(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • डॉ. जगन्नाथ दीक्षित

    डॉ. दीक्षित हे लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रोगप्रतिबंधक आणि सामाजिक शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

  • डॉ. शिवाजीराव पटवर्धन

    विदर्भातील थोर सामाजिक कार्येकर्ते व कॉंग्रेसचे निष्ठावंत सेवक.

  • रघुनाथ अनंत माशेलकर

    वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) १९९५-२००६ या काळातील महासंचालक. देशातील आघाडीचे वैज्ञानिक. रासायनिक अभियंते असलेल्या माशेलकरांनी नॉन न्यूटोनियम लिक्विड्स या विषयात मौलिक संशोधन केले आहे. पेटंट साक्षरतेची मोहीम रुजवून संशोधन करून ज्ञाननिर्मितीद्वारे पेटंट घेण्यासाठी शास्त्रज्ञांना प्रवृत्त करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले.

    हळदीची पूड औषधी उपयोगासाठी वापरण्यासंबंधी अमेरिकेला दिलेल्या पेटंटविरुद्ध यशस्वी लढा देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ते अनेक पुरस्कारांचे मानकरी असून त्यातील पद्मविभूषण आणि फेलो ऑफ रॉयल सोसायटी हे प्रमुख आहेत. सध्या ते राष्ट्रीय इनोव्हेशन प्रतिष्ठान आणि ग्लोबल रिसर्च अलायन्सचे अध्यक्ष आहेत.

    (जन्म १९४३)

    माहितीस्त्रोत - (म.वि.प.चा.) विज्ञानतंत्रज्ञान कोष

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

  • (डॉ.) जगन्नाथ पाटील

    पाटील, (डॉ.) जगन्नाथ

    कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील तिटवे या लहानशा गावातून डॉ. जगन्नाथ पाटील यांचा शैक्षणिक क्षेत्रातील जो प्रवास सुरू झाला, तो आता ‘एशिया पॅसिफिक क्वॉलिटी नेटवर्क’ (एपीक्यूएन) या आंतरराष्ट्रीय संस्थेचे अध्यक्ष या महत्त्वाच्या मुक्कामावर पोहोचला आहे. उच्चशिक्षण क्षेत्रातील गुणवत्तेचे मापन आणि गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न, अशा दुहेरी उद्देशाने किमान ४२ देशांत कार्यरत असलेल्या या संस्थेच्या अध्यक्षपदाची सूत्रे ऑस्ट्रेलियाच्या डॉ. अँटनी स्टेला यांच्याकडून गेल्याच आठवडय़ात डॉ. पाटील यांनी स्वीकारली आणि
    ‘युनेस्को अथवा जागतिक बँकेकडून वाढीव निधी मिळाला म्हणजे आपण वाढलो, असे होत नाही.. वाढीसाठी निराळा विचार करावाच लागेल’, अशा अर्थाचा संदेशही प्रमुखपदावरून दिला. इथवर मजल मारण्याइतका अनुभव गेल्या दहा-बारा वर्षांत त्यांनी कमावला आहे, हेही विशेष. शिवाजी विद्यापीठातून १९९४ साली बी.एस्सी. झालेल्या जगन्नाथ यांनी पुढे याच विद्यापीठात पत्रकारिता व संज्ञापनाचे (कम्युनिकेशन) शिक्षण घेतले. १९९६ मध्ये याच विद्यापीठातून पत्रकारितेतील मास्टर्स मिळवून त्यांनी पुढली पाच वर्षे शिक्षण-संज्ञापनातील पीएच.डी.साठी अभ्यास केला. यानंतरच्या काळात, शिवाजी विद्यापीठात सहायक कुलसचिव पदावर कार्यरत असताना देशभरच्या उच्चशिक्षण संस्थांचे मूल्यांकन करणाऱ्या ‘नॅक’मध्ये त्यांची नियुक्ती झाली. ‘नॅक’मध्ये आधी सहायक सल्लागार, मग उपसल्लागार आणि पुढे प्रादेशिक समन्वयक या नात्याने ते कार्यरत राहिले. या कार्यकाळात ५०० वर महाविद्यालयांच्या मूल्यांकनाचे समन्वयन त्यांनी केले. नॅकमधूनच ‘एपीक्यूएन’साठी काम करण्याची संधी त्यांना सात वर्षांपूर्वी पहिल्यांदा मिळाली. तेथे त्यांनी २००७ मध्ये मेलबर्न (ऑस्ट्रेलिया), क्वालालंपूर (मलेशिया) आणि हाँगकाँग येथे, शिक्षण संस्थेच्या गुणवत्ता मूल्यांकनात विद्यार्थी-सहभाग कसा असू शकेल याच्या कार्यशाळा घेतल्या. जागतिक बँक, युनेस्को यांनी निधी दिलेल्या या प्रकल्पांवर काम करताना, कामाची प्रक्रिया अधिकाधिक प्रगत करण्यावर जगन्नाथ यांचा मोठा भर असे. महाराष्ट्रातील गावांतसुद्धा दर्जेदार उच्चशिक्षण मिळावे, अशी कळकळही डॉ. पाटील यांना आहे.

  • कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी

  • रामनाथ पारकर

    भारतातर्फे दोन कसोटी सामने खेळलेले त्यांचे दोन्ही सामने इंग्लंडविरुद्धच होते. गुणवत्ता असूनही पारकर यांच्या वाटयाला केवळ दोनच कसोटी सामने आले. ७०च्या दशकात सुनील गावस्कर यांचे सलामीचे साथीदार म्हणून पारकर यांना पुरेशी संधी मिळाली नाही.

  • आनंद दिघे

    आनंद दिघे हे ठाण्यातील नावाजलेलं राजकीय व्यक्तिमत्व होतं. त्यांना ठाणेकर नागरिकांकडून ‘ धर्मवीर ‘ ही पदवी प्राप्त झाली होती. आनंद दिघे ह्यांनी प्रचंड प्रमाणात समाजकार्य केलं आणि जनमानसात प्रचंड मान मिळवला.

  • किसन तुळपुळे

    विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात कामगार चळवळ ज्या प्रामाणिक आणि निस्वार्थी पुढाऱ्यांच्या जीवावर फोफावली त्या पुढाऱ्यांमध्ये किसन तुळपुळे यांचा समावेश अपरिहार्यपणे करावा लागेल. किंबहुना त्यांच्या समावेशाशिवाय या पुढाऱ्यांच्या यादीला कुठेतरी अपूर्णपणा येईल. महात्मा गांधींनी १९४५ मध्ये अहमदाबादला जाऊन ‘मजदूर महाजन’ या कामगार संघटनेचे काम करण्याचा दिलेला सल्ला धुडकावणाऱ्या तुळपुळेंनी नंतर अहमदाबादमधील सूत गिरणी कामगारांसाठी ‘मिल मजदूर सभा’ स्थापन केली.

    अर्थात कामगार हा त्यांचा प्राण होता आणि ‘मिल मजदूर सभा’ हा श्वास होता. पुण्यामध्ये १९२१ मध्ये जन्म झालेल्या किसन तुळपुळ्यांची मुंबई ही कर्मभूमी होती. १९४१ मध्ये मुंबई विद्यापीठाची रसायनशास्त्रातील पदवी घेतल्यानंतर पदव्युत्तर शिक्षण घेण्याची त्यांनी तयारी केली. त्याचबरोबर खडकीच्या दारूगोळा कारखान्यात त्यांनी नोकरी करण्यास सुरुवात केली.

    जयप्रकाश नारायण, एसेम जोशी, साने गुरूजी, राम मनोहर लोहिया आदी स्वातंत्र्य चळवळीतील भूमिगत नेते त्याकाळातील तरूणांचे आदर्श होते. तुळपुळेही त्याला अपवाद नव्हतेच. या नेत्यांच्या ते संपर्कात आले. चळवळीसाठी काम करीत असतानाच त्यांना १९४३ मध्ये अटक होऊन दोन वर्षांची शिक्षा झाली. या दोन वर्षांचा अनुभव त्यांनी आपल्या ‘माझी जेलयात्रा’ या पुस्तिकेत नोंदवला आहे. तुरूंगातून सुटल्यावर ते मुंबईला कामगारांच्या चळवळीकडे आकर्षित झाले. साम्यवाद्यांच्या ‘गिरणी कामगार युनियन’मध्ये अनुभव घेतल्यावर ते ‘राष्ट्रीय मिल मजदूर संघा’त गेले.

    राजकीय मुद्दय़ांवर संघ फुटल्यावर ते साथी अशोक मेहतांबरोबर बाहेर पडले आणि ‘मिल मजदूर सभे’त गेले. या संघटनेचे ते पहिले खजिनदार होते. पण नंतर त्यांनी तब्बल २७ वर्षे या संघटनेचे अध्यक्षपद भूषविले. ही संघटना म्हणजे त्यांचा खरोखरच श्वास होता. दर बुधवारी या संघटनेच्या दादर येथील कार्यालयात जाऊन सहकाऱ्यांशी गप्पा मारल्याखेरीज त्यांना चैन पडत नसे. हा त्यांचा नेम शेवटपर्यंत होता. १९५८ मध्ये त्यांची निवड वेतन मंडळावर झाली. त्याचवर्षी अमेरिकेत झालेल्या ‘लीडर एक्स्चेंज’ या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी त्यांना मिळाली.

    राष्ट्राध्यक्ष जॉन. एफ. केनेडी यांच्याशी त्यांनी कामगारांच्या प्रश्नावर चर्चा केली. १९६८ मध्ये तुळपुळ्यांच्या अध्यक्षतेखाली ‘मिल मजदूर को-ऑप. क्रेडीट सोसायटी’ स्थापन करण्यात आली. कामगारांचे आर्थिक प्रश्न सोडविण्यामध्ये या सोसायटीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. भविष्य निर्वाह निधीच्या मध्यवर्ती मंडळावर नियुक्ती होताच त्यांनी कामगारांना निवृत्ती वेतन देण्याची व्यवस्था केली. आणीबाणीच्या काळात त्यांना या मंडळावरून दूर करण्यात आले पण १९७७ नंतर पुन्हा त्याची नियुक्ती करण्यात आली. केवळ कामगारांच्या संघटनांमध्ये त्यांनी काम केले नाही तर मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवरही त्यांनी आपला ठसा उमटविला आहे.

    कामगार आणि मालक यांच्यात नेहमी सौहार्दाचे वातावरण असले पाहिजे, न्याय्य मागण्यांसाठी मिल बंद करायची नाही तर ती सुरू ठेवून आपल्या मागण्यांसाठी लढा द्यायचा, यावर त्यांचा नेहमी भर असे. रेशम उद्योगातील कामगारांचा लढा लढताना ‘अशोक सिल्क मिल’ आणि एल्डी व्हेल्वेट अ‍ॅण्ड सिल्क मिल’ या दोन बंद गिरण्यांचा प्रश्न त्यांनी याच पद्धतीने लढवला. पाच वर्षे लढा दिल्यावर त्यांनी त्या पुन्हा सुरू केल्याच पण कामगारांची थकीत देणीही मिळवून दिली.

    ५५ वर्षे कामगार संघटनेत काम केल्यावर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि सल्लागाराची भूमिका स्वीकारली. किसन तुळपुळे यांनी कामगार चळवळीवर काही पुस्तकेही लिहिली आहेत. कोणत्याही प्रसिद्धीच्या मागे न लागता आपले काम करीत राहणाऱ्या तुळपुळ्यांची श्रीमंती ही त्यांच्या सहकाऱ्यांच्या संख्येत होती. त्यांचा साधेपणा सर्वानाच भावणारा होता.

    सच्छिल, निस्वार्थी आणि प्रामाणिक असे दुर्मिळ गुण त्यांच्यात होते. कामगारांप्रती असलेली त्यांची तळमळ त्यांच्या सहकाऱ्यांना कायम लक्षात ठेवणारी आहे. मरगळलेल्या कामगार चळवळीला संजीवनी देण्यासाठी सुरू असलेली त्यांची धडपड अखेर ५ सप्टेंबर रोजी विसावली.

  • मनोहर जोशी

    मुंबई महापालिकेत नगरसेवक ते महापौर…… पुढे विरोधी पक्षनेता ते थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री….नंतर खासदार, केंद्रिय मंत्री आणि उल्लेखनीय म्हणजे लोकसभा अध्यक्ष. यशाची अशी सतत चढती कमान असलेले मनोहर जोशी हे एक कल्पक नेतृ़त्व.

  • अशोक पाटोळे

    पाटोळे यांनी लिहिलेली २० नाटके व्यावसायिक रंगभूमीवर गाजली. ‘झोपा आता गुपचूप’ हे त्यांचे पहिले नाटक. ‘मुंबई पोर्ट ट्र्स्ट’च्या ‘एकटा जीव सदाशिव’ या नाटकात त्यांनी विनोदी नायकाची भूमिका केली होती. चित्रकला, वक्तृत्व, गीतगायन व अभिनय यांचीही पाटोळ्यांना आवड होती.