(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • चारुशीला पटवर्धन

    फक्त दूरदर्शन होते, चॅनल्सचा सुळसुळाट नव्हता तेव्हा टीव्हीवर चमकणाऱ्या प्रत्येक चेहर्‍याला ग्लॅमर होते. यात चारूशीला पटवर्धन हे नाव ‘बेस्ट थ्री’मध्ये होते.

  • मधुकाका कुलकर्णी

    श्रीविद्या प्रकाशनचे श्री मधुकाका कुलकर्णी.

    गेली कित्येक वर्षे, अनेक दर्जेदार ग्रामीण कवी व नवोदित लेखकांचे आर्थिक चणचणींमुळे अंधारात राहिलेले साहित्य आकर्षक व सुबक रूपांमध्ये प्रकाशित करून ते नावारूपास आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. स्थानिक ग्रामीण कवी व लेखकांना ओळख मिळवून देण्यात मधुकाकांचा मोलाचा वाटा आहे.

    कोणत्याही जादा अपेक्षांचे ओझे साहित्यिकांवर न लादता त्यांनी अनेकजणांना या क्षेत्रात आर्थिक भरभराट व सुबत्ता मिळवून दिली. उपेंद्र कुलकर्णींचे विपूल व दर्जेदार साहित्य त्यांनी पुस्तकरूपांत आणले आहे.

    दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित

  • जितेंद्र जोशी

    सुरवातीला त्यामध्ये विक्रम गोखले यांचे बरोबर जितेंद्र जोशी काम करीत असे. इतके जबरदस्त नाटक होते कि त्यामध्ये नातू आणि आजोबा यांच्या संघर्षामध्ये सध्याच्या दोन पिढ्यातील अंतर इतक्या प्रभावीपणे मांडला आहे कि हे नाटक पाहताना डोळ्यात अक्षरश अश्रू येतात.

  • राजन विचारे

    राजन विचारे हे ठाण्यामधील सुपरिचित राजकीय व्यक्तिमत्व. ठाणे शहर मतदारसंघातून ते २०१४ साली लोकसभेवर निवडून गेले. त्यापूर्वी ते ठाणे शहराचे आमदारही होते.

    ठाणे शहराचे महापौरपद भुषवित असताना त्यांनी सॅटिससारखा महत्वाकांक्षी प्रकल्प उभारून ठाणे स्टेशन परिसरामधील वाह्तुकीची कोंडी दुर केली होती. तसेच शहरासाठी ११० एम. एल. डी. पाणी पुरवठा योजना राबवून पाणी कपातीचा प्रश्न सोडविण्याचा अनोखा प्रयत्न केला होता. त्याचप्रमाणे त्यांनी कापूरबावडी येथील कलादालन तसेच मानपाडा येथील नाटयगृहाची बांधणी करून त्यांनी पर्यटनाच्यादृष्टीनेदेखील ठाणे नगरीला नवा आयाम देण्याचा दमदार प्रयास केला होता.

    आमदार झाल्यानंतर अधिवेशनांमध्ये ठाण्याच्या विकासाचे विवीध प्रश्न विधीमंडळामध्ये उपस्थित करून जनतेच्या समस्यांना वाचा फोडली. गावदेवी मंडईचा गेली १४ वर्षे रखडलेला प्रश्न त्यांच्या पुढाकारामुळे अधिवेशनामध्ये मांडला गेला होता.

    शहरातील स्थानिक लोकांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात याकरिता ठाण्यामध्येच मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्यासाठी सरकारमागे तगादा लावणे, शहर्‍यातील प्रचंड कचर्‍याची विल्हेवाट लाविण्याकरिता भरावभूमी चा आग्रह धरणे, शहरातील नागरिकांना बेस्टची सुविधा मिळावी यासाठी पवारनगर ते शिवाजीनगर, वाघबीळ ते सिप्झ, दादलानी पार्क ते अंधेरी अशा गर्दींच्या ठिकाणांवर बस सेवा सुरू करून देणे, अशी कित्येक कल्याणकारी कामे त्यांनी आजवर केली आहेत.

    सांस्कृतिक कार्यक्रमांचे ठाण्यामधील विविध ठिकाणी आयोजन करून, त्या त्या क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रणे देवून, व उपयुक्त संवादसत्रे घेवून मराठी संस्कृतीची काहीशी भुसभुशीत झालेली मुळे, पुन्हा रूजविण्याचे कार्य ते आजही अतिव उत्साहाने करित असतात. महादहीहंडी महोत्सव, तसेच चैत्र महिन्यामध्ये सामुहिक चैत्रोत्सव व नवरात्रोत्सव साजरा करण्याचा पायंडा, ते महापौर असतानाच पाडला गेला.

    ठाणे परिसरातील पर्यटन विकासाकरिता ठाणे शहरालगत पसरलेल्या खाडीमध्ये, कल्याण ठाणे व बेलापुर या प्रदीर्घ पट्टयादरम्यान जलमार्ग विकसीत करून जलवाहतुकीसाठी या खाडीचा वापर करण्याचा प्रस्ताव त्यांनी सरकारसमोर मांडला आहे. तसेच मेट्रो रेल्वेचा बहिउद्देशीय प्रकल्प ठाण्यापर्यंत वाढवण्याची मागणी सुध्दा ते रेल्वे प्राधिकरणाकडे करीत आहेत.

  • जयसिंग चव्हाण

    नाट्यनिर्माता म्हणून सत्तर ते ऐंशीच्या दशकात जे रंगकर्मी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उदयाला आले आणि आपला छोटासा का होईना पण गडद ठसा उमटवून गेले, त्यात जयसिंग चव्हाण यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल.

  • अच्युत पालव

    १९८३ साली अच्युत पालव यांनी उल्का शिष्यवृत्तीसाठी मोडी लिपीचा पंधराव्या ते सतराव्या शतकांतील इतिहास, तसेच मोडी लिपीची विविध वळणे व अक्षररुपे यांवर कलात्मक दृष्ट्या संशोधन करुन प्रबंध लिहिला. मोडी व आजची देवनागरी यांच्या दृश्य समन्वयातून ‘धृतनागरी’ तयार केली. तिला ‘मुक्त लिपी’ असे नाव दिले. या लिपीचा त्यांनी सुलेखनातून कलात्मक आविष्कार घडवून ह्या प्रयोगाची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख करुन दिली.

  • सरसेनापती प्रतापराव गुजर

    छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य मावळ्यांना बरोबर घेऊन स्वराज्याचे धोरण बांधले आणि हिदवी स्वराज्य स्थापन केल्यावर जी नवरत्ने घडवली त्या प्रत्येकाच्या कर्तृत्वाला इतिहासात तोड नाही.

  • जगन्नाथ कुंटे तथा स्वामी अवधूतानंद

    तीन वेळा परिक्रमा केल्यानंतर त्यांनी ‘नर्मदे हर हर’ हे पुस्तक लिहिले. या परिक्रमेत त्यांना आलेले अनुभव अत्यंत रोमांचक आणि अचंबित करणारे आहेत. लेखकपणाचा कोणताही आव न आणता फक्त घटनेशी भिडण्याच्या त्यांच्या शैलीने वाचक मंत्रमुग्ध झाले. त्यांचे काही चमत्कारांचे अनुभव बुद्धीला पटणारे नसले, तरी कुंटे यांची शोधक वृत्ती आणि मानवी स्वभावाची निरीक्षणशक्ती यांमुळे त्यांच्या पुस्तकाच्या चाहत्यांची संख्या वाढतच गेली.

  • बाळकृष्ण रंगराव सुंठणकर

    बाळकृष्ण रंगराव सुंठणकर हे लेखक व बेळगाव तरुण भारतचे माजी संपादक होते. 

  • सूर्यकांत दाणेकर

    सुर्यकांत दाणेकर हे किर्ती प्रकाशन, या प्रसिध्द संस्थेचे संपादक म्हणून कार्यरत आहेत. नवोदित लेखक व कवींना आपल्या प्रतिभेचे अविष्कार रसिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी ही प्रकाशन संस्था नेहमी तत्पर असते. आजपर्यंत प्रख्यात लेखिका अनुराधा वैद्य, रेखा बैजल यासारख्या अनेक हौशी व अनुभवी लेखकांचे साहित्य त्यांनी आपल्या निखळ साहित्यप्रेमापोटी आग्रहाने प्रकाशित केले. व्यक्तिशः हिंडून फिरून आपल्या पुस्तकांचे वितरण करणार्‍या काही मोजक्या संपादकांपैकी ते त्यांचे नाव प्रथम घ्यायला हवे. साहित्य निवडण्यातील त्यांच्या चोखंदळपणामुळे त्यांनी आपल्या वाचकवर्गाला नेहमीच दर्जेदार वाड्मय प्रदान केले आहे.