डॉ. अनिल अवचट हे मराठीतील प्रसिद्ध लेखक, समाजसेवक आहेत. त्यांचे केवळ लिखाणच नव्हे तर त्यांचे सामाजिक कार्य ही आदर्श आहे. अनिल अवचट हे पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र याचे संचालक आहेत.
शशीकांत कोनकर ह्यांच्या मते ठाणे हे जणू मुंबईजवळचे पुणे आहे. उद्याच्या ठाण्याकडे पाहताना ते म्हणतात की ते नितांत सुंदर, स्वच्छ व संस्कृती जपणारे असावे. ठाणे विद्येचे माहेरघर आहे असंही ते म्हणतात.
१९३६ साली मामा पेंडसे यांनी ’रमेश नाटक मंडळी’त प्रवेश मिळवला. त्यांच्या ’आग्र्यायहून सुटका’ या नाटकात केलेल्या कामामुळे मामांचे नाव सर्वमुखी झाले.
व्यावसायिक रंगभूमीवर त्यांचं पहिलं नाटक ‘ गंध निशिगंधाचा ‘ हे होतं. पुढे त्यांनी अनेक नाटकांमध्ये आपल्या अभिनयाचं गारुड , रसिक प्रेक्षकांच्या मनावर केलं. त्यातील सध्या चर्चेत असलेलं सोयरे सकळ ह्या नाटकात त्यांनी दुहेरी भूमिका साकारल्या आहेत.
सुधीर नांदगावकर, हे आंतरराष्ट्रीय चित्रपट समीक्षक संघटनेच्या भारतीय शाखेचे अध्यक्ष होते. त्यानिमित्त जगातील अनेक महोत्सवात ज्युरी म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांनी आतापर्यंत बर्याच पुस्तकांचे लेखनही केले आहे.
राजमाता विजयाराजे शिंदे यांचे चिरंजीव माधवराव शिंदे यांनी राजकारणात प्रवेश करत १९७१ मध्ये गुना लोकसभा मतदारंसघातून निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर १९८४ पर्यंत ते गुनातून खासदार म्हणून निवडून आले.
मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील चतुरस्त्र अभिनेते सुधीर जोशी यांचा जन्म १९४८ रोजी मुंबईत झाला. सुधीर जोशी यांनी मुंबईच्या कीर्ती कॉलेजातून अर्थशास्त्रात बी.ए. केले होते. अभिनया कडे वळण्या आधी ते मुंबईतल्या ब्लॅकी ॲड सन्स या प्रकाशन संस्थेत विपणन अधिकारी होते.
सुधीर जोशी यांच्या निधनानंतर ते करत असलेल्या "मातीच्या चुली' या चित्रपटातील त्यांची अर्धवट राहिलेली भूमिका अभ्यंकर यांनी पूर्ण केली होती. सुधीर जोशी यांचे १४ डिसेंबर २००५ रोजी निधन झाले.
परेश मोकाशी यांचे गाव रायगडमधलं चौक. पणजोबा पोस्टमास्टर होते. जन्म पुण्याचा असला तरी सगळं शिक्षण लोणावळ्याच्या पुरंदरे हायस्कूलमध्ये झालं. परेश मोकाशी यांचे वडील पत्रकार होते.
आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून पाटील यांनी गावरान विषय, सामाजिक प्रश्न तसंच वास्तवता मांडली. ‘सावरखेड-एक गाव’ , ‘जोगवा’, ‘७२ मैल एक प्रवास’, ‘पांगिरा’, ‘सनई चौघडे’, ‘ऑक्सिजन’, ‘ब्लाईंड गेम’; असे वैविध्यपूर्ण विषय दिग्दर्शित करुन प्रेषकाचं पुरेपूर मनोरंजन होईल याची खात्री घेतली.
ठाणे महापालिकेचे माजी महापौर अशोक वैती यांच्या दमदार व खमक्या राजकीय नेतृत्वामुळे त्यांच्या कार्यकाळात ठाण्याचा झपाट्याने विकास झाला.
महापौरपदी विराजमान झाल्यानंतर, या शहराचा आधुनिक व अद्ययावत पायाभुत सुविधांनी चौफेर विकास करण्याचा विडा उचललेल्या वैती यांनी एकामागोमाग एक अशा कल्पक व कलात्मक योजना आखून व सर्वसामान्य चाकरदार जनतेला अग्रस्थानी ठेवून या शहराचा चेहरामोहराच बदलवून टाकला. चांगले रस्ते व पदपथ, सायकल ट्रॅकची आदर्श रचना, आरोग्य सेवेच्या प्रगत सुविधा, उच्चस्तरीय शिक्षण व मुबलक पाणी पुरवठा या मुलभूत घटकांना पुरेसा न्याय देणारा शास्त्रशुध्द विकास आराखडा त्यांच्या अधिपत्याखाली साकारला गेल्याने, हे शहर वेगाने आता एका सस्टेनेबल विकासाचे उत्कृष्ठ असे द्योतक ठरत चालले आहे.
हरित विकास प्रकल्प, हरित जनपथ प्रकल्प अशा पर्यावरणीय समतोलाशी आपलं नातं सांगणार्या प्रकल्पांच्या सामावेशामुळे, हा आराखडा पर्यावरणाशी सौहार्दपुर्ण संबंध प्रस्थापित करेल याची वैती यांनी पुरेशी दक्षता घेतली. त्यामुळे पर्यावरणमित्रांकडून देखील या उपक्रमाला हिरवा कंदिल मिळालेला.
घनकचर्याचे शास्त्रोक्त पध्दतींनी विघटन करण्याकरिता बायोमिटोनायझेशन प्रकल्प, घरोघरी कचरा संकलन, तसेच सामाजिक पायाभुत सुविधांअंतर्गत प्रभाग कार्यालये बांधणे, भाजी मंडया उभारणे, मिनी स्टेडियमच्या रचना साकारणे, क्रिडा संकुलांची उभारणी करणे अशा अनेक सार्वजनिक बांधकाम योजनांमुळे ठाणेकरांना दिलासा मिळाला. या सर्व योजनांची आखणी व त्यांच्या समर्थ अंमलबजावणीचे श्रेय अर्थात अशोक वैती यांना जाते. त्यांनी ठाणे शहरातील रस्ते वाहतुकीच्या विकासासाठी दिलेले योगदानदेखील केवळ अतुलनीय असेच म्हणावे लागेल. रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण, पुलांचे रूंदीकरण, नव्या उड्डाणपुलांची रचना व या शहरातील अतिशय निकडीच्या बनत चाललेल्या अशा पार्किंग सुविधेच्या प्रश्नाचा निकाल लावण्याकरिता त्यांनी केलेली, विविध महापालिका वाहन तळांची निर्मिती, त्यांच्या दुरदृष्टीची व सामाजिक तळमळीची साक्ष देते. महापालिकेतर्फे मोक्यांच्या जागांवर ट्रक टर्मिनसची बांधणी, ही योजना देखील त्यांनीच लढवलेल्या एका कल्पक शक्कलीची परिणीती आहे.
केंद्र शासनाच्या उर्जा मंत्रालयाच्या अकराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत ठाणे शहराची निवड सौर शहरांच्या यादीमध्ये झाल्यामुळे येथे सौर उर्जेवर चालणार्या अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांची नांदी झाली. अशा प्रकल्पांना आर्थिक पाठबळ देण्यामध्ये मोलाची भुमिका त्यांनी बजावली आहे. तसेच ठाण्यामधील ऐतिहासिक अशा मासुंदा तलावावर लेझर शोची अभिनव रचना साकारण्यामागेदेखील त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
क्रीडा क्षेत्रातील हिरे पारखून त्यांना विनामुल्य प्रशिक्षण शिबीरे, व तज्ज्ञ प्रशिक्षकांचा सहवास लाभण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान अगदी वाखाणण्याजोगे आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti