आपल्या कलाकृतीनं जाणकारांचं लक्ष वेधून घेणारे कलावंत फार थोडे असतात. सामाजिक विषय समर्थपणे पडद्यावर जिवंत करणारे नवीन पिढीतील दिग्दर्शक गजेंद्र अहिरे हे त्यापैकी एक. आपल्याला काय सांगायचंय, ते कसं मांडायचं आहे याचा पक्का आराखडा गजेंद्र अहिरे यांच्या डोक्यात असतो.
संत एकनाथांनी समाजमनाची नस ओळखली आणि भारुडांच्या माध्यमातून समाजातील अपप्रवृत्तींवर हल्लाबोल केला. नाथांच्या याच सामाजिक प्रबोधनाचा वारसा सांगत चंदाबाई तिवाडी या लोककलावंत सध्या महाराष्ट्रभर भ्रमंती करत आहेत. भारुडाच्या माध्यमातून समाजातील दुष्प्रवृत्तींवर कडाडून हल्ला चढवत आहेत.
भावपूर्ण आणि लाघवी चेहरा, बोलके डोळे, उंच तसंच शिडशिडीत बांधा असंच काहीसं वर्णन इंदूमती पैंगिणकर यांच्या व्यक्तिमत्वाचं करता येईल. अभिनयासोबतच लेखिका म्हणून त्यांनी मिळवलेली ओळख ही सुद्धा त्यांचा महत्वाचा पैलू असल्याचं सांगते.
मुकेश माचकर हे महाराष्ट्र टाईम्स, केसरी, प्रहार, अशा नामांकित वृत्तपत्रांमधुन नियमीत स्तंभलेखन व प्रासंगिक लेखन करणारे तरूण पत्रकार आहेत. पत्रकारिता व लेखन या दोन्ही विभिन्न भुमिका समर्थपणे निभावताना त्यांनी त्यांची स्वतःची अशी अगदी वेगळी व मार्मिक अशी शैली निर्माण केल्यामुळे त्यांची गणती आज भारतातल्या निवडक काही जबाबदार व लोकप्रिय पत्रकारांमध्ये होते.
महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्रीपद भूषविणार्या नासिकराव तिरपुडे यांनी आदिवासी व मागासवर्गीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला.
ग.रा.कामत यांनी मराठीत राजा परांजपे, राजा ठाकूर यांच्या चित्रपटासाठी काम केले. त्यांनी लिहिलेले ‘पेडगावचे शहाणे’, ‘शापित’ हे मराठी चित्रपट खूप गाजले.कन्यादान हा त्यांचा आणखी एक गाजलेला मराठी चित्रपट. ‘सावरकर’ चित्रपटाचेही सुरवातीचे लेखन त्यांनी केले होते, द.ग.गोडसे आणि म.वि.राजाध्यक्ष यांच्या लेखांचं संकलन व संपादन केलेले ‘शमानिषाद’ हे कामत यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
तीन वेळा परिक्रमा केल्यानंतर त्यांनी ‘नर्मदे हर हर’ हे पुस्तक लिहिले. या परिक्रमेत त्यांना आलेले अनुभव अत्यंत रोमांचक आणि अचंबित करणारे आहेत. लेखकपणाचा कोणताही आव न आणता फक्त घटनेशी भिडण्याच्या त्यांच्या शैलीने वाचक मंत्रमुग्ध झाले. त्यांचे काही चमत्कारांचे अनुभव बुद्धीला पटणारे नसले, तरी कुंटे यांची शोधक वृत्ती आणि मानवी स्वभावाची निरीक्षणशक्ती यांमुळे त्यांच्या पुस्तकाच्या चाहत्यांची संख्या वाढतच गेली.
प्राणिमात्रांप्रमाणे सर्व वनस्पतीतीलही साऱ्या जीवनक्रिया ‘सायटोक्रोन-सी’च्या मध्यस्थीने एन्झाइम्समुळे होतात, हे मूलभूत महत्त्वाचे संशोधन सादर करून १९३९ साली केंब्रिज विद्यापीठाची विद्यावाचस्पती(पीएच्.डी.)ही पदवी संपादन केली. इतरांचे प्रबंध हजार-पंधराशे पानांचे असताना, कमलाबाईंचा प्रबंध अवघ्या ४० पानांचा होता आणि तो त्यांनी त्यावेळी एका व्याख्यानाद्वारे सभागृहापुढे ठेवला.
रामदास बंडू आठवले हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) ह्या राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. तसेच केंद्रीय मंत्रीमंडळात मंत्री आहेत.
‘साधना’ला मराठी वृत्तपत्रसृष्टीत वैचारिक प्रतिष्ठा मिळवून देणारे संपादक यदुनाथ दत्तात्रय थत्ते यांचा जन्म ५ ऑक्टोबर १९२२ रोजी झाला.
Copyright © 2025 | Marathisrushti