लेखक आणि अनुवादकार भालचंद्र दत्तात्रय खेर
November 7, 2017
December 15, 2010
गणेश वासुदेव मावळणकर हे १९५२ साली स्वतंत्र भारतात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीद्वारे, तत्कालीन मुंबई प्रांतात असलेल्या अहमदाबादमधून लोकसभेवर निवडून गेलेले संसद सदस्य होते.
June 25, 2022
कुष्ठरोगाचं निर्मूलन व्हावं, कुष्ठरोग्याला समाजात मानाचं स्थान मिळावं ही महात्मा गांधींची इच्छा होती. डॉ. सामंत यांनी गांधीजींचा हा संदेश आपल्या कामात उतरवला. त्यांच्या कामाचा भारतीयांना गर्व असेल,’ हे उद्गार आहेत, भारताचे उपराष्ट्रपती अन्सारी यांचे. डॉ. जगदीश सामंत यांना मानाच्या अशा, ‘ गांधी इंटरनॅशनल अवॉर्ड ‘ ने गौरवण्यात आलं आहे.
August 9, 2017
कृषिप्रधान असलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशात कृषी विद्यापीठांची स्थापना केली. तेव्हा कृषीक्षेत्रात नव्या संशोधनाची आवश्यकता होती, तशीच हे संशोधन सामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहचण्याचीही गरज होती. नेहरूंच्या मनातले हे स्वप्न साकार करण्यासाठी ज्या ज्या कृषी तज्ज्ञांनी अथक प्रयत्न केले, त्यामध्ये राहुरी कृषी विद्यापीठाचे मावळते कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख यांनी जे कष्ट केले आहेत, त्याला तोड नाही.
उद्योगाच्या क्षेत्रात संशोधन आणि त्याचा प्रत्यक्ष वापर ही साखळी इतकी कमी कालावधीची आहे की, जगात कोणतेही नवे संशोधन होताच, त्याचा दैनंदिन जीवनात तातडीने वापर कसा करता येईल, याचा विचार उद्योगक्षेत्रातील सगळेचजण करत असतात. मात्र भारतातील कृषी विद्यापीठे आणि सामान्य शेतकरी यांच्यातील दुरावा बराच काळ तसाच राहिला. त्यामुळे कोणत्याही पिकाचे नवे वाण तयार करण्यात यश मिळाले, तरी त्याचा प्रत्यक्ष वापर होण्यासाठी बराच कालावधी जावा लागत असे. डॉ. देशमुख यांनी कृषी विद्यापीठे ही शेतकऱ्यांची तीर्थस्थाने कशी होतील, याकडे लक्ष दिले. राहुरी कृषी विद्यापीठ शेतकऱ्यांची पंढरी झाली, याचे कारण शेतकरी आणि संशोधक यांच्यात समन्वय निर्माण करण्यासाठी त्यांनी घेतलेले अपार कष्ट. त्यासाठी शेतकरी शास्त्रज्ञ मंच, कृषी तंत्रज्ञान सप्ताह, इंटरनेटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घरबसल्या सल्ला असे अनेक उपक्रम डॉ. देशमुख यांनी यशस्वीरीत्या राबवले. त्यांना भारतातल्या शेतकऱ्यांची मानसिकता चांगलीच ठाऊक आहे. हे संशोधन शेतकऱ्यांच्या फायद्याचे ठरत नाही, तोवर त्याला प्रतिसाद मिळणे कठीण आहे, याची जाणीव त्यांना होती. हरभऱ्याचे पीक घेताना येणारे उत्पादन वाढण्यासाठी त्यांनी केलेले संशोधन अक्षरश: वरदान ठरले आहे.
फुले जी-५, फुले जी-१२, विजय, विशाल, विराट, विहार, दिग्विजय या हरभऱ्याच्या जाती त्यांनी विकसित केल्या. पूर्वी हरभऱ्याचे उत्पादन फार कमी येत असे. या नव्या वाणानंतर त्यात तिपटीने वाढ झाली. कडधान्यांच्या उत्पादनाची कमतरता भरून काढण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची देशपातळीवर प्रशंसा झाली. सध्याच्या शेतीची चौकट बदलण्यासाठी शेतकऱ्याची मानसिकता बदलणेही आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन, त्यांनी जगात येऊ घातलेल्या जैवतंत्रज्ञानाच्या विकासाला हातभार लावण्यासाठी एका स्वतंत्र प्रयोगशाळेची उभारणी केली. खासगी कंपन्यांच्या सहकार्याने विद्यापीठाच्या क्षेत्रावर जीएम बियाणे विकसित करण्याचे त्यांचे प्रयोग पर्यावरणवाद्यांच्या दृष्टीने वादग्रस्त ठरले आणि कोल्हापूरच्या केंद्रावर हल्लाही झाला. त्यावेळी शास्त्रज्ञांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहत ते केंद्र सुरू राहील याची दक्षता त्यांनी घेतली. सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्राला असलेल्या मर्यादा लक्षात घेऊन त्यांनी खासगी उद्योगांच्या मदतीने प्रयोग सुरू केले.
महिको, मोसॅन्टो, जैन, पारस, महिंद्रा, कोरसपाइप यांच्यासह अनेक कंपन्यांच्या मदतीने कृषी क्षेत्रातील संशोधनास चालना देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी सुरू केला आणि त्याला उत्तम प्रतिसादही मिळाला. जगाला भेडसावणाऱ्या तापमानवाढीचा कृषी क्षेत्रावर सर्वात मोठा परिणाम होऊ शकेल, हे लक्षात घेऊन डॉ. देशमुख यांनी नवी पीकपद्धती (क्रॉप पॅटर्न) विकसित करण्याची योजना आखली आहे. सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेतीबाबत टोकाचा आग्रह न धरता मध्यममार्ग अनुसरून शेतकऱ्याचे हित पाहणारे ते आघाडीचे शास्त्रज्ञ आहेत. स्वत:च्या गुणवत्तेवर पीएच.डी.पर्यंत मजल मारणारे डॉ. देशमुखांचा, शालेय शिक्षणात कृषी हा विषय समाविष्ट व्हायला हवा, असा आग्रह आहे. राष्ट्रीय कृषी संशोधन परिषदेने राहुरी कृषी विद्यापीठाला सवरेत्कृष्टतेचे प्रमाणपत्र देऊन त्यांच्याच कार्याचा गौरव केला आहे. जगातील अनेक मान्यवर पुरस्कारांचे धनी असलेले डॉ. राजाराम देशमुख निवृत्त झाले ते केवळ नियमानुसार. या नंतरही त्यांचे कार्य असेच जोमदार असेल, अशी कामना देशातील सगळेच शेतकरी करतील, यात शंका नाही.
August 5, 2017
कथालेखक, नाटककार म्हणून रणजित देसाई यांचा परिचय असला तरी एक उत्कृष्ट दर्जाचे कादंबरी लेखक म्हणूनच महाराष्ट्राला भावलेले व्यक्तिमत्त्व. ८ एप्रिल १९२८ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील कोवाड हे आहे. माध्यमिक शाळेत असतानाच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली.
February 4, 2010
प्रल्हाद केशव अत्रे, विनायक दामोदर सावरकर, पु.ल. देशपांडे, चिं.वि. जोशी, अ.वा. वर्टी यांच्यासह अनेक साहित्यिकांच्या पुस्तकांची मुखपृष्ठे मुळगावकरांच्या कुंचल्याने सजली. त्याचप्रमाणे दीपलक्ष्मी, धनुर्धारी, वसंत, अनुप्रिता, नंदा, माधुरी, माणिक, अलका, पैंजण अशा अनेक नियतकालिकांची व त्यांच्या दिवाळी अंकांची मुखपृष्ठे मुळगावकरांच्या कुंचल्याने साकारली.
July 20, 2022
मंगेशकरांसह सुरेश वाडकर, सुमन कल्याणपूर, कविता कृष्णमूर्ती, साधना सरगम ते स्वप्नील बांदोडकर पर्यंत सुमारे ७८ विविध गायकांचे आवाज त्यांनी आपल्या ध्वनिफितींच्या माध्यमातून लोकांसमोर आणले. भावगीते, भक्तिगीते, लोकगीते, अभंग, आरत्या, संतरचना, बालगीते असे अनेक गीतप्रकार त्यांनी संगीतबद्ध केले.
July 7, 2022
ऑल इंडिया रेडिओमध्ये प्रोड्यूसर म्हणून काम करताना गजेंदगडकर यांना गंगूबाई हनगल, कुमार गंधर्व, मल्लिकार्जुन मन्सूर यांच्यासारख्या अनेक श्रेष्ठ गायकांचा सहवास लाभला.
July 5, 2022
अरूण साधू हे मराठी भाषेतील प्रख्यात लेखक, पत्रकार तसेच आंतरराष्ट्रीय सामाजिक निरिक्षक व समीक्षक आहेत.
December 15, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti