प्रख्यात गायिका बेगम अख्तर यांच्याकडून गाणं शिकण्याची संधी त्यांना मिळाली होती, परंतु त्यावेळी त्यांची नाटयकारकीर्द जोरात असल्याने त्यांना गाणं शिकता आलं नाही. परंतु त्यांनी बगम अख्तर यांना मनोमन आपला गुरू मानलं. त्यांच्याकडून गाणं शिकता न आल्याची रूखरूख त्यांना आजही वाटते.
July 9, 2022
सी.डी. देशमुख हे मराठी अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी होते. ते भारतीय रिझर्व बँकेचे तिसरे आणि मूळ भारतीय वंशाचे पहिले गव्हर्नर होते
March 1, 2011
पदवीने एमबीबीएस असणारे डॉ. प्रमोद पाटील यांनी पक्षीसंवर्धनाच्या क्षेत्रात पारदर्शी असे काम केले आहे. काळाच्या पडद्याआड जात चाललेल्या माळढोक पक्षाला वाचविण्याच्या कामात डॉ. प्रमोद पाटील यांच्या संशोधनाने मुख्य बळ मिळाले. निसर्गरक्षक गिधाडांना वाचविण्याच्या कामीही त्यांनी असेच भरीव कार्य केले आहे. गिधाडांचा जीव घेणार्या औषधांवर बंदीसाठी त्यांचे काम मार्गदर्शक ठरले.
महाराष्ट्र टाईम्समध्ये मटा नोंद डॉ. प्रमोद पाटील यांच्यावर आलेला माळढोक-गिधाडांचा रक्षणकर्ता हा लेख पुढील पानावर वाचा.
महाराष्ट्र टाईम्समध्ये डॉ. प्रमोद पाटील यांच्यावर आलेला माळढोक-गिधाडांचा रक्षणकर्ता हा लेख खाली देत आहोत.

July 24, 2015
महामहोपाध्याय काशिनाथ वासुदेव अभ्यंकर हे मराठीसह अर्धमागधी, प्राकृत आणि संस्कृतचे जाणकार होते. त्यांचा जन्म ७ ऑगस्ट १८९० रोजी झाला.
“पातंजलीकृत व्याकरणमहाभाष्य” या ग्रंथाच्या सात खंडांचे संपादन त्यांनी केले होते.
Kashinath Vasudeo Abhyankar
November 7, 2017
पानसरे, (कॉ.) गोविंद
‘राजर्षी शाहू पुरस्कारा’साठी कॉ. गोविंद पानसरे यांची निवड यंदा झाली, तो त्यांना २६ जून रोजी दिला जाईल. दोन वर्षांपूर्वी स्वत:च्या अमृत महोत्सवप्रसंगी ‘माझ्याखेरीज अन्य कार्यकर्त्यांवर पुस्तके काढा’ म्हणणारे कॉ. पानसरे या प्रतिष्ठेच्या सन्मानाला तयार झाले, हेच विशेष. शाहूंच्या कोल्हापुरातूनच गेली सहाहून अधिक दशके पानसरे महाराष्ट्रीय पुरोगामी चळवळीला दिशा देणारे काम करताहेत.
कामगार चळवळ, विद्यार्थी चळवळीला मार्गदर्शन, स्त्री-मुक्ती चळवळीत इथल्या मातीच्या गरजा ओळखणारे ‘जटामुक्ती’ कार्यक्रम हाती घेणे आणि वयपरत्वे व्याख्याने / लेखन यांतून प्रबोधनावर भर देणे हे त्यांचे हल्लीच्या तरुणांना चटकन आठवणारे काम. पण संयुक्त महाराष्ट्र आणि गोवामुक्ती आंदोलने यांत सक्रिय असलेले पानसरे पुढे वकील म्हणून केवळ न्यायालयीन लढाया न लढता लोकजागृतीसाठी रस्त्यावरही उतरत राहिले. ‘यशवंतराव चव्हाणांना कोल्हापूर प्रवेशबंदी’ किंवा ‘गुंडगिरीविरोधी मोर्चा’ अशी नावीन्यपूर्ण आंदोलने त्यांनी केली. शेतमजुरांची युनियन सशक्त केली आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाला थेट रस्त्यावर उतरून कृतीचा भक्कम पायाही दिला. अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार ते कोल्हापूर हे स्थलांतर इयत्ता सातवीनंतर पुढल्या शिक्षणासाठी करण्यात पानसरे यांना ज्या गोविंद पत्की या गुरुजींची मदत झाली, त्यांनीच राष्ट्र सेवा दलाच्या संस्कारांची शिदोरीही पानसरे यांना दिली होती. मात्र पुढे, १९५२ साली कसे लढायचे, हा प्रश्न आला तेव्हा दलाचा सौम्य समाजवाद सोडून थेट साम्यवादी पक्षात प्रवेश करणाऱ्यांत ते सामील झाले. कम्युनिस्ट चळवळीला मुंबईत जे फूट, पोथीनिष्ठा आदी उपसर्ग झाले ते कोल्हापुरात झाले नाहीत, याचे कारण बागल, गायकवाड, पानसरे, आदींची लोकनिष्ठ आणि बुद्धिनिष्ठ काम करत राहण्याची पद्धत. वकिलीपर्यंतचे शिक्षण घेताना नानापरींचे कष्ट करावे लागणे, निवाराही नसताना कधी पुस्तकांच्या दुकानात तर कधी ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडे राहणे अशा अनुभवांनी ही लोकनिष्ठा पानसरे यांच्यात भिनवली. शाहू महाराजांच्या काळात स्थापन झालेल्या ‘प्रिन्स शिवाजी फ्री मराठा बोर्डिग हाऊस’ने पानसरे यांना छत्र दिले आणि इथेच त्यांच्यातला विद्यार्थी-कार्यकर्ताही घडला. याच शाहूंच्या नावाचा पुरस्कार आता पानसरे स्वीकारणार आहेत.
-----------------------------------------------------------------------
पानसरे, गोविंदराव उर्फ कॉम्रेड गोविंदराव पानसरे
कॉ. गोविंद पानसरे यांची पंचाहत्तरी झाली तेव्हा सहकारी आणि मित्रमंडळाने त्यांना १५ लाखांची थैली भेट दिली. कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जन्मभर वणवण केलेल्या आणि वैयक्तिक लाभहानीचा विचारही मनाला न शिवलेल्या पानसरेंनी त्याच कार्यक्रमात या निधीतून ७५ कॉम्रेड्सची प्रेरक चरित्रे पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली जावीत, असे मनोगत व्यक्त केले. ते प्रत्यक्षातही आणले. कॉ. पानसरेंचे वैशिष्ट्य येथेच आहे. कोणत्याही गोष्टींचा नेमका वापर कसा करायचा हे ते काटेकोरपणे स्पष्ट करतात आणि काम पूर्ण होईपर्यंत स्वस्थ बसत नाहीत किंबहुना त्यांचे कार्यच त्यांना स्वस्थ बसू देत नाही. एकाच व्यक्तीत नेता आणि कार्यकर्ता असा अद्भुत संगम क्वचितच पाहायला मिळतो. कॉ. पानसरे तर परखड लेखक आणि फर्डे वक्ताही आहेत. सर्व डाव्या, पुरोगामी गटांशी त्यांचा दोस्ताना आहे.
अहमदनगरच्या श्रीरामपूरमधील कोल्हार गावी त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. राहुरीला माध्यमिक शिक्षण घेतले. घरची परिस्थिती तशी बेताची. कोल्हापूरच्या प्रिन्स शिवाजी फ्री मराठा बोर्डिंगमध्ये राहून राजाराम कॉलेजात त्यांनी शिक्षण सुरू केले. प्रसंगी वृत्तपत्रविक्रेता म्हणून कामही केले. महापालिकेत शिपायाची नोकरी केली. म्युनिसिपल बोर्डात प्राथमिक शिक्षक बनले. कायद्याचे शिक्षण पूर्ण करून वकिली सुरू केली.
पण हे इतपतच नव्हते. राष्ट्र सेवा दलातही जाणे चालू होते. पुढे पानसरेंनी कॉ. माधवराव बागल, कॉ. माधवराव गायकवाड, कॉ. गुलाबराव गणाचार्य, कॉ. बापूराव जगताप यांच्यासोबत १९५२ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ काम सुरू केले. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, गोवा मुक्ती आंदोलन यात तर ते होतेच ; पण कम्युनिस्ट पक्षाचा कणा असलेल्या आयटकच्या कामगार आणि शेतमजुरांच्या युनियन बांधण्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला. यशवंतराव चव्हाणांना कोल्हापूर जिल्हाबंदी करणारे पानसरे अद्याप अनेकांच्या स्मरणात असतील. पानसरे आजही मोलकरणी, रिक्षावाले, टपरीवाले यांच्या संघटनाबांधणीत गुंतलेले आहेत. त्यांचे सारे कुटुंबच कार्यकर्ते आहे. काही वर्षांपूर्वी पुत्रवियोगाचे दुःख त्यांच्या वाट्याला आले. कॉ. अवीला अखेरचा निरोप देण्यासाठी आलेल्यांना ते म्हणाले, ' अश्रु ढाळू नका, त्याऐवजी मी आजन्म समाजासाठी काम करेन अशी शपथ घ्या.' आणि तशी ती त्यांनी उपस्थितांना घ्यायला लावलीही.
त्यांनी विपुल लेखन केले आहे, मात्र शिवाजी खरा कोण होता या त्यांच्या दीड लाखांहून अधिक खपलेल्या पुस्तकाने सामाजिक न्यायावर आधारलेल्या बहुजनवादी शिवाजीराजाची नवी ओळख आक्रमकपणे महाराष्ट्राला करून दिली. प्रचंड आवाका असलेल्या या मर्हाटी मातीतल्या साम्यवाद्याचा गौरव राजर्षि शाहू पुरस्काराने करण्यात आला.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
August 5, 2017
१९११ मध्ये त्यांनी गायक व संगीतज्ञ पं. विष्णू नारायण भातखंडे यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यास सुरुवात केली व आजमितीला ते भातखंडेबुवांचे सर्वात ख्यातनाम शिष्य मानले जातात.
July 5, 2022
कृष्णाजी वासुदेव पुरंदरे हे इतिहास संशोधक होते.
January 4, 2021
आशुतोष गोवारीकर यांनी उमेदवारीच्या काळात सी.आय.डी.मालिकेतून शिवाजी साटम यांच्या साहाय्यकाचे काम केले. त्यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला. अमोल पालेकरच्या 'कच्ची धूप' या मालिकेतून आशुतोष अभिनेता म्हणून लोकांना प्रथम दिसले.
पुढे त्यांनी 'होली', 'गूँज', 'कभी हां कभी ना', 'सलीम लंगडे पे मत रो' सारख्या सिनेमांत काम केले. पण त्यांना अभिनय-कारकिर्दीत घट्ट मुळे रोवता आली नाहीत. मग दिग्दर्शन क्षेत्रातले पदार्पण असलेला त्यांचा 'पहला नशा' हा त्याचा चित्रपट दणकून आपटला. त्याच्या, आमीर खान नायक असलेल्या 'बाजी'च्या दिग्दर्शनानेही बाजी मारली नाही. त्यामुळे 'लगान' हा त्याचा जीवन-मरणाचा प्रश्न बनला होता.
'लगान' ने त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली. ते दिग्दर्शक व अभिनेता म्हणून अनेक आव्हानांना खंबीरपणे सामोरा गेले. आशुतोष गोवारीकर यांनी २००१ मध्ये 'लगान' तयार केला.
आशुतोष गोवारीकर यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
http://www.marathisrushti.com/articles/ashutosh-govarikar/
# Govarikar, Aashutosh
June 4, 2017
डॉ. सुरेंद्र शिवराम बारलिंगे हे महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष होते. १३ मराठी, सहा हिंदी व आठ इंग्रजी पुस्तके त्यांनी लिहिली.
August 22, 2017
ठाणे येथे सुरुवात करुन गेली ४५ वर्षे योगप्रसारासाठी सर्वस्व अर्पण करणारे ज्येष्ठ योगाचार्य श्रीकृष्ण उर्फ अण्णा व्यवहारे हे ठाणे शहराचे एक भूषण होते. २६ जानेवारी १९६५ रोजी त्यांनी घंटाळी मित्र मंडळाची स्थापना केली. मंडळाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसह अण्णांनी योगसाधनेची चळवळ ठाणे शहरात उभी केली.
August 25, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti