(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मेधा पाटकर

      December 15, 2010


  • शंकर आबाजी भिसे

    मुद्रण तंत्रज्ञानात मौलिक संशोधन करणारे अमेरिकानिवासी भारतीय संशोधक. भिसे टाइप मुद्रण यंत्र, सिंगल टाइपकास्टर विथ युनिव्हर्सल मोल्ड, रोटरी मल्टिपल टाइपकास्टर या यंत्रांचा, अॅटोमायडीन या औषधाचा व विद्युत्शास्त्र वगैरेतील एकूण २०० शोधांचे जनक. त्यांना ४० शोधांची एकस्वे मिळाली.

      August 1, 2011


  • डॉ. केशवचंद्र मोरेश्वर ऊर्फ दाजी भाटवडेकर

    दाजींच्या दुर्दैवाने पुढे मराठी संगीत रंगभूमीला उतरती कळा लागली. संभाषणात नाटकी अभिनिवेशाने बोलण्याच्या जागी वास्तव शैलीने बोलायची पद्धत पडू लागली. मग दाजींनी आपला मोहरा संगीत रंगभूमीकडे वळवला.

      June 28, 2022


  • (प्रा.) ल. ना गोखले

    गोखले, (प्रा.) ल. ना.

    लक्ष्मण नारायण गोखले हे नाव पत्रकार ही त्यांची ओळख दिली जाईल. ते पत्रकार होते, पण पत्रकारांचे ते उत्तम शिक्षक आणि मार्गदर्शक मित्र होते. पत्रकारितेच्या अभ्यासक्रमातले ते दीपस्तंभ होते. पुणे विद्यापीठाच्या पत्रकारितेच्या अभ्यासक्रमातले ते पहिले उत्तम संयोजक होते. ‘ल.ना.’ अशी आद्याक्षरे उच्चारली तर त्यापुढे केवळ गोखले हेच नाव येते ते यामुळेच. ही आद्याक्षरे त्यांच्या त्या आडनावाशी एकरूप झाली होती आणि ती त्यांचा व्यासंग सांगायला पुरेशी होती. ल.ना. सेवानिवृत्त होऊन बरीच वर्षे झाली, पण तरीही त्यांना सर्व घडामोडी इत्यंभूत माहित असायच्या. पत्रकारितेतही रोजच काही ना काही घडत असते.

    कुणी त्याकडे लक्ष देते, कुणी देत नाही. ‘लनां’ना आपल्याकडून ती सांगितली जाईपर्यंत ती त्यांना मिळालेली असे. ल.ना. हे त्याही अर्थाने ज्ञानकोशच होते. कोणत्या वृत्तपत्रात काय आले आहे आणि काय हवे होते ते ल.ना. अचूकपणे सांगू शकायचे! वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होणारी मराठी भाषा बिघडत चालली आहे, अशी तक्रार अनेकजण करतात, पण कोणी त्यावर उपाय सांगत नाही. ल.ना. म्हणायचे, ‘तुम्हाला वाटले तर मला सांगा, मी एखादा तास घेऊन काय चुकते ते सांगू शकेन.’ अर्थात, यामागे चुका दाखवून देण्यापेक्षा त्या पुन्हा केल्या जाऊ नयेत, हा दृष्टिकोन होता. ‘पत्रकारांसाठी मराठी’ या पुस्तकाचा जन्मही त्यांच्या अशाच आग्रहातून झाला. या पुस्तकातही लिहिताना त्यांनी संपूर्ण वर्षभराचे अंक समोर ठेवून कोणत्या वृत्तपत्राने कोणता शब्दप्रयोग केला आहे, तेही तपासून पाहिले होते. काही वेळा तर अनर्थ होईल, असेही शब्दप्रयोग केले गेल्याचे त्यांना आढळले. या चुका दाखवताना एखाद्या मराठीच्या प्राध्यापकाप्रमाणे त्यांनी सोपी मांडणी केली आहे. पत्रकारांना भाषा शिकवायचा उद्देश त्यामागे नक्कीच नव्हता, तर पत्रकारांनी सुबोध मराठीचा वापर करून वाचकांना चुकीच्या मराठीपासून वाचवावे, ही त्यामागे असणारी दृष्टी होती. त्यांचा त्यासाठी आग्रह होता, पण तो अनाठायी नक्कीच नव्हता. इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये कोठे काय आले आहे आणि त्यामागे काय भूमिका असू शकते, याचे नेमके ज्ञान त्यांना होते. इंग्रजी किंवा हिंदी वृत्तपत्रे मराठीचा वापर करतात का, तर नाही. मग आपण त्यांच्या त्या शब्दांची उसनेगिरी का करायची, असा त्यांचा साधा सवाल असे. फलटणच्या मुधोजी प्रशालेत त्यांनी शिक्षकाची नोकरी केली तरी पत्रकारितेची उपजत वृत्ती त्यांना स्वस्थ बसू देईना. ते पुण्यात आले आणि ‘काळ’, ‘त्रिकाळ’ या वृत्तपत्रांनंतर ‘केसरी’मध्ये दाखल झाले. ‘केसरी’त त्यांनी काही काळ ‘वाट्टेल ते’ या नावाचे सदर लेखनही केले, ज्याचे पुढे पुस्तकही झाले. त्या काळात पत्रकारांचे आर्थिक जीवनमान फार चांगले नसले तरी जे होते त्यात समाधान मानणारे ते होते. पुणे विद्यापीठाने वृत्तपत्रविद्येचा अभ्यासक्रम सुरू करायचे ठरवल्यानंतर ते त्या विभागाचे प्रमुख बनले. अतिशय विद्यार्थिप्रिय शिक्षक म्हणूनही ते ओळखले गेले. वृत्तपत्रविद्या अभ्यासक्रमासाठी पुणे विद्यापीठात ‘संदेश’कार कोल्हटकर शिष्यवृत्ती ठेवण्यात आली होती, पण पैसे मिळण्यात होणारी दिरंगाई पाहून त्यांनी साऱ्या विद्यापीठाला हलवून सोडले होते. श्रमिक पत्रकार संघाच्या बैठकींमध्ये कधी वादावादी झालीच तर तिथे एकच व्यक्ती अशी असे, की जी त्या सर्व वादावर पडदा टाकून पुढे जाणे श्रेयस्कर मानत असे. ते अर्थातच ल.ना. होते. जयंतराव टिळक, भा. गो. बापट, प्र. ल. गावडे, द. मा. मिरासदार, दा. सी. देसाई, मा. वि. साने आदींबरोबर त्यांनी काम केले. बाहेरच्या अनेक लेखकांना त्यांनी लिहिते केले. पत्रकारितेबाहेर शिक्षण क्षेत्रात काम करतानाही त्यांनी पत्रकारांबरोबरचा संवाद तोडला नाही. पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थिवर्गाचे पत्ते आणि त्यांचे काम करण्याचे ठिकाण यांचीही हमखास माहिती त्यांच्याकडेच मिळत असे. संगणकयुग अवतरायचे होते, त्या काळात त्यांच्याकडे जमा होणारी ही माहितीही थक्क करून सोडणारी असे. त्याचा अनाठायी अभिमान बाळगणे हेही त्यांच्या गावी नव्हते. अलीकडे ते एका पुस्तकाच्या लेखनात गुंतले होते, त्याचे काम चालू होते, तोपर्यंत त्यांच्या तब्येतीने उमेद बाळगली होती. पुस्तकाचे काम संपत आले तेव्हा त्यांनी पडद्याआड जायचे ठरवले होते की काय, हे न कळे, पण झाले तरी तसेच! त्यांच्या निधनाने मात्र एका अतिशय चिकित्सक वृत्तीच्या सुसंस्कृत पत्रकारास आपण मुकलो आहोत.

      August 5, 2017


  • पं. वामनराव सडोलीकर

    खाँसाहेब कधीकधी फिरायला जाताना भाऊंना घेऊन जात. फिरता फिरता त्यांचे काही अनुभव, कधी उपदेश, कधी त्या दिवशी भाऊंचा ऐकलेला रियाज यावर टिप्पणी करून खाँसाहेब सूचना करीत. ते दिवस भाऊंनी हृदयात जपून ठेवले होते. खाँसाहेब आणि त्यांचं कुटुंब हे भाऊंनी जन्मभर पुण्य मानलं.

      July 2, 2022


  • संदीप अवचट

    संदीप अवचट

    संदीप अवचट हे नामांकित व विश्वासार्ह मानले जाणारे प्रसिध्द ज्योतिषी, व प्राचीन ज्योतिर्विद्या तसेच अर्वाचीन अंकशास्त्राचे गाढे आभ्यासक व चिकीत्सक आहेत.

      August 16, 2011


  • बेबीताई कांबळे

    कांबळे, बेबीताई

    ‘रिपब्लिकन पक्षाला गटातटांमुळे भवितव्य नाही.. आता दलित पँथरसारखी चळवळ महिलांमधून उभी राहायला हवी,’ असे बरोबर वर्षभरापूर्वी, गेल्या एप्रिलमध्ये सम्यक साहित्य संमेलनात झालेल्या सत्काराला उत्तर देताना बेबीताई कांबळे म्हणाल्या होत्या. बेबीताई तेव्हाही खंगल्या होत्या, पण पँथरने जो आत्मविश्वास आणि बेधडकपणे वास्तवाला भिडण्याची वृत्ती युवकांच्या अंगी बाणवली, तसा एल्गार पुन्हा सुधारित स्वरूपात यायचा असेल तर तो महिलांमधून यावयास हवा, असे स्वप्न पाहात होत्या.

    बेबीताईंना ओळखले जाते ते ‘जिणं अमुचं’ या आत्मचरित्राच्या लेखिका म्हणून. प्रा. डॉ. माया पंडित यांनी त्याचा इंग्रजी अनुवाद ‘प्रिझन्स वुइ ब्रोक’ या नावाने केला आणि पुढे फ्रेंचसारख्या अन्य भाषांतही बेबीताई कांबळे यांचे नाव पोहोचले. दलित मुलगी, युवती- स्त्री स्वतंत्र विचार कसा करू शकते, याचा हे पुस्तक म्हणजे एक उत्तम नमुना. ‘आमुचं जिणं’ सांगताना हे प्रातिनिधिक आत्मचरित्र आहे, याचे भान बेबीताईंना आहे. बाबासाहेब गावात आले म्हणून बालपणी आपणा भावंडांना केवढा आनंद झाला होता, यांसारख्या वर्णनांतून तर ते समाजाचेच चरित्र होते. डॉ. आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न कसा केला, हे सांगताना त्यात आलेले अडथळे किती वास्तव होते, याचेही भान बेबीताईंना असते. या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळाचा पुरस्कार मिळाला, त्यानंतर अनेकांनी बेबीताईंनी पुढेही लिहिते राहावे, लेखिका म्हणून नाव कमवावे, अशा भाबडय़ा अपेक्षा ठेवल्या होत्या! मुळात बेबीताई कार्यकर्त्यां. मिळालेल्या मानातून त्यांनी भटक्या- विमुक्तांसाठी आश्रमशाळा फलटणजवळ काढली आणि वाढवली. सत्कार पुढेही होत राहिले, तो पैसाही बेबीताईंनी या कार्यासाठी वापरला. गेले काही महिने त्या खंगल्या व थकल्या होत्या. पुण्यातील खासगी रुग्णालयात शनिवारी (२१ एप्रिल) त्यांचे निधन झाल्याची वार्ता कळल्यावर, स्त्रीवादी आणि दलित साहित्याने एक आधार गमावला, याचे वाईट अनेकांना वाटले. आश्रमशाळेतील मुलींना मात्र आप्तवियोगाचे दु:ख झाले.

    -------------------------------------------------------

    कांबळे, बेबीताई

    दलित चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या आणि लेखिका श्रीमती बेबीताई कांबळे.

