(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • इतिहास संशोधक डॉ.पांडुरंग पिसुर्लेकर

    पिसुर्लेकरांनी या अभिलेखागाराखालील दप्तरखाना सुधारला; त्यातील कागदपत्रे खंडवार लावली आणि त्यासंबंधी सूची व दोन मार्गदर्शिका प्रसिध्द केल्या. गोवा स्वतंत्र झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाने पणजी येथे इतिहास संशोधनकेंद्र स्थापन केले. त्याचे संचालकपद पिसुर्लेकरांकडे होते. गोमांतकातील पहिले हिंदू इतिहास संशोधक असणारे डॉ. पिसुर्लेकर पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेली सर्व ऐतिहासिक कागदपत्रे भारतीय पुराभिलेखागारात आणण्यासाठी आयुष्यभर झटले. पोर्तुगीज दफ्तरातील साडेचारशे वर्षातील सर्व कागदपत्रे अभ्यासून त्यांनी ‘पोर्तुगीज मराठे संबंध’ हा अप्रतिम साधनग्रंथ लिहिला.

  • कवी एकनाथ पांडुरंग रेंदाळकर

    एकनाथ रेंदाळकरांनी आंग्ल कवी टेनिसनच्या ‘एनॉक आर्डन’ काव्याने ‘सारजा’ ह्या नावाने रूपांतर केले. इंग्रजीबरोबर काही संस्कृत, बंगाली, गुजराती काव्यरचनाही त्यांनी मराठीत आणल्या.

  • ज्येष्ठ वृत्तनिवेदक – सूत्रसंचालक प्रदीप भिडे

    गेली चाळीसहून अधिक वर्षे ‘नमस्कार, आजच्या ठळक बातम्या’ असे सांगणारा भारदस्त आवाज व प्रसन्न मुद्रा असलेले, बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काही वर्षे नोकरी करून त्या काळात ती सोडण्याचे धाडस दाखवलेले, नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या नाटय़संस्थेतून काही काळ नाटकांशी जोडले गेलेले आणि हजारो जाहिराती, माहितीपट-लघुपट यांचा ‘आवाज’ असलेले ज्येष्ठ वृत्तनिवेदक-सूत्रसंचालक. 

  • कृष्णा दामोदर अभ्यंकर

    अभ्यंकर कृष्णा दामोदर आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त खगोलभौतिकीतज्ञ, हैद्राबाद येथील उस्मानिया विद्यापीठामध्ये खगोलशास्त्र विभागप्रमुख.

  • ज्येष्ठ गायक, संगीतज्ञ आणि लेखक पं.सत्यशील देशपांडे

    शास्त्रीय संगीतात आपल्या अनोख्या आणि स्वयंभू गायकीने उच्चस्थान निर्माण करणारे पं. कुमार गंधर्व हे पं.सत्यशील देशपांडे यांचे गुरू!
    त्यांचा जन्म ९ जानेवारी १९५१ रोजी झाला. लहान मुले खेळताना भिंतीआडून डोकावणाऱ्या एखाद्या भिडूला ज्या सहजतेने आपल्या खेळात समाविष्ट करून घेतात, तेवढय़ाच सहजतेने एखाद्या रागातील एखाद्या वज्र्य स्वराला हळूवार कुरवाळणाऱ्या पं. कुमार गंधर्व यांची संगीताकडे पाहण्याची दृष्टीच वेगळी आणि उदात्त होती. हाच उदात्त दृष्टिकोन आपल्या जीवनाचे साध्य बनवून संगीताची आराधना करणाऱ्या पं. सत्यशील देशपांडे यांनी ख्याल गायकीचे अक्षरश: झाड फुलवले. विशेष म्हणजे, मा.कुमारजींप्रमाणेच मा.पं.सत्यशील देशपांडेही संगीताच्या बाबतीत कोणत्याही बंधनात अडकून पडले नाहीत. भारतीय शास्त्रीय संगीतातील ख्याल गायकी हा प्रकार लोकप्रिय असला, तरी कलाकारांसाठी तो साधनेचा विषय आहे. मा.पं. सत्यशील देशपांडे यांनी ख्याल गायकी साधनेने आत्मसात केली. त्यांनी ज्या सहजतेने आणि तन्मयतेने ख्याल गायकी गायली, त्याच तन्मयतेने त्यांनी ‘लेकीन’ किंवा ‘विजेता’ अशा चित्रपटांमधील गाणीही गायली. ख्याल गायकी सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रफुल्ल डहाणूकर आर्ट फाऊंडेशनसाठी ‘पाच मिनिटांचे शास्त्रीय संगीत’ असा एक पाच मिनिटांचा तुकडा तयार केला होता. संगीताकडे वेगळ्याच दृष्टीने पाहणारा हा सुरांचा गुरू शास्त्रीय संगीत हा फक्त ऐकण्याचा किंवा गाण्याचा विषय नसुन अनुभवण्याचा देखील विषय आहे हे मा.पं.सत्यशील देशपांडे जेव्हा सांगतात ते रसिकांना नक्की पटत असेल. हा अनुभव स्वत: घेण्यासाठी व लुटण्यासाठी सत्यशीलजींनी आयुष्यभर अक्षरशः जीवाचं रान केलं. मुख्य म्हणजे त्यांचे गुरु कुमारजी नेहमीच आधी कुठलीही गोष्ट करुन दाखवायचे व मग त्यावर भाष्य करायचे. कुमारजींच्या ह्या आगळ्यावेगळ्या शिष्याचीही तीच पद्धत आहे. नुसत्या समीक्षेपेक्षा हे वेगळं व अवघड काम आहे. एखादी नवीन बंदिश बसवणं म्हणजे काय असतं ते गवयांना चांगलेच माहितेय. मग प्रत्येक रागातील पाचपन्नास बंदिशी नुसत्या बसवुनच नाही तर त्यातील सौष्ठव व सौंदर्यासहित स्वत: गाऊन अनुभवण्याचा वसा त्यांनी घेतला व अजुनही तो चालुच ठेवलाय. तसेच त्या बंदिशीचे पोषण कुठल्या गायकिने चांगले होते ही सौंदर्य दृष्टी सुद्धा त्यांच्याकडे आहे. त्यासाठी त्यांनी विविध गायकींचा अभ्यास करुन त्या आत्मसात केल्यायत. त्यामुळे वेगवेगळ्या गायकींचा तुलनात्मक आभास करणं त्यांना शक्य झालंय. टोकाचा व्यासंग, तल्लख बुद्धी व उत्तम प्रतिभा हा त्रिवेणी संगम सत्यशीलजींपाशी आहे.

    तरुण संगीतकार कौशल इनामदार हे पं.सत्यशील देशपांडे यांचे शिष्य.

    कौशल इनामदार आपल्या गुरु बद्दल सांगताना म्हणतात, गुरु अंतर्दृष्टी देतो ती फक्त कलेकडे पाहण्याची नाही तर जगण्याकडे पाहण्याची. त्यांनी गाण्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन दिला. ते स्वतः कुमारजींचे शिष्य. तरीही त्यांच्या गाण्यात कुमारजींची नक्कल नाही. कुमारजींनीपण त्यांना सांगितलं होतं की तुमचे खड्डे तुम्ही खणा! थोडक्यात काय तर अगदी गुरूचीसुद्धा नक्कल न करता स्वतःचं वेगळेपण स्वतः सिद्ध करा. त्यामुळे मी विचार करताना कधीही सत्यशील देशपांडे यांच्यासारखा करत नाही. मी माझ्या सारखा विचार करतो. मला वाटतं की आपल्यासमोर वाट असतेच, ती आपण शोधत जातो. गुरु आपल्याला जाणीव करून देतो की तुमची वाट तुम्ही शोधा. त्यासाठी आवश्यक त्या गोष्टी गुरु पुरवतात. मी गाण्याचा विचार माझ्यासारखा करतो कारण मी त्यांचा शिष्य आहे. एखादी चाल फसली तर ते सांगतात की त्यात काय करता येईल. त्यातलं एक सूत्र सांगतात ज्यामुळे अनेक गोष्टी स्पष्ट होतात. मी संगीत द्यायला लागल्यापासून माझ्या चालींवर त्यांचा एक वेगळ्या प्रकारचा प्रभाव आहे. ते स्वतः उत्तम संगीतकार आहेत. त्यांना संगीतातले बारकावे अचूक कळतात. त्यांनी दाखवलेलं प्रतिबिंब इतकं स्वच्छ असतं की ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट’ अशी काहीशी स्थिती होते! त्यामुळे असं म्हणायला हवं की गुरु म्हणजे वाटाडय़ा नाही. तो सतत तुमच्याबरोबर राहत नाही. वेगवेगळे मार्ग ते तुम्हाला सांगतात. तिथे जाताना तुम्हाला प्रश्न पडतात. माझ्या गुरुचं वेगळेपण हेच की त्यांनी आम्हाला असे प्रश्न पाडले. आज जवळजवळ १६ वर्ष मी त्यांच्याकडे शिकतोय पण जाऊन त्यांच्याकडे शिकायला बसलोय असं कधीच झालं नाही. मी कधीही त्यांना भेटायला जातो आणि शिक्षण सुरु होतं. त्यांनी मला अगदी मुलासारखं वाढवलं आहे. सध्या ‘अजिंठा’ या चित्रपटासाठी ते माझ्याकडे गातायत. मला वाटतंय ‘हे गीत जीवनाचे’ नंतर पहिल्यांदाच ते चित्रपटासाठी गातायत. त्यांनी माझ्याकडून चाल समजून घेतली, त्यावर मी जेवढा विचार केला नसेल तेवढा त्यांनी केलाय, त्याच्या शंभरेक तालमीसुद्धा केल्यात! ते नुसते गायक किंवा संगीतकार नाहीत तर एक विचारवंत, लेखकसुद्धा आहेत. त्यांचा भाषेचा सेन्स अतिशय उत्तम आहे. होतं.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • इंटेल कंपनीचा एक संस्थापक गॉर्डन मूर

    १९७१ साली इंटेलच्या टेड हॉफनं ‘मायक्रोप्रोसेसर’चा शोध लावला. या निर्मितीमुळे इंटेलचा कॉम्प्युटर जगतात प्रवेश झाला. मग इंटेलनं त्या कामात लक्ष घातलं.

  • गोपीनाथ मुंडे

    गोपीनाथ मुंडे हे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते होते. ते खर्‍या अर्थाने `लोकनेते’ होते. विद्यार्थी दशेपासुनच विविध चळवळींमध्ये सक्रीय असलेल्या गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर यशाची विविध शिखरे गाठली होती.

  • संगीततज्ज्ञ गुरुवर्य प्रा. बा. र. देवधर

    संगीततज्ञ गुरुवर्य प्रा.मा.बा. र. देवधर यांची एक विशेष ओळख म्हणजे पं कुमार गंधर्व ह्या महान गायकाचे ते गुरु …जवळ जवळ १२ वर्ष आपल्या जवळ ठेवून त्यांनी आपल्या ह्या शिष्याला घडवले. भारतातील आवाज साधना शास्त्र किंवा व्हॉइस कल्चरचे ते आद्य प्रणेते आहेत …. त्यांनी सिनेमाला संगीत देण्याचे कार्यही केले … किंबहुना भारतीय चित्रपट सृष्टीचे ते पहिले संगीतकार आहेत.

  • सदाशिव पां. टेटविलकर

    असं म्हणतात माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हाच त्याने आयुष्यात काय करायचे आहे हे निश्चित झालेले असतं ! त्यामुळेच की काय पुढे जाऊन त्याच्या आयुष्याला एक वळण मिळतं आणि तिथुन त्याचा, त्याच्या नशिबात लिहिलेल्या मार्गाने प्रवास सुरु होतो. असंच काहीसं इतिहास लेखक सदाशिव टेटविलकरांच्या बाबतीत झालं असावं.

  • बाळासाहेब ठाकरे यांच्या ८८ व्या जयंती निमित्ताने

    आदरणीय, देवतूल्य, हिंदूहृदयसम्राट आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 88 व्या जयंतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देऊया ! आज बाळासाहेब ठाकरे देह रूपाने आपल्या नसले तरी त्यांचे कार्य, त्यांचे विचार, त्यांचा आवाज, त्यांचे लिखाण, त्यांची व्यंगचित्रे यांच्या रूपात ते आपल्यात आहेतच. आपल्या मनातील गाभार्‍यात त्यांना फार पूर्वीच देवत्व लाभल होत असं म्ह्टल तर ते वावग ठरणार नाही. त्यांच ते देवत्व प्रत्यक्षात साकार करण्यासाठी काहींनी बाळासाहेबांची आणि मॉसाहेबांची स्थापना प्रत्यक्ष देवळात करण्याचा घाट घातला आहे. बाळासाहेब स्वतः देव वगैरे मानत नव्ह्ते म्ह्णून काही प्रसारमाध्यमांतून त्यावर टिकेचा सूरही लावला. पण ते काही का असेना त्यामूळे बाळासाहेबांच देवत्व अधोरेखीत झाले हे निशिचत.

