(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • जनार्दन परब

    मराठी रंगभूमी, चित्रपट, तसंच हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा अविष्कार दाखविणार्‍यांपैकी एक नाव म्हणजे जनार्दन परब.अनेक हिंदी-मराठी चित्रपटात लहान मोठ्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत यामध्ये “माझा पती करोडपती”, “नवरी मिळे नवर्‍याला”, “गम्मत जम्मत”, “कुलस्वामिनी तुळजाभवानी” चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, हिंदीत “कसम”, “शिकारी”, “ऐलान”, “जिद्दी”, “क्रांतीवीर”, “बाजीगर”, “नायक”, “गुलाम”, “उडान”, “चाय ना गेट” सारख्या असंख्य चित्रपटांचा उल्लेख करता येईल.

  • कमलाबाई विष्णू टिळक

    “हृदयशारदा”, “आकाशगंगा हे संग्रह. “झोपडपट्टीतील झिपर्‍या” व “सारेच खोटे” ही पुस्तके त्यांनी कुमारांसाठी लिहिली. “स्त्रीजीवनाची नवी क्षितिजे”, “स्त्रीजीवनविषयक प्रश्न” अशी पुस्तके, अनेक कथासंग्रह त्यांनी लिहिले.

  • विवेक भोळे

    जळगावच्या विवेक भोळे यांनी वास्तुरचनाकार म्हणून भरारी घेताना मुंबई बरोबरच जयपूर, दिल्लीपासून चीनमध्येही कार्यालये थाटली. जगभर अनेक प्रकल्प तडीस नेले आणि वास्तुरचनेबरोबर इंटिरिअर डिझाइन, ग्राफिक डिझाइन या क्षेत्रातही काम केले...

    विवेक भोळे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला खान्देशची 'वास्तु' भरारी हा लेख पुढील पानावर वाचा.

    विवेक भोळे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला खान्देशची 'वास्तु' भरारी हा लेख वाचा.

    Bhole-vivek-modified

  • भास्कर पाळंदे

    ठाणे शहराचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी पुर्वीपासून येथे साहित्यिक, नाटयकर्मी, संगीतकार, शिक्षणतज्ञ, संशोधक, व इतर कलाप्रेमी रथी महारथींची रेलचेल आहे. या शहराचा सांस्कृतिक व साहित्यिक ज्ञानबिंदू उंचवण्यात जुन्या काळातील म्हणजे साधारण १९ व्या शतकाच्या पुर्वार्धातील, प्रसिध्द कवी भास्कर दामोदर पाळंदे यांचं महत्त्वाचं योगदान होतं.

    मूळ ठाण्याचे रहिवाशी असलेल्या भास्कर पाळंदे आपल्या परिसरातील स्थानिकांना आपल्या रसभरित व जातीवंत कवितांनी मंत्रमुग्ध करून, रसिकतेचा दरवळणारा पारिजात आपल्या वाचकांच्या सामुहिक मनांमध्ये दीर्घकाळ फुलवून ठेवला होता. इंग्रज राजवटीत ते न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. भास्कर पाळंदे यांनी “विक्रमोर्वशीयम्” या संस्कृत नाटकाचे गद्यपद्यात्मक व गीतेचे ओवीबध्द भाषांतर केले आहे. त्यांनी लिहीलेल्या “रत्नमाला” या प्रसिध्द भक्तीपर पद्यग्रंथाचे वाचन करताना सर्वसामान्य व्यक्ती गहिवरून जातो.

    दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित

  • चाफेकर बंधु

    वासुदेव चाफेकर व त्यांचे बंधु हे आद्य भारतीय क्रांतिकारकांमध्ये गणले जातात.

  • डॉ. अशोक रानडे

    डॉ. रानडे यांनी अनेक विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीत आणि “व्हॉईस कल्चर’चे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले होते. संगीताचे सौंदर्यशास्त्र, लोकसंगीत शास्त्र, ऑन म्युझिक अँड म्युझिशियन्स, स्टेज म्युझिक इन महाराष्ट्र, महाराष्ट्र आर्ट म्युझिक यासारख्या संगीताचं महत्त्व सांगणारी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली.

  • सुलोचनाबाई

    सुलोचनाबाईंनी २५० पेक्षाही अधिक मराठी चित्रपटांतून विविध व्यक्तिरेखा सादर केल्या तसंच सुमारे १५० हिंदी चित्रपटांमधुन चरित्र-अभिनेत्री सोबतच आईच्या भूमिका साकारुन त्या लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवल्या आहेत.

  • सत्यजित खारकर

    कधी ते कविता लिहितात. कधी एखाद्या शॉर्टफिल्मची कथा, तर कधी स्वत:च चित्रपटाचे दिग्दर्शन...हे सगळे त्यांचे छंद असले तरी, या कलाकृतींना आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये अव्वल स्थान मिळते. औरंगाबादचे सत्यजित खारकर शिकागोत इंजिनीअरिंग शिक्षणाशी निगडीत नोकरी करीत असले, तरी त्यांचे रुपेरी पडद्याशी घट्ट नाते आहे.

    शिकागोत उलगडला रुपेरीपट

  • दिग्दर्शक दत्ता माने

    दत्ता माने यांनी अभिनेता व मराठी दिग्दर्शक म्हणून काम केले. त्यांचा जन्म १९२२ रोजी झाला. त्यांनी आपल्या काळात १८ चित्रपट बनवले. काही नावे बाईसाहेब, मामा भाचे, कार्तिकी, कसे काय पाटील बरे आहे का?, पाटलाची सून.

    दत्ता माने यांचे २९ ऑक्टोबर १९८० रोजी निधन झाले.

    अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

    #DattaMane

  • अरूण होर्णेकर

    कुठल्याही भूमिकेत शिरून तिची मजा लुटणे, ही चांगल्या नटाची खूण त्याच्यात ठसठशीतपणे आहे. म्हणूनच ‘सख्खे शेजारी’सारखा विनोदी रेव्ह्यू असो की ‘कुणी तरी आहे तिथं’ यासारखे रहस्यप्रधान नाटक, अरूणचे त्यातले असणे लक्षणीय ठरते