साठोत्तरी मराठी सामाजिक कादंबरीतील इहवाद आणि नैतिक जाणीवांना चिकीत्सक अभ्यास या विषयावर त्यांनी संशोधन केले आहे.
उल्हास कशाळकर यांना अखिल भारतीय पातळीवरील ‘क्रिटिक असोसिएशन’च्या मानाच्या पुरस्काराने गौरवले गेले आहेत. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार २००८ साली प्राप्त झाला होता.
अवघे १५०० रुपये घेऊन १९९१ साली नाशिकमध्ये आलेले विराज लोमटे यांनी यशश्री ग्रुप या बांधकाम कंपनीची सुरुवात करून २० वर्षांत कोटीच्या कोटी उड्डाणे घेत मराठी पाऊल पडते पुढे हे दाखवून दिले आहे.
सांगली येथील मध्यमवर्गीय कुटूंबातील विराजने आई - वडिलांच्या आग्रहाखातर बी. ई. सिव्हीलचे शिक्षण घेतले. सांगलीसारख्या छोट्या शहरात कर्तृत्वाला संधी नाही म्हणून नोकरीच्या शोधात नाशिक गाठले. आर्किटेक्ट जयंत देशमुख यांच्या कंपनीत दोन वर्षे नोकरी करून १९९४ साली स्वत:चा व्यवसाय सुरू केला.
पीडब्ल्यूडीमधील बांधकाम ठेकेदार म्हणून करिअरला सुरुवात केली. त्याचबरोबर अनेक औद्योगिक इमारती, खासगी बंगलो व अनेक संस्थांच्या इमारती बांधल्या. स्वत:ची आवड म्हणून प्लॅनिंग करीत आर्किटेक्चरल फर्मही काढली. या फर्मला पहिल्याच वर्षी सांगली येथे वसंतदादा स्मारकाच्या डिझाइनसाठी पारितोषिकही मिळाले.
सांगली, नाशिक, शिर्डी, कोपरगांव, देवळाली, सटाणा, त्र्यंबकेश्वर नगरपालिका, राहुरी कृषी विद्यापीठ, यशवंतराव मुक्त विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, विविध बँका आदींच्या आर्किटेक्चरल पॅनलवर त्यांची संस्था काम करते आहे. शिर्डी येथील हॉटेल, नाशिक येथील बंगल्यांसाठी त्यांची डिझाइन्स वापरली जात आहेत. त्र्यंबकेश्वर नगरपालिकेसाठी सिटी डेव्हलपमेंट प्लॅनही त्यांच्या संस्थेने बनविला आहे.
बांधकाम व्यवसायात सचोटी, प्रामाणिकपणा, गुणवत्ता व पारदर्शकता यामुळे यशश्री, भाग्यश्री, धनश्री, विजयश्री, श्रीगणेश, अपूर्वाई, गझल, धन्वंतरी, श्रीयोगेश्वर, श्रीसूर्यमाला हे प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. उदघाटनापूर्वीच पूर्ण बुक होणारा त्र्यंबकचा श्रीवरद व पुण्याच्या डी. एस. के. समूहाबरोबर साकारण्यात येत असलेला सुवास्तू प्रकल्प हे त्यांच्या व्यवसायाच्या मानांकनाचे केंद्रबिंदू ठरले आहेत.
व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधीलकी जपताना पर्यावरण रक्षणासाठी ३०० वृक्षांचे रोपण व संगोपन, मोदक स्पर्धा, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. लघुउद्योग भारती या राष्ट्रीय संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व मानद सचिवपदही त्यांनी भूषविले आहे. नुकत्याच पार पडलेल्या नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक ६० टक्के इतके मतदान घडविण्यासाठी नाशिक सिटीझन फोरमने राबविलेल्या मतदार जागृती अभियानात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
जोशी, द. पां.
स्वातंत्र्योत्तर काळात हैदराबादसारख्या उर्दू व तेलुगू या भाषांचा प्रभाव असलेल्या शहरात मराठी भाषा, साहित्य व संस्कृती समृद्ध करण्यात ज्यांनी तोलामोलाचे योगदान दिले, अशांमध्ये प्रा. द. पं. जोशी हे ठळक नाव. आपल्या सुमारे ५० वर्षांच्या वाङ्मयीन व संघटनात्मक कारकीर्दीत स्वत:ची विपुल ग्रंथसंपदा निर्माण करण्यावर भर देण्यापेक्षा संशोधन व संपादनाचा पिंड जोपासणाऱ्या या भाषाप्रभूने संपादित केलेल्या महत्त्वाच्या ग्रंथांपैकी एका ग्रंथाचे शीर्षक ‘काळाच्या पडद्याआड’ असे होते.
ते द. पं. नुकतेच काळाच्या पडद्याआड गेल्याने हैदराबादची मसाप, मराठी महाविद्यालय यांसह तेथील समस्त मराठी भाषकांचा आधारवड कोसळला आहे. हैदराबादेत मराठी वातावरण तयार होत असतानाच्या काळात तेथे आधी विद्यार्थी म्हणून गेलेल्या आणि मग प्राध्यापकी पेशाच्या निमित्ताने स्थायिक झालेल्या द.पं.नी पुढच्या पाच दशकांत मराठी बहुअंगाने समृद्ध करण्याचे कार्य व्रतस्थपणे पार पडले. डॉ. नांदापूरकर, भालचंद्र कहाळेकर हे त्यांचे गुरू. त्यांच्या पश्चात ‘मसाप’चा लौकिक सर्वदूर पसरवताना द.पं.नी हैदराबादेतील वाङ्मयीन चळवळीत मोठी मांदियाळी सहभागी करून घेतली. अनेक संस्था व उपक्रमांचे ते अध्वर्यू. वाचन, अभ्यास, लेखन-संपादन यामध्ये त्यांनी कधी उसंत घेतलीच नाही. त्यांच्या संपादित ग्रंथसंपदेवर नजर टाकली तरी त्यांच्यातला संशोधक दिसतो. महाराष्ट्र शासनाने नांदेडच्या कुरुंदकर स्मारकाला निधी देण्याच्या बाबतीत करंटेपणा केला आहे, पण द.पं.नी हैदराबादेत बसून याच शासनाकडून अर्थसहाय्य मिळवून कुरुंदकर स्मृतिग्रंथासह समग्र नांदापूरकर, समग्र सेतू माधवराव पगडी इत्यादी अभ्यासकांचे ग्रंथ अभ्यासकांसमोर आणण्याचे ऐतिहासिक कार्य केले. पंचधारा नियतकालिकाला प्रतिष्ठा व सन्मान लाभला तो त्यांच्या कुशल संपादनामुळेच! या सबंध कार्यात सहचारिणी डॉ. उषा यांचीही त्यांना साथ होती. मागील एक-दोन वर्षांपासून द. पं. काहीसे थकले होते, पण सार्वजनिक कार्यातील त्यांचा उत्साह कायम होता. ‘इतिहास-हैदराबादचा’, ‘व्यक्तिविशेष’ आदी काही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर असतानाच या साहित्यसेवकाची ‘साहित्य-सहवास यात्रा’ थांबली.
“विज्ञानप्रणीत समाजरचना”, “भारतीय लोकसत्ता”, “लोकसत्तेला दंडसत्तेचे आव्हान”, “राष्ट्रधर्म”, “हिंदू समाज”, “महाराष्ट्र संस्कृती”, “इहवादी शासन”, “केसरची त्रिमूर्ती” आदी वैचारिक पुस्तके लोकहितवादींच्या शतपत्रांचे संपादन, तसेच “साहित्यातील जीवनभाष्य” ही समीक्षा, दोन नाटके आणि “लपलेले खडक” हा लघुकथासंग्रह त्यांनी लिहीला.
मंगेश तेंडुलकर हे अखेरपर्यंत कार्यरत असणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. मंगेश तेंडुलकर यांनी ९० हून अधिक व्यंगचित्र प्रदर्शन आयोजीत केली होती. स्वतःचा मृत्यू या विषयावरही त्यांनी व्यंगचित्रांची मालिका बनवली होती.
भास्कर काशीनाथ चांदूरकर हे “काव्यशेखर” या टोपण नावाने कविता लिहित असत.
मराठी प्रायोगिक रंगभूमीचे जनक आणि बुजूर्ग नाट्य दिग्दर्शक दामू केंकरे यांचा जन्म ५ मे १९२८ रोजी झाला.
दामोदर काशिनाथ केंकरे उर्फ दामू केंकरे यांनी तब्बल सहा दशके रंगभूमीची सेवा केली. दामू केंकरे हे मुंबईतील जे.जे.स्कूल ऑफ आर्ट या कलाशिक्षण संस्थेत ते १९५७ सालापासून १९७८ सालापर्यंत कला शिकवीत होते. या दरम्यान त्यांची नाट्यकारकीर्द चालू होतीच. गोवा हिंदू असोसिएशन संस्थेकरता त्यांनी बरीच नाटके बसवली. चाकोरीबध्द रंगभूमीच्या बाहेर जाऊन विचार करणारा दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख होती. हॅल्मेट,कालचक्र, उद्याचा संसार, आपलं बुवा असं आहे, सूर्याची पिल्ले, अखेरचा सवाल, कालचक्र, कार्टी प्रेमात पडली अशा नाटकांचे दिग्दर्शन दामू केंकरे यांनी केले होते. त्यांनी हॅल्मेट या नाटकात हॅम्लेटची मुख्य भूमिकाही केली होती. वाजे पाऊल आपुले हे नाटक १९६७ साली दामू केंकरे यांच्या अभिनयाने गाजले होते.
अरविंद देशपांडे दिग्दर्शित तुघलक व बादल सरकार यांच्या सारी रात या नाटकाचे नेपथ्य दामू केंकरे यांनी केले होते. तुघलक व सारी रात या नाटकांच्या नेपथ्याबद्दल त्यांना अनेक पुरस्काभराने सन्मानित करण्यात आले होते. 'सुर्याची पिले' या गाजलेल्या नाटकाने त्यांनी मराठी रंगभूमीला समृध्द करण्यात मोठे योगदान दिले.
दामू केंकरे यांचा गोवा कला अकादमीच्या उभारणीत मोलाचा वाटा होता. दामू केंकरे यांनी डारेक्टर ऑफ कल्चरल अफेअर महाराष्ट्र राज्य म्हणून काही वेळ काम केले. त्यांना जीवनगौरव पुरस्कार, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार ही मिळाला होता. साहित्य संघाचे संस्थापक डॉ. अ. ना. भालेराव यांची जन्मशताब्दी २००२ मध्ये साजरी करण्यात आली. त्या वेळी हा नाटय़ोत्सव उपक्रम सुरू करण्यात आला. दामू केंकरे यांच्या निधनानंतर पासून हा महोत्सव दामू केंकरे यांच्या नावाने साजरा केला जातो.
दामू केंकरे स्मृती नाटय़ोत्सवाचे आयोजन दर वर्षी करण्यात येते. या नाटय़ोत्सवासाठी केंकरे कुटुंबीयातर्फे प्रायोगिक नाटय़संस्था किंवा व्यक्तीला प्रोत्साहन म्हणून नाटय़निर्मितीसाठी एक लाख रुपये देण्यात येतात. बालरंगभूमीसाठी आपलं सारं जीवन वेचणाऱ्या सुधाताई करमरकर व दामू केंकरे यांच्या पत्नी ललिता केंकरे या दोघी बहिणी. ललिता केंकरे यांनीही नाटकातून काम केले. मराठी रंगभूमीला निवडक पण चांगल्या नाटकांची पर्वणी देणारे दिग्दर्शक विजय केंकरे हे त्यांचे चिरंजीव. गोवा हिंदू असोसीएशनने दामू केंकरे यांच्या वर “३ अंकी गुरुकुल” या नावाने गौरवग्रंथ लिहिला आहे.
दामू केंकरे यांचे २८ सप्टेंबर २००८ रोजी निधन झाले.
#DamuKenkare
खाडिलकर हे एक उत्तम मुलाखतकार होते. त्यांनी घेतलेल्या गोळवलकर गुरुजी आणि सत्य साईबाबा यांच्या मुलाखती अतिशय गाजल्या होत्या.
घारे भेदक डोळे आणि खोलवर रूतणारा आवाज या वैशिष्ट्यांचा परिणामकारक वापर करत रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन या तिन्ही माध्यमांत लीलया मोहन गोखले वावरले.
Copyright © 2025 | Marathisrushti