शिल्पकार र.कृ. फडके यांनी सुरू केलेल्या व केशव लेले यांच्या अशा प्रदर्शनांनी महाराष्ट्रातील जनसामान्यांची यथार्थदर्शी वास्तववादी कलेप्रती असलेली अभिरुची वाढवली. त्यातूनच कलेच्या विविध शैलींतील प्रगल्भतेऐवजी आजही महाराष्ट्रात याच प्रकारच्या यथार्थदर्शी कलेचा प्रभाव आढळून येतो.
कृष्णाजी वासुदेव पुरंदरे हे इतिहास संशोधक होते.
मुग्धा या केवळ अभिनेत्री नव्हत्या तर त्या उत्कृष्ट कथा-कथनकारही होत्या. भारत आणि अमेरिकेत त्यांनी कथाकथन शैलीत ५०० कार्यक्रम सादर केले होते. मुंबईतील ‘ऑल इंडिया रेडिओ’मध्ये पुष्कळ कार्यक्रम सादर केले.
मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक, कथालेखक व पटकथाकार अशी ख्याती असलेल्या दिनकर पाटील यांनी शंभरापेक्षाही अधिक चित्रपटांसाठी संवाद लिहिले यामध्ये “जय मल्हार”, “सांगत्ये ऐका”, “बेल-भंडारा”, “शिकलेली बायको”, “बाळ माझं नवसाचं”, “सुधारलेल्या बायका”, “पाटलाची सून”, “फटाकडी”, “कुंकवाचं लेणं”, “गुणवंताची कन्या”, “मोसंबी नारंगी”, असे एकाहून एक दर्जेदार चित्रपटांचा समावेश असून पन्नासाहून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन देखील पाटील यांनी केले.यामाध्ये काही उल्लेखनीय चित्रपट म्हणजे “रामराम पावणं”, “शारदा”, “पाटलाचं पोर”, “मूठभर चणे”, “कुलदैवत”, “उमज पडेल तर”, “प्रेम आंधळं असतं”, “मल्हारी मार्तंड”, “कामापुरता मामा”, “धन्य ते संताजी धनाजी”, “काळी बायको”, “कोर्टाची पायरी”, “जोतिबाचा नवस”, “पैजेचा विडा”, “भामटा”, “भटकभवानी”, “शिवरायाची सून ताराराणी”; तर हिंदीत “मंदीर”, आणि “घरबार”च्या दिग्दर्शनाची धुरा दिनकर पाटील यांनी सांभाळली होती.
चिपळूणकर, (डॉ.) विष्णू गोविंद - 0013
१० जून १८६२
१८६२> शिकारकतांचे लेखक विष्णू गोविंद चिपळूणकर यांचा जन्म. “कृष्णसार (काळवीट) अथवा हरणाची शिकार”, “मृगया कुतूहल” (बडोदेनरेश सयाजीराव महाराज यांच्या वाघाच्या शिकारी विषयी), “बनवराहघात”, “हिंदुस्थानातील सर्प” अशी पुस्तके त्यांनी लिहिली. शिवचरित्रावर दोन व संभाजीराजांवर एक नाटकही अशी तीन नाटकेही त्यांनी लिहिली होती.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
चिपळूणकर, (डॉ.) विष्णू गोविंद - 0460
३१ ऑक्टोबर १९१६
१९१६> डॉ. विष्णू गोविंद चिपळूणकर यांचे निधन. “शरीरशिक्षण”, या पुस्तकांसिवाय काही नाटकेही डॉ. चिपळूणकरांनी लिहिली होती.
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे.
बा.सी. मर्ढेकर हे मराठी कवी, लेखक होते
मराठी रंगभूमी, चित्रपट, मालिका तसंच हिंदी सिनेसृष्टीतील गुणी कलावंत म्हणून उपेंद्र लिमये हे नाव आपल्याला परिचित आहे. ८ मार्च १९७४ रोजी पुणे येथे जन्मलेल्या उपेंद्र लिमयेंना लहानपणापासूनच अभिनयकलेची आवड होती. १९८७ साली पुण्याच्या ललित कला केंद्रातून अभिनयाचं सास्त्रोक्त प्रशिक्षण घेण्यासाठी दाखल झाले.
ठाण्याचे आघाडीचे क्रिकेटपटु व क्रीडाविश्वाला लाभलेले अप्रतिम रत्नजडित कोंदण असे खंडेराव रांगणेकर यांच्या कारकिर्दीचे वर्णन करावे लागेल.
संगीत नाटकांच्या कालखंडात रंगभूमीनी महाराष्ट्राला जे अनेक नट दिले त्यातील एक नाव म्हणजे गणपतराव बोडस. यांचे मूळनाव गणेश गोविंद बोडस. गणपतरावांचा जन्म २ जुलै १८८० रोजी अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे झाला.
Copyright © 2025 | Marathisrushti