(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • (न्या.) सरोश कापडिया

    येत्या बुधवारी १२ मे रोजी सकाळी न्या. सरोश होमी कापडिया भारताचे ३८ वे सरन्यायाधीश म्हणून सूत्रे स्वीकारतील तेव्हा न्यायव्यवस्थेतील या सर्वोच्च पदाच्या बाबतीत एक स्थित्यंतर घडेल. आजच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना भारतीय राज्यघटनेने कापडिया, (न्या.) सरोश

    १९५० मध्ये झाली. न्या. कापडिया हे स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिले सरन्यायाधीश ठरतील. त्यादृष्टीने ते स्वातंत्र्योत्तर पिढीचे न्यायसंस्थेतील पाईक ठरतील.

    स्वातंत्र्यानंतर अवघ्या ४६ दिवसांनी २९ सप्टेंबर १९४७ रोजी मुंबईत एका गरीब पारशी कुटुंबात जन्मलेल्या न्या. सरोश कापडिया यांचा गेल्या ६३ वर्षांचा जीवनपट खडतर परिस्थितीवर गुणवत्ता, हुशारी आणि जिद्द या जोरावर मात करून निवडलेल्या क्षेत्रात सर्वोच्च स्थान कसे प्राप्त करता येते याचा वस्तुपाठ घालून देणारा आहे. गुणवत्ता असली तरी संधी मिळावी लागते. न्या. कापडिया यांना अशा संधी मिळाल्या व त्यांनी त्या संधी दोन्ही हातांनी कवटाळून त्यांचे सोने केले. भारतातील पारशी हा अत्यंत अल्पसंख्य असला तरी या समाजाने भारताला विविध क्षेत्रात अनेक अनमोल रत्ने दिलेली आहेत. विशेषत: मुंबईच्या कायदा आणि न्यायविश्वात एकेकाळी या समाजाचा दबदबा होता. मुंबई उच्च न्यायालयात किमान एक तरी न्यायाधीश या पारशी समाजाचा असायलाच हवा हा गेल्या कित्येक दशकांचा अलिखित पायंडा आजही अबाधित आहे. या दृष्टीने न्या. कापडिया हे न्यायाधीश होण्यात परंपरेचा भाग असला तरी त्यातही एक वेगळेपण आहे. वकिलीची अजिबात परंपरा नसलेल्या घरात जन्माला येऊनही त्यांनी आधी वकिलीच्या व नंतर न्यायदानाच्या क्षेत्रात यशोशिखर गाठले. शिक्षणाची खूप आवड होती पण घरची परिस्थिती नव्हती. त्यामुळे न्या. कापडिया यांनी वयाच्या विशीत फोर्टमधील बेहरामजी जिजीभॉय प्रा. लि. या कंपनीत शिपाई, भाडेवसुली करणारा मुनीम व कारकून अशा सबकुछ पदावर नोकरी पत्करली. त्यांचा मालक त्यांना रोख पगार देत नसे. पण कॉलेजची फी भरत असे. ही नोकरी सात वर्षे करीत असताना त्यांनी बी.ए. व नंतर कायद्याच्या पदवीपर्यंतचे शिक्षण गुणवत्तापूर्वक पूर्ण केले. मे. गगराट अँण्ड कं. या नामवंत सॉलिासिटर फर्मचे भागीदार आर. ए. गगराट यांनी न्या. कापडिया यांना वकिलीची दिशा दाखविली. फिरोज दमानिया, के. जी. अभ्यंकर, साळी, परुळेकर, सी. आर. दळवी, सी. ज. सावंत, फली नरिमन आणि सोली सोराबजी अशा अनेक नामवंत वकिलांनी त्यांच्यातील वकील घडविण्यात मोलाची कामगिरी केली. पारशी समाजाने भारताला अगणित नामांकित वकील व न्यायाधीश दिलेले असले तरी देशाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान होणारे न्या. कापडिया हे केवळ दुसरे झोराष्ट्रियन न्यायाधीश असतील. न्या. एस. पी. भरुचा यांच्या निवृत्तीनंतर बरोबर सात वर्षांनी ते या पदावर विराजमान होतील. कितीही गुणवत्ता असली तरी प्रत्येकाला योग्य वेळी ‘लिफ्ट’ देणारा कोणीतरी ‘गॉडफादर’ लागतोच. न्या. कापडिया यांना न्या. भरुचा यांच्या रूपाने असा ‘गॉडफादर’ लाभला, असे म्हणण्याने दोघांच्याही महत्तेत जराही उणेपणा येत नाही. ८ ऑक्टोबर १९९१ ते ४ ऑगस्ट २००३ अशी पूर्ण १२ वर्षे मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश राहिलेल्या न्या. कापडिया यांची त्यापुढील वाटचाल मात्र जलदगतीने झाली. मुंबईहून हिमाचल प्रदेशात मुख्य न्यायाधीश म्हणून गेलेले न्या. कापडिया यांची त्यानंतर चारच महिन्यांत म्हणजे १८ सप्टेंबर २००३ रोजी सर्वोच्च न्यायालयावर न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली. न्या. भरुचा यांच्या सरन्यायाधीशपदाचा तो अगदी शेवटचा काळ होता. न्या. कापडिया सर्वोच्च न्यायालयावर गेले तेव्हा त्यांच्याकडे न्या. भरुचा यांचे भावी उत्तराधिकारी म्हणूनच पाहिले गेले. ‘आम्हा भय कसले, आमचा कैवारी नारायण!’ या संत तुकारामांच्या तत्वज्ञानाचा आदर्श ठेवून गेली २० वर्षे निर्भीडपणे न्यायदान करणाऱ्या न्या. कापडिया यांनी अनेक महत्वाच्या प्रकरणांमध्ये पथदर्शक निकाल दिले आहेत. तरीही व्यापारी व व्यावसायिक वाद, करविषयक प्रकरणे ही त्यांची विशेष खासियत म्हणावी लागेल. मुंबई उच्च न्यायालयात असताना घडलेल्या हर्षद मेहता याच्या महारोखे घोटाळ्याचा गुंता दिवाणी आणि फौजदारी प्रकरणांच्या रूपाने सोडविण्याचे सुरुवातीचे जिकिरीचे काम त्यांनीच विशेष न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून लीलया केले होते. न्यायाधीशांच्या भ्रष्टाचार व गैव्यवहारांच्या जाहीर चर्चेने वरिष्ठ न्यायसंस्था विश्वासार्हता पुन्हा संपादित करण्याच्या प्रयत्नात असताना आणि न्यायाधीशांच्या नेमणुकींच्या बाबतीत प्रस्थापित ‘कॉलेजिएम’पद्धतीच्या परिणामकारकतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात असताना सरन्यायाधीश होणाऱ्या न्या. कापडिया यांना सरन्यायाधीशपदाचे हे सतीचे वाण सुमारे सव्वा दोन वर्षे म्हणजे २९ सप्टेंबर २०१२ पर्यंत सांभाळायचे आहे.

  • ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)

    निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. ते राष्ट्रीय सुरक्षा या विषयावरील तज्ज्ञ आहेत.

  • दिलीप देवीदास भवाळकर

  • गिरीश वासुदेव

    गिरीश वासुदेव हे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ होते. १९९१ च्या उदारीकरणानंतर देशात येणार्‍या परदेशी गुंतवणुकीला साचेबद्ध आकार देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.

  • महादेव नामदेव अदवंत

    समीक्षक महादेव नामदेव अदवंत यांचा जन्म ६ जून १९१४ रोजी झाला.

    लघुकथाकार म्हणून कारकीर्द सुरु केलेल्या अदवंतांचे नाव झाले ते “माणुसकीचा धर्म”, “मनाची मुशाफिरी”, अशा लघुनिबंध संग्रहांमुळे. सहा शाहिरांचे “पैंजण”, “विनायकांची कविता”, “दहा कथाकार” अशी संपादने त्यांनी केली.

    # Adawant, Mahadev Namdev
    # अदवंत, महादेव नामदेव

  • ऐश्वर्या साखरे

    अॅक्टिंग , डान्स , जिमनॅस्टिक , मल्लखांब अशी चौफेर आवड जपत , अभ्यासही तितक्याच कुशलतेने सांभाळणारी ' ऐश्वर्या साखरे '

    रुईया कॉलेजला बीएच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या ऐश्वर्याने लहानपणापासूनच नृत्याचे धडे गिरवायला सुरुवात केली. तिने डॉ.संध्या पुरेचांकडे भरतनाट्यमचं शिक्षण घेतले. भरतनाट्यममधील विशारद ही पदवीही तिने प्राप्त केली. याबरोबरच कथ्थकचीही डिग्री मिळवली.

    नृत्य म्हणजे तिचा जीव की प्राण. पण इतरांना ते शिकवायलाही तिला मनापासून आवडतं. म्हणूनच डान्स शिकता शिकता तिनं निरनिराळ्या शोज मध्ये परफॉर्म करायलाही सुरुवात केली. नुकताच सिमल्याच्या एका शाळेच्या शतकपूर्तीसाठी लहानग्यांचा डान्सही तिने बसवला होता.

    'डान्स ही माझी पहिली आवड असली तरी अॅक्टींगचीही मला प्रचंड ओढ आहे' असं ऐश्वर्या म्हणते. ' राहिले दूर घर माझे ', ' देवकी ', ' हिरवं कुंकू ' अशा सिनेमांत बालकलाकार म्हणून तिनं काम केलंय. त्यासोबतच अनेक जाहिराती आणि हिंदी मराठी मालिकांमधूनही ती तिची अभिनयाची आवड जोपासत असते.

