(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • शालिनीताई मोघे

    वंचित वर्गातील मुलांचे शिक्षण तसेच निराधार महिलांच्या उत्थानासाठी पायाभूत स्वरुपाचे कार्य करण्याच्या हेतूने दिवंगत स्वातंत्र्य सेनानी तात्या सरवटे यांनी इंदूरच्या पागनीसपाग्यात सुमारे ६० वर्षांपूर्वी बाल निकेतन संघाची स्थापना केली तेंव्हा त्यांच्या समवेत कन्या शालिनीताई या बिनीच्या शिलेदार होत्या. निव्र्याज सेवेचा वसा वडिलांकडून घेतल्यानंतर तो आजन्म पाळताना शालिनीताईंनी त्याला प्रयोगशिलतेची जोड देऊन समाजहितैषी कामाचा एक मानदंड आखून दिला.

    गुरुवारी वयाच्या ९८व्या वर्षी शालिनीताईंचे निधन झाले तेंव्हा प्रत्येक इंदूरकर हळहळला. इंदूर आणि मध्य प्रदेशच्या शाजापूर, झाबुआ येथील आदिवासी व वंचितांसाठी बाल निकेतन संघाच्या माध्यमातून काम करताना ताईंनी मोठा गोतावळा जोडला. एखाद्याला, विशेषत ज्याला कशाचाही आधार नाही, अशा दुर्बलाला उभे करून आत्मनिर्भर करणे हे मानवसेवेचे कार्य ताई शेवटपर्यंत अथकपणे करीत राहिल्या. रोज शिकत राहा, सचोटीने व्यवहार करा अन् गरजूंना मदतीसाठी तत्पर राहा ही साधीसोपी त्रिसूत्री स्व. तात्या सरवटे यांनी आखून दिली होती, ताईंनी ती जीवनभर एखाद्या व्रतासारखी पाळली. वडिलांप्रामाणे बंधू व्ही. व्ही. सरवटे तसेच पती दादासाहेब मोघे यांची त्यांना सक्रिय साथ लाभली. बाल निकेतन संघ स्थापन करण्याचा निर्णय झाल्यानंतर या क्षेत्रातील कामाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यासाठी ताई त्याकाळी अलीगडच्या विश्व विद्यालयात दाखल झाल्या. बालशिक्षणाच्या प्रणेत्या मादाम माँटेसरी यांच्याकडे कराचीला जाऊन त्यांनी मार्गदर्शन घेतले. हाती घेतलेल्या कामाला त्यांनी प्रयोगशीलतेची जोड दिली. बाल शिक्षणाच्या मार्गातील अनेक अडचणींचे भान त्यांना आले होते, आणि म्हणूनच याबाबत नेमके काय करावे याची त्याना जाण होती. बालशिक्षणाच्या बरोबरीने पोषण व दुर्बल घटकातील महिलांच्या आरोग्याचा प्रश्न त्यांनी हाती घेतला. गरीब महिलांच्या रोजगारासाठी त्यांनी विविध प्रकल्प राबविले. लहान मुलांसाठी ‘झुला घर' सुरू करून अनेक भागांत त्यांची साखळी तयार केली. शहरी भागाच्या गरीब वस्त्यांतील आरोग्याचा प्रश्नही आपल्या अंगीभूत कार्यात सामावून घेतला. एकात्मिक विकासासाठी त्यांनी केलेले कार्य अनेक सेवाभावी संस्थांसाठी आर्दशवत ठरले याचे कारण हेच की, या कामासाठी काय काय करावे याबाबतची ताईंची भूमिका स्पष्ट होती व त्याला कृतिशिलतेची जोड होती. शाळा, ग्रंथालये, महिलांसाठी प्रशिक्षण केंद्रे, अनाथालय, वात्सल्यधाम, शैक्षणिक साहित्य बनवण्याची केंद्रे आदी प्रयोग राबवून त्यांनी समाजातील मोठय़ा घटकाला त्यात सामावून घेतले. निरपेक्ष सेवा हाच त्यांचा मूलमंत्र राहिला. बाल निकेतन संघाच्या कार्याने प्रभावीत झालेल्यांत आचार्य विनोबा भावे, पं जवाहरलाल नेहरू, डॉ. राधाकृष्णन, लालबहाद्दूर शास्त्री, इंदिरा गांधी आदी अनेक मान्यवरांचा समावेश करावा लागेल. १९६० साली त्यांना पद्मश्री किताबाने गौरवण्यात आले. सेवाभावी संस्थेच्या कार्याचा वस्तूपाठ घालून देणाऱ्या ताई शेवटपर्यंत निगर्वी राहिल्या. त्यांचे व्यक्तिमत्वच इतके आश्वासक अन् प्रेमळ होते की त्यांच्या केवळ दर्शनानेही अनेकजण आश्वस्थ होत असत. त्यांच्या निधनाने एका सेवाव्रतीला आपण मुकलो आहेत.

  • श्रीधर देविदास इनामदार

    समीक्षक, कथालेखक आणि चोखंदळ अनुवादक श्रीधर देविदास इनामदार यांचा जन्म ३ सप्टेंबर १९४२ रोजी झाला. “अरण्यरुदन” व “रंगसावल्या” हे त्यांचे कथासंग्रह, तर “काचेचा पिंजरा”, “दिगंतराचे पक्षी” हे त्यांनी केलेले अनुवाद प्रकाशित झाले आहेत. “प्रक्तनाचे संदर्भ” हा त्यांच्या समीक्षापर लेखांचा संग्रह प्रसिद्ध आहे.

    ## Shridhar Devidas Inamdar

  • सतीश पाटील

    बावीसाव्या वर्षीच क्रीडा शिक्षक झालेले औरंगाबादचे सतीश पाटील यांनी हजारांहून अधिक अॅथलिटस् घडविले आहेत. त्यांच्या परिश्रमामुळे वैजापूर तालुक्यातील बाभूळगावची वेगवान दौड सुरु आहे...

    सतीश पाटील यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला बाभूळगावची दौड हा लेख पुढील पानावर वाचा.

    सतीश पाटील यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला बाभूळगावची दौड हा लेख वाचा.

    patil-satish-modified

  • किसन बाबुराव हजारे

    अण्णा हजारे

  • मधुकर नारायण गोगटे

  • श्रीकृष्ण केशव क्षीरसागर

    “टीकाविवेक”, “उमर खय्यामची कैफियत” आदी समीक्षापुस्तके, आधुनिक विवाहपद्धतील दोष टिपणारी राक्षस विवाह ही कादंबरी, तसेच “आधुनिक राष्ट्रवादी रवींद्रनाथ ठाकुर” सारखे चरित्रपुस्तक याचे लेखन त्यांनी केले.

  • दिवाकर नारायण भिष्णूरकर (शाहीर योगेश)

    ‘जय भवानी-जय शिवराय.,’ ‘छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार.’ हे शिवछत्रपतींचे गुणगान ऐकत-त्याच्यातील जोश कानात साठवत महाराष्ट्रातील अनेक पिढय़ा मोठय़ा झाल्या. या पंक्ती राज्यातील अनेक गायक मनसोक्तपणे गात आणि श्रोतृवर्ग मंत्रमुग्ध होई, मात्र त्या रचना नेमक्या कोणाच्या याची माहिती सर्वानाच नव्हती. मराठी मनांचा ठाव घेणारे या पंक्तींचे कर्ते होते शाहीर योगेश. योगेश ऊर्फ दिवाकर नारायण भिष्णूरकर.

    आपले काव्य आणि पोवाडे योगेश स्वत:च गात असत, तेव्हा त्यांचा आवेश पाहण्यासारखा असे, खडा आवाज ऐकण्यासारखा असे. तो ऐकण्याचे भाग्य लाभलेले मराठीजन त्यांच्या सादरीकरणाविषयी सांगतातच, पण त्यांच्या रचना दुसऱ्यांकडून ऐकलेलेही त्या पंक्तीतील चमक, देशप्रेम पाहून दिपून जात. शाहीर मूळचे विदर्भातील. अमरावती जिल्ह्य़ातील अंजनगाव सुर्जी या लहान गावात त्यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९२८ ला झाला. आपल्या भावामुळे ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या रचनांकडे ओढले गेले. त्यांच्या रचना म्हणण्याचा छंद त्यांना लागला. मात्र त्यानंतर शाहीर पांडुरंग दत्तात्रेय खाडिलकर यांचा शाहिरी कार्यक्रम त्यांनी ऐकला आणि शाहिरीतील तेजाने ते तिकडे आकर्षिले गेले. खाडिलकर यांचे पोवाडे गातगात ते स्वत:च रचना करू लागले. मराठी आणि हिंदीतील तब्बल पाचशे काव्यरचनाही त्यांनी केल्या. जुन्या मॅट्रिकनंतर चरितार्थासाठी त्यांनी पशुसंवर्धन खात्यात नोकरी केली, पण त्यांचा खरा ओढा हा काव्यरचना करून त्या गाण्याकडे होता. त्यासाठी त्यांनी उभा महाराष्ट्र पालथा घातला. शिवाजीमहाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंगांवर त्यांनी पोवाडे रचले. शिवछत्रपतींप्रमाणेच शंभूराजे, संत तुकाराम, रामदास स्वामी, श्री चक्रधर स्वामी, लहुजी वस्ताद साळवे, डॉ. हेडगेवार आदींवरही त्यांनी केलेले पोवाडे गाजले. त्यांची गीते चटकन ओठांत खेळू लागत आणि मग ती पाहतापाहता सर्वच जण गाऊ लागत. सातवीच्या एका पुस्तकात त्यांचे शिवबाचे गोंधळी हे गीत समाविष्ट करण्यात आले होते, मात्र त्यांचे नावच त्यात नव्हते, तसेच ‘देश धरमपर मिटनेवाला, शेर शिवाका छावा था, महापराक्रमी परमप्रतापी एक ही शंभू राजा था।’ या संभाजीमहाराजांचे यथार्थ चित्र रंगणारे गीतही कोणीतरी स्वत:च्या नावाने छापले. हे लक्षात आल्यावर आपल्या रचनांची पुस्तके प्रसिद्ध करण्याचे योगेश यांनी ठरविले. ‘शिव-मातृ वंदना’, ‘वीरश्री गाथा-पोवाडे’, ‘प्रहरी’ अशी पुस्तके त्यांनी प्रकाशित केली. केवळ शाहिरीला नव्हे तर राज्यातील सर्वच शाहिरांनाही कायम आठवणीत राहील अशी गोष्ट त्यांनी केली आणि ती म्हणजे शाहीर हिंगे यांच्या साथीने स्थापन केलेली शाहीर परिषद. १९६८ मध्ये स्थापन झालेल्या या शाहीर परिषदेच्या २६ जिल्ह्य़ांत शाखा सुरू झाल्या आणि शाहिरांचे प्रश्न सोडविण्याच्या महत्त्वाच्या कामाला सुरूवात झाली. आपल्या आयुष्याच्या अगदी अखेपर्यंत म्हणजे तब्बल ८३ व्या वर्षांपर्यंत ते कार्यरत होते, खडय़ा आवाजात ‘ही रात्र शाहिरांची’ सारखे कार्यक्रम गाजवत होते. मात्र अचानक काळाने त्यांना हिरावून नेले आणि खडय़ा आवाजातील शाहिरी आवाज मुका झाला.

  • राज ठाकरे

    राजकीय नेते

  • अनंत घोगळे

    अभिनयापासून नाट्यस्पर्धांच्या आयोजनापर्यंत अनेक भूमिकांत रमणारे अनंत घोगळे हे एक वल्ली आहेत. नाट्यचळवळीची गौरवशाली परंपरा अखंड सुरू राहावी म्हणून अनेकजण धडपडत असतात. काही पडद्या समोर तर काही मागे! जे सतत प्रकाश- झोतात असतातत्यांना प्रसिद्धीचं वलय लाभतं, पडद्या-मागचे कलाकारांच योग्दान मात्र दुर्लक्षितच राहतं. ‘औट घटकेच्या’ या नाट्यावकाशात काही मंडळींनी ही तफावत मनोमन स्वीकारलेली असते. त्यांच्या दृष्टीने नाट्यसेवा हे एक प्रकारचं व्रत असतं. घेतला वसा टाकणार कसा, असाच त्यांचा बाणा असतो.

  • सदाशिव पां. टेटविलकर

    असं म्हणतात माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हाच त्याने आयुष्यात काय करायचे आहे हे निश्चित झालेले असतं ! त्यामुळेच की काय पुढे जाऊन त्याच्या आयुष्याला एक वळण मिळतं आणि तिथुन त्याचा, त्याच्या नशिबात लिहिलेल्या मार्गाने प्रवास सुरु होतो. असंच काहीसं इतिहास लेखक सदाशिव टेटविलकरांच्या बाबतीत झालं असावं.