(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • आनंद देशपांडे ऊर्फ आकाशानंद

    दूरदर्शनवर त्यांनी ‘माध्यम चित्रवाणी’ नावाचे पुस्तक लिहिले. या पुस्तकाला राज्य सरकारचा सवरेत्कृष्ट पुरस्कारही मिळाला. त्याचबरोबर बालसाहित्यिक म्हणून त्यांची वेगळी ओळख होती. त्यांनी मुलांसाठी सुमारे ३०० पुस्तके लिहिली.

  • सुधीर माईणकर

    माईणकर, सुधीर

    ‘तबला वादन : कला और शास्त्र’ हे हिंदी पुस्तक आज देशभरच्या हिंदुस्थानी संगीत विद्यालयांत क्रमिक पुस्तकाच्या दर्जाचे ठरले आहे. त्याचे लेखक म्हणजे पं. सुधीर माईणकर. पंच्याहत्तरीनिमित्त उद्याच्या शनिवारी त्यांचा होणारा सत्कार, हा त्यांना ‘प्रसिद्धी’ देणारा अपवादात्मकच सोहळा ठरेल. एरवी, प्रसिद्धी आणि ‘कीर्ती’ या किती निरनिराळय़ा गोष्टी आहेत, हे पाहायचे असेल तर सुधीर माईणकर यांच्या कारकीर्दीकडे पाहावे! तबलावादक म्हणून नाव कमावण्याची संधी असूनही सांगीतिक विद्वत्ता वाढवण्याची अवघड वाट माईणकर यांनी स्वीकारली.

    ‘अनेकांना ऐकता आले, त्यांनी संगीतात शोधलेली सौंदर्यस्थळे तबल्यात शोधून पाहाता आली,’ याचेच समाधान पं. माईणकर यांना अधिक आहे.. असे समाधान मिळवणारा गुरू विद्यार्थ्यांना थोडक्या काळातही किती भरभरून देऊ शकतो, याचा प्रत्यय मुंबईच्या राष्ट्रीय संगीत नाटय़ केंद्रात (एनसीपीए) माईणकर यांच्या तबला कार्यशाळांमध्ये सहभागी झालेल्या अनेक तरुण वादकांना तसेच देशभरच्या विद्यापीठांत संगीताचे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या अनेकांना आला आहे. ‘तबल्याचे व्याकरण, भाषा आणि सौंदर्यशास्त्र यांचा सखोल अभ्यासक’ ही माईणकर यांची प्रसिद्धी नव्हे, तर सिद्धीतून आलेली कीर्ती आहे. ‘..कला और शास्त्र’च्या इंग्रजी आवृत्तीच्या प्रकाशन सोहळय़ाला झाकीर हुसेन मुद्दामहून आले, ते त्यांना ही कीर्ती जवळून माहीत होती, म्हणूनच. वडील विष्णुपंत यांचा तबल्याचा नाद शालेय वयातच अंगी मुरलेल्या सुधीर यांनी बडम्े गुलाम अली, डी. व्ही. पलुस्कर, ॐकारनाथ ठाकुर, केशरबाई केरकर आणि आमीर हुसेनखाँ यांसारख्या दिग्गजांना ऐकले. तरुणपणी तबल्याची ‘गत’ हा त्यांचा खास अभ्यासविषय झाला, तो तबल्यातील दिल्ली घराण्याचे खलीफा इनाम अली खान यांची शागिर्दी केल्यानंतर. अजराडा, बनारस आदी घराण्यांचा बाजही त्यांनी अभ्यासला, पण ‘दाया’वर केवळ तर्जनी व शेजारचे बोट ठेवून तालाचे चापल्य आणि शुद्धता राखणारा दिल्ली घराण्याचा ‘चटिका बाज’ ही माईणकरांची खास शैली. गुरू म्हणून त्यांचे इनेगिने शागिद आहेत. परंतु अनेक विद्यार्थी आणि अभ्यासक यांनाही पं. माईणकर गुरुस्थानीच आहेत व राहतील.

  • चरित्र अभिनेते नाना पळशीकर

    नाना पळशीकर यांचा जन्म २० मे १९०८ रोजी मध्यप्रदेशातील भंडारा येथे झाला. नाना पळशीकर म्हणजे नारायण बळवंत पळशीकर.

    नाना पळशीकर हे केवळ आपल्या मुद्राअभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारे असामान्य चरित्र अभिनेते होते. मध्य प्रदेशात जन्म झाल्यामुळे त्यांच्यावर मराठीपेक्षा हिंदी भाषेचे संस्कार खूप होते. जेमतेम मॅट्रिकपर्यंत शिक्षण झाल्यावर देशप्रेमाने प्रेरित होऊन त्यांनी स्वातंत्र्ययुद्धात उडी घेतली आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. नागपूर येथे हिंदू महासभेच्या कार्यक्रमात कॅम्प फायरचे आयोजन करण्यात आली. त्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. हेगडेंवार तेथे होते, त्या वेळी नाना पळशीकर यांनी एक छोटा कार्यक्रम केला होता. तो पाहून त्यांनी नानांची प्रशंसा केली आणि म्हणाले , " तू खूप चांगला अभिनय करतोस, तू सिनेमात गेलास तर चांगले नांव कमवशील."

    त्या काळात नागपूरला एक चित्रपट संस्था मूकपट तयार करत होती. त्या मूकपटात नारायण यांना काम मिळाले. त्याचवेळी त्यांनी त्यांचे नाव ' नाना पळशीकर ' असे केले. चित्रपट क्षेत्रात नाव कमवावे या हेतूने नाना प्रभात कंपनीत पुण्याला गेले. पण तिथे काम मिळाले नाही. मग ते मुबंईला गेले आणि तिथे रोज एक रुपया रोजदारीवर रणजित स्टुडिओमध्ये काम करू लागले. त्यावेळी रणजीत स्टुडिओत १९३५ साली ' देशदासी ' या चित्रपटाचे काम चालले होते. त्या चित्रपटात त्यांना छोटी भूमिका मिळाली. त्यानंतर ' बॅरिस्टर की बीबी' या चित्रपटात छोटी भूमिका मिळाली. पुढे काहीतरी काम मिळाले पाहिजे असा विचार करता असताना द्वारका प्रसाद जे मध्यप्रदेशचे गृहमंत्री होते त्यांच्याशी त्यांची भेट झाली. ते ' धुवादार' चित्रपटाची निर्मिती करत होते त्यांनी नाना पळशीकर यांना त्या चित्रपटासाठी करारबद्ध केले. त्यातील त्यांची भूमिका गाजली. त्यानंतर त्यांनी बॉम्बे टॉकीजच्या ' दुर्गा', नया संसार', ' कंगन', ' आझाद ' या चित्रपटात चरित्र अभिनेत्याच्या भूमिका केल्या. त्यामुळे त्यांना खुपच प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या नावाचा बोलबाला पाहून व्ही. शांताराम यांनी त्यांना राजकमल कलामंदिर मध्ये बोलवून घेतले. त्यांना ' माली ' या हिंदी चित्रपटात आणि ' भक्तीचा मळा ' या मराठी चित्रपटात भूमिका दिली.

    'माल' या चित्रपटासाठी त्यांनी एक हिंदी गीतही लिहिले. 'भक्तीचा मळा' हा त्यांचा पहिला मराठी बोलपट. त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातून कामे केली.

    त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातून कामे केली त्यामुळे त्यांना मराठी चित्रपटात कामे करण्यास वेळही मिळत नसे. तरीही १९५५ च्या 'मूठभर चणे', १९६२ च्या 'प्रेम आंधळं असत' आणि १९६३ च्या ' फकिरा ' या चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. त्याचप्रमाणे 'जेम्स आयव्हरीच्या ' द गुरु ' नावाच्या अमेरिकन चित्रपटातही त्यांनी काम केले. ह्या चित्रपटात काम केल्यावर जेम्स यांनी विधान केले ' की त्यांना जेव्हा ह्या चित्रपटात घेतले तेव्हा मला कल्पना नव्हती की ते इतके चांगले आणि प्रामाणिक कलाकार आहेत ते.' त्यांच्या त्या कामाची न्यूयॉर्क मॅगझीनने देखील प्रशंसा केली होती.

    नाना पळशीकर यांनी चार मराठी चित्रपटात भूमिका केल्या आणि शंभरहून अधिक हिंदी चित्रपटात भूमिका केल्या. त्यांना ' कानून ' ह्या चित्रपटातील भुमीकेसाठी , तसेच एकूण तीन चित्रपटासाठी त्यांना सर्वोतकृष्ट अभिनेता म्हणून फिल्मफेअरची पारितोषिके मिळाली. त्याचप्रमाणे त्यांना १९८२ साली बोलपट चित्रपटसृष्टीच्या अमृतहोत्सवानिमित्त त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते पारितोषीक देण्यात आले. नाना पळशीकरांनी कंगन, कुवारा बाप (१९४२) , दो बिघा जमीन, बाप बेटी , श्री.४२० , जेलर , अनाडी , दोस्ती , शेर और सपना , कानून, माया , हेमराज , आखरी खत , आदमी और इन्सान , ललकार , शोर, धुंद, प्रेम पर्वत , आक्रोश , गांधी, कानून क्या करेगा अशा अनेक चित्रपटात कामे केली.

    नाना पळशीकर यांनी १०० हून अधिक हिंदी व फक्त ४ मराठी चित्रपटात कामे केली. त्यांनी चित्रपटसृष्टीत नेहमी चरित्र भूमिका केल्या होत्या.

    नाना पळशीकर यांचे २ जून १९८४ रोजी निधन झाले.

    अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

  • राम ताकवले

    ताकवले, राम

    भारतीय शिक्षण क्षेत्रात तीन दशकांच्या काळात ज्यांनी मूलभूत स्वरूपाची कामगिरी केली, अशा महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये डॉ. राम ताकवले यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. त्यांच्या या कामगिरीमुळेच नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या गोदावरी पुरस्कारासाठी त्यांची झालेली निवड सर्वथा योग्य आहे. देशातल्या महत्त्वाच्या विद्यापीठांचे कुलगुरू म्हणून त्यांनी केलेली कामगिरी जेवढी मोलाची आहे, तेवढेच शिक्षणाच्या भावी विकासाच्या दृष्टीने त्यांनी केलेले चिंतनही महत्त्वाचे आहे.

    ग्रामीण भागातून आलेल्या ताकवले यांनी कष्टाने आपले शिक्षण पूर्ण केले. पुणे विद्यापीठात उच्च शिक्षण घेऊन मॉस्को विद्यापीठाची डॉक्टरेट त्यांनी मिळविली. पदार्थविज्ञानाच्या क्षेत्रात उच्च पदवी मिळवल्यानंतर त्यांनी अध्यापनाचे क्षेत्र निवडले आणि त्यातच ते रममाण झाले. विद्यापीठातील उच्चशिक्षणाच्या क्षेत्राशी त्यांचा संबंधही अगदी लवकर आला आणि त्यामुळे ते पुणे विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान विभागात अध्यापक म्हणून रुजू झाले. विद्यार्थ्यांमध्ये अतिशय प्रिय असलेल्या ताकवले सरांनी विद्यादानाचे कार्य करत असतानाच संशोधनाच्या क्षेत्रातही आपला ठसा उमटवला. पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी त्यांची निवड झाली, तेव्हा भारतीय विद्यापीठांमधील विज्ञान शिक्षणासंबंधी केलेले वक्तव्य शिक्षण क्षेत्रातील प्रत्येकाच्या लक्षात राहणारे होते. विद्यापीठांमधून नुसते शिक्षण मिळता कामा नये, तर ती संशोधनाची देशातील महत्त्वाची केंद्रे बनली पाहिजेत, असा आग्रह त्यांनी त्या वेळी बोलून दाखवला होता. हा आग्रह त्यांनी त्यांच्याच कारकीर्दीत प्रत्यक्षात आणला. पुणे विद्यापीठातील विज्ञान विषयांशी संबंधित अशा सगळय़ाच विभागांना राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर जाण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य केले. पुणे विद्यापीठाचा या क्षेत्रातील नावलौकिक वाढण्यास त्यांची कारकीर्द कारणीभूत ठरली, तशीच नाशिकच्या यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी मुक्त शिक्षणाच्या क्षेत्रात केलेले कार्य अधोरेखित करण्यासारखे झाले. या त्यांच्या कामगिरीमुळेच दिल्लीच्या इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही त्यांना आमंत्रित करण्यात आले. राष्ट्रीय पातळीवर त्या विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षणाच्या भावी विकासाच्या दिशेने त्यांनी केलेले कार्य लक्षणीय आहे. अतिशय सौम्य प्रकृतीच्या ताकवले सरांनी शिक्षणाच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर केल्या जाणाऱ्या विविध प्रयोगांचा बारकाईने अभ्यास केला. त्या बदलांना सामोरे जाताना भारतीय शिक्षण व्यवस्थेची होणारी तारांबळ ते स्वत: अनुभवत होते. माहिती आणि ज्ञानाच्या क्षेत्रात घडत असलेल्या क्रांतीचे डॉ. ताकवले हे एक महत्त्वाचे साक्षीदार आहेत. त्यामुळेच या बदलांना आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये सामावून घेण्यासाठी त्यांनी अनेक नव्या योजना आखल्या, त्या केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयापर्यंत पोहोचवल्या, त्यांचे महत्त्व पटवून दिले. त्यामुळेच काही वर्षांत शिक्षणाच्या बाबतीत अनेक नवे प्रकल्प कार्यान्वित होत आहेत. गरिबातल्या गरीब विद्यार्थ्यांलाही शिक्षणाच्या सगळय़ा संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत आणि त्याला जगात सध्या उपलब्ध असलेल्या सर्व साधनांचा लाभ घेता यायला हवा, असा आग्रह त्यांनी सातत्याने धरला. विद्यापीठीय शिक्षण पद्धतीत संशोधनाचे महत्त्व तीन दशकांच्या काळातच वाढत गेले आणि त्यासाठी पुढाकार घेतलेल्यांमध्ये डॉ. राम ताकवले यांचे नाव ओघानेच घेतले जाते. शिक्षणाचा जगण्याशी आणि मानवी जीवनाशी असलेला संबंध स्पष्ट करताना डॉ. ताकवले यांनी व्यवहार आणि ज्ञान यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. अर्थार्जनासाठी आवश्यक असलेले ज्ञान विद्यापीठीय शिक्षण पद्धतीत देता येण्यासाठी आवश्यक असलेल्या गरजा आणि शिक्षणक्रम यांचा अन्योन्यसंबंध निर्माण करणे आवश्यक होते. उद्योग आणि व्यापाराच्या क्षेत्रात ज्या कौशल्यांची गरज आहे, ती कौशल्ये शिक्षणातून कशी देता येतील, हा व्यावहारिक विचार करत असतानाच संशोधनातून मानवी ज्ञानाची लालसा अधिकाधिक जागृत कशी करता येईल, यासंबंधीही त्यांनी मूलभूत स्वरूपाचा विचार केला. त्यांना मिळणाऱ्या गोदावरी पुरस्कारामुळे त्यांच्या या क्रांतदर्शी कारकीर्दीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

  • पंडित धुंडिराजशास्त्री ऊर्फ अण्णा लक्ष्मण दाते

    महाराष्ट्रात ‘पंचांग म्हणजे दाते पंचांग’ हे समीकरण झाले आहे. याचा परिणाम म्हणून भारत सरकारने कॅलेंडर रिफॉर्म कमिटीवर अण्णा दाते यांना सदस्य करून घेतले.

  • पंडितराव नगरकर

    सुलोचना पालकर हिच्या सहकार्याने पंडितरावांनी १९३४ साली ‘सुलोचना संगीत मंडळी’ या नाट्यसंस्थेची स्थापना केली व १९३७ पर्यंत कंपनीच्या नाट्यप्रयोगांत नायकाच्या भूमिका केल्या.

  • पं. नारायणराव बोडस

    त्यांनी सं. सौभद्रम्, पती गेले ग काठेवाडी, बुद्ध तिथे हरला, सं. मृच्छकटिक, सं. महाश्वेता, सं. मानापमान, सं. स्वयंवर, सं. सौभद, सं. संशयकल्लोळ, सं. धडिला राम तिने का वनी?, सुंदर मी होणार, मंदारमाला, सुवर्णतुला, बावनखणी, संत गोरा कुंभार, लहानपण देगा देवा, देव दीनाघरी धावला, तो एक राजहंस, सं. कृष्णार्जुनयुद्ध, अशा अनेक संगीत व बिगर संगीत नाटकात अविस्मरणीय व गाजलेल्या भूमिका केल्या.

  • डॉ. दत्ता सामंत

    डॉ.दत्ता सामंत यांचे नेतृत्व बघता, इतर कामगार संघटनाही त्यांच्याकडे येऊ लागल्या. त्यांना नेतृत्व स्वीकारण्याचा मागण्या करू लागल्या आणि दत्ता सामंत यांनी त्या कामगार संघटनांचे नेतृत्व स्वीकारले.

  • रघुनाथ धोंडो कर्वे

    लोकशिक्षणाचा मार्ग पसंत असलेल्या रघुनाथरावांनी सतत सत्तावीस वषे एकाकी लढत दिली, लैंगिगकतेपवषयी मूलगामी विश्लेलेषण केले. एका अर्थी रघुनाथराव कर्वे हे ‘सुधारक’कार आगरकरांचे एकटेच वारस होते.

  • प्रदीप भिडे

    प्रदीप भिडे यांना नाटकाचीही पार्श्वभूमी आहे. नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या संस्थेत त्यांनी काही काळ प्रायोगिक नाटकांतून काम केले. दिलीप प्रभावळकर, वसंत सोमण, रवी पटवर्धन हे त्यांचे सहकलाकार. नाटकातून काम केलेले असल्याने ‘स्टेज फीअर’ म्हणून जे काही असते त्याची भीती, दडपण त्यांच्यावर नव्हते.