(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • डॉ. श्यामला वनारसे

    श्यामला वनारसे मूळ पेशाने मानसशास्त्रज्ञ. मानव संसाधन विषयातल्या तज्ज्ञ. अनेक कंपन्या व संस्थांमधून प्रशिक्षक म्हणून त्यांचा नावलौकिक. शाळा, महाविद्यालये, कंपन्या, सामाजिक संस्था, चळवळी, महिला संघटना, अशा सर्वत्र त्यांनी चित्रपट या माध्यमाचा कल्पक वापर करून त्या त्या विषयांची मांडणी केली. मुले आणि महिला हे त्यांचे विशेष आस्थेचे समूह. तिथेही त्यांनी आवर्जून चित्रपट या माध्यमाचा शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक संदर्भात वापर केला. इतर कलामाध्यमाविषयीही त्यांना आस्था आहे. संगीताचे मानसशास्त्र, घाशीराम कोतवाल- एक अभ्यास ही त्यांची पुस्तके याची साक्ष आहेत. सत्यजित राय आणि भारतीय मन्वंतर या पुस्तकातून त्यांनी सत्यजित राय यांच्या चित्रपटांतून उभ्या राहणार्‍या भारतीय समूहमनाचे विस्तृत विश्लेषण केले आहे.

    कलेचा वारसा श्यामलाताईंना बालपणापासूनच लाभला. वडील फोटोग्राफर होते. दृश्यकलांकडे पाहण्याची दृष्टी तिथून मिळाली, पण निमित्त घडले पुण्यातल्या एका चर्चासत्रातल्या व्याख्यानाचे. फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्युटचे तत्कालीन संचालक प्रा. सतीश बहादूर यांचे एक व्याख्यान श्यामलाताईंनी ऐकले आणि चित्रपटांकडे पाहण्याची त्यांची दृष्टीच बदलून गेली. चित्रपटांचा कलामाध्यम म्हणून विचार, सूक्ष्म विश्लेषण, मौलिक लेखन, भाषांतरे करून त्यांनी चित्रपट अध्यापनाची एक पद्धती विकसित केली. विविध समूह व शैक्षणिक संस्थांसाठी चित्रपटविषयक अभ्यासक्रम आखण्यात पुढाकार घेऊन विलक्षण झपाटलेपणाने त्यांनी चित्रपटसंस्कृतीचा प्रसार करण्याचे काम केले. बहादुरांचे लेखन संग्रहित करणे, प्रसिद्धीपरान्मुख असणार्‍या बहादुरांच्या लेखनाला उचित व्यासपीठ मिळवून देणे, त्यांच्या लेखनाची मराठीतून भाषांतरे करणे ही कामेही त्यांनी गुरूनिष्ठेतून केली. आज प्रा. सतीश बहादूर हयात नाहीत, परंतु बहादुरांनी घातलेला चित्रपट विश्लेषण, लेखन, अध्यापनाचा हा पाया विस्तृत करण्याचे कार्य त्या आज वयाची सत्तरी ओलांडल्यावरही करीत आहेत. चित्रपट संस्कृतीतील बहादूर स्कूलच्या त्या एकमेव प्रसारक आहेत.

    मुंबईत झालेल्या दहाव्या आशियायी चित्रपट महोत्सवात श्यामला वनारसे यांना सत्यजित राय स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. चित्रपटसंस्कृतीचा व्रतस्थपणे प्रसार करणार्‍या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार आजवर प्रा. सतीश बहादूर, अरुणा वासुदेव, बासू चटर्जी, एच. एन. नरहरी राव यांना देण्यात आला आहे. डॉ. श्यामला वनारसे हेदेखील याच गौरवशाली परंपरेतले एक नाव.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


      August 9, 2017


  • त्र्यंबक शंकर शेजवळकर

    निजाम-पेशवे संबंध, पानिपत : १७६१, श्रीशिवछत्रपती इ. त्यांचे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. इतिहासाप्रमाणेच समाजशास्त्र हाही त्यांच्या चिंतनाचा विषय होता.

      August 2, 2017


  • द. पां जोशी

    जोशी, द. पां.

    स्वातंत्र्योत्तर काळात हैदराबादसारख्या उर्दू व तेलुगू या भाषांचा प्रभाव असलेल्या शहरात मराठी भाषा, साहित्य व संस्कृती समृद्ध करण्यात ज्यांनी तोलामोलाचे योगदान दिले, अशांमध्ये प्रा. द. पं. जोशी हे ठळक नाव. आपल्या सुमारे ५० वर्षांच्या वाङ्मयीन व संघटनात्मक कारकीर्दीत स्वत:ची विपुल ग्रंथसंपदा निर्माण करण्यावर भर देण्यापेक्षा संशोधन व संपादनाचा पिंड जोपासणाऱ्या या भाषाप्रभूने संपादित केलेल्या महत्त्वाच्या ग्रंथांपैकी एका ग्रंथाचे शीर्षक ‘काळाच्या पडद्याआड’ असे होते.

    ते द. पं. नुकतेच काळाच्या पडद्याआड गेल्याने हैदराबादची मसाप, मराठी महाविद्यालय यांसह तेथील समस्त मराठी भाषकांचा आधारवड कोसळला आहे. हैदराबादेत मराठी वातावरण तयार होत असतानाच्या काळात तेथे आधी विद्यार्थी म्हणून गेलेल्या आणि मग प्राध्यापकी पेशाच्या निमित्ताने स्थायिक झालेल्या द.पं.नी पुढच्या पाच दशकांत मराठी बहुअंगाने समृद्ध करण्याचे कार्य व्रतस्थपणे पार पडले. डॉ. नांदापूरकर, भालचंद्र कहाळेकर हे त्यांचे गुरू. त्यांच्या पश्चात ‘मसाप’चा लौकिक सर्वदूर पसरवताना द.पं.नी हैदराबादेतील वाङ्मयीन चळवळीत मोठी मांदियाळी सहभागी करून घेतली. अनेक संस्था व उपक्रमांचे ते अध्वर्यू. वाचन, अभ्यास, लेखन-संपादन यामध्ये त्यांनी कधी उसंत घेतलीच नाही. त्यांच्या संपादित ग्रंथसंपदेवर नजर टाकली तरी त्यांच्यातला संशोधक दिसतो. महाराष्ट्र शासनाने नांदेडच्या कुरुंदकर स्मारकाला निधी देण्याच्या बाबतीत करंटेपणा केला आहे, पण द.पं.नी हैदराबादेत बसून याच शासनाकडून अर्थसहाय्य मिळवून कुरुंदकर स्मृतिग्रंथासह समग्र नांदापूरकर, समग्र सेतू माधवराव पगडी इत्यादी अभ्यासकांचे ग्रंथ अभ्यासकांसमोर आणण्याचे ऐतिहासिक कार्य केले. पंचधारा नियतकालिकाला प्रतिष्ठा व सन्मान लाभला तो त्यांच्या कुशल संपादनामुळेच! या सबंध कार्यात सहचारिणी डॉ. उषा यांचीही त्यांना साथ होती. मागील एक-दोन वर्षांपासून द. पं. काहीसे थकले होते, पण सार्वजनिक कार्यातील त्यांचा उत्साह कायम होता. ‘इतिहास-हैदराबादचा’, ‘व्यक्तिविशेष’ आदी काही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर असतानाच या साहित्यसेवकाची ‘साहित्य-सहवास यात्रा’ थांबली.

      August 5, 2017


  • विष्णू शास्त्री पंडीत

    (1827 -1876)

    यांचे मूळ गाव सातारा जिल्हयातील वाई जवळील बावधन. मुंबईच्या `इंदु प्रकाश` साप्ताहीकाच्या मराठी विभागाच्या संपादनाशी यांचे नाव निगडीत होते. तत्कालिन समाजातील कर्मठ, जूनाट, चालीरीतीं विरुध्द त्यांनी आपली मते निर्भिडपणे मांडली. बालविवाह, केशवपन, विधवापुनर्विवाह या विषयावर त्यांनी व्यक्त केलेल्या मतांनी खळबळ उडवुन दिली. ईश्वरचंद विद्यासागर यांच्या विधवा विवाह या ग्रंथाचा त्यांनी मराठी अनुवाद केला. आपल्या पहिल्या पत्नीच्या मृत्युनंतर त्यांनी 1874 मध्ये एका विधवेशी पुनर्विवाह केला होता.

      March 11, 2015


  • दत्तात्रेय नरसिंह गोखले

      December 15, 2010


  • डॉ. विद्याधर गोपाळ ओक

    सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक व संगीत संशोधक. संगीतातील २२ श्रुतींवर आधारित जागतिक दर्जाचे संशोधन.

      May 29, 2014


  • देशपांडे (प्रा.) रमाकांत

    गेली ५० वर्षे शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते. प्रा. अ. का. प्रियोळकर व डॉ. एच.ए. ग्लीसन या भाषा शास्त्रज्ञांच्या हाताखाली संशोधन. पदवी पदव्युत्तर वर्गांचा अध्यापन अनुभव.

      December 7, 2011


  • अभिनय देव

    देव, अभिनय

    जागतिकीकरणाच्या युगात जाहिरात क्षेत्राची व्याप्ती ही अमर्याद आणि तेवढीच खोलवर पसरलेली आहे. अर्थात या क्षेत्रामध्ये अनेक स्थित्यंतरे तसेच बदलही काळानुरूप होत गेले. नवनवीन संकल्पना त्यामधून उदयास आल्या. लोकजीवनाशी थेट संबंध येत असलेल्या या क्षेत्राचे आकर्षण आणि गोडी अभिनय देव या अवलियाकडे पहिल्यापासूनच होती. घर रमेश व सीमा देव यांचे, तेथे अभिनयाची सरस्वती वास करीत असली तरी त्यांच्या या ज्येष्ठ पुत्राचा कल जाहिरात क्षेत्राकडे होता.
    वास्तुविशारदाचे शिक्षण घेताना याच शिक्षणातून अभिनय यांना वेगवेगळ्या जाहिरातींची संकल्पना सुचत गेली आणि याच ऊर्मीपोटी ते ओ अ‍ॅण्ड एम या प्रख्यात जाहिरात संस्थेत दाखल झाले. आयुष्याला वेगळे वळण देणाऱ्या अभिनय देव यांचा जाहिरात क्षेत्रातील प्रवास त्यानंतर बहरत गेला. काही काळ त्यांनी हायलाइट प्रॉडक्शन या जाहिरात कंपनीमध्येही दिग्दर्शक म्हणून काम केले. पण मनातील तो सुप्त दिग्दर्शक स्वस्थ बसू देत नव्हता. यामधूनच रमेश देव प्रॉडक्शन (आरडीपी) या जाहिरात संस्थेची निर्मिती झाली. तुम्ही जगाकडे कोणत्या दृष्टीने पाहता ती दृष्टी तुम्हाला जाहिरात सुचवून जाते असे अभिनय देव यांचे म्हणणे आहे आणि याची साक्ष पटते ती सर्फच्या ‘दाग अच्छे है’ या जाहिरातीमधील वाक्याने. कल्पकता आणि सृजनशीलतेच्या याच जोरावर अभिनय देव यांनी तब्बल ४५० जाहिरातींना आकार दिला. जाहिरातींमध्ये दिसणारे चेहरे लक्षात राहतात, पण त्यांचे दिग्दर्शक कुणाला माहीतही नसतात.. जाहिरातींच्या या अफाट विश्वामध्ये या दिग्दर्शकांच्या कर्तृत्वाची दखल ‘कान’ महोत्सवामध्ये खास विभागात घेतली जाते. (चित्रपटांचा कान येथे होणारा महोत्सव निराळा) जाहिरात क्षेत्रामधील ऑस्कर अशी ओळख असलेला प्रतिष्ठेचा ‘कान गोल्ड लायन’ (द बेस्ट डिरेक्टर- फिल्मक्राफ्ट) हा पुरस्कार अभिनय देव यांनी पटकावून आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये देशाची माान उंचावली. जगभरातील तब्बल १७०० जाहिरात दिग्दर्शकांमधून अभिनय देव यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. कल्पकता आणि सृजनशीलतेचा हा बहुमान असल्याची अभिनय देव यांची ही प्रतिक्रिया बरेचसे काही सांगून जाते.

      August 5, 2017


  • दिनकर कांबळे

    अपघात असो, महापूर असो वा आगीचा लोळ, कोणत्याही आपत्तीत माणसांचे जीव वाचविण्यासाठी धावून जाण्याचे व्रत कोल्हापूरच्या दिनकर कांबळे यांनी गेली २१ वर्षे निभावले आहे. आता ते जीवरक्षकांची नवी पिढीही घडवत आहेत.

    जीवरक्षक

      July 24, 2015


  • मिलिंद तुळाणकर

    जलतरंग हे प्राचीन भारतीय वाद्य असून ते वाजविणाऱ्या व्यक्ती दुर्मीळ आहेत. ‘ही ६४ कलांमधील एक कला आहे. या वाद्याला जलवाद्य किंवा ‘जलतंत्री वीणा’ असेही म्हणतात. यात कमीतकमी १२, तर जास्तीत जास्त २६ भांडी असतात. भांड्यांची रचना मोठ्यापासून छोट्यापर्यंत, अर्धवर्तुळाकार स्वरूपात केली जाते. बांबूच्या किंवा प्लास्टिकच्या काठ्यांनी ते वाजवितात.

      July 16, 2022