    बाळासाहेबांनंतर शिवसेना मोडकळी येईल असे बर्‍याच जणांना वाटत होते पण प्रत्यक्षात तसे होताना काही दिसले नाही. आजही शिवसैनिक बाळासाहेब या जगात नसतानाही पूर्वी सारखेच शिवसेनेशी इमान राखून आहेत. बाळासाहेब एकमेव असे राजकारणी होते की त्यांच्या शत्रूंच्या मनातही त्यांच्याविषयी प्रेम होते. बाळासाहेबांच्या 88 व्या जयंतीच्या निमित्ताने प्रत्येकाने त्यांचे स्मरण करणे हे अनिवार्यच आहे कारण भविष्यात आपल्या देशातील राजकारणाचा अभ्यास करणारयांसाठी बाळासाहेब हेच सर्वात जास्त कुतूह्लाचा आणि अभ्यासाचा विषय ठरतील यात शंका नाही. बाळासाहेबांना प्रत्यक्ष न भेटलेले, त्यांना प्रत्यक्ष न पाहिलेले कित्येक जण वेगवेगळया माध्यमातून त्यांचे विचार जाणूनच त्यांचे चाहते झालेले आणि त्यांच्या प्रेमात पडलेले दिसतात.

    बाळासाहेब फक्त एक प्रेमळ राजकारणीच नव्हते तर ते हाडाचे कलाकारही होते एक उत्तम व्यंगचित्रकार, पत्रकार आणि विचारवंत ही होते. त्यांच्याकडे भविष्याकडे डोळसपणे पाहण्याची अलौकीक क्षमता होती म्ह्णूनच अतिशय सर्वसामान्य माणसातील राजकारणी हेरून त्याला प्रोत्साहन देत त्यांनी त्याच्यातील राजकारणी घडविला. खरं सागांयच तर त्यांनी कित्येक मराठी तरूणांची आयुष्ये घडविली. महाराष्ट्रातील सर्वसामान्य गृहीणींनाही राजकारणात आणण्याच महान कार्य खर्‍या अर्थाने बाळासाहेबांनीच केले आहे. आजही शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या इतर राजकीय पक्षातील महिला कार्यकर्त्यांच्या तुलनेत प्रभावी भासतात कारण बाळासाहेबांनी त्याच्या मनात फक्त राजकारण न पेरता सर्वच बाबतीतला स्वाभिमानही पेरला आहे.

    शिवसेना हा जरी राजकीय पक्ष असला तरी तो अनेकांच्या विचारसरणीवर उभा राहिलेला आणि वाढलेला पक्ष नाही. शिवसेना हा पक्ष पूर्वीही बाळासाहेबांच्या विचारावर उभा होता आणि आजही उभा आहे. त्यांच्या विचारांना बाजूला सारून हा पक्ष भविष्यातही कदाचित वाटचाल करू शकणार नाही. बाळासाहेबांचे विचार हेच या पक्षाचे खरे बलस्थान आहे. त्यामुळेच कदाचित आदरणीय उध्दव ठाकरे साहेबांनी शिवसेना प्रमुख हे पद न स्विकारता शिवसेना अध्यक्ष हे नवीन पद निर्माण केले असावे. बाळासाहेब राजकारणी असतानाही हिंदूत्वाच्या मुद्दयावर नेहमीच ठाम राहिले आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांनी त्या बाबत तडजोड कधीच केली नाही. प्रसंगी त्यांनी आपली राजकीय मैत्रीही त्यासाठी पणाला लावली. बाळासाहेंबाना जनतेने बहाल केलेली हिंदूहृद्यसम्राट उपाधी त्यामूळेच सार्थकी ठरते. आजच्या पिढीत राजकारणात असणारया - नसणार्‍या सर्वच तरूणांच्या मनात व्यक्तीशः ज्यांच्याबद्दल कमालीचा आदर आहे असे एकमेव व्यक्तीमत्व म्ह्णजे बाळासाहेब ठाकरे. त्यांच्या 88 व्या जयंतीच्या निमित्ताने आंम्ही जर त्यांचे स्मरण करत त्यांच्यासमोर नतमस्तक झालो नसतो झालो तरच खरया अर्थाने करंटे ठरलो असतो नाही का ?

    -- निलेश बामणे