संदीप अवचट हे नामांकित व विश्वासार्ह मानले जाणारे प्रसिध्द ज्योतिषी, व प्राचीन ज्योतिर्विद्या तसेच अर्वाचीन अंकशास्त्राचे गाढे आभ्यासक व चिकीत्सक आहेत.
गेल्या काही वर्षांत मराठी साहित्यात मोलाची भर घालणार्या महत्त्वाच्या कादंबर्या ग्रामीण भागातून लिहिल्या गेल्या आहेत. 'बारोमास', 'रौंदाळा', 'निशाणी डावा अंगठा' ही त्यातली काही लख्ख उदाहरणे. याच परंपरेतील अलीकडची महत्त्वाची कादंबरी म्हणजे, आनंद विंगकर यांची 'अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट'. परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीने नाडल्या जाणा-या शेतक-यांचं सनातन दु:ख मांडणा-या या कादंबरीने आनंद विंगकर यांना चांगलाच नावलौकिक मिळवून दिला आहे.
या कादंबरीला आतापर्यंत आद्य कादंबरीकार बाबा पदमनजी आणि सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. तिला मानाचा 'केशवराव कोठावळे पुरस्कार'ही मिळालेला आहे. अर्थात पुरस्कारांपेक्षाही विंगकर यांनी या कादंबरीतून शेतक-यांच्या दु:खाला जी वाचा फोडली आहे, ती महत्त्वाची आहे आणि खुद्द लेखकालाही तसंच वाटतं. कारण त्याचा आजवरचा प्रवासही संघर्षाचाच आहे.
सातारा जिल्ह्यातील कराडजवळच्या विंग गावातील आनंद विंगकरांचे वडील मुंबईत गिरणी कामगार होते. त्यांचं तिसरीपर्यंत शिक्षण मुंबईतच झालं. मात्र त्यानंतर आनंद विंगकर आईबरोबर गावाकडे परतले आणि गावच्या शाळेत जायला लागले. त्यानंतरचं त्यांचं वास्तव्य बहुतांशी ग्रामीण भागातच होतं. शिकून नोकरीला लागल्यावर काही काळ ते मुंबईत स्टेट बँकेत नोकरीला होते. परंतु १९८५च्या दरम्यान त्यांची कराडला बदली झाली. तिथे असतानाच एकदा त्यांची बदली खटाव-माण परिसरातील चितळी गावातल्या शाखेत झाली. तिथल्या वास्तव्यात आजूबाजूच्या परिसरातील जे भयानक वास्तव त्यांनी अनुभवलं, त्यातूनच 'अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट' आकाराला आली. प्रकाशित झालेली ही त्यांची पहिली कादंबरी असली, तरी त्यापूर्वी त्यांनी 'दस्तावेज' नावाचीही कादंबरी लिहिली होती.
आणीबाणी ते जागतिकीकरण असा प्रदीर्घ काळ कवेत घेणा-या या कादंबरीचं ते सध्या पुनर्लेखन करीत आहेत. महत्त्वाचं म्हणजे विंगकरांची पहिली ओळख सामाजिक कार्यकर्ता आणि कवी म्हणूनच आहे. गेली अनेक वर्षं ते कवितालेखन करत आहेत. तसंच 'भारत ज्ञान-विज्ञान समुदाय' या पुण्यातील संस्थेच्या माध्यमातून ते साक्षरता व विज्ञानाच्या प्रसाराचंही काम करत आहेत. त्यांचा 'आत्मटीकेच्या उदास रात्री' हा कवितासंग्रह आणि 'सुंबरान मांडलं' ही दीर्घ कविता हा त्यांचा यापूर्वीचा प्रकाशित साहित्यिक ऐवज. त्यांचे डावे विचार व त्यातून आलेले व्यापक सामाजिक भान त्यांच्या शब्दाशब्दातून पसरलेले आहे. 'अवकाळी पावसाच्या' गोष्टीतले हेच भान वाचकांना अस्वस्थ करते.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
एप्रिल २०१८ मध्ये माधव भांडारी यांनी भारतीय जनता पक्षाने मानाचे स्थान दिले असून, मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
खाडिलकर हे एक उत्तम मुलाखतकार होते. त्यांनी घेतलेल्या गोळवलकर गुरुजी आणि सत्य साईबाबा यांच्या मुलाखती अतिशय गाजल्या होत्या.
नयना आपटे यांनी बालकलाकार म्हणून वयाच्या चौथ्या वर्षी मराठी नाटकातून कामं केली. पाचव्या वर्षी 'पुण्यप्रभाव' या नाटकात युवराजचं काम केलं. वयाच्या सातव्या वर्षांपासून सलग पाच वर्षं रोहिणी भाटे यांच्याकडे नयना कथकही शिकत असे. त्याच सुमारास सरस्वती बोडसांच्या 'झाशीची राणी' या चित्रपटात झाशीच्या राणीचा छोटा मुलगा दामोदर याचं काम तिने केलं.
१९५८ साली 'रणजित स्टुडिओ'चे मालक नानूभाई मिस्त्री यांच्या 'चंडीपूजा' या हिंदी चित्रपटातली काम केले. निरुपा रॉय यांच्या या पहिल्या चित्रपटात छोट्या निरुपा रॉयचं काम नयना आपटे यांनी केले होते.
२४ फेब्रुवारी १९६४ ला शांता आपट्यांचं दु:खद निधन झालं. आचार्य अत्रे यांच्या सांगण्यावरून शांताताईंच्या पाथिर्वाला अग्नी नयनानेच दिला. वय वर्ष होतं फक्त चौदा.
नयना आपटे यांच्यावरील लेख वाचण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा.
# Apte, Nayana
समीक्षक प्रा. सदाशिव शिवराम भावे यांचा जन्म १८ डिसेंबर १९३१ रोजी झाला..
त्यांचे मराठी व इंग्रजी नियतकालिकांतून सुमारे ३०० हून अधिक लेख असंग्रहित राहिले, परंतु “अमेरिका नावाचे प्रकरण” हे प्रवासवर्णन प्रकाशित झाले.
## Prof Sadashiv Shivram Bhave
२०१२ मध्ये झी मराठी प्रदर्शित झालेल्या एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत राधा देसाई ही मध्यवर्ती भूमिका मुक्ता बर्वेने केली होती. मुक्ताने महाराष्ट्र स्टेट फिल्म अॅवार्डचे उत्कृष्ट पदार्पणासाठी एक, व सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून चार पुरस्कार जिंकले आहेत.
नीतिन आरेकर हे मराठीचे प्राध्यापक असून ते उल्हासनगर येथील चांदीबाई कॉलेजमध्ये मराठीचे विभागप्रमुख आहेत.
महाराष्ट्रातील नामांकित महिला समाजसेविकांपैकी एक तसंच कुष्ठरोगी, आदिवासी यांच्यासाठी निरपेक्ष मनाने काम करणार्या साधनाताई आमटे यांचा जन्म नागपूर येथे ५ मे १९२७ साली झाला.
कुष्ठरोग्यांसाठी काम करणार्या मुरलीधर देवीदास आमटे अर्थात बाबा आमटे यांच्यासोबत १९४६ साली त्या विवाहबध्द झाल्या. डॉ. बाबा आमटे यांच्या जीवनपटलावरती धावती नजर फिरवणारे, व त्यांच्या गुण दोषांवर प्रकाश टाकणारे निर्भीड असे “समिधा” हे आत्मचरित्र लिहिले. हे आत्मचरित्र तमाम मराठी साहित्यप्रेमींकडून नावाजले गेले. याशिवाय अनेक दर्जेदार पुस्तके व कादंबर्या लिहून त्यांनी आपली एक अत्यंत चौकस व प्रतिभावंत लेखिका ही ओळख मिळविली.
बाबा आमटे यांच्या जीवनकार्याला व त्यांच्या प्रत्येक निर्णयाला व अभिनव उपक्रमांना, त्यांनी खंबीर व सक्रिय अशी साथ सोबत दिली होती. त्यासोबतच कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाचे कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातल्या आनंदवन आश्रमाच्या उभारणीत सुध्दा त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. चतुरंग प्रतिष्ठानच्या २००७ सालच्या चतुरंग जीवनगौरव पुरस्काराने साधना आमटे यांना सन्मानित करण्यात आले होते.
डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. विकास आमटे हे त्यांचे पुत्र त्यांचा आणि बाबा आमटे यांचा वारसा चालवित आहेत.
९ जुलै २०११ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील आनंदवन येथे साधनाताईंचे निधन झाले.
Copyright © 2025 | Marathisrushti