    दलित आत्मचरित्रांच्या प्रदीर्घ आणि उज्ज्वल परंपरेत ज्या मोजक्या महिला आत्मचरित्रांचा समावेश आहे, त्यात बेबीताई कांबळे यांच्या 'जिणं आमचं' या आत्मकथनाचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. त्यांचे "जिणं आमचं' या आत्मचरित्राचे सात भाषांमधून भाषांतर झालेले आहे. राज्य शासनाने त्यांना दलितमित्र पुरस्काराने गौरविले होते.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून थेट प्रेरणा घेतलेले विविध क्षेत्रांमधले जे धडाडीचे कार्यकर्ते आजही कार्यरत होते, त्यात बेबीताईंचा समावेश होता. १९३० च्या दशकात जेजुरीच्या जत्रेत बाबासाहेबांनी ओजस्वी भाषण करून 'पोरांना शिकविल्याशिवाय आपली या नरकातून सुटका होणार नाही' असे बजावले होते. ते ऐकून बेबीताईंच्या वडिलांनी त्यांना सातारा जिल्ह्यातल्या फलटण येथे शाळेत घातले आणि बेबीताईंचे जीवनच बदलले. त्यांचे आजोबा इंग्रज साहेबांचे बटलर; तर वडील ठेकेदार होते. असे असूनही 'महारवाड्या'तले कष्टाचे, रोगराईचे, अज्ञानाचे जिणे सगळ्यांप्रमाणेच त्यांनाही जवळून पाहायला लागलेच.

    पुढे अनेक वर्षांनी हे जीवन शब्दबद्ध करताना बेबीताईंनी 'बिनशेपटाच्या जनावराचं जिणं' असे त्याचे मामिर्क वर्णन केले होते. हे आपले आत्मकथन नाही, तर त्या पिढीचे, समाजातल्या दबून गेलेल्या वर्गाचे ते प्रातिनिधिक प्रकटन आहे, असे बेबीताई म्हणत. त्यांचे आत्मकथन हा बहुमोल सामाजिक दस्तावेज आहे. त्यामुळेच, माया पंडित यांनी त्याचा 'प्रिझन्स वुई ब्रोक' असा अनुवाद केला, तेव्हा जगभरच्या वाचकांना दलित समाजाचे अस्सल दर्शन घडू शकले. हे कथन नंतर फ्रेंच व इतर भाषांमध्येही गेले.

    'तुम्ही आणखी लिहा' असा आग्रह बेबीताईंना होई, तेव्हा आपण कार्यकर्त्या आहोत, लेखन हे आपले साधन आहे, असे त्या म्हणत. त्यामुळेच, फलटणला काढलेल्या भटक्या-विमुक्तांच्या आश्रमशाळेची त्यांना अधिक चिंता असे. दलित संघटित होत नाहीत, याची त्यांना काळजी वाटे. 'गटातटांच्या राजकारणाने रिपब्लिकन पक्षाला फारसे भवितव्य उरलेले नाही' असे कठोरपणे सांगतानाच आता दलित महिलांनीच 'दलित पँथर'सारखी आक्रमक संघटना उभारली पाहिजे, असे बेबीताई आवर्जून सांगत. हा त्यांचा स्त्रीशक्तीवरचा विश्वास होता.

    बेबीताई कांबळे यांनी अत्यंत गरीब परिस्थितीला तोंड देत साहित्याची सेवा केली. अल्पशिक्षित असलेल्या बेबीताई विवाहानंतर फलटणमधील मंगळवार पेठेमध्ये दुकान चालवीत होत्या. दुकानात येणारे रद्दीचे कागद व वह्यांचे कागद यातील अक्षर ओळखीने त्यांना साहित्याची आवड निर्माण केली आणि हळूहळू जमेल तसे त्या कोऱ्या कागदावर लिहीत गेल्या. त्यातूनच दलित साहित्यिक म्हणून त्यांची ओळख होत गेली. श्रीमती बेबीताई यांनी दलित बांधवांची दु:ख अत्यंत जवळून अनुभवली आणि त्याचबरोबर स्वत:ही त्या परिस्थितीला तोंड देत राहिल्या. त्यातूनच त्यांच्या "जिणं आमचं' या आत्मचरित्राचा जन्म झाला. त्यांच्या आत्मचरित्राची मराठी, हिंदी, फ्रेंच, पंजाबी, बंगाली या भाषांत भाषांतरे झाली. इंग्रजी भाषेमध्ये या साहित्यकृतीचे भाषांतर झाल्यानंतर त्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा हैदराबाद येथे झाला होता.

    बेबीताई कांबळे यांच्या "जिणं आमचं' या पुस्तकावर पुणे विद्यापीठात पीएचडी करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील कवितासंग्रह (भीमगीते) त्यांनी लिहिला असून, केवळ साहित्य सेवा करताना चळवळीतून दलित बांधवांना प्रगतीचे, शिक्षणाचे विचार देण्याबाबत त्या नेहमी अग्रेसर राहिल्या. त्यांनी केलेल्या सामाजिक व दलित चळवळीच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने त्यांना दलितमित्र पुरस्कार देऊन गौरविले होते. फलटण भूषण पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले आहे. राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत त्यांनी निंभोरे (ता. फलटण) येथे भटक्‍या जमातीतील मुलांसाठी काढलेली आश्रमशाळा गेली २० वर्षे त्या चालवीत होत्या. याच परिसरामध्ये संविधान भवन बांधण्याच्या कामाला त्यांनी प्राधान्य दिले होते. फलटण तालुक्‍यासह जिल्ह्यातील दलित चळवळ व साहित्यामध्ये त्यांचा एक वेगळा दबदबा होता.

    दलित साहित्यात स्त्रीवादाचा जोमदार प्रवाह वाहू शकला नाही. मात्र, स्त्रीवाद व दलित चळवळ यांचे जे अभिन्न, अतूट नाते आहे, त्याची नेमकी जाण बेबीताईंना होती. त्यामुळे त्या ज्याला 'भीमाचं वारं' म्हणत, ते वारे प्रत्येक घरातल्या मुलीच्या मनात शिरायला हवे, ही त्यांची तळमळ असे. म्हणूनच, बाबासाहेब शहरांत रुजले, आता ते खेड्यापाड्यांमध्ये रुजायला हवेत, यासाठी त्या अखेरपर्यंत धडपडल्या. २१ एप्रिल २०१२ रोजी वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांचे पुणे येथे एका खाजगी रुग्णालयात निधन झाले.

    http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12904269.cms - बेबीताई कांबळे यांच्या निधनानंतर लिहिलेले महाराष्ट्र टाईम्समधील संपादकीय...

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर आणि विविध वर्तमानपत्रांतील लेख)

      August 5, 2017


  • किशोर लिंबाणी

    किशोर लिंबाणी अनेक वर्षांपासून ठाणे शहर विभागाचे युवक मंडळ उपाध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत. सामाजिक कार्यासोबतच धार्मिक कार्यातही ते सहभाग नोंदवत आहेत.

    हरिद्वारच्या कच्छी लालाराम आश्रमात नऊ महिने साधुसंतांच्या सेवेसाठी ते भेट देत असतात. समाजातील गरीबांवर मोफत औषधोपचार करणे हे या आश्रमाचे प्रमुख कार्य असून, या कार्याला पुर्णत्वास नेण्यात त्यांचं मोलाचं योगदान आहे. लहानांपासून वृध्दांपर्यंत तसंच महिलांना सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांचा कटाक्ष आहे.

    क्रिकेट स्पर्धा, शैक्षणिक वह्या वाटप, प्रभागातील सांडपाण्याचे व्यवस्थापन, वृक्षलागवड त्याचप्रमाणे ठाणे निर्धार अभियानात उत्साही सहभाग, तसंच ठाणे महानगरपालिकेच्या वतीने वेटलिफ्टींग चा खेळ सुरू करावा यासाठी पत्रव्यवहार आणि प्रयत्न, जनलोकपाल विधेयकाबाबत जनजागृतीप्रती विद्यार्थ्यांसाठी अर्धा डझन वह्या अशी अनेक कल्याणकारी कामे किशोर लिंबाणी यांच्याकडून करण्यात आली आहेत.

    दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित

      January 3, 2015


  • दिनकर रायकर

    ज्येष्ठ मराठी पत्रकार. सध्या लोकमत वृत्तपत्र समूहाचे समूह संपादक आहेत.

      July 19, 2011


  • निरंजन उजगरे

    निरंजन उजगरे यांनी एक मुख्य काम केले ते म्हणजे कवी-संपादन-अनुवादाच्या कार्यासाठी भारतभर भ्रमण केले , आणि त्यांच्या महत्वाकांक्षी ‘ काव्यपर्व ‘ या पुस्तकांची निर्मिती झाली. . स्वातंत्र्योत्तर भारतीय कविता -२१ भाषा आणि १७० कवींच्या कविता त्यात आहेत.

      July 1, 2022