(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • विलास संगवे

    हे मुळचे सोलापुरचे असणार्‍या प्रा. डॉ. विलास सांगवे यांनी मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी आणि जैन समाज या विषयावर संशोधनात्मक प्रबंधक सादर करुन १९५० साली डॉक्टरेट संपादन केल्यावर सर्वप्रथम कर्नाटक महाविद्यालयात अध्यापन सुरु केलं, त्यानंतर राजाराम महाविद्यालय व पुढे शिवाजी कार्याचे संशोधन करण्यासाठी स्थापन केलेल्या शाहू संशोधन केंद्रामध्ये त्यांची संचालक म्हणून नियुक्ती झाली.

  • दिनू रणदिवे

    ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांना “सिंहासन” कादंबरीसाठी सुचलेली दिघू टिपणीसांची व्यक्तीरेखा ही रणदिवेंवरुनच सुचल्याचं अनेकजण अगदी ठामपणे सांगतात. दिनू रणदिवे यांच्या व्यक्तीमत्त्वानं प्रेरित होऊन अनेक ज्येष्ठ पत्रकार त्यांच्याविषयी आदरानं बोलतात व त्यांचे विचार व कार्य नवीन पिढीपर्यंत पोहोचवताना दिसतात.

  • अभिजीत मुळ्ये

    आरोग्यविषयक विपुल व वैविध्यपुर्ण लेखन करून अनेक कौटुंबिक जोडप्यांच्या जीवनांमध्ये लक्षवेधी सुधारणा करणार्‍या निवडक काही तरूण पत्रकारांमध्ये अभिजीत मुळ्ये यांचे नाव घेता येईल. पत्रकारितेच्या आपल्या प्रदीर्घ कालावधीमध्ये त्यांनी विवीध पदांवर व विभीन्न जबाबदार्‍यांवर आवडीने काम केले, असले तरी आरोग्याच्या सर्वांगीण विकासाच्या संकल्पनेभोवती फिरणार्‍या घटकांवर माहितीपर लेखन करणे हा त्यांचा विशेष जिव्हाळ्याचा प्रांत आहे. लहान असताना प्रत्येक गोष्टींवर चौफेर विचार करणार्‍या अभिजीत यांनी आपल्यातल्या जिज्ञासु पत्रकाराला अवांतर वाचनाद्वारे व सुक्ष्म निरीक्षण शक्तीद्वारे आकार दिलेला होता.

  • बाबा पदमनजी

    (मे 1831- 29 ऑगष्ट 1906)

    मराठी ग्रंथकार आणि मराठी ख्रिस्ती वाड्गमयाचे जनक. पुर्ण नाव बाबा पदमनजी मुळे. जन्म बेळगावचा. शिक्षण बेळगाव आणि मुंबई येथे. बेळगावच्या मिशन स्कूलमध्ये शिकत असतांना ख्रिस्ती धर्माचे ज्ञान मिळाले; बायबल; तसेच अब्राहम. इझाक इत्यादींच्या कथा हे सर्व इंग्रजी समजू लागल्यानंतर वाचले; मुंबईच्या प्री चर्च विद्यालयात `बैबल मास्तर` म्हणून काम केले. हळूहळू ख्रिस्ती धर्माकडे ओढा निर्माण झाला. काही काळ ते `परमहंस मंडळी` हया प्रगतिक विचारांच्या गुप्त संघटनेतही होते; परतु तेथे व्यक्त होणारे नास्तिक विचार; तसेच मंडळाच्या पुस्तिकेतील कोणताही धर्म ईश्वर दत्त नाही व कोणतेही शास्त्र ईश्वरप्रणीत नाही अशा आश्याचे विचार त्यांना पसंत न पडल्यामूळे त्यांनी हया संघटनेशी संबंध तोडला.

    ख्रिस्ती धर्म स्विकारण्याची त्यांची इच्छ त्यानंतर अधिकाधिक तीव्र होत गेली व अखेरीस 3 सप्टेंबर 1854 रोजी त्यांनी बाप्तिस्मा घेतला. ख्रिस्ती झाल्यानंतर ते पुण्यास गेले. पुणे येथे त्यांचे वास्तव्य सु. 16 वर्ष होते. तेथे असताना त्यांनी बरीच वर्ष प्री चर्च मिशनच्या शाळेत शिक्षकाचे काम केले; पुण्याच्या प्री चर्च मिशनच्या मंडळाचे पाळक म्हणून 1867 मध्ये त्यांची नेमणूक झाली; परंतु 1873 मध्ये या कामाचा राजीनामा देऊन त्यांनी स्वतला लेखनास वाहून घेतले. 1873 आधीही त्यांची काही पुस्तके प्रसिद्ध झालेली होतीच. त्यांच्या एकूण ग्रंथांची संख्या शंभराहून अधिक आहे. स्त्रीविद्याभ्यास निबंध (1852), व्यमिचारनिषेधक बोध (1854), यमूनापर्यटन (1857), सर्वसंग्रही उर्फ निबंधमाला (1860), हे त्यांच्या आरंभीच्या ग्रंथापैकी काही होत.

  • गंगाधर बाळकृष्ण सरदार (गं बा सरदार)

    गंगाधर सरदार हे मराठी साहित्यिक आणि विचारवंत होते.

  • डॉ. विट्ठल नागेश शिरोडकर

    डॉक्टर विट्ठल नागेश शिरोडकर यांचे महिलांसाठी असलेले अतुल्य योगदान पाहिले की मन भरून येते. मातृत्व हा प्रत्येक मातेसाठी व तिच्या कुटुंबियांसाठी सर्वात आनंदाचा, समाधानाचा, व आयुष्यभर जतन करून ठेवण्यासारखा क्षण असतो. शेवंतीच्या फुलांसारखी सुगंधी दरवळ आणणारा, व आनंदाच्या व हास्याच्या कारंज्यांनी घर भारून टाकणार्‍या या क्षणाला कोणाची नजर लागू नये यासाठी त्यांनी आपले सारे आयुष्य व कारकीर्द पणाला लावली होती. सतत होणारे गर्भपात या विषयावरील त्यांचे यशस्वी संशोधन, म्हणजे प्रत्येक गृहिणीसाठी तिच्या आईपणाची शाश्वती देणारे अमृतच ठरले. त्याकाळी शारिरीक गुंतागंतींमुळे गर्भपात होण्याचे प्रमाण फार मोठे व सामान्य होते.

  • व्यंकटेश माडगूळकर

    व्यंकटेश दिगंबर माडगूळकर (६ जुलै, १९२७ – २८ ऑगस्ट, २००१) हे मराठी लेखक आणि चित्रकार होते. त्यांनी कथा, कादंबर्‍यांसोबत चित्रपटांसाठी पटकथाही लिहिल्या.

  • संजय जगदाळे

    जगदाळे, संजय

    भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदावर एन. श्रीनिवासन यांची वर्णी लागल्याने सचिवपदाच्या शर्यतीसाठी बरीच नावे चर्चेत आली होती. त्यामध्ये रणजिब बिस्वाल हे बाजी मारतील असे वाटत असले तरी अमिताभ चौधरी यांनी त्यांच्याविरोधात अर्ज दाखल करण्याचे ठरविले होते.तथापि, बीसीसीआयमधील वरिष्ठ पदांवरील व्यक्ती निवडणूक होऊ नये, यासाठी आग्रही होते. त्यामुळे बिस्वाल आणि चौधरी यांचा पत्ता कट झाला.

    बीसीसीआयच्या धुरीणांना यावेळी अनुभवी, पण वाद-विवादात न पडणारी आणि आपले सारे काही ऐकणारी व्यक्ती हवी होती. त्यावेळी बीसीसीआयच्या वरिष्ठ पदांवरील व्यक्तींपुढे एकच नाव आले आणि त्यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले, ते नाव म्हणजे संजय जगदाळे. बीसीसीआयच्या कारभाराचा असलेला अनुभव आणि स्वच्छ प्रतिमा असल्यामुळे जगदाळे यांच्या नावाला कोणीही विरोध केला नाही आणि बिनविरोधपणे जगदाळे बीसीसीआयच्या सचिव पदावर विराजमान झाले. १९६८-८३ या दरम्यान स्थानिक क्रिकेटमध्ये जगदाळे हे एक गुणी अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जायचे. या दरम्यान त्यांनी ५५ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये २,०७७ धावा केल्या, ज्यामध्ये दोन शतकांसह नऊ अर्धशतकांचा समावेश होता. त्याचबरोबर गोलंदाजीमध्ये त्यांनी ८५ विकेट्स घेतल्या होत्या, ज्यामध्ये १३२ धावांत ६ बळी ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती. १९८३ नंतर क्रिकेट खेळायचे सोडल्यावर त्यांनी प्रशासकाची भूमिका वठवली. त्यानंतर १९९० मध्ये त्यांची ज्युनिअर निवड समितीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आणि त्यांनी व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, ऋषीकेश कानिटकर, मुरली कार्तिक, एस. श्रीराम आणि नमन ओझासारखे गुणवान खेळाडू शोधून काढले. त्यांनी हेरून काढलेले खेळाडू आणि त्यांचे काम पाहून २००० साली त्यांना मध्य विभागातून राष्ट्रीय निवड समितीमध्ये स्थान देण्यात आले. चंदू बोर्डे यांच्या निवड समितीमध्ये त्यांची २०००-२००१ साली पहिल्यांदा निवड झाली, त्यानंतर ब्रिजेश पटेल, सय्यद किरमाणी यांच्या अध्यक्षतेखालीही त्यांनी निवड समितीचे काम पाहिले. २००० ते २००३ पर्यंत ते भारतीय निवड समितीमध्ये होते. त्यानंतर पुन्हा एकदा किरण मोरे आणि दिलीप वेंगसरकर यांच्या अध्यक्षतेखालीही त्यांनी निवड समितीमध्ये काम केले. २००७ साली त्यांच्यावर संघव्यवस्थापकाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली. २००७ च्या विश्वचषकासाठी गेलेल्या भारतीय संघाचे जगदाळे हे व्यवस्थापक होते. २००७ नंतर मात्र त्यांची बीसीसीआयला आठवण झाली ती थेट २०११ साली. कारण बिस्वाल आणि चौधरी यांच्यामधील भांडणामुळे बीसीसीआयची प्रतिमा डागाळण्याची शक्यता होती. जगदाळेंचा स्वभाव मितभाषी असला तरी त्यांच्याकडे असलेला राष्ट्रीय निवड समितीचा दांडगा अनुभव, त्याचबरोबर प्रशासकीय कामांचा अनुभव, शांतपणे सुसंवाद साधण्याची शैली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वच्छ प्रतिमा या साऱ्या गोष्टींमुळे जगदाळे यांची सचिवपदी निवड करताना बीसीसीआयच्या वरिष्ठ पदांवरील व्यक्तींना जास्त वेळ घ्यावा लागला नाही. आता नुकताच मी या पदावर विराजमान झालो आहे. आव्हाने बरीच आहेत, याची मला पूर्णपणे कल्पना आहे. ही फार मोठी जबाबदारी आहे, याचीही मला पूर्णपणे जाणीव आहे, असे जगदाळे यांनी सचिवपदी नियुक्त झाल्यावर सांगितले होते. त्यामुळे ही महत्त्वपूर्ण जबाबदारी ते कसे पार पाडतात, यावरच साऱ्यांचे लक्ष असेल.

  • उत्तम भास्कर जोशी

    श्री. उत्तम जोशी हे ठाणे येथील ठाणे भारत सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष आहेत. ते ठाणे येथील उद्योजक असून ठाण्यातील अनेक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध आहे.

  • डॉ. गोपाळ शिवराम लागवणकर

    डॉ. गोपाल शिवराम लागवणकर  हे  निष्णात शल्यचिकित्सक (सर्जन) व वैद्यकीय ग्रंथांचे लेखक होते. मराठीत “शस्त्रवैद्यक” आणि ”न्यायवैद्यक” ही पुस्तके त्यांनी लिहिली, तसेच “दंभहारक” या टोपण नावाने अनेक लेख लिहिले.