    अभिनय आणि नृत्यासोबत मल्लखांब आणि जिम्नॅस्टिकचीही तिला आवड आहे. दादरच्या प्रभात पथकात मल्लखांब आणि जिम्नॅस्टिक्स दोन्हीचं शिक्षण ती सध्या घेतेय. अभिनय आणि नृत्यासोबतच या क्षेत्रातही भरीव कामगिरी करण्याचा तिचा मानस आहे.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


  • डॉ. रामचंद्र काशीनाथ भिडे उर्फ डॉ. नंदू भिडे

    डॉ. रामचंद काशीनाथ भिडे हे 'फास्ट ट्रॅक ओपन हार्ट सर्जरी' करणारे पहिले भारतीय डॉक्टर होते. 'सुप्रापीप' या आज सर्जनप्रिय झालेल्या सुरक्षित तंत्राचे जनकत्वही त्यांच्याकडेच जाते. त्यांनी दहा हजारांवर हृदयशस्त्रक्रिया केल्या होत्या. असंख्य रुग्णांना त्यांनी मृत्युशय्येवरून परत आणून जीवनदान दिले. वैद्यकीय क्षेत्र आज अनैतिक व्यवहारांमुळे बदनाम होत आहे. अशा काळात डॉ. भिडे प्रथम आपली लाईफ स्टाईल बदलून शस्त्रक्रिया कशी टाळता येईल याचा सल्ला पेशंटांना देत असत.

    या संशोधनाचे पेटंटही डॉ. भिडे यांना मिळाले होते. गरीबांना आपल्या संशोधनाचा फायदा व्हावा; अशी त्यांची भूमिका असे. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या या संशोधनाची दखल घेण्यात आली होती.

    नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात मानद हृदय शल्यचिकित्सक म्हणून काम पाहणार्‍या डॉ. भिडे यांनी ज्येष्ठ प्राध्यापक या नात्याने त्यांनी बजावलेली कामगिरी तर फार मोलाची ठरली. ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट व डॉक्टरेटचे विद्यार्थी यांना त्यांनी सलग नऊ वर्षे मार्गदर्शन केले. आपल्या देशातील तसेच अमेरिकेतील असंख्य विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला. कृत्रिम हृदय विकसित करण्याच्या संशोधनासाठी महाराष्ट्र, गुजरात व केंद सरकारचे पुरेसे सहकार्य न मिळाल्याने नाइलाजाने त्यांना जर्मनीला जावे लागले. स्वभावाने नम्र, व्यवसायात प्रामाणिक आणि प्रसिद्धीपासून दूर असे डॉ. भिडे सतत देशाचाच विचार करत.

    ते ज्युदो आणि अॅथलेटिक्सचे चॅम्पियन होते. वक्तृत्व, परिसंवाद आणि लेखनात त्यांनी अनेक पारितोषिके पटकावली. ठाण्यात ते भाड्याच्या घरात राहत, यावर कोणाचा विश्वास बसणार नाही.

    अधिक संशोधन, प्रयोग व प्रशिक्षणाकरिता त्यांनी मृत्युच्या चार-पाच महिन्यापूर्वीच जर्मनीला प्रयाण केले. जागतिक स्तरावर अग्रेसर असलेल्या जर्मनीमधील हार्ट अॅन्ड डायबेटीस सेंटरमध्ये त्यादृष्टीने त्यांची आगेकूच चालू होती. ब्रिटिश कौन्सिलनेही त्यांच्या संशोधनासाठी अनुदान मंजूर केले होते.

    हजारो रुग्णांवर ह्रदयशस्त्रक्रिया करून त्यांना नवी जीवनसंजीवनी देणार्‍या डॉ. भिडे यांना काळाच्या पडद्याआड नेलं ते सुध्दा एका ह्रदयविकारानेच. डॉ. भिडे यांच्या अकाली निधनाने कृत्रिम हृदय विकसित करण्याच्या प्रयत्नातील भारतातला मोठा संशोधक, शास्त्रज्ञ तसेच एक समाजसेवक हरपला आहे.

    डॉ. भिडे अवघ्या पन्नास वर्षांचे होते. सारा मित्रपरिवार आणि पेशंटही त्यांना 'नंदू भिडे' या नावानेच ओळखत. त्यांचे कृत्रिम हृदय प्राण्यांना बसविण्याचे प्रयोग सुरू होते.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


  • डॉ. वसंतराव देशपांडे

    डॉ. वसंतराव देशपांडे हे हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते होते.

  • लक्ष्मण शंकरराव काटेकर

    लक्ष्मण शंकरराव काटेकर, हे तुळजापूर येथील रहिवाशी असुन परिचीतांमध्ये तात्या या नावाने लोकप्रिय आहेत.

  • संदीप माळवी

    आपलं ठाणे बहुआयामी व्यक्तीमत्वांची मांदियाळीच! अशी अनेक व्यक्तीमत्व आपल्या ठाण्यात आहेत ज्यांनी आपल्या कार्यातनं आणि कर्तृत्वातनं आपली वेगळी ओळख जगासमोर ठेवली. असंच ठाण्यातलं बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त जनसंपर्क अधिकारी