(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • विठ्ठल रामजी

    ‘ग्रामीण जनतेची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे आणि सर्व चळवळींना नैतिक अधिष्ठान असले पाहिजे’ असे उदात्त विचार आणि तपस्वी जीवनाचा पुरस्कार करणारे विठ्ठल रामजी तथा महर्षी अण्णासाहेब शिदे. जमखिडी येथील एका धार्मिक कुटुंबात १८७३ ला अण्णासाहेब शिद्यांचा जन्म झाला.

  • संजीव अभ्यंकर

    स्वराचे भान येणे ही जी गोष्ट आहे, ती गुरूच्या समोर बसल्याशिवाय कळणेच शक्य नसते. संजीव अभ्यंकर यांना त्यांच्या गुरूकडून मिळालेली तालीम ही अशी होती. संगीताच्या क्षेत्रात कोणताही शिष्य फक्त गुरूचेच गाणे गात राहिला, तर त्याला फारसे महत्त्व मिळत नाही.

  • दिग्दर्शक दत्ता माने

    दत्ता माने यांनी अभिनेता व मराठी दिग्दर्शक म्हणून काम केले. त्यांचा जन्म १९२२ रोजी झाला. त्यांनी आपल्या काळात १८ चित्रपट बनवले. काही नावे बाईसाहेब, मामा भाचे, कार्तिकी, कसे काय पाटील बरे आहे का?, पाटलाची सून.

    दत्ता माने यांचे २९ ऑक्टोबर १९८० रोजी निधन झाले.

    अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

    #DattaMane

  • अजित प्रधान

    अजित प्रधानांकडे प्रामुख्याने १९८०पर्यंतच्या हिंदी चित्रपट संगीताचा संग्रह आहे. शंकर-जयकिशन आणि ओ. पी. नय्यर या दोन संगीतकारांचं जवळजवळ सगळं कलेक्शन त्यांच्याकडे आहे. त्याशिवाय सी. रामचंद्र, एस. डी. बर्मन आणि त्या काळातल्या बहुतेक सगळ्या संगीतकारांच्या रेकॉर्ड्स त्यांच्या खजिन्यात आहेत.

  • आप्पा गोगटे

    आप्पासाहेबांनी मतदारसंघ टँकरमुक्त होण्यासाठी आपल्या कार्यकालात अपार मेहनत घेतली. शेतकर्‍यांची शेती-बागायती वाचवण्यासाठी आप्पासाहेबांनी अनेक बंधारे मंजूर करून घेतले. जुन्या किंवा आतापयर्ंत प्रचलित असणार्‍या देवगड मतदारसंघातील किनारपट्टी भागात गावोगावी आप्पांच्या कार्याची साक्ष देत हे बंधारे उभे आहेत.

  • चिंतामण द्वारकानाथ अर्थात सी डी देशमुख

    सी.डी. देशमुख हे मराठी अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी होते. ते भारतीय रिझर्व बँकेचे तिसरे आणि मूळ भारतीय वंशाचे पहिले गव्हर्नर होते

  • अच्युत बळवंत कोल्हटकर

    १९१५ साली त्यांनी काढलेल्या “संदेश” ने मराठी वृत्तपत्रांना आधुनिक रुप दिले. चरित्रपर नाटके (स्वामी विवेकानंद, ताई तेलीण, मस्तानी, चांदबीबी) हा नवा प्रकार त्यांनी हाताळला. 

  • पार्श्वगायिका आशा भोसले

    आपल्या मधाळ आवाजाने पाच दशकं रसिकांच्या हृदयावर राज्य करणार्‍या भारतातील आघाडीच्या पार्श्वगायिका म्हणून आशा भोसले यांचा लौकिक आहे. प्रदीर्घ काळ अनेकविध प्रकारची गीतं आपल्या सहज शैलीत गाऊन चिरतरुण, चतुरस्त्र गायिका म्हणूनही त्यांनी लोकप्रियता मिळवली.

  • भागोजी बाळूजी कीर

    दादरच्या जडणघडणीत, विशेषतः तिथल्या सामाजिक घडणीत काही मंडळींचा वाटा आहे. त्यांत एक भागोजी कीर हे आहेत. आज भागोजी कीर असते तर त्यांचा उल्लेख ‘मॅनेजमेंट गुरू’ असा झाला असता. त्यांची पुस्तकं निघाली असती. आयआयएममध्ये त्यांना लेक्चर देण्यासाठी पाचारण केलं गेलं असतं.

  • चित्तरंजन चिंतामणराव कोल्हटकर

    चित्तरंजन चिंतामणराव कोल्हटकर हे मराठी नाट्य-अभिनेते, चित्रपट अभिनेते होते.