मराठी साहित्यविश्वामधील सर्वात प्रसिध्द व प्रथितयश असलेल्या मनोरमा प्रकाशन या संस्थेचे अनिल फडके हे संस्थापक आहेत.
पुस्तकातील आकर्षक व रेखीव मांडणी, लक्षवेधक मुख व मलपृष्ठे, व सुबक अंतरंग या ठळक वैशिष्ठयांनी नटलेली त्यांची पुस्तके ही नेत्रसुखदपणाबातीत निश्चितच वेगळ्या स्वरुपाची सगतात. उत्तम उठाव होणारी पुस्तके प्रसिध्द करणे हा अनिल फडके यांचा केवळ व्यवसाय नसून, त्यांचे निश्चल साहित्यप्रेम तसंच निष्ठा या गोष्टी आहेत. जहिराती व मोठ-मोठे प्रकाशन समारंभ या नव्या विक्रीकौशल्यांवर त्यांचा विश्वास नसल्याने अत्यंत साधेपणाने त्यांची पुस्तके प्रकाशित होतात.
लेखकांना पृष्ठसंख्येच्या हिशोबाने तात्काळ मानधन देणे, आणि स्वतःच्या टेम्पोमधून खेड्यापर्यंत मोठया प्रमाणावर पुस्तकांचे वितरण करणे ही त्यांच्या कार्यपध्दतीमधील विलोभनीय पैलू आहेत.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
ज्येष्ठ मराठी पत्रकार. सध्या लोकमत वृत्तपत्र समूहाचे समूह संपादक आहेत.
पानिपत या कादंबरीच्या माध्यमातून आतापर्यंत उपेक्षित राहिलेल्या व कायम टीकेच्या केंद्रस्थानी असलेल्या सदाशिवराव भाऊ पेशवे यांच्यावरील अन्याय ऐतिहासिक सत्याद्वारे दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराजांची प्रतिमा आजपर्यंत वेगळी होती.
बोबडे बोल हा एकमेव गुण असुनही केवळ त्यावर अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपट करणारे मधू आपटे हे एकमेव कलावंत असतील. मधुकर शंकर आपटे हे मधू आपटे यांचे पुर्ण नाव.
कादंबर्या, नाटके, कथा आदी लिहून पुढे समीक्षेत लौकिक मिळवणारे संपादक व समीक्षक विष्णू बापूजी आंबेकर
यतिन टिपणीस गेली २३ वर्षांपासून ठाणे जिल्हा टेबलटेनिस असोसिएशनचे सचिव म्हणून कार्यभाग सांभाळत आहेत. त्याचप्रमाणे १२ वर्षांपासून महाराष्ट्र टेबलटेनिस असोसिएशनचे सह-सचिव म्हणून ते कार्यरत आहेत. भारतीय टेबलटेनिस फेडरेशनच्या कार्यकारी समितीचे ते सदस्य आहेत.
मराठी मध्ये होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमांत भाऊ असायलाच पाहिजे तर कॉमेडी पूर्णत्वाला गेल्यासारखी वाटतें आणि म्हणून होणाऱ्या प्रत्येक अवार्ड शो मध्ये भाऊ च्या बतावण्या ऐकुन प्रेक्षक ही पोट धरून हसताना आपल्याला दिसतात.
मिरजकर, युसूफ
भारतीय वाद्यांच्या निर्मितीमागील विज्ञान समजून घेऊन त्यात आपला जीव ओतणारे कारागीर ते वाद्य वाजविणाऱ्यांसाठी फार महत्त्वाचे असतात. पुण्याचे युसूफभाई मिरजकर हे अशांपैकी एक होते. त्यांच्या अपघाती निधनाने त्यांनी तयार केलेल्या वाद्यांवर आनंद निर्माण करणारे अनेक कलावंत आणि रसिक दु:खी होणे स्वाभाविक आहे. पंडित भीमसेन जोशी यांच्यापासून ते रईस खाँ यांच्यापर्यंत अनेक ज्येष्ठ कलावंत युसूफभाईंनी तयार केलेल्या वाद्यांवर फिदा असत.
वाद्यनिर्मिती ही जरी आनंद निर्माण करण्याचे साधन असले, तरीही त्यामागे विज्ञानाची पक्की बैठक असते. सतार, सरोद, विचित्र वीणा, व्हायोलिन, तबला, हार्मोनियम अशा वाद्यांमधील विज्ञानाचे सार लक्षात आल्याशिवाय त्या वाद्यांची निर्मिती अशक्य असते. त्यासाठी विज्ञान शिकावे लागत नाही, तर त्या विज्ञानाचा उपयोग समजून घ्यावा लागतो. सुमारे २०० वर्षांपूर्वी मिरजेत आलेल्या वाद्यनिर्मितीकारांनी भारतीय संगीतात आपण अपरिहार्य असल्याचे सिद्ध केले आहे. युसूफभाई हे अशा वाद्यनिर्मितीकारांच्या ३६ व्या पिढीचे प्रतिनिधी. भाईबंद मिरजेत राहिले आणि युसूफभाईंचे वाडवडील पुण्यात आले. पुण्याच्या लक्ष्मी रस्त्यावर त्यांनी आपले दुकान थाटले आणि मग तिथे अनेक ज्येष्ठ कलावंतांचा राबता सुरू झाला. एखादा पदार्थ तयार करताना त्या माऊलीच्या ‘हाताची चव’ त्यात सहजपणे विरघळते, असा अनुभव आपल्या सगळय़ांना येतो. पुस्तकात वाचून पदार्थ तयार करण्याचा सोस असणाऱ्यांना ‘काहीतरी कमी’ असल्याचे जाणवत राहते. वाद्यांच्या बाबतीत तसेच घडते. त्या वाद्याच्या जडणघडणीमागे असणाऱ्या हाताची कमाल ते वाद्य बोलायला लागल्यावर लक्षात येते. युसूफभाईंचा हात प्रत्येक वाद्यावर ज्या मायेने फिरत असे, ते प्रेमच त्यांच्या वाद्याला सजीव करत असे. लाकडावर ताणून बसविलेल्या तारांचा झंकार होण्यासाठी जवारीची गरज असते. जवारी हा भारतीय संगीतातील एक वैज्ञानिक असला तरीही मनाला जाणवणारा चमत्कार आहे. ही जवारी काढणे ही मोठी कुशलतेची गोष्ट असते. प्रत्येकाला ती जमतेच असे नाही. युसूफभाई मात्र जवारी काढण्यात पटाईत होते. वाद्य तयार करणाऱ्याला त्यातून निर्माण होणाऱ्या संगीताची मोठी जाण असावी लागते. युसूफ मिरजकर हे त्या अर्थाने वादक नसले, तरीही त्यांच्या तंतुवाद्यांवरची हुकमत अफाट होती. त्यांच्या हाती वाद्य आले, की ते त्याच्यावर ज्या आत्मीयतेने ‘उपचार’ करायचे, की त्या वाद्यानेही सजीव होऊन त्यांचे आभार मानावेत! पुण्याच्या मानाच्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवात येणाऱ्या सगळय़ा दिग्गज कलावंतांना युसूफभाई तिथे आहेत, याचाच आधार असायचा. आपली वाद्ये सुस्थितीत ठेवून ती संगीतानुकूल ठेवण्यात त्यांचा हातखंडा होता. वादक आणि संगीतकार म्हणूनच या पडद्यामागील खऱ्या कलावंताच्या प्रेमात असत. आयुष्यभर संगीताची खरी सेवा करणारा हा एक वाद्यनिर्मिती करणारा कलावंतच होता. रस्त्यावरील अपघातात त्यांचा जागीच मृत्यू होणे ही जशी धक्कादायक बाब आहे, तशीच मनाला चटका लावून जाणारी घटना आहे.
उत्तम व नैसर्गिक अभिनय क्षमता, निःपक्षपाती समिक्षा, कथा, व समाजकल्याण अशा विविध गुणांचा प्रभावी मिलाफ असणारे व आयुष्यभर अशा निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये सारख्याच तन्मयतेने वावरणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे लाडकोजीराव आयरे ! खेडयातील संस्कृती, रीतिरिवाज, रूढींशी त्यांचं जीवन निगडित असल्यामुळे, खेडयातील पार्श्वभूमी त्यांनी आपल्या नाटकांमधून अत्यंत कल्पकतेने उभी केली. समाजाच्या दृष्टीने ज्वलंत व खळबळजनक विषयावर त्यांनी १८ नाटके लिहून कित्येक सामाजिक समस्यांना व अन्यायाला वाचा फोडली.
महाराष्ट्र राज्य सरकारचा साहित्य लेखन स्पर्धेत उत्कृष्ट नाटयलेखनाचा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला, तसेच अखिल भारतीय नाटय परिषदेने श्रमजीवी वर्गाचे रंगभूमीवरील पहिले यशस्वी नाटककार म्हणून त्यांचा गौरव केला गेला होता .
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
कोल्हटकर, वासुदेव पुरुषोत्तम - 0034
Birth - 21 जून १९२२
१९२२> “ग्रंथालयीन सूचिलेखन”, “ग्रंथालयीन वर्गीकरण”, “ग्रंथपालनाचे आप्त” (व्यक्तिचित्रे), “मराठी ललित वाङमयाचे वर्गीकरण” आदी पुस्तके लिहिणारे/भाषांतरित करणारे ग्रंथालय चळवळीचे धडाडीचे कायकर्ते वासुदेव पुरुषोत्तम कोल्हटकर यांचा जन्म.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कोल्हटकर, वासुदेव पुरुषोत्तम - 0467
Death - ०९ सप्टेंबर १९७८
१९७८> मराठीत ग्रंथालयशास्त्रासारख्या किचकट विषयावर व्यासंगपूर्ण लेखन करणारे वासुदेव पुरुषोत्तम कोल्हटकर यांचे निधन. “ग्रंथालयांची व्यवस्था”, “ग्रंथवर्गीकरणाची कोलन पद्धत” तसेच “ग्रंथपालाचे आप्त” ही त्यांची पुस्तके.
Copyright © 2025 | Marathisrushti