बाल-गीत, कांचनगंगा, फलभार, चंद्रलेखा, सोनेरी चांदणे हे काव्यसंग्रह, चार स्वरचित खंडकाव्ये व टेनिसनच्या इनॉक आर्डेनचा ‘अनिकेत’ हा काव्यानुवाद ही त्यांची काव्यसंपदा. स्वप्नभूमी हे माधव जूलियनांचे चरित्र त्यांनी लिहिले.
चव्हाण, विमल
लढवय्या साम्यवादी चळवळीतील आपल्या साथीदाराचा संसार नेटाने चालवताना डाव्या चळवळीमध्येही योगदान देणाऱ्या त्या तिघीजणी. एकाच पक्षाशी म्हणजे लाल निशाण पक्षाशी बांधिलकी असलेल्या या तीन रणरागिण्यांचे अवघ्या काही दिवसांच्या अंतराने निधन झाले आणि एक पर्व संपले.
विमल चव्हाण यांची ओळख केवळ यशवंत चव्हाण यांच्या पत्नी अशी कधीच नव्हती. ते एक स्वतंत्र व्यक्तिमत्व होते. विमल चव्हाण म्हणजे पूर्वाश्रमीच्या विमल हेमाडी.
मडगाव गोव्यात नारायणराव हेमाडी या प्रतिष्ठित व्यापाऱ्याच्या घरात त्यांचा १९१७ मध्ये जन्म झाला. मोठा परिवार होता. कॉन्व्हेंट शाळेत शिक्षण झाल्यामुळे इंग्रजी भाषेवर मराठी इतकेच प्रभुत्व होते. शाळेत असल्यापासूनच स्वभाव बंडखोर होता. बायबलच्या क्लासवरून त्यांनी शाळेच्या व्यवस्थापनाविरुद्ध लढा दिला होता. १९३८ च्या सुमारास त्या कोल्हापूरला वडीलबंधू प्रभाकर हेमाडी यांच्याकडे महाविद्यालयीन शिक्षणासाठी आल्या. तेथे लेखक, कलाकारांचा राबता असे. स्वाभाविकच विमलताईंवर सांस्कृतिक संस्कार झाले. त्या विद्यार्थी चळवळीमध्ये अग्रेसर होत्या. कोल्हापूरमध्ये सायकलवरून फिरणारी ही एकमेव मुलगी. याच दरम्यान त्यांनी यशवंत चव्हाण यांना पाहिले. कोल्हापूरमध्ये झालेल्या ऐतिहासिक सभेनंतर यशवंत चव्हाण यांच्यावर वॉरंट निघाले आणि त्यांना भूमिगत व्हावे लागले. त्यावेळी ते हेमाडी यांच्या घरी राहिले आणि नंतर विमलताईंच्या प्रेमाच्या बेडीत अडकले. १९४५ मध्ये त्यांचे लग्न अवघ्या पाच रुपयात झाले. अनेकदा दोघांचे राजकीय मतभेद होत. तरीही पतीबद्दल त्या नेहमी ‘माय हजबंड इज अ जेम’ असेच सांगत. स्वातंत्र्य लढय़ाला विरोध करणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाच्या भूमिकेला विरोध करणाऱ्या नवजीवन संघटनेमध्ये त्या सुरुवातीपासून होत्या. त्या संघटनेचे म्हणजेच आताच्या लाल निशाण पक्षाची मंडळी अगदी अलीकडच्या काळापर्यंत कम्युनवर राहत होती. विमलताई आणि यशवंत चव्हाण तेथेच राहत. डॉ. माधव चव्हाण हे त्यांचे पुत्र. जनचळवळीतल्या मंडळींप्रमाणेच विमलताईंनी पूर्णवेळ नोकरी केली आणि यशवंतराव पूर्णवेळ राजकारणात राहिले. खार येथील बी. पी. एम. हायस्कूलमध्ये त्या शिक्षिका होत्या. नोकरीच्या अखेरच्या काळामध्ये त्या या शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका होत्या. नोकरीमुळे आपल्याला राजकारणात सक्रिय होता आले नाही, ही खंत त्यांना अखेपर्यंत होती.
नीळकंठशास्त्री शिवरामशास्त्री गोरे हे वादविवादपटू, मराठीतील महत्वाचे ख्रिस्ती धर्मविवेचक, निबंधकार, संस्कृतचे जाणकार आणि वेद-उपनिषदांचे गाढे अभ्यासक होते.
मराठी चित्रपट सृष्टीतील चॉकलेटी नायक म्हणून उमेश कामत यांनी ओळख मिळवली आहे. “कायद्याच बोला” या चित्रपटातून त्यांनी २००६ साली आपली चित्रपट सृष्टीतील कारकीर्द सुरु केली. ते प्रिया बापट यांच्याशी विवाहबद्ध झाले आहेत.
बबनराव नावडीकर हे बालगंधर्वांचे भक्त असल्याने त्यांनी बालगंधर्वांची गायकी तरुण पिढीपुढे नेण्यासाठी अतोनात परिश्रम केले.
प्रदीप साठे हे व्यक्तिमत्त्वच तसे वेगळे होते. छोटीशी मूर्ती, लहान शरीरयष्टी, जाड तपकिरी रंगाचा चष्मा, हलक्या आवाजातले बोलणे आणि हातात सिगारेट. ‘आवाज’ दिवाळी अंकातली ‘खिडकी चित्रे’ हे त्यांचे वैशिष्टय़ होते. त्या अनोख्या चित्रांसाठीच अनेक लोक त्यांना ओळखत होते. त्यांच्या या ‘खिडकी चित्रांचा’ एक मोठा चाहता वर्ग तयार झाला होता. अशा प्रकारची विनोदी चित्रे काढणारा हा माणूस बोलताना विनोदी असेल अशी जर तुमची समजूत असेल तर ती खोटी म्हणावी लागेल.
साठे यांचे बोलणे हलक्या आवाजातले असले तरी ते ठाम असायचे आणि बहुतेक वेळा ते गंभीर विषयावरच बोलत. लोकांच्या समजुतीत ‘विनोदी’ असलेल्या या माणसाने आपला अंत मोठा दुर्दैवी करावा ही बाब मनाला चटका लावणारी होती. प्रदीप साठे यांनी आत्महत्या केल्याची बातमी आली आणि या बातमीवर कुणाचा विश्वासच बसेना. कदाचित आयुष्यात आलेल्या अनेक कठोर प्रसंगांवर मात करणे त्यांना कठीण गेले असावे. यातूनच त्यांच्यासारख्या एका कलाकार माणसाला हे जीवन संपविण्याचा विचार आला असावा. साठेंचे बालपण अतिशय चांगल्या स्थितीत गेले. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगलीच होती.
मुंबईत मोठी जागा, वडिलांच्या मालकीची कंपनी. त्यामुळे घरात लक्ष्मी पाणी भरत होती. त्यांच्या वडिलांना प्राण्यांची फार आवड होती. त्यामुळे त्यांनी घरात मासे, पोपट, कुत्रे, कासव, मांजर इतकेच नव्हे तर माकड, अजगर आणि अगदी बिबळ्याचा बछडासुध्दा त्यांनी पाळला होता. अशा या प्राणी-पक्ष्यांच्या सहवासात प्रदीप वाढले. त्यांच्याशी हसत खेळत प्रदीप रेखाटने काढू लागले. या वातावरणात ते चांगलेच रमले होते. पुढे त्यांच्या कलाकृतींमध्ये विविध प्राण्यांची अॅनाटॉमीयुक्त चित्रे दिसत. याला त्यांच्या बालपणातील प्राण्यांच्या सहवासाची पाश्र्वभूमी होती. अर्थातच त्यांनी आपल्या आवडीनुसार आर्टस्कूलला प्रवेश घेतला. परंतु वडिलांना त्यांचा हा निर्णय काही मान्य नव्हता. यातूनच त्यांच्याशी मतभेद झाले. शेवटी स्वत: पार्टटाइम नोकरी करून फीचे पैसे भरून या कलाकाराने शिक्षण पूर्ण केले.
शिक्षण पूर्ण झाल्यावर अनेक मासिकांत त्यांची चित्रे प्रसिध्द होऊ लागली. देशातील विविध भाषांतल्या कॉमिक्ससाठी त्यांनी चित्रे काढली. याद्वारे त्यांनी कॉमिकमधील चित्रकलेला एक दर्जा प्राप्त करून दिला. अशी चित्रे काढीत असताना त्यांची प्रामाणिक भूमिका होती की, आपण ‘इलस्ट्रेटर’ आहोत, पण आपण व्यंगचित्रकार नाही. ‘निवडक मराठी व्यंगचित्रे’ या पुस्तकाचे संपादन करीत असताना त्यांनी हे वास्तव आपल्या मित्रपरिवारात मान्यही केले होते. त्यांचे हे प्रामाणिक मत असले तरी त्यांना विनोदाची चांगली जाण असल्याने तसेच चित्रकलेतील त्यांचे नैपुण्य यामुळे त्यांनी बरीच व्यंगचित्रे काढली. प्रामुख्याने ‘आवाज’ या दिवाळी अंकातली त्यांची ‘खिडकी चित्रे’ लोकप्रिय झाली आणि हा तेथून कलाकार खरे तर जनतेपुढे आला. या व्यंगचित्रांच्या जोडीला त्यांनी विनोदी कथांना पूरक अशी रिअलिस्टिक शैलीतील असंख्य चित्रे काढली. त्यांच्या चित्रातील बारकावे अस्सल होते. चित्रातील रंगसंगती व पात्रांच्या चेहऱ्यावरचे हावभाव इतके प्रभावी असत की एखादा जिवंत प्रसंग साकारल्याचा भास होई. त्यांनी देशभरात काढलेल्या कॉमिक्समधील चित्रांनी त्यांना देश पातळीवर प्रसिद्धी लाभली.
कॉमिक्ससाठी चित्रे काढताना त्यांनी स्वत: काही पात्रे तयार केली. त्यांच्या गोष्टी रंगविल्या आणि केवळ मुलांमध्येच नव्हे तर सर्वच वयोगटातील वाचकांना त्या भावल्या. मुलांसाठी कॉमिक्स करताना प्राणी विज्ञान हा विषय त्यांनी मोठय़ा खुबीने, सचित्र सांगून मोठा चाहता वर्ग मिळविला. चेहऱ्यावरच्या हावभावांबरोबर प्रसन्न रंगसंगती हे त्यांचे वैशिष्टय़ होते. मध्यंतरी त्यांनी एका अर्कचित्र प्रदर्शनासाठी अभिनेत्री नंदा हिचे काढलेले अर्कचित्र विलक्षण होते. प्रत्यक्ष भेटीत विनोदी किस्से सांगताना त्यांच्या विनोदबुध्दीची झलक दिसे. चित्रकलेसारख्या एका क्रिएटिव्ह विश्वात रंगलेल्या या कलाकाराने व विनोदाची चांगली जाण असलेल्या या व्यक्तीने आयुष्याचा शेवट अशा रीतीने करावा हे दुर्दैवी, धक्कादायक आणि अनाकलनीयही!
विख्यात व्हायोलीन वादक व गायक मा. पं गजाननबुवा जोशी यांचा जन्म ३० जानेवारी १९११ रोजी झाला.
ग्वाल्हेर, जयपूर आणि आग्रा ह्या तीनही घराण्याच्या गायकीवर एकाच वेळी प्रभुत्व मिळवून त्याच वेळी एक विख्यात व्हायोलीन वादक म्हणूनही किर्ती आणि प्रतिष्ठा प्राप्त केलेले पं. गजाननबुवा जोशी ह्यांनी शास्त्रीय संगीताच्या विश्वात आपल्या कर्तृत्वाने स्वतःचे एक गौरवशाली असे स्थान निर्माण केले आहे.
हातचे राखून न ठेवता आपल्याकडचे सारे शिष्यांना देणाऱ्या गुरूंपैकी गजाननबुवा एक होते. संगीताचा विद्यार्थी म्हणूनच जगायचे, वावरायचे हेच त्यांचे ध्येय होते, त्यामुळे शेवटपर्यंत ते विद्यार्थी म्हणूनच वावरले, जगले व शिकत राहिले. दौऱ्याहून परतल्यानंतर आपले अनुभव सांगतील म्हणून सगळे उत्सुक असायचे, पण बुवा खिशातून एखादा कागदाचा कपटा काढून त्यावर लिहून आणलेली बंदीश शिकविण्यात दंग होऊन जायचे. वाळूतून तेल निघेल एवढी मेहनत घेणाऱ्यांपैकी गजाननबुवा एक तालिया होते. स्वरांचा सच्चा असलेला हा माणूस व्हायोलिन केवळ वाजवतच नसे, तर त्यांचे व्हायोलिन गात असे. गाणे बोलायचे नाही तर ते गाण्याशी बोलायचे, असा हा आदळआपट न करणारा महान तालिया होता.
गजाननबुवा जोशी यांचे २८ जून १९८७ निधन झाले. गजाननबुवा जोशी यांचे दुर्मिळ रेकॉर्डिंग इंटरनेटवर उपलब्ध आहे.
http://www.gajananbuwajoshi.com
#PtGajananbuvaJoshi #GajananbuaJoshi
सुभाष नाईक हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. ते विविध विषयांवर विपुल लेखन करतात. ते मराठीसृष्टीचे एक मुख्य लेखक असून मराठीसृष्टीविषयी प्रचंड आत्मियता असलेले आधारस्तंभ आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत.
सिनेमा, रेडीओ, टी.व्ही. अश्या विविध माध्यमांमुळे कीर्तन हा प्रकार थोडा मागे पडू लागला होता. त्यात आफळे बुवांनी नवचैतन्य निर्माण केले. क्षणात हास्याचा खळखळाट तर क्षणात वीरश्री, गहिवर दाटेल असा करूण रस तर मिश्कील कोट्या अशाप्रकारे नवरसांचा उत्कट अविष्कार त्यांच्या कीर्तनातून होत असे.
ध्येयनिष्ठा, कलाप्रेम, अथक परिश्रम करण्याची वृत्ती, जिद्द, अभ्यासूपणा, नम्रता, सामाजिक जाणीव, आई-वडील-भावंडे आणि गुरू यांच्यावरील प्रेम, निष्ठा, आदर आणि कृतज्ञता इत्यादी गुणांनी माणूस घडतो; मोठा होतो. पद्मजा फेणाणी यांच्या मध्ये हे सारे गुण आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti