राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वत:चा ठसा उमटवणारी सायली राणे ही ठाण्यातील सय्यद मोदी बॅडमिंटन अकादमीतील बॅडमिंटनपटू आहे.
“काळ” साप्ताहिकाचे संस्थापक, वा “काळ-कर्ते” ही निबंधकार, पत्रकार, साहित्यिक-समीक्षक, फर्डे वक्ते शिवराम महादेव परांजपे यांची ओळख.
नाटकात रंगभूषेला महत्त्वाचे स्थान मिळवून देणार्या ज्येष्ठ रंगभूषाकार प्रभाकर भावे यांचा महत्त्वाचा वाटा आहे. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या माध्यमातून तरुणाईमध्ये रंगभूषेविषयी जागृती करत त्यांनी रंगभाषा विकसित केली आहे.
रंगभाषाकार
ज्यांच्या नावाने पुण्याचा संगीत महोत्सव अवघ्या भारतात नव्हे तर अवघ्या जगभरात गाजतो आहे व त्या महोत्सवात आपल्या गायनाची गुरूंची व घराण्याची गायकी गायला मिळावी म्हणून काही नवीन कलाकार कसोशीने प्रयत्न व प्रयास करत असतात. तसेच काही जेष्ठ व श्रेष्ठ गायक आणि वादक नेहमी हजेरी लावत असतात व त्यांच्या गायन वादनाने मंत्रमुग्ध होण्यासाठी सगळेच कानसेन त्या महोत्सवाची आतूरतेने वाट बघत असतात असा सवाई गंधर्व महोत्सव जो दर वर्षी पुण्यात न चुकता होतो व ज्याच्यां नावाने होतो ते सवाई गंधर्व उर्फ रामचंद्र गणेश कुंदगोळकर.
भाभा अणू विज्ञान संस्थेत वैज्ञानिक अधिकारी म्हणून कार्यरत असणारे व निवृत्ती नंतरही स्वत:ला वैज्ञानिक क्षेत्रात झोकून देऊन ठाणे शहराचे नाव वैज्ञानिक क्षेत्रात उज्वल करणारे डॉ. प्रकाश रा
कदम, रवी
महाधिवक्ता या महत्वाच्या घटनात्मक पदाची जबाबदारी राज्य शासनाची उच्च न्यायालयात बाजू मांडणे एवढीच नसते. न्यायप्रक्रियेस साह्य, न्यायमित्र, कायदेशीर तरतुदी आणि सत्य बाजू न्यायालयासमोर परखडपणे सादर करणे, या भूमिका त्यांना पार पाडाव्या लागतात.
शासनाची धोरणे व निर्णयांची न्यायालयात पाठराखण करीत असताना महाधिवक्ता म्हणून सरकारला कायदेशीर सल्ला देण्याचीही जबाबदारी असते. महाधिवक्ता रवी कदम यांनी आपल्या सात वर्षांच्या कार्यकाळात अनेक अडचणींना तोंड देत अतिशय कसोशीने हे सारे निभावून नेले. मुंबई उच्च न्यायालयातील महाधिवक्ता हे पद एच. एम. सिरवई यांच्यासारख्या ज्येष्ठ व नामांकित घटनातज्ज्ञाने १९७४ मध्ये तब्बल १७ वर्षे भूषविले. त्यांच्यानंतर सर्वाधिक काळ या पदावर राहण्याचा सन्मान कदम यांना मिळाला. कदम प्रसिध्दीमाध्यमांपासून नेहमी दूरच राहिले. ते आपल्या वर्तणुकीने किंवा वक्तव्याने कधीही वादग्रस्त ठरले नाहीत. बेधडक विधाने करणे त्यांच्या स्वभावातच नाही. मुख्यमंत्री बदलल्यावर महाधिवक्त्याने राजीनामा देण्याची प्रथा आहे. पण कदम यांनी विलासराव देशमुख, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या तीन मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात काम केले. प्रथेनुसार त्यांनी राजीनामा दिला तरी नवीन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त करीत त्यांची जबाबदारी कायम ठेवली. त्यांनी या पदाचा कधीही राजकीय वापर होऊ दिला नाही. साधनशुचिता जपण्यासाठी त्यांनी शासकीय निवासस्थानही स्वीकारले नाही. कदम हे मुंबई विद्यापीठात १९८२ मध्ये एलएलबीला सर्वप्रथम आले होते. ट्रेडमार्क, पेटंट प्रकरणे हाताळण्यात त्यांचा लौकिक. गिरणजमिनींचा वाद, एन्रॉन, वनजमीन, डान्सबार बंदी, मुख्यमंत्र्यांविरुध्दची निवडणूक याचिका आदी प्रकरणांमध्ये त्यांनी शासनाची बाजू भक्कमपणे मांडली व निकाल शासनाच्या बाजूने लागले. बँकांच्या कर्जवसुलीच्या कायद्यासंदर्भातही (सिक्युरिटायझेशन अॅक्ट) त्यांनी काम केले. विधिमंडळाला हक्कभंग प्रकरणात सा केले. तब्बल ३० वर्षे मुंबई उच्च न्यायालयात वकिली केल्यावर आता सर्वोच्च न्यायालयात वकिली करण्याचा कदम यांचा मनोदय आहे.
(१८२८-१९३०)
सार्वजनिक सभेचे संस्थापक. न्यायमुर्ती रानडे यांचे सहकारी. विविध सामाजिक, स्वदेशी चळवळीमध्ये सहभाग. पुण्यातील सार्वजनिक जीवनातील एक उल्लेखनीय व्यक्तिमत्व. जातीयता निर्मूलनासंबंधी विचार निर्भीडपणे मांडले.
प्रा. डॉ. प्रकाश खांडगे हे लोकसाहित्याचे अभ्यासक, पत्रकार व लेखक आहेत. प्रा. प्रकाश खांडगे हे मुंबई विद्यापीठातील लोककला अकादमीचे समन्वयक आहेत.
यशवंत दिनकर फडके हे मराठी चरित्रलेखक, इतिहाससंशोधक होते.
मुंबई शहराच्या विकासाचा पाया रचणार्या त्याचबरोबर मुंबई शहराच्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय व्यवस्थापनाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणार्या जगन्नाथ नाना शंकरशेठ यांना आधुनिक मुंबईचा शिल्पकार मानण्यात आले आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti