(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • जे. एल. रानडे

    १६ ऑक्टोबर १९५१ या दिवशीच्या ‘लोकसत्ता’ दैनिकातील ‘संगीतसुधा’मध्ये नवीन रेकॉर्डस्च्या जाहिरातीत गायक जे. एल. रानडे यांच्या ‘घायाळ मी शिकारी’ व ‘डोळे तुझे शराबी’ या गीतांचा उल्लेख आहे.

  • नाट्य दिग्दर्शक दामू केंकरे

    मराठी प्रायो‍गिक रंगभूमीचे जनक आणि बुजूर्ग नाट्य दिग्दर्शक दामू केंकरे यांचा जन्म ५ मे १९२८ रोजी झाला.

    दामोदर काशिनाथ केंकरे उर्फ दामू केंकरे यांनी तब्बल सहा दशके रंगभूमीची सेवा केली. दामू केंकरे हे मुंबईतील जे.जे.स्कूल ऑफ आर्ट या कलाशिक्षण संस्थेत ते १९५७ सालापासून १९७८ सालापर्यंत कला शिकवीत होते. या दरम्यान त्यांची नाट्यकारकीर्द चालू होतीच. गोवा हिंदू असोसिएशन संस्थेकरता त्यांनी बरीच नाटके बसवली. चाकोरीबध्द रंगभूमीच्या बाहेर जाऊन विचार करणारा दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख होती. हॅल्मेट,कालचक्र, उद्याचा संसार, आपलं बुवा असं आहे, सूर्याची पिल्ले, अखेरचा सवाल, कालचक्र, कार्टी प्रेमात पडली अशा नाटकांचे दिग्दर्शन दामू केंकरे यांनी केले होते. त्यांनी हॅल्मेट या नाटकात हॅम्लेटची मुख्य भूमिकाही केली होती. वाजे पाऊल आपुले हे नाटक १९६७ साली दामू केंकरे यांच्या अभिनयाने गाजले होते.

    अरविंद देशपांडे दिग्दर्शित तुघलक व बादल सरकार यांच्या सारी रात या नाटकाचे नेपथ्य दामू केंकरे यांनी केले होते. तुघलक व सारी रात या नाटकांच्या नेपथ्याबद्दल त्यांना अनेक पुरस्काभराने सन्मानित करण्यात आले होते. 'सुर्याची पिले' या गाजलेल्या नाटकाने त्यांनी मराठी रंगभूमीला समृध्द करण्यात मोठे योगदान दिले.

    दामू केंकरे यांचा गोवा कला अकादमीच्या उभारणीत मोलाचा वाटा होता. दामू केंकरे यांनी डारेक्टर ऑफ कल्चरल अफेअर महाराष्ट्र राज्य म्हणून काही वेळ काम केले. त्यांना जीवनगौरव पुरस्कार, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार ही मिळाला होता. साहित्य संघाचे संस्थापक डॉ. अ. ना. भालेराव यांची जन्मशताब्दी २००२ मध्ये साजरी करण्यात आली. त्या वेळी हा नाटय़ोत्सव उपक्रम सुरू करण्यात आला. दामू केंकरे यांच्या निधनानंतर पासून हा महोत्सव दामू केंकरे यांच्या नावाने साजरा केला जातो.

    दामू केंकरे स्मृती नाटय़ोत्सवाचे आयोजन दर वर्षी करण्यात येते. या नाटय़ोत्सवासाठी केंकरे कुटुंबीयातर्फे प्रायोगिक नाटय़संस्था किंवा व्यक्तीला प्रोत्साहन म्हणून नाटय़निर्मितीसाठी एक लाख रुपये देण्यात येतात. बालरंगभूमीसाठी आपलं सारं जीवन वेचणाऱ्या सुधाताई करमरकर व दामू केंकरे यांच्या पत्नी ललिता केंकरे या दोघी बहिणी. ललिता केंकरे यांनीही नाटकातून काम केले. मराठी रंगभूमीला निवडक पण चांगल्या नाटकांची पर्वणी देणारे दिग्दर्शक विजय केंकरे हे त्यांचे चिरंजीव. गोवा हिंदू असोसीएशनने दामू केंकरे यांच्या वर “३ अंकी गुरुकुल” या नावाने गौरवग्रंथ लिहिला आहे.

    दामू केंकरे यांचे २८ सप्टेंबर २००८ रोजी निधन झाले.

    अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

    #DamuKenkare

  • कमल फाटक

    फाटक, कमल

    लढवय्या साम्यवादी चळवळीतील आपल्या साथीदाराचा संसार नेटाने चालवताना डाव्या चळवळीमध्येही योगदान देणाऱ्या त्या तिघीजणी. एकाच पक्षाशी म्हणजे लाल निशाण पक्षाशी बांधिलकी असलेल्या या तीन रणरागिण्यांचे अवघ्या काही दिवसांच्या अंतराने निधन झाले आणि एक पर्व संपले.
    कमल फाटक म्हणजे स्त्रीमुक्ती संघटनेतील लोभस व्यक्तिमत्व! लाल निशाण पक्षाच्या कम्युनमधील सर्व मुलांची आई म्हणजे कमलताई.

    त्यांना ओळखणारे सर्व त्यांना कमलआई म्हणूनच ओळखत. कमलताई म्हणजे नितळ वागणे, स्वयंशिस्त, कामाचा प्रचंड उरक आणि टापटीप. कम्युनमध्ये सगळी कामे तन्मयतेने त्या करीत असत. कोणत्याही चर्चेत बोलणे जवळजवळ नाही, पण तपशील हवा असेल तर तो त्यांनीच द्यावा. कधीही अटक न झालेल्या त्या स्वातंत्र्यसैनिक होत्या. पण भूमिगत कामे करणे, पुढाऱ्यांचे गुप्त संदेश पोहोचविणे, कार्यकर्त्यांची काळजी घेणे आदी कामे त्या करीत असत. कमलताईंचा जन्म १९२१ मधला. आजी आणि आई या दोघींचेही संस्कार त्यांच्यावर झाले होते. देशप्रेमाचे बाळकडू त्यांना आई-वडिलांकडून मिळाले होते. १०-११ वर्षांच्या कमलताईंना वडील प्रभातफेरीसाठी ओंकारेश्वराच्या देवळात नेऊन सोडत असत. आई न चुकता ‘केसरी’चे वाचन करीत. सोन्याचांदीच्या कपाटात स्वराज्याच्या सनदा ठेवण्याचे विचार त्याकाळी त्या व्यक्त करीत. समजत नसले तरी जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी त्यांना स्वातंत्र्याचाच ध्यास होता. परदेशी साखरेवर बहिष्कार घातल्यामुळे त्यांनी कधी चहा घेतला नाही पण त्यांनी बनविलेल्या चहाची चव कधी बिघडली नाही. स्वयंपाक आणि मुले यांची त्यांना कधीच आवड नव्हती, पण त्यांनी केलेला स्वयंपाक आणि मुलांचे करणे दोन्हीही लाजवाब असायचे. सर्वच कामे त्यांनी कर्तव्यबुद्धीने पण मनापासून केली म्हणूनच त्या कमलआई म्हणून सर्वाच्या हृदयात विराजमान झाल्या. कमलताईंच्या आईला जडीबुटी औषधांची जाण होती. त्यांचे आजोबा (वडिलांचे वडील) ग्वाल्हेर संस्थानाचे दिवाण होते. घरात पिढीजात सावकारी होती, पण ती त्यांनी अनुभवलीही नाही. वडील देवाच्या शोधात गेले आणि नंतर परत आले. कमलताईंच्या अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या वडिलांनी खंडाळ्याच्या घाटातील (जुना रस्ता) रस्त्याचे काम केले होते. पुण्यात देवळाजवळच भाऊ फाटकांचे घर. भाऊंबरोबर कमलताईही हॅट घालून आणि सायकलवरून फिरायची. पण घरातून विवाहाला विरोध होता. सदूभाऊ गोडबोले यांनी त्यांचे लग्न लावून दिले. चणे-कुरमुरे (लेनिन मिक्श्चर) खाऊन भाऊ आणि कमलताईंनी अनेक दिवस काढले होते. कमलताईंना वैयक्तिक महत्वाकांक्षा नव्हती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी अर्धवट सोडलेले शिक्षण पूर्ण करण्याचे ठरवले. भाऊंनी त्यांना प्रोत्साहन दिले. स्वातंत्र्य चळवळीतल्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वांचे दर्शन घ्यायचे आणि जमेल तितका देश-विदेश पाहायचा हेच त्यांचे ध्येय. कॉ. एस. ए. डांगे आणि त्यांच्या पत्नीचा सहवासही त्यांना लाभला होता. ८ ऑगस्ट १९४२ रोजी अरुणा आसफअल्लींच्या हस्ते झालेले ध्वजारोहणही त्यांनी पाहिले. एस. के. लिमयेंच्या वैद्यकीय उपचाराच्या निमित्ताने त्यांनी सोविएत संघराज्य पाहिले तर ‘मुलगी झाली हो’ च्या निमित्ताने ऑस्ट्रेलिया पाहिला. १९७४-७५ मध्ये त्या स्त्री मुक्ती संघटनेच्या बैठकांतून श्रवणभक्ती करीत. ‘मुलगी झाली हो’ या नाटकातील एका भूमिकेसाठी त्या स्वत:हून पुढे झाल्या. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांचा हा उत्साह तरुण कार्यकत्यांना लाजविणारा होता. बरोबरीचे सर्व सोबती, मुलगी, जावई काळाच्या पडद्याआड जात असताना वार्धक्याने थकलेल्या कमलताई शेवटपर्यंत आपले आयुष्य सर्वाच्या कारणी लागावे यासाठी धडपडत होत्या. त्यांच्या निधनाने एक सार्थक जीवन काळाच्या पडद्याआड गेले आहे.

  • शैलेश बालाजी माळोदे

  • गायक पं. जितेंद्र अभिषेकी

    जितेंद्र अभिषेकींचे मूळ आडनाव नवाथे. पण मंगेशाला अभिषेक करण्याचा अधिकार त्यांच्याकडे आला अन् ते अभिषेकी बनले.

  • कलाकार सदानंद जोशी

    या कार्यक्रमाच्या पहिल्या प्रयोगाला आचार्य अत्रे स्वत: उपस्थित होते. कार्यक्रम झाल्यानंतर अत्र्यांनी केलेल्या भाषणात सदानंद जोशी यांना प्रशस्तिपत्र देताना अत्रे म्हणाले “सदानंद जोशी यांनी मला जिवंतपणी अमर केल आहे.” मी अत्रे बोलतोय!

  • पटकथाकार ग. रा. कामत

    ग.रा.कामत यांनी मराठीत राजा परांजपे, राजा ठाकूर यांच्या चित्रपटासाठी काम केले. त्यांनी लिहिलेले ‘पेडगावचे शहाणे’, ‘शापित’ हे मराठी चित्रपट खूप गाजले.कन्यादान हा त्यांचा आणखी एक गाजलेला मराठी चित्रपट. ‘सावरकर’ चित्रपटाचेही सुरवातीचे लेखन त्यांनी केले होते, द.ग.गोडसे आणि म.वि.राजाध्यक्ष यांच्या लेखांचं संकलन व संपादन केलेले ‘शमानिषाद’ हे कामत यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

  • अभ्यासू, समर्पित आणि शिस्तीचा कलावंत विक्रम गोखले

    आज ३० ऑक्टोबर.. आज अभ्यासू, समर्पित आणि शिस्तीचा कलावंत विक्रम गोखले यांचा वाढदिवस.
    विक्रम गोखले यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९४५ रोजी झाला.
    सध्या नव्या नाटकाच्या तालमीलाही सगळे नट एकाच वेळी उपलब्ध असत नाहीत. त्यामुळे दिग्दर्शक प्रत्येकाला त्याच्या सवडीनुसार स्वतंत्र तालीम देऊन नाटक (कसेबसे) उभे करतो. अशा जमान्यात नाटकाचा सखोल आणि सर्वागीण विचार संभवणे अवघडच; परंतु काही मोजके नट याला अपवाद आहेत. त्यापैकी एक : विक्रम गोखले!

    विजया मेहता यांच्या तालमीत तयार झालेल्या शिष्यांमध्ये विक्रम गोखले हे एक बिनीचे शिलेदार. नाटकाचा सर्वस्पर्शी विचार कसा करावा, याचे बाळकडू त्यांना बाईंकडून मिळाले. ‘बॅरिस्टर’ ही त्याची उत्तम फलश्रुती.

    मा.विक्रम गोखले यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या स्त्री अभिनेत्या, तर आजी कमलाबाई गोखले (तेव्हाच्या कमलाबाई कामत) या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या. इ.स. १९१३ साली दुर्गाबाईंनी दादासाहेब फाळके यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या 'मोहिनी भस्मासुर' नावाच्या चित्रपटात पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका केली होती.

    विक्रम गोखले यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनी ७०हून अधिक हिंदी-मराठी चित्रपटांतून भूमिका केल्या होत्या. मा.विक्रम गोखले यांनी घराणेशाहीच्या जोरावर अभिनय क्षेत्रात हडेलहप्पी करण्याचा मार्ग न पत्करता अभ्यासपूर्वक त्यातले सूक्ष्म कंगोरे आत्मसात केले. जाणीवपूर्वक भूमिका निवडून त्यांना आपल्या निरीक्षणशक्तीची, आकलन आणि विश्लेषणाची जोड देऊन त्यांवर आपला असा ठसा उमटवला. मग ती भूमिका ‘माहेरची साडी’सारख्या सिनेमातली का असेना. रंगभूमी, चित्रपट, चित्रवाणी या प्रत्येक माध्यमाची निकड त्यांनी सहजगत्या आत्मसात केली. त्यांच्या या चोखंदळपणामुळेच ते कला क्षेत्रातले संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांचे धनी होऊ शकले. ते कलेचा साकल्याने विचार करणारे, नव्या पिढीला प्रशिक्षण देणारे, त्या संदर्भात बांधीलकी जपणारे एक कर्ते रंगधर्मी आहेत. म्हणूनच रंगभूमीवर सध्या सुरू असलेल्या त्यांच्या ‘के दिल अभी भरा नहीं’ या नाटकाचे प्रयोग डोळ्याला इजा झालेली असतानाही त्यांनी थांबवले नाहीत. दुसरीकडे सामाजिक बांधीलकीचा वसाही त्यांनी जपलेला आहे. कमलाबाई गोखले पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे अपंग सैनिक आणि समाजातील उपेक्षितांसाठी गेली कित्येक वर्षे ते सक्रिय कार्य करतात. सध्या त्यांनी नाटकाचे प्रयोग करणे बंद केले आहे.

    मा.विक्रम गोखले यांना आधुनिक मराठी रंगभूमीचे प्रणेते विष्णुदास भावे यांच्या नावे दिल्या जाणारा पुरस्कार मिळाला आहे.अभिनेते मा.चंद्रकांत गोखले यांनाही भावे पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • गझल किंग’ जगजित सिंह

    १९७६ मध्ये त्यांचा पहिला अल्बम ‘अनफरगेटेबल’ प्रकाशित झाला. त्यानंतर आजतागायत त्यांच्या नावावर ‘आईना’, ‘चिराग’, ‘कहकशॉं’ असे जवळपास ८० अल्बम आहेत. मेहंदी हसन, नूर जहॉं, बेगम अख्तर आणि तलत महमूद या गझलांच्या चमचमत्या दुनियेत ‘पत्ता पत्ता बुता बुता हाल हमारा जाने है’, ‘ओठोंसे छू लो तुम’ अशी अविस्मरणीय गझलांनी जगजीत सिंह यांनी आपले स्थान या क्षेत्रात बळकट केले.

  • रणधीर कपूर

    रणधीर कपूर यांची एक हिंदी चित्रपट प्रसिद्ध अभिनेता व करीश्मा व करीना कपूर यांचे वडील व राजकपुर यांचा मुलगा अशी ओळख आहे. त्यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९४७ रोजी झाला. रणधीर कपूर यांना चित्रपट क्षेत्र हे वारसाने मिळाले आहे. त्यांचे वडील राज कपूर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार होते. तर रणधीर कपूर यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात ‘श्री ४२०’ चित्रपटात बालकलाकार म्हणून केली होती. ‘दो उस्ताद’ चित्रपटात काम केलेल्या रणधीर कपूर यांनी १९६८ सालच्या ‘झुक गया आसमान’ चित्रपटा दरम्यान सहायक दिग्दर्शक म्हणूनही काम पाहिले होते. १९७१ च्या ‘कल आज और कल’ चित्रपटात अभिनय केलेल्या रणधीर कपूर यांनी या चित्रपटाद्वारे चित्रपट दिग्दर्शनाच्या क्षेत्रात देखील पाऊल ठेवले. चित्रपटात कपूर कुटुंबातील पृथ्वीराज कपूर, राज कपूर आणि रणधीर कपूर या तीन पिढ्यांनी अभिनय केला होता. याशिवाय बबीताने देखील महत्वाची भूमिका साकारली होती. सत्तर ऐंशीच्या दशकात त्यानी हिंदी चित्रपट जवानी दिवानी, हाथ कि सफाई, रामपूर का लक्ष्मण, ढोंगी, खलिफा, कच्चा चोर, कल आज और कल, पोंगा पंडित, कस्मे वादे, बिवी ओ बिवी, भंवर, हरजाई, हमराही, चाचा भातीजा,राम भरोसे,आज का महात्मा, लफंगे, खलिफा आखरी डाकू, पुकार असे चांगले व उत्तम चित्रपट दिले. किशोरकुमार व त्याचे चांगले जमत असे. किशोरकुमार यांनी गायलेली गुम है किसीके प्यारमे दिल सुबह शाम', 'जा ने जा धुंडता फिर रहा' व 'भवरे की गुंजन ए मेरा दिल' ही गाणी अजून लोकांच्या तोंडावर आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट