(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • किशोर कदम उर्फ कवी सौमित्र

    काही माणसांच्या लोकप्रियतेचे रहस्य त्यांच्या कामाइतकेच व्यक्तिमत्त्वातही असते. ते किशोर कदम यांच्यातपण आहे. किशोर कदम यांना महाराष्ट्राचा लाडका कवी आणि नट म्हणता येईल. संवेदनशील कलावंत म्हणून सुद्धा किशोर कदम यांनी रसिकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. ‘गारवा’ या अल्बमसाठी त्यांनी लिहिलेल्या कविता विशेष गाजल्या. ‘गारवा’ची लोकप्रियता हा एक विक्रम आहे आणि तो कोणीच मोडू शकलेला नाही.

    प्रेम आणि पाऊस या कवी सौमित्र यांच्या कवितेतील खास बाबी आहेत. त्याने गुलजार यांच्या अनेक कविता हिंदीतून मराठीत आणल्या. गुलजार यांनीदेखील त्याच्या कविता हिंदीत नेल्या. ते सध्या गुलजारांवरील ‘बात पश्मिनेकी’ हा कार्यक्रम सादर करतात. किशोर कदम यांचे नाव मराठी चित्रपटसृष्टीत ज्येष्ठतेच्या यादीत घेतले जात आहे. नटरंग, जोगवा, फॅण्ड्री अशा अनेक चित्रपटांत उत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांनी पुरस्कार मिळविले आहेत.

    अधिक माहितीसाठी खालील लिंक्स क्लिक करा.

    मराठी काव्यविश्वात मनसोक्त मुशाफिरी करणारे कवी सौमित्र (9-Nov-2016)

    कवी सौमित्र उर्फ किशोर कदम (15-Nov-2017)

    मराठी कवी सौमित्र उर्फ किशोर कदम (12-Jun-2019)

    कवी सौमित्र उर्फ किशोर कदम (9-Nov-2021)

    # Kadam, Kishor

  • गुरुनाथ विष्णू नाईक

    मराठीतील सुप्रसिद्ध रहस्यकथा लेखक.

    बाबुराव अर्नाळकरांप्रमाणेच त्यांनीही शेकडो रहस्यमय कादंबऱ्या लिहील्या. त्यांच्या रहस्यकथांनी एकेकाळी संपूर्ण पिढीला वेड लावले होते.

    दर महिन्याला ते सरासरी शंभर पानांच्या ७-८ कादंबऱ्या ते सहज लिहित. प्रत्येक कादंबरीच्या चार ते पाच हजार प्रति खपत असत.

    १९७० ते १९८२ या काळात त्यांनी ७२४ रहस्य व गूढकथा लिहिल्या. यात सैनिकी जीवनावरील २५० शिलेदार कादंबऱ्या आहेत.

    गोलंदाज ही काल्पनिक व्यक्तिरेखा तसेच कॅप्टन दीप, मेजर भोसले ही त्यांची पात्रे रहस्यकथा वाचणाऱ्या वाचकांच्या मनात घर करून बसली आहेत.

    # Gurunath Naik

  • वर्षा उसगांवकर

    वर्षा उसगांवकर ही मराठी आणि हिंदी चित्रपटांतील ग्लॅमरस अभिनेत्री आहे. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या वर्षाने केवळ त्यासाठी गोवा सोडून मुंबईत बस्तान बसवले.

    तिची दखल मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीने घेतली ती आचार्य अत्रे लिखित 'ब्रम्हचारी' या नाटकातील बोल्ड नायिकेमुळे.

    नाट्य, दूरचित्रवाणी इत्यादी माध्यमांमध्येही तिने काम केले आहे.

    वर्षा उसगावकरचे काही चित्रपट :

    तुझ्यावाचून करमेना
    गंमत जंमत
    खट्याळ सासू नाठाळ सून
    सगळीकडे बोंबाबोंब
    मज्जाच मज्जा
    रेशीमगाठी
    आत्मविश्वास
    हमाल दे धमाल
    कुठं कुठं शोधू मी तुला
    नवरा बायको
    अफलातून
    भुताचा भाऊ
    पसंत आहे मुलगी
    आमच्या सारखे आम्हीच
    मालमसाला
    उपकार दुधाचे शेजारी शेजारी
    पटली रे पटली
    घनचक्कर
    बाप रे बाप
    डोक्याला ताप नाही
    मुंबई ते मॉरिशस
    ऐकावं ते नवलच
    एक होता विदूषक
    शुभमंगल सावधान

    विकिपिडियावरील माहितीचे पान (इंग्रजी)

    ## Varsha Usgaonkar

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

  • श्रीकांत माने

    माने, श्रीकांत

    सार्वजनिक क्षेत्रामध्ये उच्च पदांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये सामाजिक भान आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार यांचे प्रमाण कमी होत चालले असताना आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या आणि प्रामाणिक सेवेच्या जोरावर कर्तृत्वाचा मोठा आलेख निर्माण करणारे वीजमंडळातील अभियंत्यांचे नेते श्रीकांत माने यांचे निधन संवेदनशील मनांना चटका लावून जाणारे आहे.

    त्यांच्या निधनाने वीजमंडळातील अभियंत्यांना सन्मानाचे स्थान मिळवून देणारे एक कुशल नेतृत्व केवळ काळाच्या पडद्याआड गेले असे नाही तर भ्रष्टाचाराने पोखरलेल्या राज्य वीज मंडळातील हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार निर्भीडपणे बाहेर काढणाऱ्या एका समर्पित अभियंत्याला देश मुकला आहे. माने हे मूळचे महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमेवरील संकेश्वरचे. गुलबर्गा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्युत अभियांत्रिकी या शाखेत प्रथम श्रेणीमध्ये पदवी संपादन केल्यानंतर महाराष्ट्र राज्य वीजमंडळात १९७६ साली ते कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरीत रुजू झाले. सलग ३० वर्षांच्या कालावधीत त्यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता या पदापर्यंत झेप घेतली. या प्रवासात त्यांनी वीजमंडळाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि अभियंत्यांच्या संघटनांसाठी जे योगदान दिले, ते विसरता येणार नाही. ते जेव्हा वीजमंडळाच्या सेवेत दाखल झाले, तेव्हा मंडळाच्या अभियंत्यांचे साध्या सन्मानाच्या वागणुकीपासून ते वेतनश्रेणीपर्यंत अनेक प्रश्न प्रलंबित होते. मंडळातील सबऑर्डिनेट इंजिनीअर्स असोसिएशन या संघटनेला माने यांचे कुशल नेतृत्व मिळाले आणि मंडळाच्या इतिहासात १९८२ मध्ये न भूतो न भविष्यती अशा स्वरूपाचा २७ दिवसांचा संप झाला. कधी भूमिगत राहून तर कधी हजारो अभियंत्यांच्या मोर्चाचे नेतृत्व करीत माने यांनी लढा दिला, त्यामुळेच कदाचित पुढे वीजमंडळातील अभियंत्यांना सन्मानाचे दिवस पाहता आले. माने यांनी वीज मंडळातील सिंगल फेज या अव्यवहार्य प्रकल्पाविरुद्ध दिलेल्या लढय़ामुळे मंडळाला आपले धोरण बदलणे भाग पडले. त्याहीपेक्षा त्यांनी मंडळात खरेदी केल्या जाणाऱ्या कोटय़वधी रुपयांच्या ट्रान्सफॉर्मर्स, कपॅसिटर्स, केबल्स यांच्या दर्जाविषयी जो लढा दिला, त्याचे मोलही नाकारता येणार नाही. निकृष्ट दर्जाची यंत्रसामग्री पुरविणाऱ्या ठेकेदारांनी राज्य वीजमंडळात काही बगलबच्च्यांना हाताशी धरून मंडळाला हजारो कोटी रुपयांचा चुना लावण्याचा धंदा वर्षांनुवर्षे सुरू ठेवला होता, त्याला कुलूप लावण्याचे काम माने यांनी केले. एका ट्रान्सफॉर्मरची चाचणी घेऊन शेकडो निकृष्ट दर्जाचे ट्रान्सफॉर्मर मंडळात दाखल करून घेण्याचे एक मोठे रॅकेटच त्यांनी जिवाची तमा न बाळगता उघडकीस आणले. त्यांनी या प्रकरणातून अंग बाहेर काढावे यासाठी भल्या मोठय़ा कंपन्यांनी कोटय़वधी रुपये कोऱ्या चेकद्वारे त्यांना देऊ केले. पण या नि:स्वार्थी अभियंत्याने त्याला लाथ मारून सर्वसामान्यांशी असणाऱ्या आपल्या निष्ठेला अधिक प्राधान्य दिले. या कार्याबद्दल त्यांच्या गळ्यात राष्ट्रीय सन्मान पडणे आवश्यक होते. तो मिळाला नसला तरी पुढे मंडळाला उपकरणांच्या दर्जानिश्चितीसाठी आपली पद्धत बदलावी लागली, ही मोठी देणगी त्यांनी सर्वसामान्यांना दिली आहे.

  • ज्योतिराव गोविंदराव फुले(ज्योतिबा फुले)

    हे मराठी, भारतीय समाजसुधारक होते.

  • प्रियंवदा म्हडाळकर

    मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्ससाठी राष्ट्रीय पातळीवर पहिल्यांदाच झालेल्या 'सीमॅट' या परीक्षेत व्हीजेटीआयच्या प्रियंवदा म्हडाळकरने मुलींमध्ये पहिला नंबर मिळवत बाजी मारली.

    दहावीमध्ये शाळेतून पहिली...बारावीला कॉलेजमधून तिसरी...इंजिनीअरिंगला व्हीजेटीआय कॉलेजमधून चारही वर्षं पहिल्या पाचात आणि आता सीमॅट (कॉमन मॅनेजमेंट अॅडमिशन टेस्ट) या राष्ट्रीय परीक्षेत देशभरातून मुलींमध्ये पहिली येण्याचा घसघशीत मान तिने मिळवला. व्हीजेटीआय कॉलेजमध्ये शिकणार्‍या प्रियंवदा म्हडाळकर या विद्यार्थीनीने मिळवलेलं हे सुयश आहे.

    सीमॅटच्या ४०० मार्कांच्या या परीक्षेत २८८ मार्क मिळवत प्रियंवदाने बाजी मारली. मुलींमध्ये पहिली आलेली प्रियंवदा देशातून ४३ व्या क्रमांकावर आहे. 'फेब्रुवारीमध्ये झालेल्या या परीक्षेसाठी मी गेल्या वर्षी मे महिन्यापासूनच तयारीला लागले होते. आयआयएमसाठी कॅटची परीक्षासुद्धा दिली होती. यानंतर आयआयएम-कोझीकोडेमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. सीमॅटची परीक्षा मी एक ऑप्शन म्हणून दिली होती,' असं प्रियंवदा सांगते. इंजिनीअरिंगनंतर आयआयएममधून एमबीए आणि त्यानंतर आयएएस अधिकारी बनण्याची तिची इच्छा आहे. 'दोन वर्षं जॉब करून त्यानंतर पुन्हा एकदा कॅटची परीक्षा देऊन आयआयएममध्ये अॅडमिशन मिळवायची प्रयत्न मी करणार आहे. आयएएस अधिकारी बनून देशासाठी काम करत विकासामध्ये हातभार लावण्याचा माझा निर्धार आहे,' असं ती आपण कमावलेल्या यशाबद्दल आणि भविष्यातल्या वाटचालीबद्दल बोलताना सांगते.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


  • जगन्नाथ रघुनाथ आजगावकर

    महाराष्ट्र कविचरित्रमाला” ही ३००० पृष्ठांची, ११ पुस्तकांची माला सिद्ध करणारे जगन्नाथ आजगावकर यांचा जन्म १६ ऑगस्ट १८७९ रोजी झाला.

    'कवन-कुतूहल' (पद्यरचना), “प्रणय विकसन”, “प्रणयानंद” ही नाटके आणि “मुकुंदराजाचा सार्थ-परमाकृत” हा संपादित ग्रंथ, तसेच काही बाल-पुस्तके त्यांनी लिहिली.

    Jagannath Raghunath Ajgaonkar

  • डॉ. श्रीराम लागू

    अभिनेता हा चितनशील विचारवंत असला पाहिजे हे शंभू मित्रा यांचे मत डॉ. श्रीराम लागू यांना तंतोतंत लागू पडते. १६ नोव्हेंबर १९२७ ला सातारा येथे त्यांचा जन्म झाला. एम. बी. बी. एस. झाल्यावर वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. परंतु शालेय जीवनापासून त्यांचा नाटकाकडे ओढा होता.

  • सदाशिव आत्माराम जोगळेकर

    संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात त्यांनी लिहिलेला ‘संयुक्त महाराष्ट्र — महागुजरात’ हा ग्रंथ त्या दोन राज्यांच्या जडण-घडणीचा अद्ययावत ज्ञानकोश समजावयास हरकत नाही. ‘अहल्या आणि इतर कथा’ हा त्यांचा लघुकथा संग्रह आहे.

  • श्रिया नितीन विद्वांस

    ठाण्यातील युवा धावपटू म्हणून जिनं आपली ओळख प्राप्त केली आणि ठाण्याचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात उच्च केलं ती म्हणजे श्रिया विद्वांस!