(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • डॉ. अक्षयकुमार मल्हारराव काळे

    लेखक, समीक्षक डॉ. अक्षयकुमार मल्हारराव काळे यांचा जन्म २७ जुलै १९५३ रोजी झाला.

    “स्वातंत्र्योत्तर मराठी काव्यातील प्रवाह” या विषयावर त्यांनी पी.एच.डी. मिळवली असुन “सूक्तसंदर्भ”, “गोविंदाग्रज समीक्षा” ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. याखेरीज, त्यांचे सुमारे १०० समीक्षालेख विविध ठिकाणी प्रसिद्ध झाले आहेत.

    डोंबिवली येथे फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या ९० व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

    ## Dr. Akshaykumar Malharrao Kale

  • रामचंद्र गणेश कुंदगोळकर (सवाई गंधर्व)

    ज्यांच्या नावाने पुण्याचा संगीत महोत्सव अवघ्या भारतात नव्हे तर अवघ्या जगभरात गाजतो आहे व त्या महोत्सवात आपल्या गायनाची गुरूंची व घराण्याची गायकी गायला मिळावी म्हणून काही नवीन कलाकार कसोशीने प्रयत्न व प्रयास करत असतात. तसेच काही जेष्ठ व श्रेष्ठ गायक आणि वादक नेहमी हजेरी लावत असतात व त्यांच्या गायन वादनाने मंत्रमुग्ध होण्यासाठी सगळेच कानसेन त्या महोत्सवाची आतूरतेने वाट बघत असतात असा सवाई गंधर्व महोत्सव जो दर वर्षी पुण्यात न चुकता होतो व ज्याच्यां नावाने होतो ते सवाई गंधर्व उर्फ रामचंद्र गणेश कुंदगोळकर.

  • मल्हारराव होळकर

    छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य, निष्ठेने वाढविण्याची जबादारी सुभेदार मल्हारराव होळकरांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. मराठी साम्राज्य वाढविण्याकामी मल्हारबांनी आपले सर्वस्व पणाला लावले आणि मराठी साम्राज्याच्या सीमा, सिंधू नदी पर्यंत वाढविल्या. आयुष्यामध्ये जी काही प्रगती झाली ती जेजुरीच्या खंडेराया मुळेच अशी त्यांची धारणा असल्याने त्यांनी कधीही या दैवताचा विसर पडू दिला नाही.

  • गणेश नाईक

    सरुवातीला शिवसेना पक्षातून आमदार त्यानंतर युती सरकारच्या कार्यकाळात कॅबिनेटमंत्रीपद, पुढे युतीने महाराष्ट्रातील सत्ता गमावल्यानंतर १९९९ साली शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करुन ठाणे व नवीमुंबई भागात या पक्षाचे स्थान बळकट करण्यात नाईक यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. १९९९ साली राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आल्यावर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व विविध मंत्रीपद गणेश नाईक यांनी भुषविली आहेत. त्यानंतर २००९ च्या लोकसभा निवडणुकीत गणेश नाईक प्रथमत: खासदार म्हणुन निवडून आले.

    त्यांची राजकीय कारकीर्द त्यांच्या दुरदृष्टीमुळे वा माणसे ओळखण्याच्या त्यांच्या विलक्षण कसबामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यांमध्ये भरणारी अशीच राहिली आहे. आपल्या कार्यकाळात नाईक यांनी जव्हार, मोखाडा, कल्याण, उल्हासनगर, पालघर, वसई, मिरा-भाईंदर, विक्रमगड, ठाणे शहर व नवी मुंबई अशा अनेक ठिकाणी जनता दरबार आयोजित करून सामान्य जनतेचे मुलभूत प्रश्न व असंख्य समस्यांना नाईक यांनी मोठ्या कौशल्याने सोडवले होते.

    कामगार मंत्री असताना अनेक गिरणी कामगारांना न्याय, बालकामगारमुक्त महाराष्ट्र, बालकामगारांचे पुनर्वसन, राज्यातील असंख्य सुरक्षा कामगारांना वेतन हमी, असंघटित कामगारांसाठी समान वेतनाची तरतुद, कंत्राटी कामगारांच्या समस्या अशा प्रकारचे कामगार हिताचे निर्णय त्यांनी घेतले होते. विशेष म्हणजे कामगार मंत्री असताना नवी मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राट कामगारांना पालिकेत चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांप्रमाणे वेतन देण्याची तरतूद करून त्यांनी आपल्या देशापुढे माणुसकीचे अनोखे उदाहरण सादर केले होते. पर्यावरण व वनमंत्री असताना वन कर्मचार्‍यांना पाचवा वेतन आयोग लागू करणाचे, व वन्य जीवांपासून संरक्षण करण्याकरिता लागणारी शस्त्रे त्यांना पुरविण्याचे काम त्यांच्या पाठपुराव्यामुळे साकार झाले होते. तसेच उत्पादन शुल्क मंत्री म्हणून देखील त्यांनी राज्याच्या महसुलामध्ये मोठी भर घातली होती. भूगर्भातील उष्णतेवर तयार करण्यात येणरा विद्युतप्रकल्प ठाणे जिल्ह्यात सर्वप्रथम उभारण्यात यावा हे त्यांचे स्वप्न त्यांच्या वेगळेपणाविषयी बरेच काही सांगून जाते.

    गणेश नाईक यांचा राजकारणाचा व समाजकारणाचा वारसा त्यांचे दोन्ही पुत्र म्हणजे नवीमुंबईचे महापौर सागर नाईक व आमदार संजीव नाईक हे चालवत आहे. नवीमुंबई म्हणजे नाईक मुंबई अशी ओळख निर्माण ते यशस्वी झाले असा सूर उपरोधक पणे तर कधी मिश्कीलरित्या माध्यामातुन किंवा जनतेतुन निघत असतो.

    २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गणेश नाईक यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला होता.

  • गोदावरी शामराव परूळेकर

    (1908-1996)

    पश्चिम महाराष्ट्रातील आदिवासी क्षेत्रात मार्क्सवादी पक्षाचे काम गोदावरी परूळेकर व त्यांचे पती ऍड.श्यामराव परूळेकर यांनी अथकपणे केले. ठाणे जिल्ह्यातील वारल्यांना संघटित करून त्यांचा सावकारांच्या शोषणातुन बचाव करणे. हे अवघड काम गोदावरी परूळेकरांनी केले आणि माणुस जागा झाला हे त्यांचे आत्मचीरत्र प्रसिध्द आहे.

  • कीर्ती शिलेदार

    संगीत नाटके व स्वतंत्र मैफलींच्या निमित्ताने भारतभर तसेच इंग्लंड-अमेरिकेत त्यांचे कार्यक्रम झाले आहेत.सौंदर्यशोधक दृष्टीने शास्त्रीय संगीतातील अकारण होणारे शब्दोच्चारांचे दुर्लक्ष टाळले जावे, या हेतूने त्यांनी ’स्वर ताल शब्द संगती’या नावाचे हे संशोधनात्मक पुस्तक लिहिले आहे.

  • बालकुमार साहित्यकार सुधाकर प्रभू

    सुधाकर प्रभू मराठी भाषेतील बालकुमार साहित्यकार होते.

    सुधाकर प्रभू यांचा जन्म गोव्यात पेडणे गावी झाला. शालेय शिक्षणानंतर महाविद्यालयीन शिक्षणाकरता ते मुंबईला गेले. या काळातच वयाच्या अठराव्या वर्षी `आनंद` व भा.रा. भागवतांच्या `बालमित्र` या मासिकांत त्यांच्या कथा प्रकाशित झाल्या. बी.ए. व बी.एड्. पदव्या संपादल्यानंतर त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला.

    सुधाकर प्रभू यांनी दोनशेहून अधिक पुस्तके लिहिली. त्यातील `राजू प्रधान` ही व्यक्तिरेखा भा.रा. भागवतांच्या `फास्टर फेणे`प्रमाणे लोकप्रिय ठरली.

    पुस्तकांखेरीज `साप्ताहिक स्वराज्य`, `रविवार सकाळ`, `साप्ताहिक हिंदू`, `साधना` यासारख्या नियतकालिकांतूनही त्यांनी लेखन केले.

    बालसाहित्यातील कामगिरीबद्दल गोवा कला अकादमी, गोवा सरकार, भारत सरकारचे पुरस्कार त्यांना लाभले.

    कोल्हापूर येथे 1991 मध्ये झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.

    30 जुलै 2007 रोजी पुणे येथे सुधाकर प्रभू यांचे निधन झाले.

  • भालचंद्र श्रोत्री

    भालचंद्र श्रोत्री हे अलिबाग-उरण परिसरातील सामाजिक कार्यकर्ते होते.

  • रेव्ह. जस्टिन एडवर्ड अॅबट

    मराठी संतवाङ्मयाचे अभ्यासक रेव्ह. जस्टिन एडवर्ड अॅबट यांनी “पोएट सेंट्स ऑफ महाराष्ट्र” अशी ग्रंथमाला तयार केली. या मालेतून त्यांनी एकनाथी भागवत, तुकारामांची गाथा, दासोपंत, रामदास, संत बहिणाबाई अशी १२ पुस्तके इंग्रजीतून लिहिली.

    “स्टोरीज ऑफ इंडियन सेंट्स” हा महिपतीकृत “भक्तविजया़” चा अनुवादही अॅबट यांनी, पं. नरहर रा. गोडबोले यांच्या सहकार्याने केला होता.

    संतवाङ्मयाप्रमाणेच पुरातत्वीय शिलालेखांचे वाचन, अभ्यास व भाषांतर यांतही त्यांना रस होता.

    १९ जून १९३२ रोजी त्यांचे निधन झाले.

    # Rev. Justin Abbot Edward
    # अॅबट, रेव्ह. जस्टिन एडवर्ड

  • लहू (काळू) खाडे

    लहू संभाजी खाडे, अर्थात मराठी वगनाट्यांत गाजलेल्या काळू-बाळू जोडीतील काळू यांचा जन्म १६ मे १९३३ या दिवशी झाला होता. लहू खाडेंनी मराठी तमाशा कलावंत, अभिनेते म्हणून आपली छाप रसिक मनांवर उमटवलीच! पण ते स्वत:तमाशा फडाचे मालक होते. घरात तीन पिढ्यांची तमाशा परंपरा होती व तीच परंपरा त्यांनी पुढे सुरू ठेवली. दरवर्षी ठिकठिकाणच्या यात्रा-जत्रांमधून ते तंबू लावून तमाशा फड गाजवायचे.