जेव्हा जेव्हा शांताराम प्रॉडक्शनच्या चित्रपटांचा उल्लेख होईल किंवा प्रभातच्या उत्कृष्ट कलाकृतींचा विचार होईल तेव्हा नाजूक चेहर्याची, गोड गळ्याची, रुपसंपन्न नायिका म्हणून जयश्री शांताराम यांचं नाव कायमच स्मरणात राहिल.
फलंदाज आणि यष्टीरक्षक म्हणून क्रिकेटचे मैदान गाजवणावर्या माधव मंत्री यांचा जन्म १९२१ साली नाशिकमध्ये झाला होता. अत्यंत कडक शिस्तीचे क्रिकेटपटू म्हणून ओळखले जाणारे माधव मंत्री यांनी १९४१ रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. शालेय जीवनातच त्यांना क्रिकेटची गोडी लागली. तर १९५१ मधील इंग्लंड दौकर्यात त्यांना भारतीय संघात जागा पटकावली होती.
अतुल कुलकर्णी यांनी १९८६ साली लातूर शहरातून पत्रकारितेची सुरुवात केली.सध्या मुंबईत दैनिक लोकमतचे ब्युरो चीफ, विशेष प्रतिनिधी म्हणून लोकमतमध्ये कार्यरत. सामाजिक विषयांना स्पर्श करीत, व्यवस्थेतील चुकांवर प्रहार करीत केलेले लिखाण ही जमेची बाजू. विविध वृत्तमालिका लिहीताना सामान्य माणूस केंद्रस्थानी कसा राहील याचा सातत्याने केलेला प्रयत्न कायम दिसून येतो.
माईणकर, सुधीर
‘तबला वादन : कला और शास्त्र’ हे हिंदी पुस्तक आज देशभरच्या हिंदुस्थानी संगीत विद्यालयांत क्रमिक पुस्तकाच्या दर्जाचे ठरले आहे. त्याचे लेखक म्हणजे पं. सुधीर माईणकर. पंच्याहत्तरीनिमित्त उद्याच्या शनिवारी त्यांचा होणारा सत्कार, हा त्यांना ‘प्रसिद्धी’ देणारा अपवादात्मकच सोहळा ठरेल. एरवी, प्रसिद्धी आणि ‘कीर्ती’ या किती निरनिराळय़ा गोष्टी आहेत, हे पाहायचे असेल तर सुधीर माईणकर यांच्या कारकीर्दीकडे पाहावे! तबलावादक म्हणून नाव कमावण्याची संधी असूनही सांगीतिक विद्वत्ता वाढवण्याची अवघड वाट माईणकर यांनी स्वीकारली.
‘अनेकांना ऐकता आले, त्यांनी संगीतात शोधलेली सौंदर्यस्थळे तबल्यात शोधून पाहाता आली,’ याचेच समाधान पं. माईणकर यांना अधिक आहे.. असे समाधान मिळवणारा गुरू विद्यार्थ्यांना थोडक्या काळातही किती भरभरून देऊ शकतो, याचा प्रत्यय मुंबईच्या राष्ट्रीय संगीत नाटय़ केंद्रात (एनसीपीए) माईणकर यांच्या तबला कार्यशाळांमध्ये सहभागी झालेल्या अनेक तरुण वादकांना तसेच देशभरच्या विद्यापीठांत संगीताचे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या अनेकांना आला आहे. ‘तबल्याचे व्याकरण, भाषा आणि सौंदर्यशास्त्र यांचा सखोल अभ्यासक’ ही माईणकर यांची प्रसिद्धी नव्हे, तर सिद्धीतून आलेली कीर्ती आहे. ‘..कला और शास्त्र’च्या इंग्रजी आवृत्तीच्या प्रकाशन सोहळय़ाला झाकीर हुसेन मुद्दामहून आले, ते त्यांना ही कीर्ती जवळून माहीत होती, म्हणूनच. वडील विष्णुपंत यांचा तबल्याचा नाद शालेय वयातच अंगी मुरलेल्या सुधीर यांनी बडम्े गुलाम अली, डी. व्ही. पलुस्कर, ॐकारनाथ ठाकुर, केशरबाई केरकर आणि आमीर हुसेनखाँ यांसारख्या दिग्गजांना ऐकले. तरुणपणी तबल्याची ‘गत’ हा त्यांचा खास अभ्यासविषय झाला, तो तबल्यातील दिल्ली घराण्याचे खलीफा इनाम अली खान यांची शागिर्दी केल्यानंतर. अजराडा, बनारस आदी घराण्यांचा बाजही त्यांनी अभ्यासला, पण ‘दाया’वर केवळ तर्जनी व शेजारचे बोट ठेवून तालाचे चापल्य आणि शुद्धता राखणारा दिल्ली घराण्याचा ‘चटिका बाज’ ही माईणकरांची खास शैली. गुरू म्हणून त्यांचे इनेगिने शागिद आहेत. परंतु अनेक विद्यार्थी आणि अभ्यासक यांनाही पं. माईणकर गुरुस्थानीच आहेत व राहतील.
श्री उदय वैद्य हे ट्रेनिंग आणि एच आर या क्षेत्रातील नावाजलेले सल्लागार आहेत. ते या विषयांवर नियमितपणे व्याख्यानेही देतात.
श्री उदय वैद्य हे कल्याण येथील रहिवासी आहेत.
येत्या बुधवारी १२ मे रोजी सकाळी न्या. सरोश होमी कापडिया भारताचे ३८ वे सरन्यायाधीश म्हणून सूत्रे स्वीकारतील तेव्हा न्यायव्यवस्थेतील या सर्वोच्च पदाच्या बाबतीत एक स्थित्यंतर घडेल. आजच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना भारतीय राज्यघटनेने कापडिया, (न्या.) सरोश
१९५० मध्ये झाली. न्या. कापडिया हे स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिले सरन्यायाधीश ठरतील. त्यादृष्टीने ते स्वातंत्र्योत्तर पिढीचे न्यायसंस्थेतील पाईक ठरतील.
स्वातंत्र्यानंतर अवघ्या ४६ दिवसांनी २९ सप्टेंबर १९४७ रोजी मुंबईत एका गरीब पारशी कुटुंबात जन्मलेल्या न्या. सरोश कापडिया यांचा गेल्या ६३ वर्षांचा जीवनपट खडतर परिस्थितीवर गुणवत्ता, हुशारी आणि जिद्द या जोरावर मात करून निवडलेल्या क्षेत्रात सर्वोच्च स्थान कसे प्राप्त करता येते याचा वस्तुपाठ घालून देणारा आहे. गुणवत्ता असली तरी संधी मिळावी लागते. न्या. कापडिया यांना अशा संधी मिळाल्या व त्यांनी त्या संधी दोन्ही हातांनी कवटाळून त्यांचे सोने केले. भारतातील पारशी हा अत्यंत अल्पसंख्य असला तरी या समाजाने भारताला विविध क्षेत्रात अनेक अनमोल रत्ने दिलेली आहेत. विशेषत: मुंबईच्या कायदा आणि न्यायविश्वात एकेकाळी या समाजाचा दबदबा होता. मुंबई उच्च न्यायालयात किमान एक तरी न्यायाधीश या पारशी समाजाचा असायलाच हवा हा गेल्या कित्येक दशकांचा अलिखित पायंडा आजही अबाधित आहे. या दृष्टीने न्या. कापडिया हे न्यायाधीश होण्यात परंपरेचा भाग असला तरी त्यातही एक वेगळेपण आहे. वकिलीची अजिबात परंपरा नसलेल्या घरात जन्माला येऊनही त्यांनी आधी वकिलीच्या व नंतर न्यायदानाच्या क्षेत्रात यशोशिखर गाठले. शिक्षणाची खूप आवड होती पण घरची परिस्थिती नव्हती. त्यामुळे न्या. कापडिया यांनी वयाच्या विशीत फोर्टमधील बेहरामजी जिजीभॉय प्रा. लि. या कंपनीत शिपाई, भाडेवसुली करणारा मुनीम व कारकून अशा सबकुछ पदावर नोकरी पत्करली. त्यांचा मालक त्यांना रोख पगार देत नसे. पण कॉलेजची फी भरत असे. ही नोकरी सात वर्षे करीत असताना त्यांनी बी.ए. व नंतर कायद्याच्या पदवीपर्यंतचे शिक्षण गुणवत्तापूर्वक पूर्ण केले. मे. गगराट अँण्ड कं. या नामवंत सॉलिासिटर फर्मचे भागीदार आर. ए. गगराट यांनी न्या. कापडिया यांना वकिलीची दिशा दाखविली. फिरोज दमानिया, के. जी. अभ्यंकर, साळी, परुळेकर, सी. आर. दळवी, सी. ज. सावंत, फली नरिमन आणि सोली सोराबजी अशा अनेक नामवंत वकिलांनी त्यांच्यातील वकील घडविण्यात मोलाची कामगिरी केली. पारशी समाजाने भारताला अगणित नामांकित वकील व न्यायाधीश दिलेले असले तरी देशाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान होणारे न्या. कापडिया हे केवळ दुसरे झोराष्ट्रियन न्यायाधीश असतील. न्या. एस. पी. भरुचा यांच्या निवृत्तीनंतर बरोबर सात वर्षांनी ते या पदावर विराजमान होतील. कितीही गुणवत्ता असली तरी प्रत्येकाला योग्य वेळी ‘लिफ्ट’ देणारा कोणीतरी ‘गॉडफादर’ लागतोच. न्या. कापडिया यांना न्या. भरुचा यांच्या रूपाने असा ‘गॉडफादर’ लाभला, असे म्हणण्याने दोघांच्याही महत्तेत जराही उणेपणा येत नाही. ८ ऑक्टोबर १९९१ ते ४ ऑगस्ट २००३ अशी पूर्ण १२ वर्षे मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश राहिलेल्या न्या. कापडिया यांची त्यापुढील वाटचाल मात्र जलदगतीने झाली. मुंबईहून हिमाचल प्रदेशात मुख्य न्यायाधीश म्हणून गेलेले न्या. कापडिया यांची त्यानंतर चारच महिन्यांत म्हणजे १८ सप्टेंबर २००३ रोजी सर्वोच्च न्यायालयावर न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली. न्या. भरुचा यांच्या सरन्यायाधीशपदाचा तो अगदी शेवटचा काळ होता. न्या. कापडिया सर्वोच्च न्यायालयावर गेले तेव्हा त्यांच्याकडे न्या. भरुचा यांचे भावी उत्तराधिकारी म्हणूनच पाहिले गेले. ‘आम्हा भय कसले, आमचा कैवारी नारायण!’ या संत तुकारामांच्या तत्वज्ञानाचा आदर्श ठेवून गेली २० वर्षे निर्भीडपणे न्यायदान करणाऱ्या न्या. कापडिया यांनी अनेक महत्वाच्या प्रकरणांमध्ये पथदर्शक निकाल दिले आहेत. तरीही व्यापारी व व्यावसायिक वाद, करविषयक प्रकरणे ही त्यांची विशेष खासियत म्हणावी लागेल. मुंबई उच्च न्यायालयात असताना घडलेल्या हर्षद मेहता याच्या महारोखे घोटाळ्याचा गुंता दिवाणी आणि फौजदारी प्रकरणांच्या रूपाने सोडविण्याचे सुरुवातीचे जिकिरीचे काम त्यांनीच विशेष न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून लीलया केले होते. न्यायाधीशांच्या भ्रष्टाचार व गैव्यवहारांच्या जाहीर चर्चेने वरिष्ठ न्यायसंस्था विश्वासार्हता पुन्हा संपादित करण्याच्या प्रयत्नात असताना आणि न्यायाधीशांच्या नेमणुकींच्या बाबतीत प्रस्थापित ‘कॉलेजिएम’पद्धतीच्या परिणामकारकतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात असताना सरन्यायाधीश होणाऱ्या न्या. कापडिया यांना सरन्यायाधीशपदाचे हे सतीचे वाण सुमारे सव्वा दोन वर्षे म्हणजे २९ सप्टेंबर २०१२ पर्यंत सांभाळायचे आहे.
वळीव, धिंड, भेटीगाठी, खुळ्याची चावडी, खेळखंडोबाचा आदी कथासंग्रह तर “टारफुला” ही कादंबरी गाजली. “एक गाव बारा भानगडी”, “पाहुणी” आदी चित्रपटांच्या पटकथाही शंकर बाबाजी पाटील यांच्याच.
मराठी चित्रपट, नाटक तसेच दूरचित्रवाणी वरील भारदस्त आवाज आणि रांगडं व्यक्तीमत्व लाभलेल्या तसंच चरित्र व खलनायक अश्या विविधां व्यक्तीरेखा साकारणारे ज्येष्ठ व बहुआयामी अभिनेते कुलदीप पवार यांचा जन्म २४ डिसेंबर १९४९ सालचा. कुलदीप पवार मूळचे कोल्हापूरचे. त्यां
श्री विवेक पटाईत हे भारताच्या पंतप्रधान कार्यालयात कार्यरत असून ते नियमितपणे चारोळी तसेच इतर अनेक प्रकारचे मराठी लेखन करत असतात.
दुर्गा नागरी सहकारी पतसंस्था, जिजामाता सहकारी बॅंक आणि जिजामाता महिला सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून वर्षा माडगूळकर यांनी महिलांना स्वावलंबी बनविले. सहकारातले आगळे उदाहरण उभे केले. सामान्य कुटुंबात जन्म घेऊन त्यांनी घेतेलेली बरारी चकित करणारी आहे...
कर्तबगार पंखांची भरारी
Copyright © 2025 | Marathisrushti