युनिसेफ आणि इतर काही सामाजिक संस्थांसोबत काम करताना त्यांनी राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील अनेक शाळांना भेट दिली आहे.
काकासाहेब चितळे यांच्या मार्गदर्शन आणि कार्यपद्धतीमुळे व आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे चितळे उद्योग समूह वाढला. व्यवसाय फक्त डेअरीपुरता मर्यादित न ठेवता दूध, दही, लोणी, तूप, श्रीखंडासोबतच लाडू, मोदक, करंज्या व बर्फी आदी पदार्थ बाजारात आणले.
चित्रपट, दूरचित्रवाणी, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांचे माहेरचे नाव सुप्रिया सबनीस. सुप्रिया पिळगांवकर यांचा जन्म १७ ऑगस्ट १९६७ रोजी झाला.
सुप्रियाचा रंगभूमीवरचा प्रवेश मधुकर तोरडमलांच्या 'म्हातारे अर्क बाईत गर्क' ह्या व्यावसायिक नाटकाने झाला. त्याच दरम्यान सुप्रिया दूरदर्शनवर 'किलबिल' ह्या मुलांसाठीच्या कार्यक्रमात म्हातारीची भूमिका करत होती. योगायोगाने सचिनच्या आईच्या नजरेत ही 'तरुण' म्हातारी भरली आणि त्यांनीच सचीनकडे त्याच्या नवीन चित्रपटाच्या नायिकेसाठी सुप्रियाची शिफारस केली. सुरुवातीच्या नकारानंतर आई वडिलांनी सुप्रियाला चित्रपटात काम करण्याची परवानगी दिली आणि सुप्रियाने 'नवरी मिळे नव-याला' द्वारा मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले. चित्रपटादरम्यान दोघांमधे नाजूक बंध गुंफले गेले आणि प्रत्यक्षातली नवरी नव-याला मिळाली.
१९८५ साली सचिन-सुप्रियाच्या सहजीवनाला सुरवात झाली. पहिल्या चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनयाचे 'फिल्मफेअर' पुरस्कार मिळूनही सुप्रिया फारशी चित्रपटात दिसली नाही.
मराठीसृष्टीवरील सुप्रिया पिळगांवकर यांच्यावर लिहिलेला संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अशोक समर्थ ! हिंदी , भोजपुरी तसेच मराठी सिनेसृष्टीतील एक कमी वेळात नावाजलेलं नाव. अशोक समर्थ ह्याचा जन्म बारामती सारख्या लहान पण तितक्याच महत्वाच्या गावात झाला. अशोक समर्थचे लहानपणापासूनच एक यशस्वी कलाकार , अभिनेता बनण्याचे स्वप्न होतं. ते त्याने मेहनत घेत पूर्णही केलं.
बरवे यांचे जीवनकार्य लक्षात राहाते, ते अशा सुटय़ा-सुटय़ा चित्रमालिकांतून नव्हे, तर त्यांच्या एकंदर चित्रविचारातून! याच चित्रविचाराने, ‘अमूर्त’ म्हणजे काहीतरी पलीकडचे आणि गूढ नव्हे, नेहमी दिसणाऱ्या वस्तूंचा संबंधदेखील ‘अमूर्त’ असू शकतो, असा विश्वास अनेकांना दिला. याच चित्रविचारातून, ‘कशाचे चित्र काढू?’ हा प्रश्न अनेक कलाविद्यार्थ्यांसाठी कायमचा सुटला!
वसंत तांबे हे रा.स्व. संघाचे सक्रिय कार्यकर्ते आणि अर्थात जुनेजाणते आधारस्तंभ. १९८७ ते १९९७ अशी १० वर्षे त्यांनी सांभाळलेली मुंबई महानगर कार्यवाहपदाची जबाबदारी, कोकण प्रांताचे प्रचार विभागप्रमुख म्हणून केलेले काम, विश्व संवाद केंद्र, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीसारख्या संस्थांच्या उभारणीतला सहभाग अशा कामांतून संघाला त्यांनी दिलेले योगदान मोलाचे होते.
तांबे यांचे लहानपण पुण्यात गेले. तेव्हापासून ते संघाचे सक्रिय कार्यकर्ते बनले. व्यवसायाने सिव्हिल इंजिनीअर असलेल्या तांबे यांनी मुंबईत आल्यानंतरही आपले कार्य सुरूच ठेवले. नायगाव नगराचे संघचालक म्हणून, मुंबई महानगर कार्यवाह म्हणून त्यांनी इथे कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी केली. सगळ्यांचे ऐकून घेऊन, सगळ्यांना एकत्र घेऊन संघटना उभी करण्याचे कसब, उत्तम वक्ता आणि संवादक असलेल्या तांबे यांच्या ठायी होते.
वनवासी कल्याण आश्रमाच्या कामाला आकार देण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. त्या काळात मुंबईच्या नायगावातील त्यांचे घर कार्यकर्त्यांसाठी केंद्रच बनले होते. आदिवासी मुलांना मुंबईत आणणे, त्यांना शिकवणे, मुंबई फिरवणे वगैरे कामे ते करत. महाराष्ट्रभरातील कार्यकर्त्यांना त्यांचा मोठा आधार होता. १९९५च्या सुमारास उभ्या राहिलेल्या विश्व संवाद केंद्राच्या कामात, तसेच रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या उभारणीतही त्यांनी आपल्या विचारांचे योगदान दिले होते.
महिलांच्या राजकीय कामांमध्ये सहभागी करून घेण्याबाबतच्या त्यांच्या सकारात्मक विचारांची दखल संघाकडून अखिल भारतीय स्तरावरही घेतली गेली. १९९३ साली किल्लारीच्या भूकंपामधील नुकसान त्यांनी आपल्या परीने भरून काढण्याचा प्रयत्न केला. जनकल्याण समितीच्या वतीने तेथील भूकंपग्रस्तांसाठी बांधलेल्या घरांची डिझाइन्स त्यांनी तयार केली. त्यांचे अलीकडचे महत्त्वाचे काम म्हणजे, त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली 'फोरम फॉर इंटिग्रेटेड नॅशनल सिक्युरिटी' ही संस्था. तिचे काम आज राष्ट्रीय स्तरावर सुरू असून अनेक निवृत्त लष्करी अधिकारी त्यात कार्यरत आहेत.
वसंतरावांचे वैयक्तिक आयुष्य साहित्य, संगीत यांनी समृद्ध होते. ते उत्तम तबलावादक होते. शास्त्रीय संगीताचे दर्दी होते. 'विचार करण्यासारखे काही', 'ज्येष्ठपर्व', 'प्रश्न प्रश्न प्रश्न', 'दक्षिण दिग्दर्शन' ही पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांचे लेखनकार्यही अखेरपर्यंत सुरू होते.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
चव्हाण, विमल
लढवय्या साम्यवादी चळवळीतील आपल्या साथीदाराचा संसार नेटाने चालवताना डाव्या चळवळीमध्येही योगदान देणाऱ्या त्या तिघीजणी. एकाच पक्षाशी म्हणजे लाल निशाण पक्षाशी बांधिलकी असलेल्या या तीन रणरागिण्यांचे अवघ्या काही दिवसांच्या अंतराने निधन झाले आणि एक पर्व संपले.
विमल चव्हाण यांची ओळख केवळ यशवंत चव्हाण यांच्या पत्नी अशी कधीच नव्हती. ते एक स्वतंत्र व्यक्तिमत्व होते. विमल चव्हाण म्हणजे पूर्वाश्रमीच्या विमल हेमाडी.
मडगाव गोव्यात नारायणराव हेमाडी या प्रतिष्ठित व्यापाऱ्याच्या घरात त्यांचा १९१७ मध्ये जन्म झाला. मोठा परिवार होता. कॉन्व्हेंट शाळेत शिक्षण झाल्यामुळे इंग्रजी भाषेवर मराठी इतकेच प्रभुत्व होते. शाळेत असल्यापासूनच स्वभाव बंडखोर होता. बायबलच्या क्लासवरून त्यांनी शाळेच्या व्यवस्थापनाविरुद्ध लढा दिला होता. १९३८ च्या सुमारास त्या कोल्हापूरला वडीलबंधू प्रभाकर हेमाडी यांच्याकडे महाविद्यालयीन शिक्षणासाठी आल्या. तेथे लेखक, कलाकारांचा राबता असे. स्वाभाविकच विमलताईंवर सांस्कृतिक संस्कार झाले. त्या विद्यार्थी चळवळीमध्ये अग्रेसर होत्या. कोल्हापूरमध्ये सायकलवरून फिरणारी ही एकमेव मुलगी. याच दरम्यान त्यांनी यशवंत चव्हाण यांना पाहिले. कोल्हापूरमध्ये झालेल्या ऐतिहासिक सभेनंतर यशवंत चव्हाण यांच्यावर वॉरंट निघाले आणि त्यांना भूमिगत व्हावे लागले. त्यावेळी ते हेमाडी यांच्या घरी राहिले आणि नंतर विमलताईंच्या प्रेमाच्या बेडीत अडकले. १९४५ मध्ये त्यांचे लग्न अवघ्या पाच रुपयात झाले. अनेकदा दोघांचे राजकीय मतभेद होत. तरीही पतीबद्दल त्या नेहमी ‘माय हजबंड इज अ जेम’ असेच सांगत. स्वातंत्र्य लढय़ाला विरोध करणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाच्या भूमिकेला विरोध करणाऱ्या नवजीवन संघटनेमध्ये त्या सुरुवातीपासून होत्या. त्या संघटनेचे म्हणजेच आताच्या लाल निशाण पक्षाची मंडळी अगदी अलीकडच्या काळापर्यंत कम्युनवर राहत होती. विमलताई आणि यशवंत चव्हाण तेथेच राहत. डॉ. माधव चव्हाण हे त्यांचे पुत्र. जनचळवळीतल्या मंडळींप्रमाणेच विमलताईंनी पूर्णवेळ नोकरी केली आणि यशवंतराव पूर्णवेळ राजकारणात राहिले. खार येथील बी. पी. एम. हायस्कूलमध्ये त्या शिक्षिका होत्या. नोकरीच्या अखेरच्या काळामध्ये त्या या शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका होत्या. नोकरीमुळे आपल्याला राजकारणात सक्रिय होता आले नाही, ही खंत त्यांना अखेपर्यंत होती.
“प्रभात” मधील श्रीपाद शंकर नवरे यांचे महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर यांच्यावर लिहिलेले मृत्युलेख संस्मरणीय ठरले.
अगदी मराठी-हिंदीच्या पलीकडेही जाऊन तेलुगू चित्रपट गीतांनाही त्यांनी संगीत दिलं आहे. सैराट मधील ‘याड लागले‘, “झिंगाट‘, “सैराट झालं जी‘, “आत्ताच बया‘ या चारही गाण्यांनी सर्वांनाच “याड‘ लावलं.
कडकडे कुटुंबीय मूळचे गोव्याजवळील डिचोली गावचे. इंटरपर्यंतचे त्यांचे शिक्षण गोव्यातच झाले. कडकडे घराण्यात किंवा आजोळीही गाण्याचा वारसा नव्हता. केवळ घरच्यांनी सांगितले म्हणून ते गोव्यातील माडीये गुरुजींकडे गाणे शिकायला जाऊ लागले. अजित कडकडे यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे प्राथमिक धडे पं. गोविंदराव अग्नी व पं. गोविंदप्रसाद जयपूरवाला यांच्याकडे घेतले. नंतर पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे त्यांनी दहा वर्षे संगीताची तालीम घेतली.
अजित कडकडे यांनी सुरुवातीच्या काळात 'संगीत शारदा', 'संगीत सौभद्र' या संगीत नाटकांतून गाणाऱ्या पात्रांच्या भूमिका केल्या होत्या. एका मुलाखतीत त्यांनी सांगीतले होते की ‘संगीताचा कोणताही वारसा आमच्या घरात नव्हता. माझ्या मनात गाण्याचा कसलाही विचार नव्हता. मला डॉक्टहर व्हायचे होते. परंतु पं. अभिषेकीबुवांमुळे मी या क्षेत्रात आहे. मा.आर.एन.पराडकर यांची परंपरा अजित कडकडे चालवताना दिसतात. मा.अजित कडकडे यांनी गेल्या तीस वर्षांत दत्तगुरूंवर सुमारे चाळीस-पन्नास अल्बम केले आहेत, यातल्या बहुतांश रचना कवी प्रवीण दवणे यांच्या आहेत तर संगीत नंदू होनप यांचे आहे. ‘निघालो घेऊन दत्ताची पालखी, अलौकिक दत्तात्रेय अवतार’ आदी त्यांची गाणी भक्तप्रिय ठरली आहेत.
दत्तगुरूंवरील अन्य रचनांपैकी ‘त्रिगुणात्मक त्रमूर्ती दत्त हा जाणा’ ही पारंपरिक आरती तर घरोघरी म्हटली जाते. ‘मला हे दत्तगुरू दिसले’ हे आशा भोसले यांचं गीतही (आम्ही जातो आमच्या गावा) अजरामर आहे आणि रघुनाथ साळोखे यांनी गायलेलं ‘दत्त दर्शनाला जायाचं, जायाचं, आनंद पोटात माझ्या माईना’ हे गीतही आगळंवेगळं आहे. अजित कडकडे आणि संगीतकार मा.नंदू होनप यांच्या भक्तिसंगीताने रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. तब्बल ३५ वर्षे या जोडीने एकत्र काम केले. अजित कडकडे यांनी अनेक भावगीतेही गायली आहेत..
हे हासणे गुलाबी..
सजल नयन नीत धार..
मैफलीचे गीत माझे..
अशी सुमारे दहा..
तुझ्या कृपेने दिन उगवे..
भक्तिवाचुनि मुक्तीची मज..
अशी कित्येक भक्तिगीते..
तर चक्क "चल गो चंपा.." हे कोळीगीतही गायले आहे.
"आर. एन. पराडकर" यांची भक्तीगीतांची व्हर्शन्स त्यांनी खास आग्रहाखातर केली हे विशेष.. मा.अजित कडकडे यांना "संगीतकार प्रभाकर पंडित स्मृती पुरस्कार‘ मिळाला आहे.
अजित कडकडे यांचे मराठीसृष्टीवरील लेख.
ज्येष्ठ गायक पं. अजित कडकडे (11-Jan-2018)
ज्येष्ठ गायक पं. अजित कडकडे (12-Jan-2017)
#AjitKadkade
Copyright © 2025 | Marathisrushti