जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
‘कलावैभव’चे निर्माते मोहन तोंडवळकर यांचं आकस्मिक निधन ही सहा महिन्यांतली मराठी नाटय़सृष्टीवर आघात करणारी दुसरी मोठी दुर्दैवी घटना आहे. पाच महिन्यांपूर्वी ‘चंद्रलेखा’ संस्थेचे निर्माते मोहन वाघ यांचंही असंच आकस्मिक निधन झालं.
मराठी नाटय़व्यवसायातील दुसरा बडा निर्माता असा लागोपाठ गेल्यानं नाटय़क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. नाटकाचं वेड असलेले आणि नाटक सतत जगणारे असे हे दोन निर्माते होते. काहीएक रिस्क घेऊन वेगळ्या प्रकारची नाटके करण्याची धमक त्यांच्यात होती. त्यासाठी सर्वस्व पणाला लावण्यासही ते मागेपुढे पाहणारे नव्हते.
दुर्दैवाची बाब म्हणजे त्यांच्या पश्चात त्यांचा हा नाटय़निर्मितीचा वारसा पुढे नेणारे त्यांच्या कुटुंबीयांत कुणी दिसत नाही. मोहन तोंडवळकर हे व्यावसायिक नाटय़निर्मात्यांमधले ‘प्रायोगिक निर्माते’ म्हणून ओळखले जात. राज्य नाटय़स्पर्धा तसेच इतरत्र होणाऱ्या नव्या नाटकांच्या प्रयोगांना आवर्जून उपस्थिती लावून त्यातलं एखादं नाटक वा कलाकार त्यांच्या रत्नपारखी नजरेस पसंत पडला की व्यावसायिक गणितं बाजूला ठेवून, ते त्यांना व्यावसायिक रंगभूमीवर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत.
विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, सई परांजपे, महेश एलकुंचवार, सुरेश खरे ते किरण पोत्रेकर, योगेश सोमणपर्यंत त्या-त्या काळातील नव्या लेखकांना त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर आणण्याचं धाडस दाखवलं. साहस हे त्यांच्या रक्तातच होतं. ते करताना त्यांनी परिणामांची कधीच पर्वा केली नाही.
‘काचेचा चंद्र’, ‘हिमालयाची सावली’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘मला उत्तर हवंय’, ‘महासागर’, ‘पुरूष’, ‘जास्वंदी’, ‘माणसाला डंख मातीचा’, ‘सावित्री’, ‘पर्याय’, ‘दुसरा सामना’, ‘गोष्ट प्रेमाची?’, ‘नातीगोती’, ‘राहिले दूर घर माझे’, ‘राव जगदेव मरतड’, ‘शॉर्टकट’, ‘एक हट्टी मुलगी’, ‘अपूर्णाक’, ‘कस्तुरीमृग’, ‘नांदा सौख्यभरे’, ‘नल-दमयंती’, ‘पाऊलखुणा’, ‘महायोग’, ‘मी राष्ट्रपती’, ‘सौभाग्य’, ‘वन रूम किचन’, ‘कार्टी काळजात घुसली’, ‘लफडा सदन’, ‘गेला माधव कुणीकडे’, ‘लपंडाव’, ‘अचानक’, ‘प्रासंगिक करार’ ते ‘शंभुराजे’पर्यंत कलावैभवने निर्मिलेल्या नाटकांचं वैविध्य पाहिलं तर त्यांच्या नाटय़निर्मितीच्या कक्षा किती लांब-रुंद आणि सखोल होत्या, याची कल्पना येते. नाना पाटेकरांपासून डॉ. अमोल कोल्हेंपर्यंत अनेक कलावंतांना त्यांनी आपल्या नाटकांतून पुढे आणलं. परंतु याचं श्रेय मात्र त्यांनी कधीच घेतलं नाही. ‘जो-तो आपापल्या कर्तृत्वानं पुढे येतो. मी फक्त निमित्तमात्र ठरलो. त्यात कसलं श्रेय घ्यायचं?,’ असा त्यांचा सवाल असे. त्यांचं वाचन उत्तम होतं. त्यामुळे संहितेतलं वेगळेपण त्यांना लगेचच जाणवे.
लेखकाच्या प्रभावी नाटय़वाचनाला भुलून त्यांनी कधीच नाटकं स्वीकारली नाहीत. याबाबतीत ते स्वत:व्यतिरिक्त दुसऱ्या कुणावरही सहसा विसंबले नाहीत. नाटकाच्या बुकिंग प्लॅनवर एक नजर टाकली तरी त्यांना त्या नाटकाचं भवितव्य कळे. त्यामुळेच आपल्याला आवडलेलं नाटकही त्यांनी चालत नसताना कधी हट्टाग्रहानं सुरू ठेवलं नाही. लगेचच ते नाटक बंद करीत आणि पुढच्या नाटकाकडे ते वळत. अर्थात त्यापुढचं नाटकही ते धंद्याचं गणित मांडून करतील, असंही कधी घडलं नाही. कलावैभव संस्था काढण्याआधी ते जुनी नाटकं कंत्राटी पद्धतीनं लावीत. त्यासाठी बीपीटीतल्या आपल्या सहकाऱ्यांकडून ते कर्ज वगैरे काढत. मात्र व्यवहार चोख असल्यानं त्यांना हवे तेव्हा पैसे उभे करता येत. पण तोंडवळकरांनी एकाच उद्योगात स्वत:ला कधी अडकवून घेतलं नाही. त्यांनी नाटकांबरोबरच सीरियल्स, टेलिफिल्म्सचीही निर्मिती केली. त्यांना चित्रपटनिर्मितीच्या क्षेत्रात उतरण्याची ऑफर दस्तुरखुद्द दादा कोंडके यांनी दिली होती. परंतु तोंडवळकर चित्रपट क्षेत्रापासून मात्र का कुणास ठाऊक, कटाक्षानं दूर राहिले.
पल्लवी अॅडव्हर्टायझिंग ही जाहिरात संस्था काढून जाहिरातीची कामंही ते करीत. एखाद्याची एखादी गोष्ट आवडली तर त्या व्यक्तीला आवर्जून फोन करून ते कळवीत. नाटय़क्षेत्रात ही गोष्ट तशी दुर्मीळच म्हणावी लागेल. कुठलीही गोष्ट करताना फळाची अपेक्षा न धरता करणं, ही साधारणत: योग्यालाच साध्य होणारी गोष्ट तोंडवळकरांना साध्य झालेली होती. ते नेहमी म्हणत, ‘मी ‘आज’ जगतो. काल किंवा उद्याबद्दल मी बिलकूल विचार करीत नाही.’ त्यामुळेच ते नेहमी ‘आज’ला सामोरे गेले आणि म्हणूनच कायम समकालीन राहू शकले. जे. कृष्णमूर्तीच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता.
वरकरणी ते आध्यात्मिक वृत्तीचे वाटत नसले तरी अंतर्यामी मात्र ते सगळ्यापासून अलिप्त असत. त्यांच्या जाण्यानं मराठी रंगभूमीचं केवढं मोठं नुकसान झालं आहे, हे लगेचच जाणवणार नसलं तरी प्रायोगिकांना व्यावसायिक रंगभूमीवर काहीएक सादर करायचं असेल, त्या प्रत्येक वेळी एक खंदा आधारस्तंभ हरवलाय, याची जाणीव त्यांना-आणि पर्यायानं सशक्त आशयाच्या नाटकांच्या भुकेल्या रसिक प्रेक्षकांना जाणवल्याशिवाय निश्चितच राहणार नाही.
ओ. पी. नय्यर यांचे पूर्ण नाव ओंकार प्रसाद नय्यर. त्यांचा जन्म १६ जानेवारी १९२६ रोजी पश्चिम पंजाबमधील लाहोर येथे झाला.
१९४९ मधे " कनीज" या चित्रा पासून संगीतकार म्हणून कारकीर्द ओ.पी.नी सुरवात केली पण त्यांचे पहिले गीत गाजले ते चंद्रू आत्मा यांचे प्रीतम आन मिलो. ओपीना या गीतसाठी २५ रू इतके प्रचंड मानधन मिळाले. दलसुख पांचोली यांच्या "आसमान" या चित्रा द्वारा ओ.पीं.चे आगमन हिंदी फ़िल्म संगीताच्या मंचावर झाले खरे पण या चित्रपटासकट " बाज" व "छम छमा छम" हे त्यांचे चित्रपट तिकिट बारीवर आडवे झाले. मग निराश हौउन पुन्हा पंजाबला परत जावे व शाळेत मिळाली तर एकाद्या संगीत मास्तराची नोकरी करावी या निर्णयाप्रत ओपी आले. उरलेली पंधराशे रुपये गुरूद्त्त कडे मागण्यासाठी ते गेले तेंव्हा "आपल्या मोठ्या मुलाला दूध पाजायला ही पैसे नाहीत" असे त्यानी गुरूदताला सुनावले. तर त्याने काय करावे त्याने आपला आगामी चित्रपट " आरपार" ओपीना बहाल केला. ओपींकडे काही " सांगितिक मागण्या" गुरूनी केल्या. नय्यर " आरपार" मधून एक नवाच बाज फ़िल्म संगीतात घेउन आले.
ओपी नय्यर हे चित्रसंगीतातील आद्य " फ़्युजनिस्ट " म्हणून उदयास आले.फ़्युजन करतानाही तालांची बेमालूम सरमिसळ करायची व पुन्हा साडेतीन मिनिटाचे गाणे अ पासून ज्ञ पर्यंत एकसंध करायचे ही त्यांची खास स्पेशालिटी ठरून गेली. ओपीं नी १९५२ ते २००७ य काळात एकूण सुमारे ८० चे वर चित्रपटाना संगीत दिले. इतर भाषेतील चित्राना संगीत दिले. तेलगू भाषेतील " निराजनम " या चित्राच्या संगीताने रेकॉर्ड विक्रीचा उच्चांक केला. मींड, तान, आंदोलन हे हरकतीचे प्रकार सढळपणे वापरणारे संगीतकार म्हणजे ओपी नय्यरच. मुख्य म्हणजे असे गीत नृत्यगीत असायला पाहिजे असे नाही. कवाली, युगलगीत अशा प्रकारच्या गीतातही हरकतींची भरपूर वापर आढळतो.
खरी ओपी नय्यर खासीयत दिसते ती काश्मिरकी कली, मेरे सनम, एक मुसाफ़िर एक हसीना, फ़ि रवही दिल लाया हु, हमसाया, कही दिन कही रात ,द किलर्स ,हम सब चोर है, सी आयडी ९०९, सावनकी घटा व प्राण जाय पर वचन न जाय ई या चित्रपटातून.
ओपी ना " रिदम किंग " या नावाने ओळखले जाते तसे मायस्त्रो ऑफ मेलडी असे ही म्हटले जायचे. ओ.पी हे सार् पणे स्वता" ला वेगळाच व श्रेष्ठ संगीतकार मानत. संगीतकार घडवून होत नाही तो निसर्गाने जन्मालाच घालावा लागतो असे ते वारंवार म्हणत.
सिनेजगतात कॅडिलॉक ही गाडी फ़क्त ओ. पी. नय्यर व व्ही शांताराम यांचेकडेच होती.
ओ. पी. नय्यर यांचे २८ जानेवारी २००७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
रुसी फ्रेमरोज सुर्ती हे भारताकडून क्रिकेट खेळलेच त्याचप्रमाणे गुजराथ, राजस्थान आणि क्वीन्सलँडकडूनही क्रिकेट खेळले. ते ऑल-राउंडर होते. रुसी सुर्ती गोलंदाजी करताना चेंडू डाव्या हाताने सिम आणि स्विंग करत असत तर प्रसंगी स्पिन देखील करत असत. ते उत्तम क्षेत्ररक्षकही होते , एकनाथ सोलकरप्रमाणे. ते स्वतः सर गॅरी सोबर्स ला आदर्श मानत असत. त्यांचा खेळ पाहून त्यांना ‘ गरिबांचा गॅरी सोबर्स ‘ देखील म्हणत.
राष्ट्रीय संस्कृत पंडित असणार्या कविश्वर श्रीदत्तात्रेय धुंडिराज कविश्वर यांनी निंबाकाचार्यांच्या ब्रह्मसूत्रावरील टीकेचे वेदान्त पारिजात सौरभ चे संशोधनाचे काम पाहिले होते.
माधवाचार्यांच्या सर्वच दर्शनसंग्रहवर विस्तृत टीका लिहिली. कामकोटी पीठाने सुवर्णपदक मिळवुन देत द्वारकेच्या श्री. शंकराचार्य ह्यांनी महामहोपाध्याय ही पदवी देऊन तर भारत सरकारकडून राष्ट्रीय संस्कृत पंडित हे सन्मानपत्र देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान केला होता .
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
अधिक माहितीसाठी पहा ..
काही संगीतकारांच्या मनात काही राग हे कायमचे वस्तीला आलेले असतात आणि त्यांचे प्रारूप, त्यांच्या स्वररचनांमधून आपल्याला सारखे जाणवत असते. खैय्याम यांच्याबाबत हे विधान काहीसे ठामपणे करता येईल. "पहाडी" सारखा लोकसंगीतातून स्थिरावलेला राग, त्यांच्या गाण्यांतून बरेचवेळा डोकावत असतो, अर्थात चालींचे वेगळेपण राखून. काहीवेळा त्यांच्यावर टीका देखील झाली परंतु एखाद्या रागावर अनन्वित श्रद्धा असेल तर त्याच रागातून किती छटा दाखवता येतात आणि आपले बुद्धिकौशल्य मांडता येते, याचे सुंदर उदाहरण म्हणून खैय्याम यांचे नाव घ्यावेच लागेल.
संस्कारक्षम काळात पंडित अमरनाथ यांच्याकडे शागिर्दी केली आणि आपला कलासंगीताचा पाया घोटवून घेतला. याचे फायदा पुढे जेंव्हा चित्रपटसृष्टीत यायचे ठरविले तेंव्हा तिथे आधीच कार्यरत असलेले पंडित अमरनाथ आणि त्यांचे बंधू - हुस्नलाल/भगतराम यांना साथ करणे क्रमप्राप्तच ठरते. त्याचबरोबरीने विख्यात कवी फैझ-अहमद-फैझ यांच्या संगतीने काव्याचा अभ्यास करून घेतला. याचा पुढे हिंदी चित्रपट सृष्टीत कार्यरत होताना, निश्चित फायदा झाला असणार . अर्थात एकूण कारकिर्दीकडे नजर टाकल्यास, एकूण ५० एक चित्रपटांना संगीत रचना करणे, हे काही प्रचंड कार्य नव्हे परंतु जे चित्रपट केले, त्याच्यावर स्वतः:ची नाममुद्रा उमटवली, हे विशेष म्हणायला लागेल.
"शामे गम की कसम' सारखे गाणे कारकिर्दीच्या सुरवातीच्या काळात देऊन, त्यांनी स्वतः:ची ओळख जगाला करून दिली. त्यांनीच एकेठिकाणी म्हटल्याप्रमाणे, गाण्यात कुठलेही पारंपरिक तालवाद्य वापरले नसून, "डबल बेस" आणि "स्पॅनिश गिटार" सारख्या स्वरिक वाद्यांकडून ताल पुरवला गेला. या रचनेने, खैय्याम विशेष प्रसिद्धीस आले. असे म्हणता येईल.
काही मूल्यमापन करायचे झाल्यास, १) मोठा वाद्यवृंद वापरानेवा वाद्यांचा हात राखून उपयोग करणे. वरील गाणे - शामे गम की कसम", "कहीं एक मासूम लडकी" किंवा " आज बिछडे है" ही गाणी ऐकताना आपल्याला प्रत्यय येईल. यांत वाद्य गदारोळ नाही, संगीत आणि शब्द दोन्ही आपल्या मनात झिरपत जातात आणि त्याचबरोबर एक शांत भाव. कदाचित याच सांगीत काटकसरीमुळे असेल पण तलतचा नाजूक स्वरकंप किंवा भूपिंदर सिंगचा मृदू गणोच्चार मनात ठसतो. २) याच संदर्भात एक आणखी बारकावा विचारात घ्यावासा वाटतो. काही अपवाद वगळता त्यांनी छेडण्याची तंतुवाद्ये आणि पियानो यांच्या माध्यमातून दीर्घ सुरावटीचे आकृतिबंध विणण्यावर भर दिला. उदाहरणार्थ "जीत लेंगे बाझी हम तुम" या रचनेत महत्वाचा गीतारंभ फक्त पियानोवर सोपवला आहे. तसेच पहाडी रागावरील "बहारो मेरा जीवन भी संवारो" या गाण्यात सतार इत्यादी वाद्ये दीर्घ आणि आवाहक स्वरबंध निर्माण करतात.
एक आश्चर्याची बाब - समान स्वरबंध त्यांनी काही गाण्यात सहजपणे वापरले आहेत. "कभी कभी मेरे दिल में" आणि " सिमटी हुई ये घडिया" किंवा "परबतो के पेडो पर" आणि "बहारो मेरा जीवन भी संवारो" तसेच "फार छिढी रात" आणि "आयी झंजीर" ही गाणी आलटून, पालटून स्वरसाम्यासाठी तपासावीत. खैय्याम यांना सुरावटीच्या नाविन्याची अप्रूप नाही, असे नाही. कारण सुरांची समानता ज्या गीतांत जाणवते त्या गीतांत देखील ते सूक्ष्म बदल करीतच असतात. परंतु कदाचित आशय-सुरावट यांच्या दरम्यान एक अतूट नाते असते, यावर त्यांचा गाढा विश्वास असावा.
खैय्याम यांना खरी अमाप लोकप्रियता मिळाली ती "उमराव जान" चित्रपटाच्या संगीताने. त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोच्च अढळ असे स्थान. त्यामुळे गझल हे त्यांचे मर्मस्थान होय, असे विधान करता येऊ शकते. एक प्रकारची तीव्र अकर्मण्यता किंवा अक्रियाशीलता, काहीतरी मूल्यवान हरपले आहे याचे दाट दु:ख आणि संयमित शृंगार या आणि अशा भावतरंगाना त्यांचा अंगभूत प्रतिसाद असतो. वर उल्लेख केल्याप्रमाणे, या चित्रपटातील गाण्यांत छेडण्याच्या वा गजाने ध्वनित होणाऱ्या वाद्यांचा आवाहक वापर आहे. त्यामुळे मुजरा नृत्ये असूनही त्यात एक आदबशीर शृंगार अवतरलेला आहे. "दिल चीझ क्या" या गीतांत बिहाग रागातील भावस्पर्शी सुरावट आढळते. "इन आँखो की मस्ती" या गाण्यात तर भूप रागाचा तिरोभाव अतिशय मनोरमपणे सादर केला आहे. असाच प्रयत्न त्यांनी "जिंदगी जब भी" या गीतात गौडसारंग रागापासून दूर सरकत साधला आहे. सांगीतदृष्ट्या प्रदर्शन न करता, आमच्या कर्तृत्वाकडे पहा असे गर्जून न सांगता ही गीते आपला भाव-परिणाम सिद्ध करतात. मानसिक किंवा भावनिक आशयाबरोबर हातात हात घालून चालू शकेल असा सांगीत अवकाश निर्माण करा, अशी गझलची मागणी असते. त्याचा नेमका प्रत्यय या स्वररचनेतून अनुभवायला मिळतो.
मोजका वाद्यमेळ आणि संयत गायन, याच्या साहाय्याने रचनासंबद्ध निश्चितता सादर करण्याची कामगिरी सर्वांनाच जमत नाही. खैय्याम यांना ते जमले आहे याचा सहज प्रत्यय येतो आणि हेच खैय्याम यांचे खरे यश.
- अनिल गोविलकर
आज ५ नोव्हेंबर..आज आसामी संगीताचे पितामह भूपेन हजारिका यांची पुण्यतिथी.
भूपेन हजारिका यांचा जन्म ८ सप्टेंबर १९२६ रोजी झाला.
मा. हजारिका यांचा सदिया येथे एका शिक्षकाच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शिक्षणात उत्तम गती असलेल्या हजारिका यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून बी.ए. व एम. ए. केले. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी मास कम्युनिकेशन विषयातील पीएचडी केली. शिकागो विद्यापीठाची त्यांना लिस्ले फेलोशीप मिळाली होती. यात सिनेमाच्या माध्यमातून विकास हा विषय त्यांनी निवड होता. अमेरिकेतील नामवंत गायक पॉल रॉबेसन यांच्या ‘ओल्ड मॅन रिव्हर’चे त्यांनी हिंदीत ‘गंगा बेहती हो’ असे रुपांतरण केले. त्यांच्या दिग्दर्शनाखालील ‘एरा बतार सूर’ हा चित्रपट १९५६ साली प्रदर्शित झाला व तेव्हापासून त्यांची कारकीर्द यशोशिखराच्या दिशेने सुरू झाली. ईशान्य भारतातील एक नामांकित गायक, दिग्दर्शक म्हणून त्यांना आगळे स्थान होते. अरुणाचल प्रदेशमध्ये त्यांनीच ‘मेरा धरम, मेरी मॉं’ हा पहिला रंगीत चित्रपट दिग्दर्शित केला. ‘एक पल’ या हिंदी चित्रपटात हजारिकांना संधी मिळाली व त्या संधीचे सोने करीत असंख्य पुरस्कार त्यांनी पटकावले. ‘लोहित किनारे’ या लोकप्रिय टीव्ही मालिकेमधूनही ते रसिकांपर्यंत पोहोचले होते. कल्पना लाजमी यांनी सदर मालिका दिग्दर्शित केली होती. ‘गांधी टू हिटलर’ या चित्रपटाची गाणी व संगीत त्यांनी स्वत: लिहिले होते. महात्मा गांधीजींचे प्रख्यात ‘वैष्णव जन’ हे भजनही मा.भूपेन हजारिका यांनी म्हटले आहे. कवी, पत्रकार, गायक, संगीतकार, गीतकार, चित्रपट निर्माते आणि लेखक आदी सर्वच क्षेत्रात त्यांनी आपला नावलौकिक निर्माण केला. मा.हजारिका यांनी लोकसंगीताचा वापर करून त्यावरील रचनांनी देशात आपला चाहता वर्ग निर्माण केला. डॉ. हजारिका केवळ संगीत व साहित्यातील तज्ज्ञ नव्हते तर ते मोठे नट व दिग्दर्शक होते. ब्रम्हपुत्रेचा कवी अशी त्यांना उपमा दिलेली होती. ‘दिल हुम हुम करे’ आणि ‘ओ गंगा बेहती हो’ या त्यांच्या गाण्यांनी कोट्यवधी भारतीयांना मोहीत केले. ‘जाजोबार’ म्हणजे (आश्च‘र्यचकित करणार) असे स्वत: संबोधत असत. शब्दाचे सौंदर्य ते आपल्या गाण्यातून मांडत होते. लहानपणापासून मी आदिवासींचे संगीत ऐकत होतो. त्यातील तालाने मला विकसित केले. मात्र संगीताची शिकवण मी आईकडून घेतली. ती माझ्यासाठी गाणी म्हणत असे. तिच्या रचना मी ‘रुदाली’ चित्रपटात वापरल्या. वयाच्या १२ व्या वर्षी आसामी चित्रपट ‘इंद्रमालती’ मध्ये बिश्वर नियोज नोजोवान’ हे गीत गायले होते, असे हजारिका यांनी एका आपल्या मुलाखतीत सांगितले होते. १९९२ साली मा.भूपेन हजारिका यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले होते. भूपेन हजारिका यांना पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मा.भूपेन हजारिका यांचे ५ नोव्हेंबर २०११ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे. मा.भूपेन हजारिका यांना आदरांजली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
१८८८ मध्ये डनलॉप कंपनीने पोकळी रबरी धावा (न्युमॅटिक टायर्स) ची कल्पना अस्तित्वात आणली. त्यामुळे मोटारींना टायर ट्यूब बसविणे शक्य झाले.
त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तीन वर्षे तू आता फक्त रियाज कर, असे सांगणारी माझी आई ग्रेट आहे, असे आपल्या आईबद्दल सांगतात.
आज बॉलीवूडच्या फिट अभिनेत्यांमध्ये जॉन अब्राहमच्या नावाची गणना होते. जॉन अब्राहम इंडस्ट्रीतील सर्वाधिक शिकलेल्या सेलिब्रिटींपैकी एक आहे.
संस्कृत, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांवर असामान्य प्रभुत्व, असलेले मदनमोहन मालवीय निष्णात कायदेपंडित आणि प्रसिद्ध वकील होते. अखिल भारतीय कांग्रेस पक्षाची स्थापना १८८५ रोजी झाली. त्यावेळी ते काँग्रेसचे सर्वात तरुण संस्थापक सदस्य होते. त्यांची विद्वतप्रचुरता लपून राहिली नाही.
Copyright © 2025 | Marathisrushti