(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • इरावती कर्वे

    समाजशास्त्र विषयातील संशोधक, मानववंश शास्त्राच्या एक तज्ज्ञ विचारवंत जगन्मान्य विदुषी, ललित निबंध लेखिका अशी कर्तृत्वान महिला म्हणजे इरावती कर्वे.

  • शांताराम काशिनाथ राऊत

    चित्रकलेच्या क्षेत्रात ठाण्याचे नाव उज्वल करणारे प्रसिद्ध चित्रकार व नामवंत संस्थांच्या बोधचिन्हांचे निर्माते श्री. शांताराम काशिनाथ राऊत.

  • संतकवि कृष्णदयार्णव

    संतकवि कृष्णदयार्णव हा संतकवि सातारा जिल्ह्यांतील कर्हाहड जवळील कोपरडें येथील रहाणारा. माध्यंदिनशाखी देशस्थ ब्राह्मण होय. याचें खरें नांव नरहरि असून बापाचें नांव नारायण व आईचें बहिणा होते.

  • शैलेश बालाजी माळोदे

  • वसंत कानेटकर

    महाराष्ट्राला अभिमान वाटावा असं नाट्यक्षेत्रातील एक नाव म्हणजे दर्जेदार नाटकांचे लेखक वसंतराव कानेटकर. फक्त नाटककार नाही तर कथा, कादंबरी आणि वैचारिक लेखन करणारे वसंतराव कानेटकर हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व.

  • अमेय वाघ

    अमेय वाघ एक अभिनेता म्हणून सध्या चर्चेत असलेलं नाव आहे . अमेयने कुणाच्याही अभिनय शैलीची नक्कल न करता स्वतःची एक वेगळी अभिनय शैली विकसित केली. त्या कसदार आणि सहज अभिनय करण्याच्या शैलीमुळे तो हल्ली बऱ्याच चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला नेहमी येत असतो.

  • मानसी सप्रे

    चित्रपटनिर्मती, लेखन, दिग्दर्शनात तिचा हातखंडा आहे. चित्रपट आणि संस्कृती हा तिचा अभ्यासाचा विषय आणि त्यासाठीच इराणच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ती विशेष निमंत्रित होती. ती एका राष्ट्रीय चॅनेलच्या उपाध्यक्षपदापर्यंतही पोहोचली आहे. इंग्रजी विषयात जेएनयू मधून एमए केलेली मानसी सप्रे हिने हैदराबादच्या रामोजी राव समुहात मराठी विभागाचे प्रमुखपदही भूषविले आहे. अशा अष्टावधानी चित्रकर्मीच्या कामाची ओळख...

    अष्टावधानी चित्रकर्मी

  • प्रकाश बाळ जोशी

    प्रकाश बाळ जोशी हे एक बहुआयामी असं व्यक्तिमत्त्व आहे. गेल्या एक्केचाळीस वर्षापासून ते पत्रकारितेत आहेत. एका बाजूला सर्जनशील लेखन तर दुस-या बाजूला एक चित्रकार म्हणून मिळालेली आंतरराष्ट्रीय स्तरावरची ओळख याची त्यांनी स्वत:ची अशी एक खास शैली निर्माण केलेली आहे.

  • (डॉ.) आ. ह. साळुंखे

    स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रातील बदलत्या सामाजिक-सांस्कृतिक जाणिवांवर मूलभूत चिंतन करणाऱ्या, हाताच्या बोटांवर मोजता येणाऱ्या विचारवंतांमध्ये डॉ. आ. ह. साळुंखे यांचे नाव घ्यावेच लागते. कोल्हापूर येथे या आठवडय़ात त्यांना प्रदान केल्या जाणाऱ्या छत्रपती शाहू पुरस्कारामुळे त्यांच्या वैचारिक प्रवासाला एक प्रागतिक अधिष्ठान लाभले आहे. महाराष्ट्राच्या भविष्याबाबत त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केलेले सांस्कृतिक धोरण थोरामोठय़ांकडून वाखाणले गेले.

    सांगली जिल्हय़ात खाडेवाडीसारख्या छोटय़ा गावात १९४३ मध्ये शेतकरी कुटुंबात साळुंखे जन्माले. आयुष्यभर नांगर ओढत, पाण्याच्या पखाली वाहण्याचेच काम करावे लागता कामा नये याची पक्की जाणीव आ. ह. साळुंखे यांना असली पाहिजे; डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध ही त्यांची केवळ दैवते नव्हती, तर त्यांच्या विचारांची आणि त्यासाठी झालेल्या सामाजिक प्रवासाची त्यांना अगदी लहान वयातच ओढ लागलेली होती. संत तुकारामांच्या बंडखोर विचारांना समाजाने कसे अलगद उचलले आणि त्यांच्या बंडखोरीलाही कशी समाजमान्यता मिळाली, याचा अनुभव डॉ. आ. ह. साळुंखे यांना लहान वयातच आला.

    भारतीय संस्कृतीबद्दलची जिज्ञासा पुरी करण्यासाठी केवळ समाजविज्ञानाच्या अंगाने जाता कामा नये, त्यासाठी साहित्याची उपासना महत्त्वाची आहे, याचे भान ठेवत, साळुंखे यांनी शिवाजी विद्यापीठात बी.ए.च्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना संस्कृत विषय ‘स्पेशल’ला घेतला होता. या परीक्षेत ते विद्यापीठात प्रथम आले. एम. ए. च्या परीक्षेतही त्यांनी संस्कृत आणि मराठी या विषयांत स्वतंत्ररीत्या प्रावीण्य मिळवले. संस्कृत आवडीचा विषय असल्याने ‘चार्वाक दर्शनाचा चिकित्सक अभ्यास’ या विषयात संशोधन करून त्यांनी पीएच.डी. ही संपादन केली. शिवाजी विद्यापीठाच्या संस्कृत अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, वाङ्मय विद्याशाखेचे अधिष्ठाता या नात्याने डॉ. साळुंखे यांनी संस्कृत आणि मराठी भाषेच्या अध्यापनाच्या क्षेत्रात बत्तीस वर्षे केलेली उल्लेखनीय कामगिरी जेवढी महत्त्वाची तेवढीच, कदाचित काकणभर सरस असलेली त्यांची ग्रंथसंपदा आहे. महाराष्ट्राला पहिल्यापासूनच नवनव्या विचारांचे आकर्षण राहिलेले आहे.

    वैचारिक प्रबोधनाच्या क्षेत्रात महाराष्ट्र सतत आघाडीवर राहिला. संत तुकाराम, संत चोखामेळा, संत सावतामाळी यांच्यासारख्या आधुनिकतेला स्पर्श करणाऱ्या विचारवंत संतपरंपरेनंतर महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. आंबेडकर अशी एक वैचारिक परंपरा महाराष्ट्रात निर्माण झाली आणि तिच्यावर पालनपोषण झालेले अनेक विचारवंत त्या विचारांमध्ये स्वत:ची भर घालून नवा सिद्धान्त मांडण्याचा प्रयत्न करत असतात. डॉ. साळुंखे यांचे या क्षेत्रातील कार्य अत्यंत मौलिक स्वरूपाचे आहे. समाजाला विचारप्रवृत्त करून योग्य त्या मार्गापर्यंत नेण्यासाठी सातत्याने समाजाचा आणि त्यातील आडव्या-उभ्या धाग्यांच्या विणीचा अभ्यास करणाऱ्या मोजक्या विचारवंतांमध्ये डॉ. साळुंखे यांचे नाव यासाठीच घ्यावे लागते.

    ‘गुलामांचा आणि गुलाम करणाऱ्यांचा धर्म’, ‘सर्वोत्तम भूमिपुत्र- गौतम बुद्ध’, ‘बळीवंश’, ‘तुळशीचे लग्न : एक समीक्षा’, ‘विद्रोही तुकाराम : समीक्षेची समीक्षा’, ‘आस्तिकशिरोमणी चार्वाक’, ‘धर्म की धर्मापलीकडे’, ‘म. फुले आणि धर्म’, ‘मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती’ अशी त्यांच्या ग्रंथांची शीर्षके जरी पाहिली, तरीही त्यांच्या वैचारिक क्षेत्रातील विस्तृत कामगिरीचा अंदाज येतो. तीसहून अधिक संख्येने प्रकाशित झालेली त्यांची ग्रंथसंपदा म्हणजे महाराष्ट्राच्या सामाजिक घडामोडींच्या इतिहासाचा आढावाच आहे. आपण चळवळीतराहावे आणि त्यातून समाजप्रबोधन करावे, अशी ऊर्मी डॉ. साळुंखे यांनाही होणे स्वाभाविक होते.

    धर्माच्या ऐतिहासिक गरजेपेक्षा वेगळा विचार करण्याच्या क्षमतेमुळेच शिवधर्म या नवीन विचारांची उकल करण्याची आवश्यकता त्यांना भासली. प्रखर बुद्धिमत्ता आणि त्याची साक्षेपी मांडणी करणाऱ्या आ. ह. साळुंखे यांनी लिहिलेल्या ‘तुझ्यासह आणि तुझ्याविना’ या एका अप्रतिम ललित लेखनाचा उल्लेख अपरिहार्य आहे. पती-पत्नीच्या सहजीवनातील अतिशय तरल आणि भावुक नात्यांचा त्यांनी केलेला उलगडा म्हणजे त्यांच्या साहित्यिक उंचीचा एक आगळा नमुना आहे. डॉ. साळुंखे यांच्या वैचारिक प्रवासाला शुभेच्छा देत असतानाच त्यांच्या मौलिक कार्याची दखल सर्व सामाजिक प्रवाहांतील जाणत्यांनी घेणे तितकेच गरजेचे आहे.

  • रवींद्र सदाशिव भट

    नसती उठाठेव, गोविंदा गोपाळा, ते माझे घर या चित्रपटांचे लेखनही त्यांनी केले. मोगरा फुलला, ओठावरली गाणी, जाणता अजाणता हे त्यांचे कवितासंग्रह लोकप्रिय आहेत.