(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • गजानन हरी तथा राजा नेने

    व्ही शांताराम यांनी १९४२ साली प्रभात फिल्म कंपनी सोडल्यावर दामले-फत्तेलाल यांचे सहकारी दिग्दर्शक राजा नेने यांनी रामशास्त्री चित्रपट हा हिंदी-मराठी दिग्दर्शित केला.

  • अॅड. रमाकांत ओवळेकर

    ठाण्यातील नावाजलेल्या वकिलांमध्ये ज्येष्ठ अॅड. रमाकांत ओवळेकर हे सर्वांना परिचित होते. त्यांना आदराने अनेक जण ‘अण्णा’ म्हणत. कोर्टात युक्तिवादासाठी उभे राहिले की प्रतिवादी वकिलांना आता ‘अण्णा’ काय गुगली टाकतील याबद्दल उत्सुकता असे

  • हरी नारायण आपटे

    हरी नारायण आपटे हे मराठी कादंबरीकार होते. मराठी कादंबरीचे जनक मानले जातात. १८ कादंबर्‍या लिहीणार्‍या आपटयांची ‘पण लक्षांत कोण घेतो?’ ही कादंबरी मराठी साहित्यात मानदंड समजली जाते.

  • किशोर श्रीधर नादावडेकर

    कोकणातील देवगड सारख्या निसर्गरम्य गावात व सध्या ठाण्यात वास्तव्यास असलेल्या चित्रकार किशोर नादावडेकर हे अनेक राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी आहेत. निसर्गचित्रे व व्यक्तीचित्रे यांची आवड असलेल्या श्री. किशोर नादावडेकर यांना चित्रकार वासुदेव कामत सर व विजय आचरेकर सर यांचे योग्य ते मार्गदर्शन मिळाले.

  • चंद्रशेखर शिवराम गोर्‍हे (कवी चंद्रशेखर)

    पंडिती काव्याचे एक श्रेष्ठ प्रतिनिधी, गंभीर, बोधपर आणि प्रौढ कविता करणारे कवी म्हणून चंद्रशेखर प्रसिद्ध होते.

  • विठ्ठल सायन्ना

    मुंबईच्या बांधकाम इतिहासामध्ये विठ्ठल सायन्ना यांचे नाव अत्यंत आदराने व गर्वाने घेतले जाते.

    ठाणे व मुंबईत विस्तीर्ण पसरलेल्या व वेगवेगळ्या आकारांनी, तसेच बांधकामाच्या शैलींनी नटलेल्या गगनचुंबी इमारतींचे, विस्तीर्ण जाळे विणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. मुंबई व ठाण्याची वास्तू घडण करणारे प्रसिध्द बांधकाम ठेकेदार अशी त्यांची संपुर्ण भारतामध्ये किर्ती पसरलेली होती. याला कारणेही तशीच आहेत. मुंबईच्या जन्मापासून तिच्या गळ्यामधील दुर्मिळ अलंकाराचे काम करणारे, गॉथिक वास्तुशास्त्राचा अद्वितीय नमुना असलेले, व संयुक्त राष्ट्र संघटनेकडून प्रसिध्द होणार्‍या वर्ल्ड हेरिटेज साईट्सच्या यादीमध्ये नोंद झालेले पूर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनस व आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस या रेल्वे स्थानकाचा काही भाग त्यांनी बांधला होता.

    याशिवाय मुंबईतील अनेक इमारती व पायाभूत सुविधांची बांधणी त्यांच्या हस्ते झाली. मुंबईतील जनरल पोस्ट ऑफिस, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ( हल्लीचे राजा छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय) , स्मॉल कॉसेस कोर्ट, व इन्स्टीटयूट ऑफ सायन्स या इमारतींच्या निर्मीतीची जबाबदारी अतिशय समर्थतेने त्यांनी पेलली होती. त्यांचे सुपुत्र नारायण सायना यांची गणतीदेखील मुंबईतल्या दर्जेदार व नामांकित इमारत कंत्राटदारांपैकी होते. त्यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून याच व्यवसायामध्ये उंच भरारी मारली.

    त्यांच्याच नावाने ठाणे येथे विठ्ठल सायन्ना मंदीर उभे आहे.

  • पद्मजा फेणाणी-जोगळेकर

    ध्येयनिष्ठा, कलाप्रेम, अथक परिश्रम करण्याची वृत्ती, जिद्द, अभ्यासूपणा, नम्रता, सामाजिक जाणीव, आई-वडील-भावंडे आणि गुरू यांच्यावरील प्रेम, निष्ठा, आदर आणि कृतज्ञता इत्यादी गुणांनी माणूस घडतो; मोठा होतो. पद्मजा फेणाणी यांच्या मध्ये हे सारे गुण आहेत.

  • ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे

    ढेरे यांच्या लेखनाचा प्रारंभ झाला तो साधारण १९४८ मध्ये, वयाच्या अठराव्या वर्षी कवितेतून. पुढे दोनच वर्षांत, १९५० मध्ये त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावरील पुस्तिका प्रकाशित केली.

  • विठ्ठल रामजी

    ‘ग्रामीण जनतेची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे आणि सर्व चळवळींना नैतिक अधिष्ठान असले पाहिजे’ असे उदात्त विचार आणि तपस्वी जीवनाचा पुरस्कार करणारे विठ्ठल रामजी तथा महर्षी अण्णासाहेब शिदे. जमखिडी येथील एका धार्मिक कुटुंबात १८७३ ला अण्णासाहेब शिद्यांचा जन्म झाला.

  • सूर्यकांत दाणेकर

    सुर्यकांत दाणेकर हे किर्ती प्रकाशन, या प्रसिध्द संस्थेचे संपादक म्हणून कार्यरत आहेत. नवोदित लेखक व कवींना आपल्या प्रतिभेचे अविष्कार रसिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी ही प्रकाशन संस्था नेहमी तत्पर असते. आजपर्यंत प्रख्यात लेखिका अनुराधा वैद्य, रेखा बैजल यासारख्या अनेक हौशी व अनुभवी लेखकांचे साहित्य त्यांनी आपल्या निखळ साहित्यप्रेमापोटी आग्रहाने प्रकाशित केले. व्यक्तिशः हिंडून फिरून आपल्या पुस्तकांचे वितरण करणार्‍या काही मोजक्या संपादकांपैकी ते त्यांचे नाव प्रथम घ्यायला हवे. साहित्य निवडण्यातील त्यांच्या चोखंदळपणामुळे त्यांनी आपल्या वाचकवर्गाला नेहमीच दर्जेदार वाड्मय प्रदान केले आहे.