(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • एक प्रतिभावान दिग्दर्शक बिमल रॉय

    त्यांचा जन्म १२ जुलै १९०९ रोजी झाला. दो बिगा जमीन, देवदास, मधुमती, सुजाता आणि बंदिनी आदी चित्रपटांतून रसिकांच्या मनावर मोहिनी घालणारे हिंदी चित्रपट दिग्दर्शक म्हणजे बिमल रॉय. हिंदी चित्रपटसृष्टीत त्या काळात कधी शेतकऱयांची व्यथा, रहस्यमय, विरह, समाजव्यवस्था आदी विषय त्यांनी आपल्या चित्रपटातून हाताळले आणि आपली वेगळी छाप त्यांनी निर्माण केली. ते खास करून चित्रपटामध्ये सौदर्याचा वापर करून घेणार दिग्दर्शक म्हणून ओळखले जात. त्यांच्या चित्रपटातील प्रत्येक फ्रेम ही कलात्मक असायची. मा.बिमल रॉय यांच्या चित्रपटात संवेदनशील नातेसंबंध आणि समाजातील उपेक्षित वर्गांचे चित्रण असायचे. मा.बिमल रॉय यांनी एक तरुण फिल्ममेकर म्हणून त्याकाळी अनेकांना प्रेरणा दिली. गुलजार यांना मा.बिमल रॉय यांनी त्यांच्या "बंदिनी' या चित्रपटासाठी त्यांना संधी दिली आणि त्यांनी लिहिलेले "मोरा गोरा अंग लै ले..' हे नूतन यांच्यावर चित्रित झालेले गाणे सुपरहिट ठरले. बिमल रॉय स्वत:च एक चित्रपटाची शाळा होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

    बलराज सहानी यांची दो बिघा जमींन बद्दल एक आठवण सांगितली जाते.

    बलराज सहानी हे त्या काळातले एक उच्चविद्याभूषित होते. कलकत्त्यात ते तेव्हा प्राध्यापकी करत. इंग्लंडवरून शिकून आल्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्त्व हे साहेबी होतं. बिमल रॉय हे चित्रपट बनवत असल्याचं त्यांना कळल्यानंतर ते त्यांना भेटायला गेले व आपल्याला या चित्रपटात भूमिका करायची आहे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. बिमल रॉय यांचं पात्र हे एका गरीब शेतक-याचं, एका रिक्षावाल्याचं होतं. बलराज सहानी यांना सुटाबुटात पाहून बिमल रॉय यांनी त्यांना ही भूमिका देण्याचं नाकारलं. बलराज सहानी यांनाही आपली चूक कळून आली. त्यानंतर या भूमिकेसाठीच्या पोषाखात त्यांनी वावरून त्या भूमिकेचा अभ्यास केला. इतकंच नव्हे तर आपल्या बायका-मुलांना घेऊन त्यांनी कलकत्त्यात काही काळ रिक्षा ओढण्याचाही सराव केला. या सा-या गोष्टीचा अभ्यास करून मग ते पुन्हा बिमल रॉय यांना भेटायला गेले. त्यांना त्या लुकमध्ये पाहिल्यावर मग बिमल रॉय यांनी त्यांना ही भूमिका देऊ केली. कलाकाराच्या प्रभावापुढे न झुकणारे असे ते दिग्दर्शक व आपल्या दिग्दर्शकाच्या समाधानासाठी प्रचंड कष्ट घेणारे ते कलाकार आता सापडणं मुश्कीलच.
    मा.बिमल रॉय हे त्या काळातले एकमेव असे दिग्दर्शक होते ज्यांच्या घरी दिलीप कुमार स्वत: कथा ऐकायला येत असे. एरवी सर्वच दिग्दर्शकांना दिलीप कुमार आपल्या घरी बोलावत अस्त. बिमल रॉय यांनी मात्र कधीही फोन केला तर ते लागलीच त्यांच्या घरी येत असत. दिलीप कुमार यांच्या अभिनय कारकिर्दीतली सर्वात प्रभावी व्यक्तिरेखा म्हणजे देवदास हा चित्रपट होय असे दिलीप कुमार स्वत:च म्हणत आहे. भारतीय चित्रपट इतिहासात जे देदीप्यमान तारे चमकून गेले त्यामध्ये निर्माते-दिग्दर्शक बिमल रॉय यांचे स्थान अढळ आहे. रॉय यांच्या चित्रपटांना आजमितीस अनेक वर्षे लोटली तरी त्यातील आशय, कलात्मकता आणि सर्जनशीलता सामान्य रसिकांच्या हृदयाचा ठाव अजूनही घेत असतात. १९११ ते १९६६ या काळातील ‘उदयरे पथे’, ‘दो बीघा जमीन’, ‘परिणीता’, ‘बिराज बहू’, ‘देवदास’, ‘मधुमती’, ‘सुजाता’, ‘बंदिनी’, ‘परख’ आणि ‘बापबेटी’ अशी अनेक चित्ररत्ने रॉय यांच्या श्रेष्ठत्वाची जाणीव करून देतात. बिमल रॉय यांचे ८ जानेवारी १९६६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • म्यानमारच्या नेत्या आंग सान सूची

    म्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्या आंग सान सू ची यांच्याबद्दल आपण नेहमी वाचत असतो. 72 वर्षांच्या सू ची यांचे आयुष्य अनेकविध घटनांनी व चढउतारांनी भरलेले आहे. त्यापैकी महत्त्वाच्या घडामोडींमधून त्यांचा जीवनप्रवास समजू शकेल.

    आंग सान सू ची यांचे वडिल आंग सान हे म्यानमारचे पितामह म्हणून ओळखले जातात तसेच त्यांना म्यानमारच्या स्वातंत्र्याचे शिल्पकारही म्हटले जाते. क्रांतीकारी वृत्तीचे आंग सान 1948 ते 47 असे ब्रिटिश क्राऊन कॉलनी ऑफ बर्माचे प्रमुख होते. स्वातंत्र्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले असले तरी त्यांना ब्रह्मदेश स्वतंत्र झालेला पाहता आला नाही. स्वातंत्र्यापुर्वी 6 महिने आधीच त्यांची हत्या करण्यात आली.

    आंग सान सू ची यांचा जन्म 19 जून 1945 रोजी रंगूनमध्ये झाला. 1960 मध्ये त्या आईबरोबर भारतात आल्या. त्यांची आई डॉव खिन क्यी यांची म्यानमारच्या नेपाळ व भारतामधील राजदूतपदावरती नेमणूक झाली होती.

    भारतामध्ये आंग सान यांनी नवी दिल्लीमधील कॉन्व्हेंट ऑफ जिझस अॅंड मेरीमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले आणि लेडी श्रीराम महाविद्यालयामध्ये राज्यस्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर सेंट ह्युज महाविद्यालय, ऑक्सफर्ड येथे तत्वज्ञान, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्रामध्ये बी.ए पदवी मिळवली आणि राज्यशास्त्रात एम.ए पदवी संपादित केली. त्यानंतर त्यांनी एम. फिल पर्यंत शिक्षण घेतले. शिक्षणानंतर सू ची यांनी संयुक्त राष्ट्रासाठी तीन वर्षे काम केले.

    त्यांच्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या डॉ. मायकेल एरिस यांच्याशी त्या 1 जानेवारी 1972 रोजी विवाहबद्ध झाल्या. डॉ. एरिस हे तिबेटीयन संस्कृतीचे अभ्यासक आणि भूटानच्या राजघराण्यातील मुलांचे शिक्षक होते. 1973 साली या दाम्पत्याला अलेक्झांडर आणि 1977 साली किम ही अपत्ये झाली.

    1988 साली आईची काळजी घेण्यासाठी सू ची म्यानमारमध्ये परतल्या मात्र लष्करशाहीने पोखरलेल्या मायदेशामध्ये लोकशाहीसाठी काम करण्याचे त्यांनी ठरवले व सरकारच्या विरोधातील प्रमुख आवाज म्हणून त्यांनी अल्पावधीत स्वतःचे स्थान निर्माण केले.

    मायकल यांच्याशी त्यांची 1995 साली शेवटची भेट झाली.एरिस यांना कर्करोग झाल्यामुळे त्यांना म्यानमारमध्ये जाण्याची किंवा सू ची यांना देशाबाहेर जाण्याची परवानगी हवी होती. मात्र सू ची यांना तेथिल सरकारने परवानगी दिली नाही. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस कोफी अन्नान तसेच पोप जॉन पॉल दुसरे यांनी विनंती करुनही म्यानमार सरकारने एरिस यांना व्हीसा दिला नाही.

    1989 साली प्रथम सू ची यांना नजरकैदेमध्ये ठेवण्यात आले. म्यानमारमध्ये आल्यानंतर 21 वर्षांपैकी 15 वर्षे सू ची यांनी नजरकैदेत घरातच काढली. एरिस यांचा 1999 साली ऑक्सफर्डमध्ये वयाच्या 53 व्या वर्षी मृत्यू झाला.

    13 नोव्हेंबर 2010 रोजी सू ची यांची नजरकैदेतून सुटका करण्यात आली. आज सू ची म्यानमारच्या पहिल्या स्टेट कौन्सिलर बनल्या असून हे पद पंतप्रधानांसारखेच आहे. तसेच त्या देशाच्या परराष्ट्रमंत्रीही आहेत.

    आंग सान सू ची यांना देशविदेशातील विविध सन्मान मिळाले नोबेल, राफ्टो, साखरोव, जवाहरलाल नेहरु अॅवॉर्ड, सायमन बोलिव्हॉं प्राईझ, ऑलोफ पामे प्राईझ, भगवान महावीर वर्ल्ड पीस, कॉंग्रेशनल गोल्ड मेडल अशा पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

    म्यानमारमधील वांशिक तणाव कमी होऊन रोहिंग्यांचा प्रश्न शांततेत सोडवावा, रोहिंग्यांवरील अन्याय दूर केला जावा यासाठी आंग सान सू ची यांच्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवरुन दबाव येत आहे

  • जेष्ठ मराठी गायिका ललिता देऊळगावकर फडके

    ललिता फडके या पूर्वाश्रमीच्या त्या ललिता देऊळगावकर. ललितापंचमीच्या दिवशीचा त्यांचा जन्म. वडील कापडाचे व्यापारी. त्यांचे दोन काका उत्तम गाणारे होते आणि आजीचाही आवाज गोड, त्यामुळे त्यांच्याच प्रेरणेने ललिता गाणं शिकल्या. पण गाणं हे घरापुरतं ठेवायचं, हा त्या काळातल्या सर्वसाधारण मंडळींचा दृष्टिकोन. त्यामुळेच शेजारच्या बंगाली कुटुंबाकडे आलेले कवी आणि अभिनेते हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांनी या मुलीचा आवाज ऐकला तेव्हा ‘हिला तुम्ही सिनेमात का पाठवत नाही ?’ असा प्रश्‍न केला. देऊळकर खरं तर या गोष्टीला राजी नव्हते. मात्र त्यांनी अखेर ती तयारी दर्शविली. ललिताबाईंनी गायनाचे धडे दत्तोबा तायडे आणि पुरुषोत्तम वालावलकर यांच्याकडे गिरवले. शास्त्रीय संगीतही त्या उत्तम गायच्या.

    चट्टोपाध्याय यांच्याच ओळखीने ललिताबाईंना ‘बॉम्बे टॉकीज’या मातब्बर संस्थेत प्रवेश मिळाला. ‘बॉम्बे टॉकीज’ची आघाडीची नायिका देविकाराणी सोबत ‘दुर्गा’ मध्ये एक फुटकळ भूमिका त्यांनी केली. याच संस्थेच्या ‘अंगूठी’मध्ये त्या दोन गाणीही गायल्या. ‘बंधन’, ‘कंगन’ या चित्रपटांपर्यंत त्या ‘बॉम्बे टॉकीज’ मध्ये होत्या.

    १९४० च्या दशकाच्या अखेरीस खर्‍या अर्थानं पार्श्‍वगायनाचं युग आलं. याच काळात सी. रामचंद्र यांनी ललिताबाईंच्या आवाजाचा कल्पकतेनं वापर करुन घेतला. त्यांचं संगीत असलेल्या “साजन” मधलं ‘हमको तुम्हारा ही आसरा’ हे ललिताबाईंनी मोहम्मद रफीसोबत गायलेलं गाणं चांगलंच गाजलं. पण कहर केला तो सी. रामचंद्र यांच्याच “नदिया के पार” मधल्या ‘मोरे राजा हो… ले चल नदिया के पार’ या ललिता आणि रफी यांच्या युगुलगीतानं ! बडे संगीतकार मास्टर गुलाम हैदर यांनीही ‘शहीद’ साठी ललिताबाईंकडून दोन गाणी गाऊन घेतली. त्यातलं ‘कदम उठाकर रुक नहीं सकता’ हे समरगीत आजही आठवणीत असणार.

    याच काळात मराठीतले उगवते संगीतकार मा.सुधीर फडके यांच्यासाठीही त्या गायल्या आणि पुढे त्यांच्याशी विवाहबध्द झाल्या. २९ मे १९४९ रोजी झालेल्या त्या विवाह सोहळ्यात खुद्द मोहम्मद रफीनं मंगलाष्टकं म्हटली होती, हाही एक दुर्लभ योग ! मराठीतही त्यांनी आपल्या आवाजाचा ठसा उमटवला. जशास तसे, मायबहिणी, उमज पडेल तर, वंशाचा दिवा, जन्माची गाठ, माझं घर माझी माणसं, रानपाखरं, चिमण्यांची शाळा, प्रतापगड इत्यादी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केलं.

    आशा भोसले यांना सर्वप्रथम ललिताबाईंना पारखलं होते. त्यांनीच बाबूजींकडे आशाबाईंचे नाव सुचवले होते.
    पुणे आकाशवाणीवर सर्वप्रथम सादर झालेल्या ‘गीतरामायण’ मधली गीतरामायणातील कौसल्येची सर्व गाणी ललिताबाईंनी गायली आहेत. सुधीर फडके यांच्या व्यक्तिमत्त्वाला सामाजिक आणि राजकीय पैलूही होते. त्यातील सर्व टप्प्यांवर बाबूजींना खंबीर साथ मिळाली ती ललिताबाईंची, म्हणूनच ‘गदिमा प्रतिष्ठान’तर्फे काही वर्षांपूर्वी ललिताबाईंना लाभलेला ‘गृहिणी-सखी-सचिव’ पुरस्कार त्यांच्या कर्तृत्वाचा मान राखणाराच ठरला. ‘ललिताने घराकडे पूर्णपणे लक्ष दिल्यामुळेच मी एवढे यश मिळवू शकलो’, असं अभिमानानं सुधीर फडके सांगत.ललीता फडके यांचे निधन २५ मे २०१० रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट /मराठी सृष्टी.कॉम

    ललीता फडके यांची काही गाणी :
    मोठं मोठं डोळं तुझं (जशास तसे)
    रंगू बाजारला जाते हो, जाऊद्या (वंशाचा दिवा)
    पाव्हणं एवढं ऐका (वंशाचा दिवा)
    नखानखांवर रंग भरा (मायाबाजार)
    मी तर प्रेम दिवाणी (सुवासिनी)
    लंगडा गं बाई लंगडा नंदाचा कान्हा लंगडा (सौभाग्य)
    मिटून घेतले नेत्र तरी (उमज पडेल तर)
    तिन्ही सांज होता तुझी याद येते (चिमण्यांची शाळा)
    मी आज पाहिला बाई (चिमण्यांची शाळा)
    रंगूबाई, गंगूबाई हात जरा चालू द्या (चिमण्यांची शाळा)
    अळीमिळी गोम चिळी (माय बहिणी)
    उगा का काळीज माझे उले पाहूनि वेलीवरची फुले (गीत रामायण)
    सावळा गं रामचंद (गीत रामायण)
    नको रे जाऊ रामराया (गीत रामायण)

  • दाते पंचांग’चे मोहन दाते

    सोलापूर शहर आणि ‘दाते पंचांग’ यांचा ऋणानुबंध जवळजवळ ९५ वर्षाचा. आज पाच लाख इतका खप असलेले ‘दाते पंचांग’ अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहे. ९५ वर्षापूर्वी पंचांगकार्याची मुहूर्तमेढ नाना ऊर्फ लक्ष्मणशास्त्री दाते यांनी रोवली. लक्ष्मणशास्त्री दाते यांनी लावलेल्या वृक्षाने आज विशाल रूप धारण केले आहे. आता ‘दाते पंचांग’ या नावाने ओळखल्या जात असलेल्या पंचांगाची धुरा नाना दाते यांचे नातू आणि पंचांगकर्ते धुंडीराजशास्त्री दाते यांचे पुत्र मोहनराव दाते यांच्यावर आहे. १९७७ सालापासून मोहनराव दाते या व्यवसायात आहेत. १९९५ साली धुंडीराजशास्त्रींचे निधन झाल्यानंतर ‘दाते पंचांग’ चालविण्याची जबाबदारी मोहनराव दाते यांच्यावर पडली. तेव्हापासून आतापर्यंत मोहनराव ती जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत हे दाते पंचांगाच्या लोकप्रियतेवरून दिसून येतच आहे. त्यांचा जन्म ११ जुलै १९५४ रोजी झाला. पंचांग कार्यात अधिकारवाणीने भाष्य करणारी व्यक्ती म्हणून मोहनराव दाते यांनी नावलौकिक प्रश्नप्त केला आहे. मोहनराव दाते यांच्या कार्याची दखल नुकतीच दिल्लीच्या ‘जैन प्रश्नकृत भाषा भवन’ या संस्थेने घेतली आणि मोहनराव दाते यांची आचार्य कुंदकुंद पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या आधी सोलापूरचे डॉ. निर्मलकुमार फडकुले, डॉ. महावीर प्रभाचंद्र शास्त्री यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. आता पंचांगकर्ते मोहनराव दाते यांची त्यासाठी निवड झाली आहे. जैन समाजाशी संबंधित असलेल्या संस्थेने पंचांगक्षेत्रात कार्यरत असलेल्या मोहनराव दाते यांच्या कार्याची दखल घेऊन कुंदकुंद पुरस्कारासाठी त्यांची निवड केली हे विशेष. एक लाख रुपये रोख, प्रशस्तिपत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दिल्ली येथे येत्या ३ जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमात आचार्य श्री विद्यानंदजी आणि बेळगावचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित बाहुबली उपाध्ये यांच्या उपस्थितीत मोहनरावांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. धर्मशास्त्र, मुहूर्तशास्त्र, पत्रिका, गणित आदी विषयातील लोकोपयोगी अभ्यासासाठी आणि या क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल मोहनरावाची या पुरस्कारासाठी केलेली निवड सार्थच मानावी लागेल. यंदाच्या वर्षी २१ जून रोजी ज्योतिषी म. दा. भट गौरव पुरस्कार केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते देऊन त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली होती. आता कुंदकुंद पुरस्काराच्या रूपाने त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. मोहनराव दाते यांनी ‘दाते पंचांग’ लोकप्रिय करण्याबरोबरच २००० सालापासून पंचांगाच्या जोडीला पॉकेट पंचांग, कन्नड, हिंदी आणि मराठी दिनदर्शिकेच्या माध्यमातून सर्वत्र प्रसिद्धी मिळविली आहे. पंचांगकर्ते कै. लक्ष्मणशास्त्री दाते, कै. धुंडीराजशास्त्री दाते, कै. श्रीधर लक्ष्मण दाते यांनी लोकप्रिय केलेले ‘दाते पंचांग’ आता मोहनराव दाते यांनी आणखी लोकप्रिय केले आहे. मोहनरावांच्या समवेत त्यांचे पुत्र ओंकार आणि श्रीधर लक्ष्मण दाते यांचे पुत्र विनय हेही या क्षेत्रात आहेत. पंचांगक्षेत्रात दाते घराण्याचे असे चार पिढय़ांचे योगदान आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांची वाढत चाललेली लोकप्रियता लक्षात घेऊन वेबसाइटच्या माध्यमाद्वारेही पंचाग सर्वदूर पोहोचविण्याचे कार्य पंचागकर्ते दाते करीत आहेत. भारत सरकारचे ‘राष्ट्रीय पंचांग’ तपासण्यासाठी दाते यांच्याकडे येत असते. हे लक्षात घेता दाते पंचांगकर्ते यांचा या क्षेत्रातील अधिकार किती मोठा आहे याची कल्पना यावी. लहानपणापासून घरातील संस्कारांबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलेले मोहनराव दाते सोलापूरच्या समर्थ बँकेचे संस्थापक अध्यक्ष होते. सध्या ते या बँकेचे संचालक आहेत. रा. स्व. संघाच्या जनकल्याण समितीच्या कार्याशीही ते संबंधित आहेत. सोलापूरच्या नावलौकिकात ज्यांनी भर टाकली आहे त्यात पंचांगकर्ते दाते यांचे नाव कित्येक वर्षापासून अग्रणी आहे. आता पंचांगकर्ते मोहनराव दाते यांनीही त्या लौकिकात आणखी भर टाकली आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • एक बहुरंगी मराठी लेखक, नाट्यदिग्दर्शक व अभिनेते डॉ. लक्ष्मण देशपांडे

    महाराष्ट्रातल्या एकपात्री प्रयोग करणाऱ्या प्रमुख पाच-सहा नावांमध्ये डॉ. लक्ष्मण देशपांडे यांची गणना होईल. त्यांचा जन्म ५ डिसेंबर १९४३ रोजी झाला. प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांनी एम. ए., पीएच.डी., मास्टर ऑफ ड्रॅमॅटिक्स या पदव्या प्राप्त केल्या. १९६६ ते १९६८ या कालावधीत मौलाना आझाद महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून तर १९६८ ते १९८० स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते.

    १९८० ते २००० डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाटय़शास्त्र विभागात विविध विषयांवर चर्चासत्र, शिबिर त्यांनी आयोजित केली. २३ नाटय़महोत्सवाचे आयोजन, २०० पेक्षा अधिक नाटय़कथांची निर्मिती करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, डॉ. श्रीराम लागू, सदाशिव अमरापूरकर यांच्याबरोबर दोन चित्रपटांत भूमिका, अशी त्यांची नाटय़-चित्रपट कारकीर्द होती. डॉ. देशपांडे यांनी डॉ. अनुया दळवी यांच्याबरोबर द्विपात्री 'नटसम्राट'चे शंभरावर प्रयोग केले. त्यांनी दोन चित्रपटांतही काम केले. डॉ. देशपांडे यांचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नाव आहे. ‘गीनिज बुक’मध्ये तब्बल दोन वेळा हा बहुमान त्यांना वऱ्हाड निघालय लंडनला ह्या एकपात्री नाटकासाठी मिळाला. . ‘वऱ्हाड’चे लेखन, दिग्दर्शन आणि कलावंत या सगळ्या भूमिका डॉ. देशपांडे यांच्याच होत्या. तीन छोटे दिवे, तीन माईक आणि पंचा इतके छोटे साहित्य वापरून ५२ व्यक्तिरेखा उभ्या करणाऱ्या ‘वऱ्हाड निघालंय लंडन’ची सुरुवात १९८० मध्ये झाली.

    लक्ष्मण देशपांडे यांनी 'वऱ्हाड..'च्या सुमारे २८०० प्रयोगांतून अवघा महाराष्ट्र पालथा घातलाच; पण या नाटकाला खरोखरीच सातासमुद्रापार लंडनला नेलं होतं. अफाट उर्जा आणि दर्जेदार अभिनयानं एक अख्खं कथानक ते सहजगत्या उभं करायचे. 'लंडनला शिकायला गेल्यावर तिथ जुडीच्या प्रेमात पडलेला काशीनाथ', 'मला बोलीलं का बाप्पा', असं सारखं बोलून बाप्पाला भंडावून सोडणारा बबन्या, 'मायवं हे बुईंग वर गेलं आनी पल्डं तंर', असे प्रश्न करीत विमानात सगळ्यांच्या छातीत धस्स करणारी अनेक कार्टी, 'वंस, सासूबाई, सून यांच्यातील रुसवे फुगवे', हे असं सारं म्हणजे थोडक्यात गावच्या भाषेत ज्याला आपण 'बारदान' अं म्हणतो ते अख्ख मराठवाड्याचं गाव आणि जोडी इंग्रजीची फोडणी देणारे ज्युडी, जानराव या सगळ्यांना घेऊन डॉ. लक्ष्मण देशपांडे यांनी नाट्यरसिकांना प्रचंड हसवलं, रडवलंही.

    ‘वऱ्हाड निघालय लंडनला’ या त्यांच्या एकपात्री नाटय़प्रयोगाने ते महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. त्यांनी नाटकाच्या मिळकतीतून बरीचशी रक्कम त्यांनी नगिर्स कॅन्सर हॉस्पिटल (बाशीर्), अंधशाळा नाशिक आणि इतर ठिकाणी दिली. ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ हे या नाटक सध्या संदीप पाठक करत आहे. त्यांनी पश्चिम विभागीय सांस्कृतिक केंद्र उदयपूर आणि नागपूर या संस्थेवर महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून काम केले होते.

    १९८६ मध्ये पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कल्पनेतून साकार झालेल्या अपना उत्सव या राष्ट्रीय व सांस्कृतिक एकात्मता कार्यक्रमात त्यांनी कला दिग्दर्शन केले. १९८७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय एकात्मता कार्यक्रमात समन्वयक म्हणून कार्यरत होते. १९८८ मध्ये झोपडपट्टी भागात साक्षरतेचे वर्ग घेण्यात ते आघाडीवर होते. १९९३ ते १९९५ या कालावधीत औरंगाबादेत कला आणि नाटय़ प्रदर्शनाद्वारे साक्षरता अभियानात संचालक म्हणून कार्यरत. केंद्र शासनाच्या नाटय़ विभागातर्फे कलावंत निवडण्याच्या समितीत सदस्य म्हणून सहभाग. ते परभणीच्या अ. भा. नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते. १९९९ मध्ये केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभाग आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या वतीने आयोजित पहिल्या राष्ट्रीय थिएटर महोत्सवात ते सहभागी होते.

    'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा' ने गौरव केला होता. स्वातंत्र्यसैनिक विनायकराव चारठाणकर पुरस्कार, बेंडे स्मृती पुरस्कार, पुणे महानगरपालिका पुरस्कार, पुण्याचा राम श्रीधर पुरस्कार, मुंबईत उत्तुंग पुरस्कार, मराठवाडा विकास मंडळातर्फे मराठवाडा गौरव पुरस्कार. छत्रपती शाहू महाराज पुरस्कार. अखिल भारतीय नाटय़संमेलन ठाणे आणि नाशिक, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये एकांकिका महोत्सवात पुरस्कार, मुंबई आकाशवाणीतर्फे पुरस्कार, सजाजीराव महाराज पुरस्कार (बडोदा) , कै. वसंतराव नाईक कृषी संशोधन प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार, नाटय़ क्षेत्रात केलेल्या कार्याचा महाराष्ट्र शासनातर्फे गौरव. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांना असे अनेक पुरस्कार मिळाले होते.

    प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचे २२ फेब्रुवारी २००९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ नाटक
    https://www.youtube.com/watch?v=atIEn0ODN5k
    https://www.youtube.com/watch?v=hVEu5uWb18E

  • महेश कुलकर्णी

    मराठीला वैश्विक करायचे असेल,तर इंटरनेट,मोबाईल फोन,सेट टॉप बॉक्स आदी आधुनिक साधनांवरही मराठी आणि त्यातील साहित्य हवे.त्यासाठी प्रयत्नशील असलेले पुण्यातील “सी-डॅक” चे सहसंचालक महेश कुलकर्णी ह्यांची ही ओळख

    देशी भाषांचा 'तंत्रसाधक'

  • लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी (तर्कतीर्थ)

    लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी हे मराठी लेखक, कोशकार, सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक-संशोधक होते.

    त्यांचा जन्म २७ जानेवारी १९०१ रोजी धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर इथे आणि शिक्षण वाई येथील प्राज्ञ पाठशाळेत झाले.त्यांनी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा व राज्य ग्रंथ पुरस्कारांची सुरूवात केली. त्यांना १९५५ साली 'वैदिक संस्कृतीचा विकास' साठी पहिला साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले शिवाय त्यांना १९७३ साली राष्ट्रीय संस्कृत पंडित पुरस्काराने तर १९७६साली पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

    १९५४ साली दिल्ली येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९६० ते १९८० दरम्यान त्यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. ते महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक महामंडळ पहिले अध्यक्ष होते.मराठी विश्वकोशाचे ते आद्य संपादक आहेत.प्रा. रा.ग. जाधवांनी 'शास्त्रीजी' हा तर्कतीर्थांच्या कार्याचा परिचय देणारा ग्रंथ लिहिला आहे. त्यांचा मृत्यू २७ मे १९९४ रोजी झाला.

    त्यांचे प्रकाशित झालेले साहित्य

    वैदिक संस्कृतीचा विकास
    मराठी विश्वकोश (संपादन)
    धर्मकोश (एकूण १६ खंडांचे संपादन)
    विचार शिल्प
    आधुनिक मराठी साहित्य
    समीक्षा आणि रस सिद्धांत
    हिंदू धर्मसमीक्षा
    श्रीदासबोध
    राजवाडे लेख संग्रह (संपादन)
    उपनिषदांचे भाषांतर
    संस्कृत संहितेचे वर्गीकरण (Catalogue of Sanskrit Scripts)

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

  • लेखक, नाटककार व पटकथाकार शंकर नारायण नवरे उर्फ शन्ना

    लेखक, नाटककार व पटकथाकार शंकर नारायण नवरे उर्फ शन्ना यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९२७ रोजी झाला. शं.ना. नवरे यांचं व्यक्तिमत्व अतिशय लोभस आणि लोकप्रिय होतं... ते अतिशय शैलीदार वक्ते आणि माणसांमध्ये रमणारे लेखक म्हणून प्रसिद्ध होते... कादंबरी, कथा, ललित लेख नाटकं असं चौफेर लेखन त्यांनी केलंय. त्यांच्या लेखनातून बदलत्या शहरी समाज मनाचं चित्रण आपल्याला पहायला मिळतं. त्यांनी आपल्या लेखणीतून मध्यमवर्गीयांच्या सुखदु:खाचं चित्रण केलंय.

    शंनांच्या लेखनानं वाचकांना कधी अंतर्मुख केलं तर प्रसंगी रिझवलेही. १९४५ मध्ये शालांत परीक्षा पास झाल्यावर त्यांनी मुंबईच्या सेंट झेव्हियर्स, सिद्धार्थ कॉलेज आणि पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. १९४९ साली त्यांनी बी.एस्सीची पदवी मिळवली. काही काळ त्यांनी मंत्रालयात शासकीय नोकरीही केली मात्र काही काळानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. सामान्य, मध्यमवर्गियांच्या जाणीवा, सुख-दु:खाच्या व्यथा आणि वेदना त्यांनी आपल्या सिध्दहस्त लेखणीतून, रंगमंचीय अविष्कारातून समाजासमोर आणल्या. कथा, ललित लेख, नाटक, चित्रपट पटकथा, वृत्तपत्रीय व नियतकालिकांतील स्तंभ अशा विविध माध्यमांतून ‘शन्नां’नी लेखन केले, पण ‘शन्ना’ खऱ्या अर्थाने खुलले आणि रमले ते कथेच्या विश्वात.

    १९५१ नंतर नवकथेचा बहारीच्या काळात ‘शन्नां’चीही प्रतिभा बहरली. मात्र कोणत्याही एका लेखन प्रकारात ते कधीच अडकून पडले नाहीत. वाचकांना अंतर्मुख करणारी, खुसखुशीत मध्येच हास्याची लकेर, चिमटे घेणारी ‘शन्नां’ची लेखणी तितक्याच ताकदीची रंगमंचीय पात्रे उभी करू शकली. शन्नाडे या नावाने त्यांनी वृत्तपत्रांतूनही स्तंभलेखन केले आहे. शं.ना. नवरे यांनी जयवंत दळवी यांच्या महानंदा कादंबरीवरून ’गुंतता हृदय हे’ हे नाटक लिहिले आहे. हे नाटक अमाप गाजले. डोंबिवली गावावर त्यांचे अतोनात प्रेम होते.

    ‘डोंबिवली भूषण’ पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होतेच पण ते खऱ्या अर्थाने या शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीतील महत्त्वाचा दुवाही होते. डोंबिवलीविषयी त्यांच्या मनातले ममत्व कायम होते त्यामुळेच नातेवाईक तसेच मित्रांनी आग्रह करूनही त्यांनी मुंबईत कायमचे वास्तव्य केले नाही. नोकरीनिमित्त मुंबई ही फक्त त्यांची कर्मभूमीच राहिली. डोंबिवलीत झालेल्या २००३ सालच्या नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना लेखनातून मिळणाऱ्या पैशांचा मोठा हिस्सा ते पडद्यामागच्या कलाकारांसाठी खर्च करीत असत. शन्ना नवरे यांचे २५ सप्टेंबर २०१३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    त्यांची साहित्य संपदा ‘धुक्यात हरवली वाट’, ‘सुरुंग’, ‘धुम्मस’, ‘सूर राहू दे’, ‘गहिरे रंग’, ‘गुंतता हृदय’ ही नाटकं गाजलीत तर ‘वारा’, ‘झोपाळा’, ‘मेणाचे पुतळे’, ‘शहाणी सकाळ’ हे कथासंग्रह तसेच ‘निवडुंग आणि इंद्रायणी’, ‘संवाद’, ‘सुरुंग’
    मोरावर चोर - (संमिश्र) एकांकिका 200४, पर्वणी - करमणूकपर, विनोदी, रंगसावल्या - नाटक, तिळा उघड - कथासंग्रह, वर्षाव - नाटक, मला भेट हवी हो - नाटक, खेळीमेळी - एकपात्रिका : नाटक, खेळीमेळी - एकपात्रिका : नाटक, खेळीमेळी - एकपात्रिका : नाटक, हसत हसत फसवुनी - नाटक

  • गझल, दादरा आणि ठुमरी गायिका बेगम अख्तर

    आज ३० ऑक्टोबर..गझल, दादरा आणि ठुमरी गायिका बेगम अख्तर यांची पुण्यतिथी.
    बेगम अख्तर यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९१४ रोजी झाला. बेगम अख्तर यांचं घराणे म्हणजे गळ्यात पेटी अडकवून दारोदार गाणं गात फिरणार्‍या नटनी बेडनी चं घराणं. बैठकीत बसून गाणं म्हणणाऱ्या तवायफ यांना आपल्यापेक्षा कमी लेखायच्या. बेगम अख्तर यांचा आवाज, गाण्याचा रियाज, गाण्यासाठीची तळमळ पाहून नर्गिस ची आई जद्दनबाई हीने त्यांना कलकत्त्याला बोलावून घेतलं. तिथल्या तवायफ बेगम अख्तर यांच्याबद्दल आकस बाळगून होत्या. जद्दनबाई यांनी मध्यस्थी केली. सगळ्या मोठ्या तवायफांची आपल्या घरी बैठक बोलावली. त्यात बेगम अख्तरला गायला लावलं. फुल बत्तासे वाटून त्यांच्यावर ओढणी पांघरली. सगळ्यांच्या पाया पडायला लावलं. आणि मग सगळ्या तवायफांनी बेगम अख्तर यांच्या गाण्याच्या मैफिलींना मान्यता दिली. मा.बेगम अख्तर यांनी काही चित्रपटांतून कामं केली. पण त्यांचे मन तिथे रमले नाही. चित्रपट सृष्टीनेही त्यांना स्विकारले नाही. १९४२ च्या सुमारास आलेला ‘रोटी’ हा त्यांचा चित्रपट काहीसा गाजला. पण पुढे कारकीर्द मात्र बहरली नाही. त्यांनी गझल गायकीला त्यांनी प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली. त्यांच्या सुरवातीच्या सगळ्या रेकॉर्ड ‘अख्तरी फैजाबादी’ या नावानेच आहेत. सांसारिक आयुष्यातही त्यांना सुख मिळू शकलं नाही. बाई मग संसारात रमल्याच नाहीत. त्यांच्या पतीला त्यांच्या गाण्याची तळमळ कळली. अख्तरी फैजाबादी या नावानं आत्तापर्यंत त्यांची सांगितीक कारकिर्द बहरली होती. या दु:खातून त्या बाहेर पडून गायल्या लागल्या ते नविन नाव घेवूनच. आता ‘बेगम अख्तर’ या नावानं त्यांची सांगितीक कारकीर्द सुरू झाली. व्यवस्थेचा बेगडी विरोध न करता प्रत्यक्ष कृती करण्यावर बेगम अख्तर यांचा भर होता. त्यांना आकाशवाणीत राष्ट्रीय प्रसारणासाठी बोलावण्यात आलं. त्यांनी गझल गायची तयारी केली तेंव्हा त्यांना सांगितलं की गझल गायला आकाशवाणीवर बंदी आहे. आपण ठूमरी दादरा किंवा इतर उपशास्त्रीय काहीतरी गा. बाईंनी बाणेदारपणे नकार दिला आणि तिथून न गाता परतल्या. प्रसारण मंत्र्यांना हे कळले आणि जेंव्हा आकाशवाणीच्या नियमात दुरूस्ती होवून गझल गायला परवानगी मिळाली तेंव्हाच बेगम अख्तर आकाशवाणीवर गायल्या. .बेगम अख्तर यांचे निधन ३० ऑक्टोबर १९७४ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • बाळ ज. पंडित

    अतिशय ओघवत्या मराठीत ‘चेंडू टोलवला, पायचीत, त्रिफळाचीत, चौकार, षटकार, सीमापार, पंच’ अशा शब्दांची पेरणी करीत, खेळातील रोमहर्षक घटना तितक्याच रोमहर्षकतेने आवाजात चढ-उतार करीत ते सांगत.