ज्या काळात मराठी घरांमध्ये पॉप आणि रॉक संगीत हे शब्द अनभिज्ञतेच्या किंवा विनाकारण हेटाळणीच्या सुरात उच्चारले जात, त्या काळात नंदू भेंडे यांनी छेडलेली मराठी रॉकची तार आज अन्य कितीतरी जणांमुळे झंकारत राहिली आहे.
June 30, 2022
आपलं हृदय हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा घटक असतो आणि त्याचीच आपण योग्यरितीनं काळजी घेत नाही; अशावेळी काही विपरित घडलं तर डॉ. हाच देव ठरतो!
May 23, 2014
देशात ब्रेन ड्रेन सुरु असताना आशुतोष वैद्य यांनी आयटी मध्ये करिअर घडविणार्या तरुणांपुढे आदर्श घालून दिला.
ब्रेन गेन
July 24, 2015
भाषांतरकार विष्णू वामन बापट यांनी विविध भाषांतील ग्रंथांची भाषांतरे केली. त्यांच्या नावावर ७० भाषांतरित ग्रंथ आहेत.
२० डिसेंबर १९३३ रोजी त्यांचे निधन झाले.
## Vishnu Waman Bapat
August 22, 2017
वसंत तांबे हे रा.स्व. संघाचे सक्रिय कार्यकर्ते आणि अर्थात जुनेजाणते आधारस्तंभ. १९८७ ते १९९७ अशी १० वर्षे त्यांनी सांभाळलेली मुंबई महानगर कार्यवाहपदाची जबाबदारी, कोकण प्रांताचे प्रचार विभागप्रमुख म्हणून केलेले काम, विश्व संवाद केंद्र, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीसारख्या संस्थांच्या उभारणीतला सहभाग अशा कामांतून संघाला त्यांनी दिलेले योगदान मोलाचे होते.
तांबे यांचे लहानपण पुण्यात गेले. तेव्हापासून ते संघाचे सक्रिय कार्यकर्ते बनले. व्यवसायाने सिव्हिल इंजिनीअर असलेल्या तांबे यांनी मुंबईत आल्यानंतरही आपले कार्य सुरूच ठेवले. नायगाव नगराचे संघचालक म्हणून, मुंबई महानगर कार्यवाह म्हणून त्यांनी इथे कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी केली. सगळ्यांचे ऐकून घेऊन, सगळ्यांना एकत्र घेऊन संघटना उभी करण्याचे कसब, उत्तम वक्ता आणि संवादक असलेल्या तांबे यांच्या ठायी होते.
वनवासी कल्याण आश्रमाच्या कामाला आकार देण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. त्या काळात मुंबईच्या नायगावातील त्यांचे घर कार्यकर्त्यांसाठी केंद्रच बनले होते. आदिवासी मुलांना मुंबईत आणणे, त्यांना शिकवणे, मुंबई फिरवणे वगैरे कामे ते करत. महाराष्ट्रभरातील कार्यकर्त्यांना त्यांचा मोठा आधार होता. १९९५च्या सुमारास उभ्या राहिलेल्या विश्व संवाद केंद्राच्या कामात, तसेच रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या उभारणीतही त्यांनी आपल्या विचारांचे योगदान दिले होते.
महिलांच्या राजकीय कामांमध्ये सहभागी करून घेण्याबाबतच्या त्यांच्या सकारात्मक विचारांची दखल संघाकडून अखिल भारतीय स्तरावरही घेतली गेली. १९९३ साली किल्लारीच्या भूकंपामधील नुकसान त्यांनी आपल्या परीने भरून काढण्याचा प्रयत्न केला. जनकल्याण समितीच्या वतीने तेथील भूकंपग्रस्तांसाठी बांधलेल्या घरांची डिझाइन्स त्यांनी तयार केली. त्यांचे अलीकडचे महत्त्वाचे काम म्हणजे, त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली 'फोरम फॉर इंटिग्रेटेड नॅशनल सिक्युरिटी' ही संस्था. तिचे काम आज राष्ट्रीय स्तरावर सुरू असून अनेक निवृत्त लष्करी अधिकारी त्यात कार्यरत आहेत.
वसंतरावांचे वैयक्तिक आयुष्य साहित्य, संगीत यांनी समृद्ध होते. ते उत्तम तबलावादक होते. शास्त्रीय संगीताचे दर्दी होते. 'विचार करण्यासारखे काही', 'ज्येष्ठपर्व', 'प्रश्न प्रश्न प्रश्न', 'दक्षिण दिग्दर्शन' ही पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांचे लेखनकार्यही अखेरपर्यंत सुरू होते.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
August 9, 2017
निळू फुले हे मराठी रंगभूमी व चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत अभिनेते होते.
April 14, 2010
आस्ताद काळे हा मराठी नाट्य , चित्रपट आणि मालिका सृष्टीतील एक नावाजलेला अभिनेता व गायक आहे.
August 12, 2020
अभिनयापासून नाट्यस्पर्धांच्या आयोजनापर्यंत अनेक भूमिकांत रमणारे अनंत घोगळे हे एक वल्ली आहेत. नाट्यचळवळीची गौरवशाली परंपरा अखंड सुरू राहावी म्हणून अनेकजण धडपडत असतात. काही पडद्या समोर तर काही मागे! जे सतत प्रकाश- झोतात असतातत्यांना प्रसिद्धीचं वलय लाभतं, पडद्या-मागचे कलाकारांच योग्दान मात्र दुर्लक्षितच राहतं. ‘औट घटकेच्या’ या नाट्यावकाशात काही मंडळींनी ही तफावत मनोमन स्वीकारलेली असते. त्यांच्या दृष्टीने नाट्यसेवा हे एक प्रकारचं व्रत असतं. घेतला वसा टाकणार कसा, असाच त्यांचा बाणा असतो.
July 26, 2011
वयाच्या पाचव्या वर्षी बाळकृष्णाला त्याची मातोश्री निधन पावल्याने, इचलकरंजी येथील त्याचे चुलते विष्णुभट यांच्याकडे भिक्षुकी शिकण्यासाठी पाठविण्यात आले.
July 11, 2022
यवतमाळ मधील राणी अमरावती ह्या छोट्याशा गावातून आलेले राम केवटे हे एक प्रसिद्ध चित्रकार असून आज त्यांचे ह्या क्षेत्रात फार मोठे नाव आहे.
May 16, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti