अप्पा परचुरे हे "परचुरे प्रकाशन मंदिर या संस्थे"चे सध्याचे संचालक असून, त्यांनी आपल्या वडिलांच्या साहित्यिक योगदानाचा यशस्वी वारसा पुढे चालवीत आहेत. अप्पांनी “माणुसकी” , “प्रकाशाची वाट” ही पुस्तके लिहिली असून “युगप्रवर्तक” या पुस्तकाचे संकलन देखील केलं आहे . प्रतिभावान व मनस्वी लेखक जी. ए. कुलकर्णी यांची अप्रकाशित राहिलेली सर्व पुस्तके जी. ए. प्रेमींसाठी अप्पा परचुरेंनी उपलब्ध करून दिली आहेत.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
१९७०-८०च्या दशकांत अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांमधून रंजना देशमुखांनी विविधांगी भुमिका साकारल्या. रंजना देसमुख यांचे इतर प्रमुख चित्रपट म्हणजे ‘सुशीला’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘जखमी वाघीण’, ‘भुजंग’, ‘एक डाव भुताचा’, आणि ‘चानी’
पाटील, सा. रे.
ब्रिटिश राज्य असताना म्हणजे १९३४ मध्ये त्यांनी शेतीत घाम गाळण्यास सुरूवात केली ती त्या वेळच्या पारंपरिक साधनांनिशी आणि त्यानंतर तब्बल शहात्तर वर्षे उलटल्यानंतरही अत्याधुनिकता जोपासत, नव्या जमान्याचे सूर आळवत ते उमेदीने शेती करीत आहेत. शेतीच्या मशागतीपासून त्यांनी आयुष्याला सुरूवात केली. त्यानंतर आतापर्यंतच्या प्रदीर्घ प्रवासात त्यांनी राजकीय, सामाजिक क्षेत्राच्या केलेल्या मशागतीमुळे महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनाला आकार येऊ लागला.
म्हणूनच वयाच्या तब्बल ८९ वर्षीही तरूणाच्या उत्साहाने कार्यरत असणाऱ्या सा. रे. ऊर्फ अप्पासाहेब पाटील यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा कृषी-औद्योगिक समाजरचना पुरस्कार मिळणे यथोचितच ठरते. कोल्हापूर जिल्ह्य़ातील शिरोळ तालुक्यात असलेल्या जांभळी या गावी ११ डिसेंबर १९२१ ला जन्मलेल्या अप्पासाहेबांना लहानपणापासूनच शेतीची आवड होती. वडील रेवगोंडा पाटील यांच्याबरोबरच वयाच्या १३-१४ वर्षांपासून ते शेतीची सर्व कामे करू लागले. त्याचवेळी कुस्ती आणि मलखांब खेळू लागल्याने शरीरयष्टी उत्कृष्ट झाली. अफाट वाचन, कष्ट करण्याची तयारी, जिद्द या जोरावर त्यांनी आयुष्याचा प्रवास सुरू केला. मित्रपरिवार मोठा असल्याने त्यातून त्यांना समाजवादाचे धडे मिळाले. सहकाराचा प्रसार आणि बोलबाला पुढे महाराष्ट्रात झाला, पण १९४६ मध्ये जांभळी गावातील शेतक ऱ्यांना एकत्र आणून सेवा सोसायटीची स्थापना त्यांनी केली. गांधीजींच्या विचाराने प्रभावित झाल्याने ग्रामस्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्नही त्यातून झाला. शिरोळ तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या व्यवस्थापकपदी १९५१ मध्ये त्यांची निवड झाल्याने गावातील काम तालुका पातळीवर आले. या दरम्यानच संयुक्त महाराष्ट्राच्या सुरू झालेल्या चळवळीत त्यांनी भाग घेण्यास सुरुवात केली. त्यातूनच साने गुरुजी, मधु दंडवते, अच्युतराव पटवर्धन, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, ग. प्र. प्रधान आदींच्या सान्निध्यात ते आले आणि या नेत्यांची साधी राहणीही त्यांच्यात उतरली. राष्ट्र सेवा दल, साने गुरुजींचे साधना साप्ताहिक या चळवळीत ते रमू लागले. १९५७ च्या विधानसभेच्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीने त्यांना शिरोळमधून उमेदवारी दिली. या चळवळीच्या निमित्ताने त्यांनी ‘इंद्रधनुष्य’ हे दैनिक कोल्हापुरातून सुरू केले होते. १९९९ मध्ये आणि २००९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही जनतेने त्यांना निवडून दिले. सहकार क्षेत्रातील त्यांचे कामही सुरूच होते. शिरोळला श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत त्यांनी मोलाचा वाटा उचलला. या कारखान्याचे ते संस्थापक संचालक असून आजपर्यंत अध्यक्ष-उपाध्यक्ष-संचालक अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. या कारखान्याच्या स्थापनेपूर्वी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील नद्यांना उपलब्ध असलेले पाणी विचारात घेऊन सहकारी तत्त्वावर २० पाणीपुरवठा योजनांची स्थापना त्यांनी केली. राजकारणातील कामगिरीसाठी एस. एम. जोशी-दंडवते-पटवर्धन आदींपासून स्फूर्ती त्यांनी घेतली, तशीच सहकार क्षेत्रातील कामासाठीची स्फूर्ती त्यांना मिळाली ती धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता आदींकडून. सहकार क्षेत्रातील राज्य भूविकास बँक, राज्य सहकारी संघ यांचे संचालक, जयसिंगपूर उदगाव सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. उदगाव टेक्निकल हायस्कूल, जांभळी हायस्कूलची स्थापना त्यांनी करून शिक्षण क्षेत्रावरही ठसा उमटवला. शेती हा त्यांचा पहिल्यापासूनच आवडीचा विषय असल्याने शेतीमधील नव्या तंत्रज्ञानाबाबत ते कायम आग्रही असतात. नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या त्यांच्या कळकळीमुळेच ते ताजेपणाने विचार करू शकतात. कोणतेही नवे तंत्र ते स्वीकारण्यास अप्पासाहेब कायम तयार असल्याने सर्वात वयोवृद्ध आमदार अशी त्यांची ओळख न राहता उत्साहाने सळसळणारे तरूण आमदार-नेते अशी त्यांची ओळख करून द्यावी लागते. त्यांच्या या सततच्या धडपडीला चव्हाण प्रतिष्ठानकडून मिळालेला हा मुजरा सार्थच ठरतो.
(एप्रिल 10,इ.स. 1843ःजांबोटी,बेळगांव जिल्हा -जून 18,इ.स. 1901ःमुंबई)
हे मराठी लेखक व संपादक होते. `विविधज्ञानविस्तार मासिकाचे आद्य संपादक. मराठीतील `मोचनगड` या पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे जनक. मराठी लघुलिपीचे आद्य उत्पादक. प्राथमिक शिक्षण जांबोटी व बेळगांव येथे. मुंबईच्या एल्फन्स्टिन हायस्कूलमधून मॅट्रिक(1864) व त्याच हायस्कूलमध्ये शिक्षक(1867). 1888 साली हुबळी ऍंग्लोव्हर्नाक्युलर शाळेत हेडमास्तर व 1892 मध्ये बेळगांव जिल्ह्याचे असिस्टंट डेप्युटी एज्युकेशनल इन्स्पेक्टर.
कॉलेजात असताना `मित्रोदय` या वृत्तपत्रातून(1866) ते लेख लिहू लागले. इंग्लंडमधील `एडिंबरो रिव्ह्यू` व `क्वार्टर्ली रिव्ह्यू` या नियतकालिकांच्या धर्तीवर मासिक निघावे या विचाराने 1867 मध्ये `विविधज्ञानविस्तारा`ची स्थापना झाली. त्याचे गुंजीकर हे पहिले संपादक. पण सरकारी नोकरीमुळे त्यांचे नाव अंकावर छापण्यात आले नव्हते. पहिल्या अंकात संपादकांनी या मासिकाचे स्वरूप पुढीलप्रमाणे स्पष्ट केले आहे.ः यांच्या परिमाणानुसार त्यात नानाविध विषयांचा संग्रह केला जाईल. शास्त्रीय विषय, देशज्ञान, विख्यात पुरुषांची चरित्रे, नवीन पुस्तकांचे गुणावगुणविवेचन, नीतिवादाचे निबंध इत्यादी अनेक विषयांचा संग्रह करणार आहोत.गुंजीकरांना मराठी, संस्कृत, इंग्रजीबरोबरच गुजराथी, कानडी व बंगाली याही भाषा अवगत होत्या. त्यामुळे या वाचनाच्या बळावर ते अनेक नावीन्यपूर्ण व विविध माहिती सांगणारी सदरे सजवू शकले. पहिली सात वर्षे(1867-1874) त्यांनी सातत्याने व परिश्रमपूर्वक संपादन केले. अनेक व्यासंगी विद्वानांचे सहकार्य मिळवून उच्च दर्जाचे ज्ञानप्रसारक नियतकालिक असा लौकिक त्यांनी `वि.ज्ञा.वि`ला मिळवून दिला. त्यांनी त्यात लिहिलेल्या लेखातील काही निवडक लेख, संकलित लेख, प्रथम खंड (1942) यात आले आहेत. `मराठी भाषा`, `मराठी भाषेचे कोश`, `देशभाषांची दुर्दशा`, `आपल्या भाषेची स्थिती`, `आपल्या भाषेचे पुढे काय होणार?`, `मराठी कविता`, `काव्यविचार`, `व्याकरणविचार` आदी त्यातले लेख पाहिले म्हणजे त्यांचे सखोल विचार व तळमळ लक्षात येते. त्यांच्या चार स्नेह्यांनी मुंबईत सुरू केलेल्या(10 ऑक्टोबर, 1871)`दंभहादक(?)` या मासिकासाठीही त्यांनी काही लेखन केले आहे. नियतकालिकांसाठी चालणार्या लेखनाबरोबरच त्यांचे स्वतंत्र ग्रंथलेखनही चालू असे. त्यांचे ग्रंथ पुढीलप्रमाणेः मोचनगड (ऐतिहासिक कादंबरी, 1871), गोदावरी (अर्पू), अभिज्ञान शाकुंतल (भाषांतर, 1870), रोमकेतुविजया (शेक्सपिअरच्या `रोमियो व ज्युलिएट`चे भाषांतर, 1872), विद्यावृद्धीच्या कामी आमची अनास्था (व्याख्यान, 1887), सरस्वती मंडळ (1884),भ्रमनिरास (1884), सौभाग्यरत्नमाला (1886), कौमुदीमहोत्साह, भाग-1 (भट्टोजी दीक्षित यांच्या `सिद्धान्तकौमुदी` या व्याकरण ग्रंथाचे भाषांतर, खंड 1, 2 ,3 --1877; 4, 5 --1878; भाग 6--1879), सुबोधचंद्रिका (भगवगीतेवरील मराठी टीका, 1884), `रामचंद्रिका`, कन्नडपरिज्ञान (1895)लाघवी लिपी किंवा अतित्वरेने लिहिण्याची युक्ती (1878).त्यांचे भाषा, लिपी आदिसंबंधी लेख `रामचंद्र भिकाजी गुंजीकर संकलित लेख` संपादक अ.का.प्रियोळकर या ग्रंथात आले आहेत. भाषा, व्याकरण व लेखनशुद्धी हे गुंजीकरांच्या चिंतनाचे विषय होते. वाडमयक्षेत्रात वावरणार्या अनेक समकालीनांना व उत्तरकालीनांना त्यांच्या लेखांनी विचारप्रवृत्त व कार्यप्रवृत्त केले. मोचनगडच्या रूपाने गुंजीकरांनी ऐतिहासिक कादंबरीचा एक उत्कृष्ट आदर्श निर्माण केला आहे. शिवाजीच्या उदयकालातील मराठ्यांचे जीवन व तत्कालीन वातावरण यांचे जिवंत चित्रण या कादंबरीत आढळते. गोदावरी पोर्तुगीजांच्या इतिहासाशी संबंधित अशी कादंबरी, पण ती पूर्ण होऊ शकली.
श्री नानामहाराज यांचे मूळ नाव नारायण बळवंत नाचणे. त्यांचा जन्म मरूड-जंजिरा येथे झाला. श्री गणपती हे त्यांचे उपास्यदैवत होते.
अपघात असो, महापूर असो वा आगीचा लोळ, कोणत्याही आपत्तीत माणसांचे जीव वाचविण्यासाठी धावून जाण्याचे व्रत कोल्हापूरच्या दिनकर कांबळे यांनी गेली २१ वर्षे निभावले आहे. आता ते जीवरक्षकांची नवी पिढीही घडवत आहेत.
जीवरक्षक
सीकेपी समाजातील अनेक महिला आज जागतिक स्तरावर विविध क्षेत्रांमध्ये अग्रणी राहून आपल्या समाजाला गौरवीत करत आहेत. खासगी संस्था ते मल्टिनॅशनल कोर्पोरेट्स, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पाककला, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रांत सुद्धा आपल्या महिलांचा वावर वाखाणण्याजोगा आहे. तलवार आणि लेखणीचा वारसा सांगणाऱ्या आपल्या या समाजात लेखणीचा उत्तम वापर करत साहित्य निर्मिती करणाऱ्या अनेक महिला आजही विविध माध्यमांतून आपले साहित्यिक योगदान देत असतात. योगायोगाने या वर्षी २२ मे रोजी पुणे येथे दुसरे सीकेपी साहित्य संमेलन आयोजित केले जात आहे. या पार्श्वभूमीवर सीकेपी समाजातील शंभराहून अधिक लेखिका कवयित्रींना आणि अगदी पाकशास्त्रावरील पुस्तके लिहिणाऱ्या सुगरणींना तुमच्यासमोर आणायचा हा एक छोटासा प्रयत्न.
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुप्रसिद्ध बोलपट निर्माते, दिग्दर्शक व्हि.शांताराम आणि ज्येष्ठ साहित्यिक आचार्य अत्रे या दोन दिग्गजांचा सहवास लाभलेले श्रीराम बोरकर हे ठाण्यातल्या लेखकांमधल एक परिचित नाव
एक विचारवंत लेखिका, नाटक आणि रंगभूमी विषयी भरपूर लेखन आणि टीकात्मक समीक्षा करणार्या लेखिका म्हणून पुष्पा भावे ओळखल्या जातात. पुष्पा भावे यांचा जन्म २६ मार्च १९३९ सालचा. पूर्वाश्रमीच्या त्या सरकार घराण्यातील. उत्कृष्ट लेखनाबरोबर त्या एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ही प्रसिद्ध आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti