(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • केशवराव भोळे

    मराठी व शास्त्रीय संगीत समीक्षा प्रसिद्ध संगीतसमीक्षक, संगीतरचनाकार, संगीतदिग्दर्शक आणि नाटक, चित्रपट, क्रिकेट इ. विषयांचे चिकित्सक अभ्यासक व लेखक केशवराव भोळे यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मराठी भावसंगीताचे जनक, नाट्यसंगीत विचाराला योग्य दिशा देणारे व्यक्तिमत्त्व अशीही केशवरावांची ख्याती आहे.

  • रामचंद्र शंकर वाळिंबे

    डॉ. रामचंद्र शंकर उर्फ रा. शं. वाळिंबे हे थोर समीक्षक म्हणून ओळखले जातात. ते व्यासंगी विद्वान आणि आपल्या ओघवत्या वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकणारे ख्यातनाम वक्ते म्हणूनही प्रसिद्ध होते.

  • प्रसाद सावकार

    ‘पंडितराज जगन्नाथ’मध्ये त्यांना सुरुवातीला एकच गाणे होते. पण त्यांच्या गाण्यावर फिदा झालेल्या रसिकांनी त्यांच्यासाठी आणखी एखादे गाणे नाटकात घालण्याची मागणी केल्यानंतर ‘जय गंगे भागीरथी’ हे गाणे त्यात घालण्यात आले आणि ते चांगलेच गाजले.

  • मोहन गोखले

    घारे भेदक डोळे आणि खोलवर रूतणारा आवाज या वैशिष्ट्यांचा परिणामकारक वापर करत रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन या तिन्ही माध्यमांत लीलया मोहन गोखले वावरले.

  • भालचंद्र श्रोत्री

    भालचंद्र श्रोत्री हे अलिबाग-उरण परिसरातील सामाजिक कार्यकर्ते होते.

  • नीलकंठशास्त्री शिवरामशास्त्री गोरे

    नीळकंठशास्त्री शिवरामशास्त्री गोरे  हे वादविवादपटू, मराठीतील महत्वाचे ख्रिस्ती धर्मविवेचक, निबंधकार, संस्कृतचे जाणकार आणि वेद-उपनिषदांचे गाढे अभ्यासक होते. 

  • मल्हार सदाशिव (बाबूराव) पारखे

    बाबूराव पारखे यांनी ‘राम यशोगाथा’ हा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथात पारखे यांनी, ज्या भृगूत्तमांना वैदिक वाङ्‌मयात अथर्वाण म्हटले आहे, त्या भार्गवांचा प्रभाव ॲसीरिया, बॅबिलोनिया, सुमेरिया, ॲनाटोलिया, मिसर या प्रदेशांतही असल्याचे म्हटले होते.

  • दामोदर नरहर शिखरे

    शिखरे, दामोदर नरहर - 0426

    २२ नोव्हेंबर १९०३
    १९०३> चरित्रकार, पत्रकार दामोदर नरहर शिखरे यांचा जन्म. गांधीवादाच्या पुरस्कारासाठी त्यांनी “अग्रणी” हे साप्ताहिक सुरु केले. गांधी जीवनकथा, गांधी-रणगीता, म. गांधी व त्यांचे सहकार्य, तसेच “मराठीचे पंचप्राण” ही - संतसाहित्यापासून १९५० पर्यंतच्या साहित्याची ओळख करुन देणारी ग्रंथमाला त्यांनी लिहिली होती.
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

    शिखरे, दा. न. - 0470

    ९ सप्टेंबर १९८०
    १९८०> चरित्रकार व गांधीवादविषयक पुस्तके लिहिणारे दा.न. शिखरे यांचे निधन. “मराठीचे पंचप्राण” या १९५० पर्यंतच्या साहित्याचा परिचय त्यांनी करुन दिला होता. गांधीचरित्राखेरीज आगरकर, बजाज, नेहरू यांची चरित्रपुस्तके त्यांनी लिहिली.

    mss

  • संगीतकार त्यागराज खाडिलकर

    त्यागराज यांची आई श्रीमती मंजुश्री खाडीलकर या ख्यातनाम किर्तनकार, त्यांनी ’किर्तन मंदाकिनी’ ही पदवी मिळविली. त्यांचा जन्म ११ जून १९६७ रोजी झाला. त्यांची आजी श्रीमती इंदिराबाई खाडिलकर ह्या गंधर्व गायकीसाठी प्रसिद्ध. स्वातंत्र सैनिक, पत्रकार, नाटककार श्री. मा.कृष्णाजी प्रभाकर उर्फ काकासाहेब खाडिलकर हे त्यांचे पणजोबा.

    बालपणी त्यांनी विख्यात गायक, नट कै. डॉ वसंतराव देशपांडे यांच्याबरोबर ’कट्यार काळजात घुसली’ या संगीत नाटकामध्ये काम केले. त्याचबरोबर मा. शरद तळवलकर यांच्याबरोबर बालकलाकार म्हणुन ’सखी शेजारणी’ या विनोदी नाटकामध्ये काम केले. तसेच अष्टपैलु व्यक्‍तिमहत्त्व असलेल्या मा. पु. ल. देशपांडे यांच्या ’वार्यावरची वरात’ या चंद्रलेखाचे मोहन वाघ द्वारा निर्मीत नाटकातही काम केले. त्याचबरोबर त्यांनी ’निवडुन’ या दैनंदिन मालिकेतही अभिनय केला.

    त्यांनी सगीताचे आणि नाट्य गीताचे शिक्षण आपल्या आजी श्रीमती इंदिराबाई खाडिलकर आणि किराणा घराण्याचे गायक पंडित गंगाधरबुआ पिंपळखरे यांच्या कडून घेतले.त्यांना ’गानहिरा’ हा सन्मान अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेद्वारा आयोजित अंतर महाविद्यालयीन शास्त्रीय गायनाच्या स्पर्धेमध्ये मिळाला.
    ’बिच्छू बाइट’(विंचु चावला) हा युनिवर्सल द्वारा निर्मित त्यांनी आवाज दिलेला अल्बम खूप गाजला.

    त्यांनी दत्‍ता डावजेकर, अनिल मोहिले, श्रीधर फडके, राम-लक्षम, अशोक पत्‍की,अवधुत गुप्‍ते या सारख्या सर्व विख्यात संगीतकारांबरोबर काम केले आहे. त्यांनी जवळ-जवळ ३५ मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे. त्यांनी सुपरस्टार भरत जाधव यांना ’चालु नवरा भोळी बायको’ व मकरंद अनासपुरे यांना ’काय द्याच बोला’ या चित्रपटांसाठी आवाज दिला. त्यांनी संगीतकार आनंद मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली ’दिशा’ व संगीतकार बप्पी लहरी यांच्या मार्गदर्शनाखाली सदाबहार हिरो देव आनंद दिग्दर्शित ’मि. प्राय मिनिस्टर’ या हिन्दी चित्रपटांसाठीही पाश्वगायन केले.त्यांनी ६० पेक्षा ही जास्त मालिकांची शिर्षक गीते गायिली आहेत.

    अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

    #TyagrajKhadilkar

  • चंद्रकांत कामत

    संगीतातील लय ही एक अत्यंत प्रतिभावान संकल्पना आहे. स्वरांना लयीच्या आकृतीमध्ये बांधून ठेवण्याची ही कल्पना ज्या कुणाला सुचली, त्याचे या पृथ्वीवरील समस्त मानवजातीवर अनंत उपकार आहेत. संगीताला या लयीमुळे एक प्रकारचा चुस्तपणा, बंदिस्तपणा आला. या बांधीव मांडणीमुळे संगीताच्या सौंदर्याच्या कल्पनेतही बदल झाले. मैफलीत कोणत्याही गायक वा वादकाबरोबर तबल्याची संगत करणाऱ्या वादकाला मुळात गाणे कळणे अत्यंत आवश्यक असते.

    गाणे कळणे आणि त्यावर नितांत प्रेम करणे हे गुणधर्म असलेला तबलावादकच कलावंताला अप्रतिम साथ करू शकतो. आयुष्यभर अनेक दिग्गजांबरोबर अशी लयीची संगत करणारे पंडित चंद्रकांत कामत यांचे निधन म्हणजे एका लयदार व्यक्तिमत्त्वाची अखेर आहे. अतिशय शांत आणि कमी बोलणारे कामत जेव्हा तबला आणि डग्ग्यासमोर बसायचे, तेव्हा त्यांना ब्रह्मांडाचाच साक्षात्कार होत असला पाहिजे. तबला आणि डग्गा या दोन वाद्यांमधून येणाऱ्या वेगवेगळय़ा ध्वनींचा एकरूपतेने आविष्कार करणाऱ्या तबलानवाजांची एक परंपराच भारतीय संगीतात आहे.

    चंद्रकांत कामत हे स्वत: उत्तम तबलावादक असले तरीही त्यांनी आपले सारे कलाआयुष्य तबल्यावर साथसंगत करण्यात घालवले. कलावंताबरोबर साथ करणे ही काही केवळ तांत्रिक आणि यांत्रिक गोष्ट नसते. प्रत्येक कलावंताची प्रतिभा वेगळी, त्याची मांडणी वेगळी, स्वभावाचे कंगोरे वेगळे आणि प्रत्यक्ष मैफलीत त्याला फुटणारे निर्मितीचे धुमारेही वेगळे! या सगळय़ाची जाणीव ठेवून साथ करणारा कलाकार हा तेवढय़ाच उंचीचा असतो. पंडित चंद्रकांत कामत यांनी ती उंची गाठली होती. पंडित भीमसेन जोशी यांच्यासारख्या दिग्गजाबरोबर अनेक वर्षे साथ करण्याचे भाग्य त्यांना लाभले. गायक आणि संगतकार यांच्यात अद्वैत निर्माण झाल्याशिवाय गाणे खुलत नाही.भीमसेनजींच्या अनेक अजरामर मैफलींमध्ये हे अद्वैत हजारो रसिकांनी अनुभवले आहे.

    भारतातील अनेक मोठय़ा कलावंतांबरोबर तबल्यावर साथ करण्याची संधी कामतांना मिळाली आणि त्यांनी त्याचे सोने केले. तबल्यावर लय धरताना कलावंताचा मूड समजून घेणे आवश्यक असते. कलावंताला नवे काही सुचण्यासाठी साथीदार तयारीचा असावा लागतो. केवळ लय पकडून ठेवली म्हणजे गाणे रंगते असे होत नाही. कलावंताला त्या स्वरांमध्ये चिंबवण्यासाठी लयीचे कोंदण मिळवून देणे तेवढेच महत्त्वाचे असते. कामतांच्या तबलावादनात या सगळय़ा गोष्टी होत्या. आजकाल मैफलीत साथ करणारे वादक काहीवेळा आगाऊपणा करतात. कलावंतापेक्षा आपणच काकणभर सरस कसे आहोत, ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. तसा सोस कामत यांनी कधी केला नाही. त्यामुळेच भावगीतापासून ते अभिजात शास्त्रीय संगीतापर्यंत सगळय़ा संगीत प्रकारात त्यांनी आपली मुद्रा उमटवली.

    लहानपणी वडील आणि गायकनट मास्टर शांताराम कामत यांच्याबरोबर त्यांनी बालनट म्हणून काम करायला सुरुवात केली तरी त्याच वयात तबला शिकण्याचे त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात यायला सुरुवात झाली. नाटक कंपनी बंद पडल्यामुळे कामत पुण्यात आले आणि त्यांनी कथक कलाकार रोहिणी भाटे यांना तबल्याची साथसंगत करण्यास सुरुवात केली. भाटे यांना तब्बल पंधरा वर्षे त्यांनी तबलासंगत केली. याच काळात आकाशवाणीमध्ये तबलावादक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि सुमारे पस्तीस वर्षे आकाशवाणीच्या माध्यमातून अनेक श्रेष्ठ कलाकारांबरोबरच नव्या कलाकारांनाही संगत करण्याचे काम त्यांनी केले. या काळात जी. एल. सामंत यांच्यासारख्या कसलेल्या गुरूकडून आणि सामताप्रसाद यांच्यासारख्या दिग्गजाकडून तबलावादनातील अनेक नवे धडे घेण्यात कामत यांना जराही कमीपणा वाटला नाही. सवाई गंधर्व संगीत महोत्सवामधील त्यांची हजेरी कलावंत आणि रसिक या दोघांसाठीही आश्वासक असे. त्यांच्या कलाजीवनात त्यांना ‘संगतकार पुरस्कार’, ‘स्व. वसुंधरा पंडित पुरस्कार’ तर मिळालेच, पण पुणे महापालिकेकडून गौरव करण्यात आला. भरत आणि सुभाष या त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांचा हा कलेचा वारसा सुरू ठेवला आहे, हे कलावंतासाठी भाग्याचेच म्हटले पाहिजे.

    चंद्रकांत कामत यांचे मराठीसृष्टीवरील लेख.

    ज्येष्ठ तबलावादक चंद्रकांत कामत (11-Jul-2017)

    ज्येष्ठ तबलावादक चंद्रकांत कामत (26-Nov-2018)

    VV