ब्रोकरेज फर्म्स' राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावतात आणि आजकालच्या बिझनेस युगात सर्वांनाच त्यांची गरज असते. 'ब्रोकरेज बिझनेस' हा सचोटीने, कायद्याच्या चौकटीत राहून चोखपणे करता येतो हे जाणणार्या लोकांची संख्या मात्र कमीच असेल. आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यापारातील एक आघाडीचा मालवाहतूक व्यावसायिक कंपनीसमूह म्हणून ओळखल्या जाणार्या, मुंबईच्या आणि मराठी मालक असलेल्या 'एटीसी ग्रुप'चे व्यवस्थापकीय संचालक शंतनू भडकमकर यांची 'इंन्टरनॅशनल फेडरेशन ऑफ कस्टम्स ब्रोकर्स असोसिएशन' ('आयएफसीबीए') या संघटनेच्या अध्यक्षपदी झालेली निवड ही सर्व मराठी माणसांना अभिमानास्पद वाटेल यात शंका नाही.
मुंबई विद्यापीठाची 'बी.एस्सी.' पदवी मिळविल्यानंतर भडकमकरांनी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेतील 'हार्वर्ड बिझनेस स्कूल'ची (बोस्टन) 'ओनर्स प्रेसिडेन्ट्स मॅनेजमेन्ट', 'रूल नाइन' (कस्टम्स एक्झॅमिशन क्वॉलिफाइड), 'फेडरेशन ऑफ इन्टरनॅशनल फ्रेट फॉरवर्डर्स असोसिएशन' या परीक्षा उतीर्ण केल्या. वडील श्रीराम मोरश्वर भडकमकर यांनी १९५७ साली मुंबईत स्थापन केलेल्या 'इन्टरनॅशनल फ्रेट फॉरवर्डिंग' व्यवसायाची सूत्रे शंतनू यांनी १९८१ साली हाती घेतली.
आजमितीला १० कंपन्यांचा विस्तार असलेला 'एटीसी ग्रुप' देशातील एक प्रमुख 'फुल सर्व्हिस इन्टरनॅशनल फ्रेट फॉरवर्डर' म्हणून ओळखला जातो. 'डोअर टू डोअर इन्टरनॅशनल लॉजिस्टिक्स'मध्ये 'एटीसी'चे स्पेशलायझेशन आहे. शंतनू भडकमकर यांनी 'इन्टरनॅशनल फेडरेशन ऑफ कस्टम ब्रोकर्स असोसिएशन'चे मॅनेजिंग डायरेक्टर, 'काऊन्सिल ऑफ सप्लाय चेन मॅनेजमेन्ट प्रोफेशनल्स'च्या भारतीय शाखेचे अध्यक्षपद, 'फेडरेशन ऑफ फ्रेट फॉरवर्डर्स असोसिएशन्स इन इंडिया'चे अध्यक्षपद, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीचे उपाध्यक्षपद, 'असोसिएशन ऑफ मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्स इन इंडिया'चे उपाध्यक्षपद आणि 'चायना इन्टरनॅशनल लॉजिस्टिक्स प्रोफेशनल नेटवर्क'चे उपाध्यक्षपद अशा विविध जबाबदार्या चोखपणे पार पाडल्या आहेत व पाडत आहेत.
'एटीसी ग्रुप'च्या व्यवसायाचा व्याप देशभरातील १५ शहरांतील २० कार्यालयांद्वारे सांभाळला जात असून, युनायटेड स्टेट्समध्ये एक 'ओव्हरसीज ऑफिस' कार्यरत आहे. 'मराठी माणूस व्यवसाय, उद्योगात मागे असतो, त्याला बिझनेस कळत नाही' असे म्हणणे आता इतिहासजमा झाले.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
नृत्याचार्य राजकुमार केतकर हे ज्येष्ठ कथ्थक नृत्यकार आणि पुरुषप्रधान कथ्थक नर्तक प्रचारक आहेत. राष्ट्रीय संगीत नाट्य केंद्र (एन.सी.पी.ए.) चे प्रचारक.
नुकताच संत सोपानदेवांच्या अभंगांचा त्यांनी संगीतबद्ध केलेला कार्यक्रम स्मरणीय होता. त्यांना ‘छोटा गंधर्व गुणगौरव’ पुरस्कार प्राप्त झाला होता.
बोकील, शांताराम
संपादक केबिनबद्ध नसावा, त्याने दीनदलितांच्या, भूमिपुत्रांच्या, पीडितांच्या हितासाठी आणि धर्मनिरपेक्षतेचा आधार घेऊन भाषा-धर्म-जाती-प्रदेशवादाच्या नावाखाली राजकारणाला विरोध करण्यासाठी कृतिशील असले पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेणारा कार्यकर्ता-पत्रकार, शांताराम बोकील यांच्या निधनाने काळाच्या पडद्याआड गेला आहे. सातारा जिल्ह्य़ातील कोरेगाव हे गोष्टीवेल्हाळ शांताराम बोकील यांचे जन्मगाव.
विद्यार्थीदशेपासून बोकील शेती आणि शेतीच्या प्रश्नाकडे ओढले गेले. त्यांच्यावर पं. नेहरू आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने प्रेरित होऊन ते काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते झाले. काँग्रेसी कार्यकर्ता होण्याचे समर्थनही करण्याचे धाडस बोकील यांनी पत्रकार झाल्यावर जाहीरपणे केले. या कार्यकर्ता होण्याने शेतीचे प्रश्न समजून घेताना त्यामागचे राजकीय भान बोकील यांना आले. सातारा जिल्ह्य़ातील म्हसवड या गावी सहा दशकांपूर्वी शेतकरी कुळाचा हक्क डावलला जाण्याविरुद्ध मोठे आंदोलन उभे झाले, त्यात क्रांतिसिंह नाना पाटील आणि माजी आमदार तुषार पवार यांच्यासोबत शांताराम बोकीलही आघाडीवर होते. या यशस्वी आंदोलनानंतर बोकील पत्रकारितेकडे वळले आणि तेथेच रमले. ‘पुढारी’ या दैनिकातून ग. गो. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची १९६० साली सुरू झालेली पत्रकारिता २००१ पर्यंत अखंड सुरू राहिली. या काळात शांताराम बोकील यांनी गोव्यात ‘नवप्रभा’, विदर्भात ‘नागपूर पत्रिका’, ‘लोकमत’ आणि ‘जनवाद’, औरंगाबाद आणि नांदेडच्या ‘लोकपत्र’ तसेच, कोल्हापूरच्या ‘पुढारी’ या दैनिकांचे कार्यकारी संपादकपद सांभाळत असताना महाराष्ट्रातील कृषी जगताचे साक्षेपी भाष्यकार-संपादक अशी ख्याती संपादन केली. उपसंपादक आणि सहाय्यक संपादक म्हणून नोकरी करताना आणि कार्यकारी संपादक म्हणून वृत्तपत्राचे नेतृत्व करताना शांताराम बोकील यांनी, पं. नेहरू तसेच यशवंतराव चव्हाण यांच्यावरील निष्ठा आणि शेतकऱ्यांशी असलेल्या बांधिलकीशी प्रतारणा केली नाही. या तीन मुद्यांवर मतभेदाचे प्रसंग उद्भवले तेव्हा नोकरी सोडण्याचा बाणेदारपणा बोकील यांनी दाखवला. संपादक म्हणून वैपुल्याने वावरताना राज्याच्या ज्या भागात गेले तेथील अभ्यास हे त्यांचे अविभाज्य अंग झाले. ते एक छान शिक्षकही होते. त्यांची शिकवण्याची पद्धत मात्र कठोर होती. सहकाऱ्यांच्या भाषाविषयक आणि अन्य चुका दाखवताना त्यांची जीभ दांडपट्टय़ाच्या वेगाने वार करत असे. मात्र त्यात व्यक्तिगत विखार नसे; बोकील क्षणार्धात समजदार शिक्षकाच्या भूमिकेत शिरत आणि भाषा, व्याकरण, शैली, एखाद्या प्रतिपाद्य विषयावरील त्यांच्याकडील माहितीचा खजिना रिता करत. पत्रकारिता समरसून शिकवण्याच्या त्यांच्या या तळमळीची आठवण त्यांच्यासोबत काम केलेले अनेक सहकारी आजही काढतात. पानाच्या टपरीपासून ते बडय़ा राजकीय धेंडांपर्यंत बोकीलांचा वावर ‘डॉमिनेटिंग’ शैलीत पण सहज असे. अशा बडय़ा धेंडाने बोलताना एखादा तपशील चुकीचा दिला तर त्याला फाडकन सुनावण्यास बोकील कचरत नसत. शेती आणि शेतकरी तसेच, धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि मुस्लिमद्वेषाचे धोकादायक वळणावर पोहोचलेले राजकारण हे बोकील यांच्या लेखनाचे, वक्तृत्वाचे मुख्य विषय असत. या विषयांवर त्यांची शैली तडजोडवादी कधीच नव्हती. त्यामुळेच पत्रकार म्हणून त्यांना स्थैर्य प्राप्त झाले नाही आणि आर्थिकदृष्टय़ाही संपन्नता दिली नाही, याबद्दल काहीशी कटुता शांताराम बोकील यांना होती. पण त्यापेक्षा जास्त खंत महाराष्ट्राने त्यांचे प्रतिपादन नीट ऐकले नाही, याची होती आणि त्यापेक्षा किती तरी जास्त पट वैषम्य या देशाने नेहरूवादाची कास सोडल्याचे होते. बोकील सर्वधर्मसहिष्णू धर्मनिरपेक्षतेचे पुरस्कर्ते होते. ही धर्मनिरपेक्षता म्हणजे जात निरपेक्षताही आहे आणि नेहरूवाद तसेच यशवंतरावांचे विचार हाच त्याचा आधार आहे, अशी त्यांची पक्की धारणा होती. जातीरहित धर्मनिरपेक्षतेचे स्वप्न साकार होण्याचे समाधान राजकारण्यांनी बोकील यांना लाभू दिले नाही ते नाहीच!
‘मसीहा’ या त्यांच्या कादंबरीवरून त्याच नावाचे नाटकही उदय कला केंद्राने रंगभूमीवर आणले होते. आय कन्फेस, रोप ट्रिक यांसारख्या १३ एकांकिका त्यांनी लिहिल्या.
“हुसेन टू विजय कुलकर्णी” या चित्र मालिकेच्या माध्यमातून औरंगाबादचे चित्रकार विजय कुलकर्णी यांच्या चित्रांची मुंबई, दिल्ली, कोलकत्ता, गोवा, चेननई, कोचीन शहरांत प्रदर्शने भरली. अमूर्त चित्रशैलीने सुरुवात करणारे कुलकर्णी यांनी वळणावर मात्र अजिंठा चित्रशैलीचा अभ्यास सुरु केला व पुढील ३५ वर्षे याच चित्रशैलीने त्यांची ओळख बनविली.
अजिंठा स्कूल
शिक्षण व बाल मानसशास्त्र या विषयांवर मराठीत लिहिणारे भास्कर धोंडो कर्वे यांचा जन्म ७ नोव्हेंबर १९०३ रोजी झाला.
बालपणाचे रहस्य, बाल अवलोक, भाषा व्यवसाय, अध्यापन व मानसशास्त्र, शिक्षणविषयक नवे विचार ही त्यांची पुस्तके होत.
महर्षी अण्णासाहेब कर्व्यांचे ते द्वितीय पुत्र.
## Bhaskar Dhondo Karve
मंगळवेढे येथील शामा नायकिणीचे पोटी हिचा जन्म झाला, सौंदर्य व गोड गळा यामुळे आपला व्यवसाय मुलगी आणखी पुढे नेईल असे तिच्या आईला वाटे. पण कान्होपात्राचा ओढा ईश्वरभक्तीकडे होता. विठ्ठल भजनात ती रंगून जात असे. तिने रचलेले अभंग प्रसिद्ध आहेत. कान्होपात्राच्या सौंदर्यामुळे तिच्यावर संकटे आली पण दरवेळी विठ्ठलकृपेने ती बचावली.
भारतातील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा “२जी स्पेक्ट्रम” घोटाळ्याचा खटला दिल्लीच्या विशेष न्यायालयात सुरु झाला, त्यात केंद्रिय गुप्तचर विभाग (सी.बीआय.) आणि अंमलबजावणी संचालनालय (ई.डी.) या दोन तपासणी यंत्रणांच्या वतीने अभियोग चालवण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाने उदय लळीत यांच्यावर टाकली आहे.
विशाल रामचंद्र हरियाण यांचा जन्म 3 मार्च 1989 मध्ये झाला. मुळचे ते मराठी नसले तरी मराठी मातीत वाढल्यामुळे, मराठी सवंगडयांबरोबर मिसळल्यामुळे, व मराठी संस्कृतीत रूजल्यामुळे त्यांची नाळ याच भाषेच्या गर्भात अगदी खोलवर गेलेली होती. शाळेत असल्यापासुनच मराठीच्या संवर्धनासाठी व संरक्षणासाठी काहीतरी भरीव व लक्षणीय करण्याची त्यांच्या मनी प्रचंड हुरहुर होती.
Copyright © 2025 | Marathisrushti