ठाणे शहराला टेबल टेनिस मधील आंतरराष्ट्रीय पदकांच्या नकाशावर नेणारी ठाणेकर क्रीडापटू म्हणजे मधुरिका सुहास पातकर ही होय.
वयाच्या ७ व्या वर्षापासून तिने खेळास सुरुवात केली.
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.
मनोज जोशी यांनी सर्फरोश या चित्रपटातून बॉलीवूड मध्ये पदार्पण केले. सरफरोश, चांदनी बार, हंगामा, देवदास, हलचल, पेज 3, फिर हेरा फेरी से, चुप चुप के, गरम मसाला, गोलमाल, भागम भाग, भूलभुलैया, मेरे बाप पहले आप, बिल्लू, दे दना दन खट्टा-मीठा हे त्यांचे काही हिंदी चित्रपट होत.
अपर्णा संत या भावसंगीत व चित्रपट संगीतावरील सांगीतिक विश्लेषणात्मक कार्यक्रम सादर करतात. संगीतकार मदन मोहन किंवा इतर अनेक संगीतकारांवरचे संगीतकारांच्या विविध सांगीतिक परिभाषेतील बद्दलचे कार्यक्रम त्या त्यांच्या विद्यार्थिनींना घेऊन कार्यक्रम सादर करत असतात.
बाबाराव यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्वाचे योगदान आहे. बाबाराव सावरकर हे स्वा.विनायक दामोदर सावरकर यांचे थोरले बंधू. त्यांनीच स्वा. सावरकरांना पितृतुल्य प्रेम देऊन, अत्यंत हालअपेष्टा सोसून लहानाचे मोठे केले आणि त्यांच्या बरोबरीने क्रांतीकार्यातही भाग घेतला.
बावीसाव्या वर्षीच क्रीडा शिक्षक झालेले औरंगाबादचे सतीश पाटील यांनी हजारांहून अधिक अॅथलिटस् घडविले आहेत. त्यांच्या परिश्रमामुळे वैजापूर तालुक्यातील बाभूळगावची वेगवान दौड सुरु आहे...
सतीश पाटील यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला बाभूळगावची दौड हा लेख पुढील पानावर वाचा.
सतीश पाटील यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला बाभूळगावची दौड हा लेख वाचा.
‘द हिंदू’ या निष्पक्ष दैनिकाने ज्यांचा उल्लेख ‘गझलसम्राट सुरेश भट यांची मशाल घेऊन पथदर्शक बनलेले गझलकार,’ असा केला, झी चोवीस तास या वाहिनीचे व झी मराठी दिशा या आठवडापत्राचे मुख्य संपादक विजयजी कुवळेकर ज्यांना ‘भट यांचे अंतरंग शिष्य’ म्हणाले, ते गझलकार प्रदीप निफाडकर. निफाडकर यांचा पहिला गझलसंग्रह होता- स्वप्नमेणा. ज्याची आता तिसरी आवृत्ती संपली आहे. त्यांनी ‘गझल’ या काव्यप्रकाराची साद्यंत माहिती देणारे पुस्तक लिहिले; ज्याचे नाव ‘गझलदीप’ आहे. त्याचीही पहिली आवृत्ती संपली आहे.
जूकर, पंढरीदादा
चित्रपटसृष्टीची फार ढोबळ ओळख सर्वसामान्य प्रेक्षकाला असते. चित्रपटाच्या तांत्रिक बाजूंपैकी छायाचित्रण, संकलन या विभागाची कामे काय असतात याचे थोडेफार तरी ज्ञान अनेकांना असते; परंतु ‘मेकअप’विषयी साधारणत: फारच कमी आणि त्रोटक माहिती चित्रपटसृष्टीच्या बाहेरील लोकांना असते. ‘मेकअप’ म्हणजे ‘तोंड रंगविणे’ असा एक सर्वसाधारण ठोकताळा असतो. मात्र असे ‘तोंड रंगविणाऱ्याला’ व्यक्तिरेखांचा अभ्यास असेल, अभिनेत्याच्या चेहऱ्यात नेमके काय कमी आहे आणि काय अधिक आहे याचा अंदाज असेल आणि या ज्ञानाचा उपयोग तो ‘मेकअप’ करताना जाणतेपणी करीत असेल तर ‘मेकअप’ हा ‘मेकअप’ राहत नाही, त्याची कला बनते.
पंढरीदादा जूकर यांनी ‘मेकअप’ला असे महत्त्वाचे स्थान प्राप्त करून देता देता स्वत:ही एक कलावंत म्हणून स्थान मिळविले. गेली जवळपास ५० वर्षे पंढरीदादा आपली या क्षेत्रातली ‘दादगिरी’ टिकवून आहेत. आज या क्षेत्रात काम करणारे जवळपास सर्वच तंत्रज्ञ कधीतरी पंढरीदादांच्या ‘हाताखालून’ गेलेले आहेत. मेकअपचे तंत्र जेव्हा पुरेसे विकसितही झाले नव्हते तेव्हापासून दादांचा परिसस्पर्श हजारो चेहऱ्यांना झालेला आहे. चित्रपटसृष्टी ‘कृष्णधवल’कडून रंगांच्या युगात आली तेव्हा छायाचित्रण, वेशभूषा, रंगभूषा या सर्वच गोष्टींकडे नव्या दृष्टीने पाहण्याची गरज निर्माण झाली. त्यामुळे ‘कृष्णधवल’च्या युगात ज्यांची चलती होती, असे अनेकजण ‘रंगांशी’ जुळवून घेण्यात अपयशी ठरले किंवा कमीतरी पडले. पंढरीदादा जूकर यांनी मात्र हे आव्हान सहजगत्या स्वीकारले .‘मधुबाला’पासून ‘मीनाकुमारी’पर्यंत आणि तेथून माधुरी दीक्षित, जुही चावलापर्यंतचा एक मोठा टप्पा गाठला. माधुरीचं नाव या ठिकाणी प्रामुख्यानं घ्यावं लागलं कारण पंढरीदादांच्या मते माधुरी दीक्षितचा चेहरा हा हिंदी चित्रपटसृष्टीतील अलीकडल्या काळातला सर्वाधिक वेधक चेहरा होता. माधुरीनंतर त्यांना थोडेफार आकर्षक, आव्हानात्मक वाटले ते मनिषा कोइराला आणि सुश्मिता सेन हे दोनच चेहरे. आजही प्रत्येक मोठी नायिका आणि हिंदी-मराठी मालिकांमधील छोटय़ा-मोठय़ा अभिनेत्रीही आपल्या चेहऱ्याला पंढरीदादांच्या मेकअपचा स्पर्श व्हावा म्हणून उत्सुक असतात. कारण त्या त्या चेहऱ्याची सौंदर्यस्थळे काय आहेत, पडद्यावर चेहर दिसतो तेव्हा नेमका तो कोणत्या बाजूने अधिक आकर्षक दिसतो याबाबतचे नेमके मार्गदर्शन पंढरीदादा करतात. १९६१ साली सुरू झालेला त्यांचा चित्रपटसृष्टीतला प्रवास, मीनाकुमारी, माला सिन्हा, मधुबाला, वहिदा रेहमान, हेमामालिनी, श्रीदेवी, स्मिता पाटील असा आजच्या काळापर्यंत येऊन ठेपला आहे. त्या काळात मेकअपसाठी केवळ ‘व्हाइट जेली’ उपलब्ध असे, भूवया कोरण्यासाठी काजळाचा वापर होत असे आणि व्यक्तिरेखा ‘म्हातारी’ करताना केस पांढरे करण्यासाठी अंडय़ाचा बलक हा एकमेव पर्याय असे. एवढय़ा मर्यादित साधनांचा वापर करूनही नायिकांचे सौंदर्य पडद्यावर उठून दिसत असे कारण दादांच्या मते त्या चेहऱ्यांमध्येच नैसर्गिक गोडवा होता. पंढरीदादा जर ‘मेकअप’साठी उपलब्ध नसतील तर मीनाकुमारी चित्रिकरणासाठी येतच नसे. ‘त्यांच्या चेहऱ्यांवर फार कमी मेहनत घ्यावी लागत असे,’ असे दादा आवर्जुन सांगतात; परंतु सुंदर चेहरेही अधिक सुंदर करण्यात दादांचा हात कोणी धरू शकत नाही. ‘चांदणी’ किंवा ‘लम्हे’मधली श्रीदेवी आणि ‘हम आपके है कौन’मधील माधुरी नेहमीपेक्षा वेगळी भासते कारण पंढरीदादांनी त्यांना ‘मेकअप’मधून काही वेगळी वैशिष्टय़े बहाल केली होती. ‘डर’च्या वेळी जुही चावला आणि पंढरीदादांची प्रथमच गाठ पडली. हा चित्रपट पाहून जुही चावला म्हणाली ‘मी यापूर्वी कधीही एवढी सुंदर दिसले नव्हते.’ गेली पााच दशके ‘ग्लॅमर’ला ग्लॅमरस करण्यात महत्त्वाचा वाटा असलेल्या पंढरीदादा जूकर यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कर देण्यात येत आहे. चित्रपटसृष्टीतील अभिनय, दिग्दर्शनाव्यतिरिक्त इतर अंगांना क्वचितच असे पुरस्कार दिले जातात. पंढरीदादांच्या निमित्ताने पुरस्कार देणाऱ्यांचे लक्ष अशा उपेक्षित विभागांकडे गेले तर खुद्द पंढरीदादांनाही त्याचा अधिक आनंद होईल. आज आथुनिक साधने हाताशी असताना अनेक गोष्टी सहजसाध्य झालेल्या आहेत, परंतु हे सर्व नसतानाही आजच्यापेक्षा अधिक उत्तम परिणाम साधला जात होता याचे रहस्य आहे कलांच्या जाणिवांमध्ये आणि निष्ठेमध्ये!
त्यांनी अनेक वर्षे लोकसत्ताच्या “विवा” या पुरवणीचे संपादन केले, त्यात त्यांनी लिहिलेल्या “सो कूल” या स्तंभावर आधारीत त्यांच नावाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. व्यावसायिक आणि कलात्मक असे दोन्ही प्रकारचे चित्रपट करतांना त्यात योग्य संतुलन त्यांनी साधले आहे. त्यांनी चित्रपट सृष्टितील आपली कारकीर्द गिरीश कर्नाड दिग्दर्शित “चेलुवी” या चित्रपटातून सुरु केली.
लेखक, समीक्षक आणि संतसाहित्याचे अभ्यासक म्हणून निर्मलकुमार जिनदास फडकुले हे प्रसिद्ध आहेत. २० स्वलिखित, तर ७ संपादित पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti