(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • नवनीतभाई बार्शीकर

    बार्शीकर, नवनीतभाई

    नवनीतभाई बार्शीकर यांच्या निधनाने नगर शहराच्या जडणघडणीचे वैभवशाली पर्वच काळाच्या पडद्याआड गेले. सार्वजनिक जीवनातून निवृत्त होऊन पंचवीस-तीस वर्षे झाल्यानंतरही शहराच्या दैनंदिन व्यवहारात पदोपदी होणारा नामोल्लेख हीच त्यांच्यातील अस्सल नगरकराची खरी ओळख होती. राजकारण, अर्थकारण आणि समाजकारण अशा सर्वच आघाडय़ांवर आपल्या कामाची पक्की मोहोर त्यांनी उमटवली. भाईंना नगर शहराची आणि नगर शहराला भाईंची ओळख चिकटली ती त्यामुळेच!

    राज्याच्या राजकारणात वैशिष्टय़पूर्ण स्थान असलेल्या नगर जिल्हय़ाच्या लौकिकात मुळातच नगर शहराचे स्थान तसे दुय्यम आहे. सहकार, शेती, पाटपाण्याच्या अनुषंगाने ग्रामीण भागाचा जिल्हय़ात व राज्यातही वरचष्मा आहे. राज्याच्या पातळीवर त्याला धक्का देण्याचे काम नवनीतभाई बार्शीकर यांनी केले. नगर विकासाच्या जोरावर त्यांनी जिल्हा व राज्यातही नगर शहराची स्वतंत्र ओळख निर्माण केली. सधन घरात १३ जानेवारी १९२० ला नवनीतभाईंचा जन्म झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात चळवळीत सहभागी झालेल्या भाईंनी त्या धकाधकीच्या काळातही शिक्षणाची आस सोडली नाही. पुण्यात फग्र्युसन कॉलेजमधून एम.ए. पूर्ण करून त्यांनी पुढे कायद्याचीही पदवी घेतली. भाईंना कुठल्याही स्वरूपाची राजकीय पाश्र्वभूमी नव्हती. वडिलांचा देशसेवेचा वारसा मात्र त्यांना लाभला. याच प्रेरणेतून सन ४२ च्या चलेजाव आंदोलनात ते सहभागी झाले, त्यात त्यांना सहा महिन्यांचा कारावासही भोगावा लागला. उण्यापुऱ्या ४०-५० वर्षांच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात त्यांना एकदाच आमदारकीची संधी मिळाली. त्याचेही त्यांनी सोने केले. १९७२ ते ७८ या काळात विविध कारणांनी विधानसभेत नगर शहराचे नाव कायम चर्चेत राहिले. विधिमंडळाच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष म्हणून काम करताना भाईंनी राज्यात ठसा उमटवला. नगर शहरात त्यांनी उभ्या केलेल्या मूलभूत सोयीसुविधांचे पुढे राज्यात अनुकरण झाले. अगदी स्मशानभूमीचे उदाहरण घेतले तरी नगरचे अमरधाम पाहून त्या धर्तीवर पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीची उभारणी झाली! तब्बल ५० वर्षे शहराच्या सार्वजनिक जीवनात नवनीतभाई बार्शीकर सर्वार्थाने केंद्रस्थानी राहिले. ४० वर्षे नगरचे नगरसेवक व त्यातील १८ वर्षे नगराध्यक्ष, वीस वर्षे अर्बन बँकेचे अध्यक्ष ही त्यांची कारकीर्द. विशेष म्हणजे पक्षीय राजकारणाच्या नादी न लागता अपक्ष म्हणूनच भाईंनी प्रदीर्घ काळ नगर शहरावर शब्दश: राज्य केले. त्यांचे हे स्थान हीच नगर शहराची स्वातंत्र्योत्तर काळातील खऱ्या अर्थाने जडणघडण आहे. त्यातूनच त्यांनी स्वत:ची ‘अस्सल नगरकर’ अशी ओळख निर्माण केली आणि नगर शहरालाही आधुनिकतेची नवी ओळख दिली. त्याच्या खुणा आजही शहरात जागोजागी शाबूत आहेत. त्यांची पदोपदी आठवण काढली जाते ती याच कारणामुळे! लोकनियुक्त नगराध्यक्ष, त्या काळात एकमेव अर्थसत्ता असलेल्या नगर अर्बन बँकेचे अध्यक्ष आणि आमदार अशा तीनही संस्थांचा कारभार एकाच वेळी ताब्यात ठेवूनही भाई ‘लार्जर दॅन लाईफ’ झाले नाही. महत्त्वाच्या तिन्ही संस्थांचे सर्वेसर्वा होते तरी त्यांच्या दृष्टीने संस्था मोठय़ा होत्या. सार्वजनिक जीवनातील त्यांच्या निवृत्तीने नगर शहराच्या विकासाची परंपरा खंडित झाली, निधनाने या पर्वाचाच अस्त झाला!

  • दादा धर्माधिकारी

    सर्वोदयदर्शन, गांधीजी: एक दर्शन, क्रांतिनिष्ठा, आपल्या गणराज्याची घडण, पाकिस्थानी वृत्तीचा प्रतिकार अशी प्रेरक पुस्तके त्यांनी लिहिली होती.

  • डॉ. प्र. चिं. शेजवलकर

    वाणिज्य, व्यवस्थापन, अर्थ, बँक, विमा, शिक्षण, साहित्य, अध्यात्म अशा विविध क्षेत्रांत सहजपणे मुसाफिरी करणारे प्राचार्य डॉ. प्र. चिं. शेजवलकर.

    ज्या काळामध्ये आपल्या देशात व्यवस्थापन या विषयाचा शास्त्र म्हणून उदय झाला नव्हता, त्या काळात त्यांनी विद्यार्थ्यांना या विषयाकडे पाहण्याची व्यापक दृष्टी दिली.

    'मॅनेजमेंट गुरू' ही संज्ञा आता प्रचलित झाली आहे. शेजवलकर हे या संज्ञेचे एक चालते-बोलते उदाहरण. याच्या पुढे जात ते 'मॅनेजमेंट एज्युकेशन गुरू' बनले. म्हणूनच पुण्यातील व्यवस्थापन शिक्षणक्षेत्रात त्यांचा उल्लेख 'शेजवलकर शिक्षण संस्था' म्हणून केला जातो. त्यांनी विद्यापीठाच्या स्तरावर तब्बल ६० वर्षे अध्यापन केले. पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन विभागाचे ते प्रमुख होते. त्यांच्या हाताखाली ८२ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. मिळवली आहे. काही व्यवस्थापन संस्थांचे प्रमुख संचालकपद ते अखंडपणे भूषवित आहेत. पुणे विद्यापीठाच्या 'नॉलेज मॅनेजमेंट' या अभ्यासमंडळाचे ते अध्यक्ष होते. पुणे स्टॉक एक्स्चेंजचे ते संचालक होते. ही यादी आणखी वाढविता येईल; पण केवळ एवढ्या उल्लेखांमध्येही त्यांच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाची झलक दिसून येते.

    त्यांचे मराठी भाषाप्रेमही सर्वज्ञात आहे. मराठी ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी ते नेहमीच आपल्या लेखनातून आणि व्याख्यानांमधून पाठपुरावा करतात. पुण्यात बी.कॉम.चा अभ्यासक्रम आज मराठी भाषेतून शिकवला जातो. उत्तरपत्रिकासुद्धा मराठी भाषेमधून लिहिता येते. हे सारे डॉ. शेजवलकर यांच्या प्रयत्नांमधूनच साध्य झाले. वाणिज्य विद्याशाखेत पीएच.डी.चा प्रबंध मराठीतून लिहिण्यास परवानगी मिळावी, हा त्यांचा आग्रह पुणे विद्यापीठाने मान्य केला. परंतु तेवढ्यावरच ते थांबले नाहीत. सुमारे ३० पाठ्यपुस्तके त्यांनी मराठीतून लिहिली.

    महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे ते पाच वर्षे अध्यक्ष होते. या सार्‍या व्यापातून वेळ काढून त्यांनी चार हजारांहून अधिक मराठीतून भाषणे केली. कामगारांसाठी ज्ञानशिक्षण देण्याचे वर्ग काढले. गेली ५० वर्षे त्यांनी अध्यात्मावरही विविधांगी लेखन केले आहे. 'प्रार्थने'संबंधी ते लिहितात, 'सुखदु:खाच्या पलीकडे जाऊन परमेश्वराजवळ जाण्याची खरी ओढ निर्माण होते, तेव्हा केलेली प्रार्थना आत्मोन्नती करणारी असते.' व्यवस्थापनापासून अध्यात्मापर्यंतचा त्यांचा सहजसुंदर वावर खरोखरच स्तिमित करणारा आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदावरील त्यांच्या निवडीमुळे राजकारणविरहीत भाषासेवेचे बीज रोवले जाईल, अशी आशा आहे.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


  • विलासराव देशमुख

    कर्तृत्व आणि परिश्रमावर विश्वास असणारा नेता. या विश्वासामुळेच बाभूळगावच्या सरपंच पदापासून सुरु झालेला प्रवास आज केंद्रिय अवजड उद्योग मंत्रालयापर्यंत येऊन ठेपला आहे. दोन वेळा त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविले.

  • वसंतराव नाचणे

    समाजवादी पक्षाचे कट्टर कार्यकर्ते श्री. वसंतराव नाचणे यांनी कै. दत्ताजी ताम्हणे यांच्या बरोबर खेडोपाडी खूप काम केले.

  • निर्मल मेहेंदळे

    प्रदूषण होते म्हणून कारखानेच कसे बंद करणार? उलट कारखान्यांमधील टाकाऊ पदार्थ, पाणीव्यवस्थापन याबाबत शास्त्रीय कसोट्या वापरुन प्रदूषण रोखणे, हा त्यावरचा उपाय. हरयाणात स्थिरावलेले प्रदूषण नियंत्रक इंजिनीअर निर्मल मेहेंदळे हे गेली तीन दशके उद्योगांमध्ये पर्यावरणाचा शास्त्रीय मंत्र रुजवत आहेत.

    निर्मल मेहेंदळे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला लक्ष्य निसर्गस्नेहाचे हा लेख पुढील पानावर वाचा.

    निर्मल मेहेंदळे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला लक्ष्य निसर्गस्नेहाचे हा लेख वाचा.

    mehendale-nirmal-modified

  • मनोज लासे

    ठाणे महापालिकेच्या उपमहापौर पदाच्या कार्यकाळात वावरत असताना, मनोज लासे यांनी ठाणे शहर अत्याधुनिक, अतिक्रमणरहित व हरित कसे राहील या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले. त्याचप्रमाणे शहरात रस्ते, स्वच्छ आणि मुबलक पाणी, नियमित वीज पुरवठा यासारख्या मुलभूत सुविधा त्यांनी गतिमानरित्या पुरविलेल्या आहेत. ठाणे शहराला हरित बनवण्याच्या दृष्टीने वृक्षारोपणासारखे कार्यक्रम राबवून जनतेला पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले व स्वतःही कार्यक्रमाचे आयोजन केले. संपूर्ण ठाणे शहराची काळजी घेताना त्यांनी गटारे, पदपथांचे काँक्रिटिकरण, पाणीगळती, व प्रत्येक चौकातील सुशोभिकरणाला त्यांनी प्राधान्य दिले.

    विद्यार्थ्यांपासून वयोवृध्दांपर्यंतच्या सर्वच वयोगटातील लोकांच्या समस्यांना प्रत्यक्षात मदत करून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. खारीगाव कळव्यातील राजपार्क सोसायटीजवळ वृध्दांसाठी अद्ययावत नाना नानी पार्क उभारले. शहरातील दळणवळण सुधारण्यासाठी सुसज्ज रस्त्यांना प्राधान्य देण्यासोबतच, खारेगांव येथील स्मशानभूमीचच्या दुरावस्थेमुळे उद्भवणार्‍या अनेक अडचणींची लक्षात घेत या स्मशानभूमीसाठी ५५ लाखांचा निधी उपललब्ध करून नुतनीकरणास सुरूवात केली.

    त्याचप्रमाणे घोलाई भागातील पाणी, रस्ते, शौचालये आदी मुलभूत सुविधांपासून वंचित राहिलेल्या नागरिकांच्या मदतीला धावून, त्यांनी काही महिन्यांमध्येच या विभागाचा चेहरामोहरा पालटून दाखविला. सध्या या विभागामध्ये सुसज्ज रस्ते, पदपथावर दिवे, व घाणीचा निचरा करणार्‍या ड्रेनेज लाईनची व्यवस्था झाली आहे. या ठिकाणी विजेची समस्या असल्याने लासे यांच्या हस्तक्षेपामूळे येथे ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे शाळा क्रमांक ६८ चे नुतनीकरणही त्यांनी केले. वास्तू आनंद सोसायटी येथे सधीकरणासाठी धबधबा उभारल्याने हा भाग अधिक रमणीय झाला आहे.

    दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित

  • श्रीधर शांताराम आजगावकर

    मधुमेहतज्ज्ञ, संशोधक आणि विज्ञान प्रसारक.

  • (पं.) मनोहर चिमोटे

    चिमोटे, (पं.) मनोहर
    भारतीय संगीतात वाद्यसंगीताचे एक स्वतंत्र आणि समृद्ध असे दालन आहे. वाद्यांमधून अभिजात संगीताचा संपन्न अनुभव देऊ शकणाऱ्या प्रतिभासंपन्न कलावंतांची खाणच भारतात गेल्या काही शतकांमध्ये निर्माण होत आलेली आहे. भारतीय संगीताच्या अभिव्यक्तीसाठीच्या वाद्यांबरोबरच परदेशातून आलेल्या रीड ऑर्गन (पायपेटी) किंवा हार्मोनिअम या वाद्यांनी भारतीय संगीतात गेल्या दोन शतकांच्या काळात भरीव कामगिरी केली आहे.
    ब्रिटिश राजवटीत आलेल्या या वाद्यांचे भारतीयीकरण करून त्यांना आपल्या संगीतात इतक्या सहजपणे मिसळवून टाकण्याची किमया येथील कलावंतांनी अशी काही करून दाखवली, की परदेशीयांना हे वाद्य आपलेच आहे काय, अशी शंका यावी. पंडित मनोहर चिमोटे हे असे एक अव्वल दर्जाचे हार्मोनियम वादक होते. हार्मोनियम या मूळ वाद्याची जवळीक अ‍ॅकॉर्डियन, ऑर्गन या वाद्यांशी असली, तरीही तिची निर्मिती भारतीय संगीतासाठी नव्हती. चिमोटे यांनी पन्नास वर्षांपूर्वी तिला भारतीय रुपडे चढवले आणि तिला येथील संगीताच्या दरबारात मानाचे स्थान मिळवून दिले. हार्मोनियमचे आगमन होण्यापूर्वीच्या काळात गायनाची संगत करण्यासाठी सारंगी हे तंतुवाद्य उपयोगात येत असे. वादकांच्या कर्तृत्वाने हार्मोनियमने गायनाच्या साथीचे वाद्य म्हणून प्रवेश केला आणि आता ते वाद्य भारतीय संगीताच्या मैफलीतील एक अविभाज्य घटक बनले आहे. पंडित चिमोटे यांनी परदेशी बनावटीच्या स्वर निर्माण करणाऱ्या स्वरपट्टय़ांवर भारतीय स्वरांचे केलेले आरोपण फारच यशस्वी झाले. गंधार हा स्वर भारतीय संगीतातील एक स्वयंभू स्वर समजला जातो. गंधाराच्या स्वरावर आधारित त्यांनी तयार केलेल्या हार्मोनियमचे नावही आपोआप ‘संवादिनी’ असे झाले आणि मग ती भारतीयच होऊन गेली. चिमोटे यांचा जन्म नागपूरचा आणि कर्मभूमी मुंबई. लहानपणी पंडित भीष्मदेव वेदी या प्रख्यात वादकाकडून त्यांनी हार्मोनियम वादनाचे धडे घेतले आणि मग त्यावर स्वप्रतिभेने नवनवीन प्रयोग केले. भारतातील अनेक दिग्गज कलावंतांबरोबर त्यांनी मैफलींमध्ये साथ केली होती. जेव्हा हे वाद्य स्वतंत्रपणे संगीत निर्माण करू शकते असा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला, तेव्हा त्यांनी साथ करणे बंद केले आणि त्यानंतर केवळ स्वतंत्रपणे संवादिनीचे एकलवादन करण्यासाठीच आपले आयुष्य व्यतीत केले. मैफलीत गायकाच्या बाजूला असणारे हे वाद्य तिच्या मध्यभागी आणण्याचे श्रेय पंडित चिमोटे यांना द्यायला हवे. भारतातल्या सगळ्या संगीत महोत्सवात त्यांच्या संवादिनी वादनाने रसिकांची वाहवा मिळवली. ‘सूरमणी’, राज्य शासनाचा पुरस्कार, आदर्श संगीत शिक्षक पुरस्काराने त्यांना सन्मानित केले गेले. त्यांनी विद्यादानाचे जे मोठे कार्य केले, त्यामुळे अनेक युवक संवादिनी वादनाकडे वळू लागले. व्हायोलिन, सतार, बासरी या वाद्यांबरोबर संवादिनीची जुगलबंदी घडवणारे चिमोटे हे एकमेव कलाकार होते. त्यांच्या निधनाने संगीताच्या क्षेत्रात स्वकर्तृत्वाने झळाळणाऱ्या एका विद्वान कलावंताचा अस्त झाला आहे.

    पंडित मनोहर चिमोटे
    भारतीय संगीतात वाद्यसंगीताचे एक स्वतंत्र आणि समृद्ध असे दालन आहे. वाद्यांमधून अभिजात संगीताचा संपन्न अनुभव देऊ शकणाऱ्या प्रतिभासंपन्न कलावंतांची खाणच भारतात गेल्या काही शतकांमध्ये निर्माण होत आलेली आहे. भारतीय संगीताच्या अभिव्यक्तीसाठीच्या वाद्यांबरोबरच परदेशातून आलेल्या रीड ऑर्गन (पायपेटी) किंवा हार्मोनिअम या वाद्यांनी भारतीय संगीतात गेल्या दोन शतकांच्या काळात भरीव कामगिरी केली आहे.
    ब्रिटिश राजवटीत आलेल्या या वाद्यांचे भारतीयीकरण करून त्यांना आपल्या संगीतात इतक्या सहजपणे मिसळवून टाकण्याची किमया येथील कलावंतांनी अशी काही करून दाखवली, की परदेशीयांना हे वाद्य आपलेच आहे काय, अशी शंका यावी. पंडित मनोहर चिमोटे हे असे एक अव्वल दर्जाचे हार्मोनियम वादक होते. हार्मोनियम या मूळ वाद्याची जवळीक अ‍ॅकॉर्डियन, ऑर्गन या वाद्यांशी असली, तरीही तिची निर्मिती भारतीय संगीतासाठी नव्हती. चिमोटे यांनी पन्नास वर्षांपूर्वी तिला भारतीय रुपडे चढवले आणि तिला येथील संगीताच्या दरबारात मानाचे स्थान मिळवून दिले. हार्मोनियमचे आगमन होण्यापूर्वीच्या काळात गायनाची संगत करण्यासाठी सारंगी हे तंतुवाद्य उपयोगात येत असे. वादकांच्या कर्तृत्वाने हार्मोनियमने गायनाच्या साथीचे वाद्य म्हणून प्रवेश केला आणि आता ते वाद्य भारतीय संगीताच्या मैफलीतील एक अविभाज्य घटक बनले आहे. पंडित चिमोटे यांनी परदेशी बनावटीच्या स्वर निर्माण करणाऱ्या स्वरपट्टय़ांवर भारतीय स्वरांचे केलेले आरोपण फारच यशस्वी झाले. गंधार हा स्वर भारतीय संगीतातील एक स्वयंभू स्वर समजला जातो. गंधाराच्या स्वरावर आधारित त्यांनी तयार केलेल्या हार्मोनियमचे नावही आपोआप ‘संवादिनी’ असे झाले आणि मग ती भारतीयच होऊन गेली. चिमोटे यांचा जन्म नागपूरचा आणि कर्मभूमी मुंबई. लहानपणी पंडित भीष्मदेव वेदी या प्रख्यात वादकाकडून त्यांनी हार्मोनियम वादनाचे धडे घेतले आणि मग त्यावर स्वप्रतिभेने नवनवीन प्रयोग केले. भारतातील अनेक दिग्गज कलावंतांबरोबर त्यांनी मैफलींमध्ये साथ केली होती. जेव्हा हे वाद्य स्वतंत्रपणे संगीत निर्माण करू शकते असा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला, तेव्हा त्यांनी साथ करणे बंद केले आणि त्यानंतर केवळ स्वतंत्रपणे संवादिनीचे एकलवादन करण्यासाठीच आपले आयुष्य व्यतीत केले. मैफलीत गायकाच्या बाजूला असणारे हे वाद्य तिच्या मध्यभागी आणण्याचे श्रेय पंडित चिमोटे यांना द्यायला हवे. भारतातल्या सगळ्या संगीत महोत्सवात त्यांच्या संवादिनी वादनाने रसिकांची वाहवा मिळवली. ‘सूरमणी’, राज्य शासनाचा पुरस्कार, आदर्श संगीत शिक्षक पुरस्काराने त्यांना सन्मानित केले गेले. त्यांनी विद्यादानाचे जे मोठे कार्य केले, त्यामुळे अनेक युवक संवादिनी वादनाकडे वळू लागले. व्हायोलिन, सतार, बासरी या वाद्यांबरोबर संवादिनीची जुगलबंदी घडवणारे चिमोटे हे एकमेव कलाकार होते. त्यांच्या निधनाने संगीताच्या क्षेत्रात स्वकर्तृत्वाने झळाळणाऱ्या एका विद्वान कलावंताचा अस्त झाला आहे.

  • बापू गोखले

    अतिशय शूरवीर असे मराठेशाहीचे शेवटचे सेनापती म्हणून ओळखले जातात ते म्हणजे बापू गोखले. कोकणातील तळेखाजण या गावी बापू गोखले यांचा जन्म झाला. बापू गोखले यांचे मूळ नाव नरहर गणेश गोखले.