(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • दत्ता पुराणिक

    असे जे आपणापाशी असे , जे वित्त वा विद्या
    सदा ते देतची जावे , जगाला प्रेम अर्पावे '

    साने गुरुजी यांच्या ' खरा तो एकची धर्म ' या कवितेतील या ओळींचा आदर्श ठेवून दत्ता पुराणिक यांनी आपले आयुष्य वेचले . साने गुरुजींच्या विचारांचा प्रसार करण्याचे व्रत त्यांनी घेतले होते . ते त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत पाळले . गुरुजींच्या ' श्यामची आई ' या पुस्तकाच्या वीस हजारांहून अधिक प्रती घरोघरी पोहोचविण्याचा त्यांचा संकल्प गेल्या वर्षीच पूर्ण झाला होता . हा उपक्रम आणखी पाच वर्षे राबविण्याचा मानस त्यांनी त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केला होता . ऐंशीव्या वर्षी असा संकल्प करुन तो तडीस नेण्यासाठी अविरत काम करणार्‍या पुराणिक यांच्यासारख्या व्यक्ती विरळ्याच ; पण हा संकल्प पूर्ण होण्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला . मात्र , तोपर्यंत त्यांनी साने गुरुजींसंबंधातील २५ हजारांपेक्षाही अधिक माहितीपत्रकांचे वाटप आणि सुमारे पाच हजार सीडींची विक्री केली होती .

    पुराणिक मूळचे अमळनेरचे . १९५० मध्ये ते पुण्यात वास्तव्यास आले . साने गुरुजींचा सहवास त्यांना लाभला होता . शाळेसमोरून जाताना गुरुजी रोज विचारपूस करीत , अशी आठवण ते नेहमी सांगत . इंग्रजांच्या जाचामुळे गुरुजी काही काळ भूमिगत झाले होते . त्यावेळी त्यांची सेवा पुराणिक यांनी केली होती . त्यांचे सारे जीवनच साने गुरुजीमय झाले होते . ' श्यामची आई ' या पुस्तकाने कित्येक पिढ्या घडवल्या . आपल्या खडतर बालपणाची कहाणी सांगत आणि संवेदनशील भावविश्व उलगडत त्यावेळच्या समाजजीवनाचे चित्रण गुरुजींनी या पुस्तकात केले होते . या पुस्तकाची ओळख आणि त्याद्वारे गुरुजींच्या विचारांचा प्रसार व्हावा यासाठी हे पुस्तक पुराणिक यांनी घराघरात पोहोचविले . या पुस्तकावर ते कथाकथनही करीत असत . इंदूर येथे २००९ मध्ये झालेल्या मध्य प्रदेश मराठी साहित्य संमेलनात त्यांच्या कथाकथनाच्या कार्यक्रमाला रसिकांची दाद मिळाली होती . ' संगम रंगभूमी ' च्या माध्यमातून त्यांनी बालनाट्येही बसविली होती . पुणेकरांनी त्यांच्या या कार्याची कृतज्ञता त्यांचा सत्कार करून वेळोवेळी व्यक्त केली होती . ' हा माझा सत्कार नसून प्रत्येक आईचा सन्मान आहे ,' अशी विनम्र भावना त्यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केली होती . व्यक्तिस्वातंत्र्याच्या अतिरेकाकडे जात असलेल्या आजच्या काळात प्रत्येकालाच गरज आहे , ती साने गुरुजींची आणि त्यांचे विचार घराघरांत पोहोचविणार्‍या पुराणिक यांचीही.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
    -----------------------------------------------------------------------------------

    साने गुरूजींनी आपल्या संस्कारपुर्ण पुस्तकांमधून स्वातंत्र्यपुर्व भारताची पिढी घडविली होती, मातृप्रेमाने पावन झालेले अमृत, अक्षररूपांनी त्यांनी महाराष्ट्राच्या साहित्यगंगेमध्ये रूजविले होते. अशा महान साने गुरूजींचे अजरामर साहित्य दीर्घकाळाकरिता जीवंत व तजेलदार ठेविण्याची जबाबदारी अमळनेरच्या दत्ता पुराणिकांनी स्वीकारली. साने गुरूजींचा सहवास त्यांना लाभला होता. साने गुरूजींच्या विचारांनी, व त्यांच्या पुस्तकांमधून वेळोवेळी दिसून आलेल्या देशाबद्दलच्या तळमळीने तसेच काळजीने प्रेरित होवून पुराणिकांनी त्यांचे सर्व साहित्य, व ग्रंथसंपदा महाराष्ट्रात सर्व ठिकाणी अजून व्यापक स्वरूपात पोहोचावी याकरिता आपले जीवन समर्पित केले. गुरूजींच्या श्यामची आई ह्या मातेची थोरवी पटवून देणार्‍या, व हरवत चाललेल्या मातृप्रेमाला साद घालणार्‍या अप्रतिम पुस्तकाची आजच्या पिढीला नितांत गरज असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी या पुस्तकाच्या वीस हजारांहून अधिक प्रती घरोघरी पोहोचविण्याचा आगळावेगळा संकल्प त्यांनी हाती घेतला. हा संकल्प तडीस नेऊन दाखविताना त्यांनी तब्बल २० हजार पुस्तकांच्या प्रतींचे वाटप, साने गुरूजींसंबंधीच्या २५ हजार माहितीपत्रकांचे वाटप, आणि सुमारे ५ हजार सीडींची विक्री असा मोठा पल्ला पार करून दाखविला. या पुस्तकावर आधारित असलेल्या कथाकथनांची सत्रे आयोजित करणे, हेदेखील त्यांनी गुरूजींच्या विचारमंथनाकरिता निवडलेल विशेष प्रभावी माध्यम होते. उत्तम वक्तृत्वाच्या जोरावर त्यांनी अशी कित्येक सत्रे यशस्वी करून दाखविली. इंदूर येथे २००९ मध्ये झालेल्या मध्य प्रदेश मराठी साहित्य संमेलनात त्यांच्या कथाकथनाच्या कार्यक्रमाला रसिकांची उत्स्फुर्त दाद मिळाली होती. संगम रंगभूमीच्या माध्यमातून त्यांनी अनेक बालनाटये बसविली, व गुरूजींच्या विचारांना विविध कलारूपांत प्रेक्षकासमोर आणले. पुणेकरांनी त्यांच्या या कार्याचा अनेकदा सन्मानाद्वारे व सत्काराद्वारे यथोचित गौरव केला होता. 'हा माझा सत्कार नसून, प्रत्येक आईचा सन्मान आहे', या त्यांनी एका कार्यक्रमा दरम्यान केलेल्या विधानावरून त्यांची विनम्रता झिरपते. वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत त्यांनी गुरूजींच्या विचारांना, तत्वांना व स्वप्नांना सामान्या माणसाच्या स्पंदनांशी जोडण्याचे अतुलनीय कार्य केले. हा उपक्रम आणखी पाच वर्षे पुढे चालू ठेवण्याचा पुराणिकांचा मानस होता. परंतु ही पाच वर्षे उलटण्याअगोदरच ते पंचतत्वांत विलीन झाले.


  • जेष्ठ हिंदी कवी, लेखक पं. नरेंद्र शर्मा

    अलाहाबाद विद्यापीठात अध्यापनशास्त्र आणि इंग्रजी मध्ये एम.ए केले. १९५३ मध्ये नरेंद्र शर्मा यांनी आकाशवाणीत नोकरी सुरु केली. त्यांचा जन्म २८ फेब्रुवारी १९१३ रोजी उत्तर प्रदेशतील जहागीरपूर येथे झाला.१९४७ साली जेव्हा भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले तेव्हा ’ऑल इंडिया रेडिओ’ नावाचा स्वतंत्र विभाग माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापन करण्यात आला. ’ऑल इंडिया रेडिओ’चे अधिकृतरीत्या ’आकाशवाणी’ हे नाव १९५७ साली ठरविण्यात आले. ते नरेंद्र शर्मा यांनी सुचविले होते. आज जे आपण ‘आकाशवाणी’ नाव ऐकतो ते १९५७ मध्ये नरेंद्र शर्मा यांनी ‘आकाशवाणी’ हे नवे आकर्षक नाव ऑल इंडिया रेडीओला सुचविले. या नावामुळे भारतीय जनता, रसिक श्रोत्यांमध्ये एक आपुलकीची भावना निर्माण झाली, व लोक रेडिओ ऐकू लागले. १९३१ मध्ये पंडित नरेंद्र शर्मा यांची पहिली कविता 'चांद' या मासिकात आली होती. विविध भारतीची सुरुवात २ ऑक्टोबर, १९५७ रोजी झाली. १९५७ साली आकाशवाणीचे तेव्हाचे महानिर्देशक गिरिजाकुमार माथुर यांनी एक असा रेडिओ चालू करण्याची कल्पना मांडली की ज्यात विविधता असावी. त्यामुळे या रेडिओचे नाव विविध भारती पडले. नरेंद्र शर्मा व गोपालदास यांनी त्यांना सहयोग दिले. विविध भारतीवर पहिल्या गाण्याची सुरुवात संगीतकार अनिल विश्वाशस यांनी नरेंद्र शर्मा यांनी लिहिलेल्या गाण्याने झाली. ज्या नरेंद्र शर्मा यांनी ज्योती कलश छलके हे गाणे लिहिले त्याच नरेंद्र शर्मा यांनी सत्यम शिवम सुन्दरम या चित्रपटातील सत्यम शिवम सुन्दरम हे गाणं लिहिले होते. नरेन्द्र शर्मा यांनी लिहिलेलं स्वागतम हे गाणं १९८२ च्या एशियाड मध्ये स्वागत गीत म्हणून निवडलेले होते. याचे संगीत रविशंकर यांनी दिले होते. पं.नरेंद्र शर्मा यांनी लोकमानसात आपले आगळे स्थान निर्माण केले होते. मुंबई टॉकीज आणि देविका राणी युसूफ खान पठाण, (दिलीप कुमार) यांचा ‘ज्वार-भाटा’ चा नायक म्हणून विचार करत होते. तेव्हा नरेश शर्मा यांनी युसूफ खान पठाण हे नाव दिलीप कुमार नाव सुचवले. पं. नरेंद्र शर्मा, यांनी लोकमानसात आपले आगळे स्थान निर्माण केले होते. पंडीत नरेंद्र शर्मा यांना लता मंगेशकर या आपले संगीत गुरू मानत. पंडित नरेंद्र शर्मा यांचे ११ फेब्रुवारी १९८९ रोजी निधन झाले.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ : इंटरनेट
    नरेंद्र शर्मा यांची दोन गाणी
    स्वागतम शुभ स्वागतम
    आनंद मंगल मंगलम
    नित प्रियम भारत भारतम

    नित्य निरंतरता नवता
    मानवता समता ममता
    सारथि साथ मनोरथ का
    जो अनिवार नहीं थमता
    संकल्प अविजित अभिमतम

    आनंद मंगल मंगलम
    नित प्रियम भारत भारतम

    कुसुमित नई कामनाएँ
    सुरभित नई साधनाएँ
    मैत्री मति कीडांगन में
    प्रमुदित बन्धु भावनाएँ
    शाश्वत सुविकसित इति शुभम

    आनंद मंगल मंगलम
    नित प्रियम भारत भारतम

    "ज्योति कलश छलके'
    ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके
    हुए गुलाबी लाल सुनहरे, रंग दल बादल के
    ज्योति कलश छलके..
    घर आंगन वन उपवन उपवन, करती ज्योति अमृतसे सिंचन
    मंगल घट ढलके, मंगल घट ढलके
    ज्योति कलश छलके..
    अंबर कुंकुम फल बरसाए, फूल पँखुडिया पर मुसकाए
    बिंदू तू ही न जलके, बिंदू तू ही न जलके
    ज्योति कलश छलके..
    पात पात बिरवा हरियाला, धरती का मुख हुआ उजाला
    सच सपने कलके, सच सपने कलके
    ज्योति कलश छलके..
    उषा ने आँचल फैलाया, फैली सुखकी शीतल छाया
    नीचे आँचल के, नीचे आँचल के
    ज्योति कलश छलके..
    ज्योति यशोदा धरती गय्या, नील गगन गोपाल कन्हैया
    श्यामल छबि झलके, श्यामल छबि झलके
    ज्योति कलश छलके..

  • भाजपचे जेष्ठ नेते जसवंतसिंह

    भाजपचे जेष्ठ नेते जसवंतसिंह यांचा जन्म ३ जानेवारी १९३८ रोजी झाला. राजस्थानच्या राजघराण्यात जन्मलेल्या जसवंतसिंह, उच्च शिक्षणानंतर तेव्हाच्या दरबारी अलिखित प्रथेप्रमाणे सैन्यात अल्पकाल सेवा बजावून परत आले. राजकारणातला त्यांचा ओढा लक्षात घेऊन आधी जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पक्षाचे राजस्थानमधले धुरंधर नेते भैरोसिंह शेखावत यांना जसवंतसिंह राजकारणात आणले. मुळात राजघराण्यातील असल्याने जसवंतसिंह यांचे वागणे आणि शालीन तसेच सुखासीनही त्यातच नंतर सैन्यात राहिल्याने जगण्याला शिस्त आलेली. त्यामुळे जसवंतसिंह यांच्या जीवन शैली तसेच सवयीविषयी पक्षात कायम एकाचवेळी असुयापूर्ण आणि नवलाईचीही चर्चा असायची, आजही असते. उच्च शिक्षण आणि वावर परदेशात राहिल्याने जसवंतसिंह झापडबंद नव्हतेच. त्यांचा कल व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनातही कायम सुधारणावादी राहिला.

    शेखावत यांच्यामुळेच जसवंतसिंह १९८० साली राज्यसभेवर निवडून गेले. पक्ष आणि सत्तेच्या वरिष्ठ वर्तुळात त्यांचा वावर सुरु झाला. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवानी यांना पक्षाचा प्रवक्ता म्हणून जसा ‘एलिट’ चेहेरा पाहिजे होता तो, जसवंतसिंह यांच्यामुळे मिळाला. पक्षाच्या ‘श्रेष्ठी’ गोटात सहज आणि फारच लवकर त्यांचा समावेश झाला. (आता, लोकसभा निवडणुकीत हवा तो मतदार संघ न मिळाल्याने पक्ष सोडल्यावर भारतीय जनता पक्ष संकुचित दृष्टीचा पक्ष आहे ! अशी टीका करणा-या ) जसवंतसिंह यांच्या वाट्याला केंद्रात अटलबिहारी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तारूढ झाल्यावर परराष्ट्र, अर्थ, सरंक्षण यासारखी महत्वाची खाती आली. केंद्रीय मंत्री म्हणून काम करतानाही त्यांचा सुधारणावादी आणि खुला दृष्टीकोन पाह्यला मिळाला.

    राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या कार्यकाळात घडलेल्या कंदहार विमान अपहरण घटनेत निरपराध प्रवाश्यांचे प्राण वाचावे यासाठी राजकीय विरोध मोडून काढत अतिरेक्यांना सोडण्यात त्यांनी पुढाकार घेतला. ते स्वत: अतिरेक्याना घेऊन कंदहारला गेले आणि अपहरण झालेल्या प्रवाश्यांना घेऊन आले. अमेरिकेशी बिघडलेले संबध पुन्हा सुरळीत करण्यात जसवंतसिंह यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून बजावलेली भूमिका त्या काळात वाखाणली गेली. म्हणूनच केंद्रातून सत्ता गेली तरी राज्यसभेतील विरोधी पक्ष नेतेपद पक्षाने त्यांच्याकडे सन्मानाने दिले. जसवंत सिंह नियोजन आयोगाचे उपाध्यक्षही होते. त्यांनी मोहम्मद अली जीनांवर २००९ मध्ये लिहिलेल्या पुस्तकाने मोठा वाद निर्माण झाला होता. "जीना- इंडिया, पार्टिशन, इंडिपेंडन्स‘ या पुस्तकात त्यांनी जीना यांचे कौतुक, तर नेहरू-पटेल यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे १९ ऑगस्ट २००९ ला त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर ते पुन्हा पक्षात परतले होते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • सॉलोमन शालोम आपटेकर

    बेने इस्रयली नाटककार, कीर्तनसंहिता लेखक सॉलोमन शालोम आपटेकर यांचा जन्म ३ ऑगस्ट १९६३ रोजी झाला.

    “एस्तेर राज्ञीचरित्र”, “दानिएकलचे मानसिक धैर्य” या दोन कीर्तनांची रचना आर्या, दिंडी, साकी, अभंग, पदे या वृत्तांनी युक्त आहे.

    संगीत दानिएल व संगीत योसेफ ही नाटके त्यांनी लिहिली.

    Soloman Shalom Aptekar

  • पंडितराव नगरकर

    सुलोचना पालकर हिच्या सहकार्याने पंडितरावांनी १९३४ साली ‘सुलोचना संगीत मंडळी’ या नाट्यसंस्थेची स्थापना केली व १९३७ पर्यंत कंपनीच्या नाट्यप्रयोगांत नायकाच्या भूमिका केल्या.

  • पद्मीनी कोल्हापुरे

    अभिनयाबरोबच गाणं गाण्याची आवड असणारी अभिनेत्री म्हणजेच पद्मिनी कोल्हापुरे, असं म्हणता येईल. त्यांचा जन्म १ नोव्हेबर १९६५ रोजी झाला. गायनाची आवड असणा-या पद्मिनीने लहानपणापासून अनेक सिनेमांमध्ये गाणी गायली आहेत. लहान असतानाच आपल्या बहिणीबरोबर त्यांनी ‘यादोंकी बारात’,‘दुष्मन दोस्त’ या चित्रपटांसाठी गाणी गायली. राज कपूर यांच्या १९७७ साली आलेल्या ‘सत्यम, शिवम, सुंदरम’ या सिनेमामध्ये त्यांनी केलेली भूमिका खूप गाजली. लहानपणी ‘साजन बिना सुहागन’, ‘जिंदगी’ आणि ‘गेहराई’ या सिनेमामध्ये त्यांनी अभिनय केला असून मोठेपणी ‘दो दिलो की दास्तान’, ‘विधाता’, ‘सौतन’, ‘प्यार झुकता नहीं’, ‘इन्साफ का तराजू’ या सिनेमांमधून भूमिका साकारल्या. २००४ साली ‘चिमणी पाखरं’ आणि ‘मंथन’ या दोन सिनेमांमधून त्यांनी रूपेरी पडद्यावर पुनरागमन केलं होतं. मराठी, हिंदी भाषेतील सिनेमांबरोबरच त्यांनी काही मल्याळम चित्रपटांतसुद्धा अभिनय केला आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • बीबीसी मराठीचा पहिला आवाज वेणूताई चितळे

    ९४० साली वेणूताई बीबीसीमध्ये दाखल झाल्या. आवाज, बोलण्याची आणि लिहिण्याची शैली पाहून वेणूताईंना लगेचच प्रसारणाचं काम देण्यात आलं. १९४२-४३ दरम्यान बीबीसीच्या ईस्टर्न सर्व्हिसनं अनेक भारतीय भाषांत प्रसारण सुरू केलं. त्यात मराठीचाही समावेश होता. वेणूताई प्रामुख्यानं याच विभागासाठी काम करत असत.

  • डॉ. अनिल अवचट

    डॉ. अनिल अवचट हे मराठीतील प्रसिद्ध लेखक, समाजसेवक आहेत. त्यांचे केवळ लिखाणच नव्हे तर त्यांचे सामाजिक कार्य ही आदर्श आहे. अनिल अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र याचे संचालक आहेत.

  • कवी मनाचा प्रखर राष्ट्रवादी – अटल बिहारी वाजपेयी

    अटलबिहारी वाजपेयी यांनी कानपूरमधून राज्यशास्त्रात एम.ए.ची पदवी मिळविल्यानंतर वाजपेयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ता झाले.त्यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी झाला. त्यांनी राष्ट्रधर्म, वीर अर्जुन आणि पांचजन्य या नियतकालिकांत पत्रकारिता केली. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रमाताही ते सहभागी झाले. त्यांची राजकीय कारकीर्द म. गांधींच्या ‘चले जाव’ चळवळीपासून सुरु झाली. स्वातंत्र्यानंतर १९५१ मध्ये स्थापन झालेल्या ‘भारतीय जनसंघ’ या पक्षाच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाट होता. पक्षाचे संस्थापक नेते डॉ. शायामाप्रसाद मुखर्जी यांचे अटलबिहारी वाजपेयी विश्वासू सहकारी होते. मा.अटलबिहारी वाजपेयी १९५७ साली प्रथमच संसदेत लोकसभेत निवडून आले. त्यानंतर तब्बल नऊ वेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत. पक्षाध्यक्ष पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या दुर्देवी मृत्यूनंतर पक्षाची धुरा वाजपेयींच्या खांद्यावर आली. ते १९६८ मध्ये प्रथमच पक्षाध्यक्ष झाले. पंतप्रधान इंदिरा गांधींनी १९७५ साली भारतावर लादलेल्या देशांतर्गत आणीबाणीमध्ये त्यांना दोन वर्षे कारावासात काढावी लागली.

    आणीबाणीनंतर आपल्या सहकाऱ्यांसह, संपूर्ण पक्षच वाजपेयी यांनी १९७७ साली जनता पार्टीत विलीन केला. पण त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच १९८० मध्ये वाजपेयी यांनी मुंबईत नव्या भारतीय जनता पार्टीची घोषणा केली. जनता पार्टीच्या ,मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनतापार्टीच्या सरकारमध्ये वाजपेयी परराष्ट्रमंत्री होते. ते १९९६ साली प्रथमच पंतप्रधान बनले. परंतु तेरा दिवसात हे सरकार कोसळले. त्यानंतर १९९८ साली लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरल्याने वाजपेयी पुन्हा एकदा पंतप्रधान बनले. हेय सरकार तेरा महिनेच टिकले. पण याच काळात भारताने अणुस्फोट घडून आणला. आणि आपले सामाजिक- वैज्ञानिक श्रेष्ठत्व सिद्ध केले. त्याचप्रमाणे वाजपेयी यांच्या सरकारने पारंपारिक शत्रू असलेल्या पाकिस्तानाशी शांतता – समझोता करण्याचा प्रयत्न केला.

    कारगिलचे युद्ध ही घटनासुद्धा याच काळातील. वाजपेयी १९९९ मध्ये तिसऱ्या वेळी पंतप्रधान झाले. हे मंत्रिमंडळ पूर्ण पाच वर्ष टिकले. विविध विकास कामे करून देखील २०४४ च्या लोकसभा निवडणुकांत भाजपा सत्तेवर येऊ शकत नाही. त्यानानातर २००५ साली वाजपेयी यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली. वाजपेयी यांच्या कुशल नेतृत्वाखालील भारताने हलाहल देखील पचविले. आणि भारताची तसेच भाजपचीही प्रतिष्ठा उंचावली. अटल बिहारी वाजपेयी ज्येष्ठ राजकीय नेते आणि भारताचे पहिलेच बिगर कॉंग्रेसी पंतप्रधान आहेत. एवढेच नव्हे तर १९९६ ते २००४ या आठ वर्षाच्या कालखंडात वाजपेयी यांनी तीन वेळा भारताचे पंतप्रधानपद भूषविले. वाजपेयी यांची आजवर सुमारे ४० पुस्तके प्रकाशित झाली असून पद्मविभूषण आणि उत्कृष्ट संसदपटू सारखे विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • मायक्रोसॉफ्टचे जनक बिल गेट्‌स

    बिल गेटस्‌नी १९९३ मध्ये “विंडोज ३.१‘ बाजारात आणले. त्याची महिनाभरात लाखोंवर विक्री झाली. १९९५ मध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस, फ्रंट पेज, इंटरनेट एक्सआपोजर यांची निर्मिती बिलच्या कंपनीने केली.