चीनमधील नानजिंगमध्ये नुकत्याच झालेल्या आशियाई युवा क्रिडा स्पर्धेत नाशिकच्या अंजना ठमके हिने ८०० मीटरच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावले. नाशिकच्या आदिवासीबहुल गणेशगावातून आलेल्या अंजनाची ही धाव सोन्यासारखी लकाकती ठरली आहे.
अंजनाचा सुवर्णवेध
देव, अभिनय
जागतिकीकरणाच्या युगात जाहिरात क्षेत्राची व्याप्ती ही अमर्याद आणि तेवढीच खोलवर पसरलेली आहे. अर्थात या क्षेत्रामध्ये अनेक स्थित्यंतरे तसेच बदलही काळानुरूप होत गेले. नवनवीन संकल्पना त्यामधून उदयास आल्या. लोकजीवनाशी थेट संबंध येत असलेल्या या क्षेत्राचे आकर्षण आणि गोडी अभिनय देव या अवलियाकडे पहिल्यापासूनच होती. घर रमेश व सीमा देव यांचे, तेथे अभिनयाची सरस्वती वास करीत असली तरी त्यांच्या या ज्येष्ठ पुत्राचा कल जाहिरात क्षेत्राकडे होता.
वास्तुविशारदाचे शिक्षण घेताना याच शिक्षणातून अभिनय यांना वेगवेगळ्या जाहिरातींची संकल्पना सुचत गेली आणि याच ऊर्मीपोटी ते ओ अॅण्ड एम या प्रख्यात जाहिरात संस्थेत दाखल झाले. आयुष्याला वेगळे वळण देणाऱ्या अभिनय देव यांचा जाहिरात क्षेत्रातील प्रवास त्यानंतर बहरत गेला. काही काळ त्यांनी हायलाइट प्रॉडक्शन या जाहिरात कंपनीमध्येही दिग्दर्शक म्हणून काम केले. पण मनातील तो सुप्त दिग्दर्शक स्वस्थ बसू देत नव्हता. यामधूनच रमेश देव प्रॉडक्शन (आरडीपी) या जाहिरात संस्थेची निर्मिती झाली. तुम्ही जगाकडे कोणत्या दृष्टीने पाहता ती दृष्टी तुम्हाला जाहिरात सुचवून जाते असे अभिनय देव यांचे म्हणणे आहे आणि याची साक्ष पटते ती सर्फच्या ‘दाग अच्छे है’ या जाहिरातीमधील वाक्याने. कल्पकता आणि सृजनशीलतेच्या याच जोरावर अभिनय देव यांनी तब्बल ४५० जाहिरातींना आकार दिला. जाहिरातींमध्ये दिसणारे चेहरे लक्षात राहतात, पण त्यांचे दिग्दर्शक कुणाला माहीतही नसतात.. जाहिरातींच्या या अफाट विश्वामध्ये या दिग्दर्शकांच्या कर्तृत्वाची दखल ‘कान’ महोत्सवामध्ये खास विभागात घेतली जाते. (चित्रपटांचा कान येथे होणारा महोत्सव निराळा) जाहिरात क्षेत्रामधील ऑस्कर अशी ओळख असलेला प्रतिष्ठेचा ‘कान गोल्ड लायन’ (द बेस्ट डिरेक्टर- फिल्मक्राफ्ट) हा पुरस्कार अभिनय देव यांनी पटकावून आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये देशाची माान उंचावली. जगभरातील तब्बल १७०० जाहिरात दिग्दर्शकांमधून अभिनय देव यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. कल्पकता आणि सृजनशीलतेचा हा बहुमान असल्याची अभिनय देव यांची ही प्रतिक्रिया बरेचसे काही सांगून जाते.
सन २००३ (पॅरीस) व सन २००५ रोजी (चायना) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिनं सहभाग घेतला. सन २००५ रोजी तिने पाकिस्तान येथील दक्षिण आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले.
अरुण कोलटकर हे महाराष्ट्रातील बहुभाषिक कवी होते. त्यांनी मराठीबरोबरच हिंदी व इंग्लिश भाषेत कविता लिहिल्या आहेत.
अभिजीत झुंजारराव हे मराठी रंगभूमीवर गाजत असलेलं नाव आहे. तसा अभिजीत अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहेच पण तो एक उत्कृष्ट नाट्य दिग्दर्शकही आहे. अभिजीत रंगभूमी नेहमी वेगवेगळे पण तेवढेच कलात्मक प्रयोग करीत असतो.
साठच्या दशकात बॅ. नाथ पै यांच्या विचारांनी गुरूनाथ कुलकर्णी यांना झपाटले होते. त्यामुळे भारावून त्यांनी देवगड तालुक्यात काम सुरू केले. एलएल.बी.च्या शिक्षणासाठी मुंबईत आल्यानंतर साम्यवादी विचारांचे त्यांना आकर्षण वाटले. पण मार्क्सच्या पोथीवादापेक्षा विविध क्षेत्रांतील लोकांत काम करण्याचा त्यांचा पिंड होता.
ठाणे शहराचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी पुर्वीपासून येथे साहित्यिक, नाटयकर्मी, संगीतकार, शिक्षणतज्ञ, संशोधक, व इतर कलाप्रेमी रथी महारथींची रेलचेल आहे. या शहराचा सांस्कृतिक व साहित्यिक ज्ञानबिंदू उंचवण्यात जुन्या काळातील म्हणजे साधारण १९ व्या शतकाच्या पुर्वार्धातील, प्रसिध्द कवी भास्कर दामोदर पाळंदे यांचं महत्त्वाचं योगदान होतं.
मूळ ठाण्याचे रहिवाशी असलेल्या भास्कर पाळंदे आपल्या परिसरातील स्थानिकांना आपल्या रसभरित व जातीवंत कवितांनी मंत्रमुग्ध करून, रसिकतेचा दरवळणारा पारिजात आपल्या वाचकांच्या सामुहिक मनांमध्ये दीर्घकाळ फुलवून ठेवला होता. इंग्रज राजवटीत ते न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. भास्कर पाळंदे यांनी “विक्रमोर्वशीयम्” या संस्कृत नाटकाचे गद्यपद्यात्मक व गीतेचे ओवीबध्द भाषांतर केले आहे. त्यांनी लिहीलेल्या “रत्नमाला” या प्रसिध्द भक्तीपर पद्यग्रंथाचे वाचन करताना सर्वसामान्य व्यक्ती गहिवरून जातो.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
त्यांनी अनेक वर्षे लोकसत्ताच्या “विवा” या पुरवणीचे संपादन केले, त्यात त्यांनी लिहिलेल्या “सो कूल” या स्तंभावर आधारीत त्यांच नावाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. व्यावसायिक आणि कलात्मक असे दोन्ही प्रकारचे चित्रपट करतांना त्यात योग्य संतुलन त्यांनी साधले आहे. त्यांनी चित्रपट सृष्टितील आपली कारकीर्द गिरीश कर्नाड दिग्दर्शित “चेलुवी” या चित्रपटातून सुरु केली.
आदित्य हा एक नावाजलेला जलतरणपटू आहे ज्याने आशियाई स्तरावर भारतासाठी १ सुवर्ण व १ कांस्य पदक संपादित केले आहे.
किशोर रामराव कुलकर्णी निवृत्त आकाशवाणी कार्यक्रम अधिकारी आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti