(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • हॉलीवुडचे प्रख्यात कथाकार, पटकथाकार सिडने शेल्डन

    त्याने आपल्या ओघवत्या शैलीने अनेक कादंबऱ्या लिहुन अक्षरशः जगाला वेड लावले आणि चार्ली चॅप्लिनच्या चित्रपटाशी स्पर्धा असताना, त्याला सर्वोत्कृष्ट कथेसाठी ऑस्कर एवॉर्ड मिळाला.

  • हरिवंश राय बच्चन

    हरिवंश राय बच्चन यांनी १९३८ मध्ये अलाहाबाद विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात एम. ए केले आणि १९५२ पर्यंत अलाहाबाद विद्यापीठात नोकरी केली. त्यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९०७ रोजी झाला. १९५२ मध्ये इंग्लंड मध्ये कैम्ब्रिज विश्वविद्यालय येथे अभ्यास करण्यास गेले. परत आल्यावर भारत सरकारने नियुक्त केले. १९२६ मध्ये हरिवंश राय यांनी श्यामा यांचेशी लग्न केले.त्यांच्या निधना नंतर १९४१ मध्ये, बच्चन यांनी सूरी यांचेशी विवाह केला. हरिवंश राय बच्चन काही काळ मानद राज्यसभा चे सदस्य होते. हरिवंश राय बच्चन यांना १९७६ मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता. १९६९ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. हरिवंश राय बच्चन यांच्या सुरवातीच्या काळातील 'उमर ख़ैय्याम' ही कविता खूप प्रसिद्ध झाली. प्रसिद्ध 'मधुशाला' ही 'उमर ख़ैय्याम' ने प्रेरित होऊन लिहलेली आहे. 'मधुशाला' मुळे हरिवंश राय बच्चन यांना खूप प्रसिद्धी मिळाली. मा.हरिवंश राय बच्चन यांचे १८ जानेवारी २००३ मध्ये निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    हरिवंश राय बच्चन यांचे काही इतर काव्य संग्रह.
    मधुबाला, मधुकलश, निशा निमंत्रण, एकांत संगीत, सतरंगिनी, विकल विश्व, खादी के फूल, सूत की माला, मिलन, दो चट्टानें व आरती और अंगारे
    'मधुशाला' च्या काही काव्य पंक्ती.
    मदिरा पीने की अभिलाषा ही बन जाए जब हाला,
    अधरों की आतुरता में ही जब आभासित हो प्याला,
    बने ध्यान ही करते-करते जब साकी साकार, सखे,
    रहे न हाला, प्याला, साकी, तुझे मिलेगी मधुशाला।। ।

    सुन, कलकल़ , छलछल़ मधुघट से गिरती प्यालों में हाला,
    सुन, रूनझुन रूनझुन चल वितरण करती मधु साकीबाला,
    बस आ पहुंचे, दुर नहीं कुछ, चार कदम अब चलना है,
    चहक रहे, सुन, पीनेवाले, महक रही, ले, मधुशाला।। ।

    जलतरंग बजता, जब चुंबन करता प्याले को प्याला,
    वीणा झंकृत होती, चलती जब रूनझुन साकीबाला,
    डाँट डपट मधुविक्रेता की ध्वनित पखावज करती है,
    मधुरव से मधु की मादकता और बढ़ाती मधुशाला।।।

    - हरिवंश राय बच्चन

  • प्रकाश गजानन खारकर

    प्रकाश गजानन खारकर

    माणसाचे अक्षर हा त्याचा मनाचा आरसा असतो असं म्हणतात. आपल्या हस्ताक्षरावर आपलं मन कसं आहे हे खरोखरच कळतं का? असा प्रश्न कुणी विचारला तर त्याला उत्तर होय असंच येईल;

  • भारतीय राजदूत रवींद्र म्हात्रे

    ब्रिटनमध्ये कार्यरत जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटच्या सहयोगी जम्मू-काश्मीर लिबरेशन आर्मीच्या अतिरेक्यांनी बर्मिंगहम मध्ये त्यांचे अपहरण केले तेव्हा भारतीय राजदूत रवींद्र म्हात्रे पहिल्यांदा ३ फेब्रुवारी १९८४ रोजी प्रसिद्धीस आले.

  • ज्येष्ठ अभिनेते ओमर शरीफ

    ‘डॉक्टर झिव्हॅगो’, ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ यासारख्या चित्रपटांवर आपल्या अभिनयाची लक्षणीय मोहोर उमटविणारे ओमर शरीफ यांना डेव्हिड लीन यांच्या ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ या चित्रपटातील शरीफ अलीच्या भूमिकेबद्दल ऑस्कर पुरस्कारासाठी १९६२ मध्ये ओमर यांचे नामांकन झाले होते.

    त्यांचा जन्म १० एप्रिल १९३२ रोजी झाला.परंतु त्यांना या चित्रपटातील कामगिरीसाठी ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याच चित्रपटात भूमिका करण्याच्या निमित्ताने मा.ओमर शरीफ यांनी प्रथमच इंग्रजी चित्रपटात अभिनय केला. त्याआधी ओमर शरीफ यांनी इजिप्तमधील २० चित्रपटांमध्ये काम केले होते. १९६५ मध्ये ‘पेल हॉर्स’ या चित्रपटात ओमर यांनी ग्रॅग्री पेकबरोबर काम केले. त्याच वर्षी पुन्हा डेव्हिड लीन यांच्या साथीने ‘डॉक्टर झिव्हॅगो’ या चित्रपटात काम करून पुन्हा एकदा ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कार पटकावला.

    ‘ब्लेझिंग सन’ या चित्रपटातील सह अभिनेत्री फतेन हमामा यांच्याशी मा.ओमर शरीफ १९५३ मध्ये विवाहबद्ध झाले.

    ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ या चित्रपटाबद्दल ओमर शरीफ यांच्या मनात एक हळवा कोपरा होता. सन २०१२ मध्ये त्यांनी ‘गार्डियन’ ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. ‘हा चित्रपट आपण केला तेव्हा ती एक ‘क्रेझी’च बाब ठरली होती. या चित्रपटात अभिनेत्री नाहीत, त्या वेळचे प्रख्यात कलाकार नाहीत किंवा मारझोड नाही. विशेष असे काहीही नाही, असे वाटले. परंतु दिग्दर्शक डेव्हिड लीन हे अत्यंत बुद्धिमान दिग्दर्शक होते. ते खरोखरच थोरच होते’ असे ओमर शरीफ यांनी म्हटले होते.

    नंतरच्या काळात, १९६९ मध्ये जगभरात गाजलेल्या ‘मॅकेनाज गोल्ड’ या चित्रपटात ओमर शरीफ यांचीही भूमिका गाजली होती. खरं तर मॅकेनाज गोल्ड आला तोवर मा.ओमर शरीफ हे हॉलिवूडमधलं एकदम उत्तुंग व्यक्तिमत्त्व झालं होतं. केवळ त्यांच्यासाठी सिनेमांच्या पटकथा लिहिल्याचं दशक त्यांनी पार केलं होतं. हा दबदबा निर्माण केला तोही अमेरिका आणि इंग्लडमध्ये जन्माला न येता.

    इजिप्तमध्ये आणि ग्रीक घराण्यात जन्मलेल्या ओमर शरीफ यांचं सगळं आयुष्य हॉलिवूडच्या अन्य कलाकारांपेक्षा वेगळं ठरलं. निळ्या, हिरव्या डोळ्यांच्या पाणीदार कलाकारांमध्ये काळ्याभोर डोळ्यांचा आणि मिशी राखलेला कलावंत नेहमीच उठून दिसला. हॉलिवूडमधली त्यांची एंट्रीच मोठी दणदणीत झाली होती. मॅकनोच्या भूमिकेतल्या ग्रेगरी पेकला कोलोरॅडोच्या भूमिकेतल्या ओमार शरीफ यांनी अक्षरशः खाऊन टाकलं. पोलिस ज्याच्या मागावर आहेत, असा कोलरॅडो आपल्या स्वभावातल्या हिंसेचं समर्थन करत नाही. ओमारने आपल्या डोळ्यांनी साधलं इतकाच तो फरक. थंडपणे शत्रूचा काटा काढायचा, आपल्या टोळीतल्या लोकांनाही दया दाखवायची नाही, इतका कमालीचा राक्षसीपणा नुसत्या नजरेने व्यक्त करण्याची पद्धत शरीफ यांनी रूढ केली, जी शोलेतून नंतरच्या हिंदी सिनेमांत झिरपली.

    ओमर शरीफ यांचे १० जुलै २०१५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • मराठी अभिनेत्री गिरिजा ओक

    प्रसिद्ध अभिनेते डॉ. गिरीश ओक यांची कन्या गिरिजा ओक. तिचा जन्म २७ डिसेंबर रोजी झाला. १५ वर्षाची असताना तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. मानिनी हा गिरिजा ओक यांचा पहिला मराठी चित्रपट आहे. गिरिजा ओक चा विवाह सुरुद गोडबोले बरोबर झाला आहे. 'गोष्ट छोटी डोंगराएवढी', 'गुलमोहर', 'मानिनी', आणि 'अडगुळे मडगुळे' या चित्रपटांत तिने काम केले आहे. 'लज्जा' या झी मराठी वरिल मालिका हि तीची पहीली मालिका होती. जाहिरात, चित्रपट, नाटक, टीव्ही मालिका अशा सर्व माध्यमात अभिनेत्री गिरीजा ओकने तिच्या अभिनयाची छाप पाडली आहे. सध्या तिचं ‘दोन स्पेशल हे नाटक रंगभूमीवर गाजत आहे. ही हरहुन्नरी अभिनेत्री बऱ्याच काळानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

  • चतुरस्र व्यक्तिमत्त्व दिलीप प्रभावळकर

    चिमणराव, गंगाधर टिपरे, तात्या विंचू.. अशा अनेक प्रसिद्ध भूमिकांनी रसिकांच्या हृदयावर छाप पाडणारे दिग्गज अभिनेते म्हणजे दिलीप प्रभावळकर. त्यांचा जन्म ४ ऑगस्ट १९४४ रोजी झाला. दिलीप प्रभावळकर यांचे शिक्षण मुंबईत झाले.

    अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी प्रभावळकरांनी जैवभौतिक शास्त्रात पदव्यूत्तर शिक्षण घेतले. भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरमधून पदविकाही घेतली त्यांनंतर त्यांनी अनेक वर्षे एका फार्मा कंपनीत नोकरीही केली. हे काम करत असतानात त्यांनी बालनाट्यात भूमिका करायला सुरूवात केली. पण खरया अर्थाने त्यांचा रंगभूमीवरचा प्रवेश विजय तेंडूलकर लिखित ‘लोभ नसावा ही विनंती’ या नाटकातून झाला. या नाटकाचे प्रयोग मोजकेच झाले. पण त्यांच्या भूमिकेला रसिकांनी चांगली दाद दिली. त्यानंतर मात्र त्यांनी आपली नोकरी सोडून पूर्णवेळ या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला.

    दरम्यानच्या काळात त्यांनी रत्नाकर मतकरी यांच्या नाटकात काम करण्यास सुरूवात केली. बाल रंगभूमी, प्रायोगिक रंगभूमी आणि व्यवसायिक रंगभूमी तसंच सिनेमा, दूरचित्रवाणी आणि लेखन अशा क्षेत्रांमध्ये आपला स्वत:चा ठसा दिलीप प्रभावळकरांनी उमटवला आहे. 'वासूची सासू', 'संध्याछाया', 'जावई माझा भला', 'घर तिघांचे हवे' या नाटकातील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या.

    वैशिष्ट्य म्हणजे या सर्व भूमिका वेगळ्या होत्या. . एक झूंज वाऱ्याशी, कलम ३०२ आणि नातीगोती यासारख्या नाटकांमधील गंभीर भूमिका प्रभावळकरांनी जीवंत केल्या. नाटकांसोबतच त्यांनी 'चिमणराव' या विनोदी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. दिलीप प्रभावळकर यांनी नेहमीच आपल्या अभियाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. त्यांनी एक डाव भुताचा, एक होता विदुषक, आपली माणसं, पछाडलेला, छक्की माणसं, झपाटलेला असे अनेक चित्रपट मराठीत दिले आहेत. त्यांच्या "चौकट राजा', "रात्र आरंभ' या सिनेमातील अभिनयाचे विशेष कौतुक झाले.

    दिलीप प्रभावळकरांचा आणखी एक पैलू म्हणजे ते एक चांगले लेखकही आहेत. त्यानी अनेक वृत्तपत्रातून स्तंभलेखनही केली आहे. विनोदी पुस्तकेही लिहिली आहेत. 'गुगली', 'हसगत' या त्यांच्या पुस्तकांना पुरस्कारही मिळाले आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट
    http://www.dilipprabhavalkar.com

  • आंतरराष्ट्रीय भाषातज्ज्ञ प्रा. अशोक केळकर

    व्याकरणाची आवड आणि भाषिक प्रश्नांबद्दलच्या कुतूहलामुळे ते भाषाविज्ञानाच्या अभ्यासाकडे वळले. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून अशोक केळकरांनी लिंग्विस्टिक्स विथ अॅन्थ्रॉपॉलॉजी या विषयात पीएच.डी.केली.

  • गझलसम्राट मेहंदी हसन

    गझलसम्राट मेहंदी हसन यांचा जन्म १८ जुलै १९२७ रोजी राजस्थान येथे झाला. मेहंदी हसन यांनी गायनाचे धडे वडील उस्ताद अझीम खॉं आणि काका उस्ताद इस्माईल खॉं यांच्याकडून गिरविले. ते दोघेही पारंपरिक धृपद गायक होते. त्यांचे कुटुंब वाद्यनिर्मिती उद्योगातही होते. फाळणीनंतर त्यांच्या कुटुंबाने पाकिस्तानात स्थलांतर केले. पंजाब प्रांतातील चिचवटनी गावात ते स्थायिक झाले. पाकिस्तानात ते एका सायकलीच्या दुकानात काम करीत होते. नंतर त्यांनी मोटार आणि ट्रॅक्टार मेकॅनिकचेही काम केले. काम करीत असतानाही त्यांनी गायनाचे धडे गिरविणे सुरू ठेवले होते. पुढील काळात ते ठुमरी गायनाकडून गझल गायनाकडे वळले. कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी, या हेतूने ते गझल गायनाचे कार्यक्रम करीत असत. गझलगायन सुरू केल्यानंतरही त्यांनी शास्त्रीय गायनाचा रियाझ कायम ठेवला होता. पाकिस्तान रेडिओवर पहिल्यांदा १९५७ मध्ये त्यांना ठुमरी गायनाची संधी मिळाली. नंतर त्यांनी पाकिस्तानी चित्रपटांसाठी गीतगायन सुरू केले. "गुलो में रंग भरीये‘ हे त्यांचे "फरंगी‘ या १९६४ च्या चित्रपटातील गीत त्यांचे पहिले चित्रपटगीत होते.

    "पत्ता, पत्ता, बूटा, बूटा‘, "अब के हम बिछडे‘, "रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ‘, "तडप ना मेरे दिल, किसी की आस में, हजार तिल्खियॉं, तेरी प्यास में..‘ अशा एकापेक्षा एक सरस आणि अविट गोडीच्या गझल मेहंदी हसन यांनी रसिकांना दिल्या. अब के बिछडे आणि पत्ता पत्ता बुटा बुटा या त्यांनी गायलेल्या गझल विशेष लोकप्रिय होत्या. मेहंदी हसन यांनी गझलेला एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली. मेहंदी हसन यांचे १३ जून २०१२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

    मेहंदी हसन यांच्या गाजलेल्या काही गझला
    https://www.youtube.com/watch?v=K-92Z3OXWZQ
    https://www.youtube.com/watch?v=_52zfKw5KoE&t=526s

  • प्राच्यविद्या संशोधक काशिनाथ त्र्यंबक तेलंग

    १८९२ साली त्यांची मुंबई विश्वविद्यालयाचे पहिले भारतीय कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली.