(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • गोपाळराव बळवंतराव कांबळे

    त्यांच्या प्रत्येक बॅनर मागे एक इतिहास होता, कहाणी होती. रामजोशी चित्रपटाच्या वेळी बाजारात मांजरपाट हे कापड मिळत नव्हते, तेव्हा शांतारामबापूनी मागचा पुढचा विचार न करता सर्व बॅनरसाठी रेशमी तागे मागवले. व रामजोशी चित्रपटाचे बॅनर रेशमी कापडावर रंगवले गेले. त्यावेळी कलायोगीनी रंगवलेला पेशव्यांचा दरबार अतीशय सुंदर रीत्या रेखाटला होता. पुढे मुंबईचे निर्माते पैसे घेऊन मागे लागले असताही कांबळे कोल्हापूरला गेले. तेथे त्यांनी सर्वस्वी पेंटींगला वाहून घेतले.

  • माधव कोंडविलकर

    प्रख्यात लेखक व आत्मचरित्रकार म्हणून माधव कोंडविलकर हे महाराष्ट्र तसंच साहित्य रसिकंना परिचयाचे आहेत. माधव कोंडविलकरांनी लिहिलेल्या “मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे” नामक आत्मकथनाने तमाम वाचकवर्गावर आपली अनोखी छाप उमटविली होती. तरूण पिढीच्या असंख्य अव्यक्त महत्त्वाकांक्षांचे भावस्पर्शी चित्रण या आत्मचरित्रात करण्यात आले आहे.

    “अजून उजाडायचं आहे”, “काहिली”, “अनाथ”, “वेध”, “भूमीपुत्र”, “डाळं”, “घालीन लोटांगण”, “हाताची घडी तोंडावर बोट”, “एक होती कातळवाडी” या पुस्तकांचं त्यांनी लेखन केले आहे.

    दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित

  • पं. पुरुषोत्तम वालावलकर

    पंडित पुरुषोत्तम वालावलकर यांचा जन्म ११ जून रोजी झाला. बालगंधर्वांच्या नाटक मंडळींमध्ये बालपण व्यतीत केलेल्या वालावलकरांनी बालगंधर्वांपासून ते पंडित भीमसेन जोशी, पं.जितेंद्र अभिषेकी, पं. सी. आर. व्यास, शोभा गुर्टू अशा दिग्गज कलाकारांना संवादिनीची साथ केली होती.

  • दिग्दर्शक दत्ता माने

    दत्ता माने यांनी अभिनेता व मराठी दिग्दर्शक म्हणून काम केले. त्यांचा जन्म १९२२ रोजी झाला. त्यांनी आपल्या काळात १८ चित्रपट बनवले. काही नावे बाईसाहेब, मामा भाचे, कार्तिकी, कसे काय पाटील बरे आहे का?, पाटलाची सून.

    दत्ता माने यांचे २९ ऑक्टोबर १९८० रोजी निधन झाले.

    अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

    #DattaMane

  • राहुल देशपांडे

    राहुल देशपांडे हा मराठी शास्त्रीय संगीतसृष्टी मधील एक ताजा व भावपुर्ण आवाज.

  • (डॉ.) वासुदेव गाडे

    गाडे, (डॉ.) वासुदेव
    प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. वासुदेव गाडे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आल्याने शिक्षणक्षेत्रातील अनेकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असेल. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात गेल्या काही दशकांत पुणे विद्यापीठाने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यासाठी आजवरच्या कुलगुरूंनी केलेले योगदान महत्त्वाचे ठरले आहे. डॉ. गाडे यांना आता ही संधी मिळते आहे. केवळ बायोटेक्नॉलॉजी या विषयातील तज्ज्ञ म्हणून त्यांना दीर्घ अनुभव असला, तरी विद्यापीठाच्या प्रशासनाचाही अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालय विकास मंडळाचे संचालक म्हणून सध्या ते कार्यरत होते. त्यामुळे महाविद्यालयांची अवस्था आणि दशा, विद्यापीठातील विविध विभागांचे प्रश्न आणि त्याबाबतची कार्यवाही याची त्यांना चांगली जाण आहे. नागपूरजवळील एका खेडय़ात प्राथमिक शिक्षणाची सुरुवात करताना डोक्यावर पुस्तके घेऊन नदी पार करण्याचे कष्ट त्यांनी उपसले होते. ज्ञानार्जनासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांची जाणीव असलेला हा माणूस शिक्षणासाठी दिल्लीत गेला, तेव्हा त्याचे आयुष्य सर्वार्थाने बदलले.

    तरीही पाय जमिनीवरच ठेवण्यात त्यांना यश मिळाले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे विद्यार्थी असलेले डॉ. गाडे संयमशील व शांत स्वभावाचे म्हणून प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सेसचे फेलो, लुपिन पारितोषिकाचे मानकरी, केंद्रीय विज्ञान संस्थेतील मान्यताप्राप्त वैज्ञानिक म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळावर काम करत असतानाही बायोटेक्नॉलॉजीमधील नव्या आणि समाजाभिमुख संशोधनाकडे ते आवर्जून लक्ष देतात. विज्ञानातील मूलभूत संशोधनाच्या परंपरेत त्यांनी आजवरकेलेले संशोधन मान्य झाले असले, तरी ते सुरू ठेवणे त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचे असते. परीक्षा आयोजित करणारी यंत्रणा असे जे विद्यापीठांचे स्वरूप झाले आहे, त्याला छेद देऊन नवे अधिक दमदार वातावरण निर्माण करण्यासाठी डॉ. गाडे यांचा अनुभव उपयोगी पडू शकतो. सर्वाना बरोबर घेऊन विद्यापीठाला उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात अधिक भरीव कामगिरी करण्यास ते उद्युक्त करतील अशा विश्वासानेच त्यांचे अभिनंदन करायला हवे.
    ---------------------------------------------------------------------------------------------------

    डॉ. वासुदेव गाडे

    डॉ. वासुदेव गाडे यांच्या रूपाने पुणे विद्यापीठाला अखेर कुलगुरू मिळाला. अभ्यासाची आणि संशोधनाची वृत्ती जोपासणाऱ्या कुलगुरूंची मोठी परंपरा या विद्यापीठाला आहे. डॉ. गाडे यांच्या नियुक्तीने ही परंपरा कायम राहिली आहे. ते उत्तम शिक्षक आणि संशोधकही आहेत. विद्यापीठाच्या प्रशासनाचाही त्यांना अनुभव आहे. पुणे विद्यापीठाच्याच 'महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळा'चे (बीसीयूडी) संचालकपद त्यांनी यशस्वीपणे सांभाळले आहे. विद्या-पीठाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या व विद्यापीठाला थेट विद्यार्थ्यांशी जोडणाऱ्या या विभागात काम केल्याने त्यांना विद्यापीठाचा विस्तार आणि आवाका यांची कल्पना आहे. विद्यार्थ्यांसाठी विशेष संशोधन शिष्यवृत्ती लागू करण्या-पासून अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांनी या पदावर असताना घेतले. 'लाइफ सायन्स' विषयात डॉक्टरेट असलेल्या डॉ. गाडे यांनी नागपूर विद्यापीठातून जीवशास्त्रातून बी.एस्सी. केल्यावर पदव्यु-त्तर शिक्षणासह पुढील संशोधन त्यांनी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात केले. एम.एस्सी., एम.फिल. व पीएच.डी. त्यांनी तेथेच संपादन केली. 'पोस्ट डॉक्टरल फेलो' म्हणून फ्रान्स आणि स्वीडनमध्ये दोन वषेर् संशोधनाचा अनुभव त्यांच्या नावावर जमा आहे. दिल्ली येथील केंदाच्या 'सीएसआयआर'च्या 'इन्स्टिट्यूट ऑफ जिनॉमिक्स अँड इंटिगेटिव्ह बायोलॉजी' प्रयोगशाळेत २० वषेर् शास्त्रज्ञ म्हणून सेवा बजावल्यावर २००३मध्ये पुणे विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागात ते रुजू झाले. प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळतानाच डॉ. गाडे यांनी आपल्या संशोधन-कार्यात खंड पडू दिला नाही. बायो-नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये केलेल्या सर्जनशील संशोधनाबद्दल त्यांच्या नावावर काही पेटंट जमा आहेत. 'सेंटर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी' (सी-मेट) संस्थेतील शास्त्रज्ञांच्या सहकार्याने केलेल्या संशोधनात एका नवीन नॅनॉ मटेरिअलचा शोध लावण्यात त्यांना यश मिळाले. कुलगुरूंच्या शैक्षणिक-व्यावसायिक अनुभवाचा परिणाम विद्यापीठाच्या ध्येय-धोरणांवर होणे स्वाभाविक असते. डॉ. गाडे यांचे कार्यक्षेत्र हे मूलभूत विज्ञानाचे असल्याने, मूलभूत विज्ञानातील उपेक्षित विषयांना नवसंजीवनी देण्यासाठी आता ते विशेष प्रयत्न करणार आहेत. गेल्या काही वर्षांत पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी इतरत्र मिळालेल्या संधींमुळे कार्यकाल पूर्ण केलेला नाही. आपण कोठेही न जाता हा कार्यकाल पूर्ण करू, असे डॉ. गाडे यांनी स्पष्ट केले आहे. नवी दिशा देण्याचा प्रयत्न करीत विद्यापीठाचा गाडा यशस्वीपणे हाकावा, यासाठी त्यांना शुभेच्छा.
    ------------------------------------------------------------------------------------------------------
    गाडे, (डॉ.) वासुदेव

    'लाइफ सायन्स' विषयात डॉक्टरेट असलेल्या डॉ. वासुदेव गाडे यांनी नागपूर विद्यापीठातून जीवशास्त्रातून बी.एस्सी. केल्यावर पदव्युत्तर शिक्षणासह पुढील संशोधन त्यांनी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात केले. एम.एस्सी., एम.फिल. व पीएच.डी. ही पदवी त्यांनी तेथेच संपादन केली. 'पोस्ट डॉक्टरल फेलो' म्हणून फ्रान्स आणि स्वीडनमध्ये दोन वर्षे संशोधनाचा अनुभव त्यांच्या नावावर जमा आहे.

    दिल्ली येथील केंदाच्या 'सीएसआयआर'च्या 'इन्स्टिट्यूट ऑफ जिनॉमिक्स अँड इंटिगेटिव्ह बायोलॉजी' प्रयोगशाळेत २० वर्षे शास्त्रज्ञ म्हणून सेवा बजावल्यावर २००३ मध्ये पुणे विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागात ते रुजू झाले. प्रशासकीय जबाबदार्‍या सांभाळतानाच डॉ. गाडे यांनी आपल्या संशोधन-कार्यात खंड पडू दिला नाही. बायो-नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये केलेल्या सर्जनशील संशोधनाबद्दल त्यांच्या नावावर काही पेटंट जमा आहेत. 'सेंटर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी' (सी-मेट) संस्थेतील शास्त्रज्ञांच्या सहकार्याने केलेल्या संशोधनात एका नवीन नॅनो मटेरिअलचा शोध लावण्यात त्यांना यश मिळाले.

    डॉ. वासुदेव गाडे हे उत्तम शिक्षक आणि संशोधकही आहेत. विद्यापीठाच्या प्रशासनाचाही त्यांना अनुभव आहे. पुणे विद्यापीठाच्याच 'महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळा'चे (बीसीयूडी) संचालकपद त्यांनी यशस्वीपणे सांभाळले आहे. विद्यापीठाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या व विद्यापीठाला थेट विद्यार्थ्यांशी जोडणार्‍या या विभागात काम केल्याने त्यांना विद्यापीठाचा विस्तार आणि आवाका यांची कल्पना आहे. विद्यार्थ्यांसाठी विशेष संशोधन शिष्यवृत्ती लागू करण्यापासून अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांनी या पदावर असतानाच घेतले.

    पुणे विद्यापीठाचे कुलगुरुपद त्यांच्याकडे चालून आले. कुलगुरूंच्या शैक्षणिक-व्यावसायिक अनुभवाचा परिणाम विद्यापीठाच्या ध्येय-धोरणांवर होणे स्वाभाविक असते. डॉ. गाडे यांचे कार्यक्षेत्र हे मूलभूत विज्ञानाचे असल्याने, मूलभूत विज्ञानातील उपेक्षित विषयांना नवसंजीवनी देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)

  • हरिश्चंद्र बिराजदार

    बिराजदार, हरिश्चंद्र

    जीवनभर कुस्ती व खेळाडूंचा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवीत ‘रुस्तुम-ए-हिंदू’ हरिश्चंद्र बिराजदार यांनी कुस्ती कारकीर्द परिपूर्ण केली. खेळाडू, संघटक व मार्गदर्शक म्हणून त्यांनी सतत आपल्या तालमीचा नावलौकिक उंचावेल हेच ध्येय ठेवले होते. स्वत: त्यांनी अनेक मैदाने गाजविली, पण त्याचबरोबर आपले मल्ल आंतरराष्ट्रीय स्तरावर कशी चांगली कामगिरी करतील हा उद्देश साध्य करण्यासाठी ते अहोरात्र झगडले.

    त्यामुळेच त्यांच्या गोकुळ वस्ताद तालमीने महाराष्ट्रास अनेक आंतरराष्ट्रीय पदकविजेते मल्ल दिले. गोकुळ वस्ताद तालमीचे ज्येष्ठ प्रशिक्षक व ‘रुस्तुम-ए-हिंद’ हरिश्चंद्र माधवराव बिराजदार हे मूळचे निलंगा तालुक्यातील रामलिंगमुथ्थगड येथील रहिवासी. लहानपणापासूनच कुस्ती हाच ध्यास घेतलेल्या या कुस्तिगीराने वयाच्या १४व्या वर्षी १९६४ मध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पदार्पण केले. या स्पर्धेत त्यांनी १९६७ मध्ये सुवर्णपदक मिळविले. १९६८ मध्ये त्यांनी अखिल भारतीय स्तरावरील हिंदकेसरी स्पर्धेत रुपेरी यश मिळविले. पाठोपाठ पुढच्या वर्षी त्यांनी याच स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. १९७० मध्ये त्यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले व याच वर्षी त्यांनी जागतिक स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी १९७२ मध्ये म्युनिच ऑलिम्पिक स्पर्धेतील ८२ किलो विभागात भारताचे प्रतिनिधित्व केले. याच वर्षी त्यांना ‘रुस्तुम-ए-हिंदू’ हा कुस्ती क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान देण्यात आला.बिराजदार यांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले ते १९७७ मध्ये महान भारत केसरी सतपाल याला अस्मान दाखवून. सतपाल यांच्यावर मात करणारा पहिला महाराष्ट्रीय कुस्तिगीर होण्याचा त्यांनी मान मिळविला. कुस्ती कारकीर्दीत त्यांनी अनेक राष्ट्रीय दर्जाच्या मल्लांवर मात केली.स्पर्धात्मक कुस्तीमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी १९८२ मध्ये पुण्यातील गोकुळ वस्ताद तालमीत उदयोन्मुख व नवोदित मल्लांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. राज्य क्रीडा संचालनालयाच्या कुस्ती प्रशिक्षण योजनेंतर्गत त्यांनी या तालमीत गेली १९ वर्षे ‘वस्ताद’ म्हणून काम केले. अर्जुन व शिवछत्रपती पुरस्कार विजेते काका पवार, शिवछत्रपती पुरस्कार विजेते गोविंद पवार, राहुल काळभोर, रवींद्र पाटील, दत्ता गायकवाड, रमेश माने, महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर, तानाजी बनकर, दत्ता गायकवाड, चंद्रहास निमगिरे, विकी बनकर, राष्ट्रकुल पदकविजेते रणजित नलावडे, राहुल आवारे यांच्यासह अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मल्ल बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले. केवळ प्रशिक्षक म्हणून नव्हे तर मल्लांना वडिलकीच्या नात्यानेच त्यांनी मार्गदर्शन केले. बिराजदार यांना राज्य शासनाने १९७१ मध्ये शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले, तर १९९८-९९ मध्ये त्यांना दादोजी कोंडदेव पुरस्कार मिळाला. २००६ मध्ये केंद्रीय क्रीडा खात्याने त्यांच्या कार्याची दखल घेत ‘ध्यानचंद’ हा राष्ट्रीय पुरस्कार देत त्यांचा सन्मान केला. त्याखेरीजही त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.

  • मारुती माने

    १९६४ ला मेहेरदीन याला पराभूत करून ‘हिंदकेसरी’ किताब पटकावलेल्या मारुती माने यांनी त्यानंतरच्या दशकात अनेक दिग्गजांशी कुस्त्या केल्या. त्यात मास्टर चंदगीराम, सादिक पंजाबी, विष्णुपंत सावर्डेकर-पाटील आणि बसलिंग करजगी आदींचा समावेश होता.

  • अण्णासाहेब किर्लोस्कर

    संगीत नाटकांचं युग सुरू करणारे रंगकर्मी म्हणजे अण्णासाहेब किर्लोस्कर. ‘संगीत सौभद्र’ आणि ‘संगीत शाकुंतल’ या त्याकाळी गाजलेल्या आणि त्यातील नाट्यगीतांमुळे आजही लोकप्रिय असलेल्या नाटकांचे नाटककार म्हणजेच अण्णासाहेब किर्लोस्कर. एका पारशी नाटकाचा प्रयोग त्यांनी पाहिला आणि असाच एखादा नाट्यप्रयोग मराठीत करून तो रंगभूमीवर आणायचा, असं त्यांनी ठरवलं. कथानक शोधता शोधता कालिदासांच्या ‘अभिज्ञान शाकुंतल’ या कलाकृतीने त्यांच्या मनात घर केलं. त्यातूनच ‘संगीत शाकुंतल’ या नाटकाचा जन्म झाला.

  • वसंत सबनीस

    (6 डिसेंबर 1923 ते 15 ऑक्टोबर 2002)

    रघुनाथ दामोधर सबनीस, उर्फ वसंत सबनीस यांचा जन्म 6 डिसेंबर 1923 रोजी झाला. बी. ए. पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी सरकारी नोकरी केली. त्यांचे शालेय शिक्षण पंढरपुर येथे झाले. तर पुण्यात पुढील महाविद्यालयीन शिक्षण झाले. रा. श्री. जोग यांच्या साहित्य सहकार या संस्थेत ते दाखल झाले. पुण्यातल्या वास्तव्यात पु.ल.देशपांडे, राम गबाले, शरद तळवलकर यांच्याशी झालेली घनिष्ठ मैत्री त्यांच्या एकुण व्यक्तिमहत्त्वाच्या घडणीतच महत्त्वाची ठरली. सबनीस बहुरुपी होते. ते ग्रामिण बाजाचे उत्तम लिखाण करीत होते. तसेच एकांकीका व रहस्यकथाही लिहीत. 1993 साली मुंबईत भरलेल्या नाटयसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. `घरोघरी हिच बोंब`, `कार्टी श्रीदेवी` या नाटकाबरोबरच `विच्छा माझी पुरी करा` यासारखे वगनाटय, तसेच इथुन सुरवात होऊन `सोगांडया`, ` एकटा जीव सदाशिव` हे दादा कोंडकेसाठी गाजलेले चित्रपट त्यांनी दिले. त्यांनी असंख्य गाजलेली नाटके लिहली. गेला माधव कुणीकडे हे त्यांचे गाजलेले नाटक होते.

    वसंत सबनीस यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.

    ज्येष्ठ पटकथाकार रघुनाथ दामोदर सबनीस, ऊर्फ वसंत सबनीस (6-Dec-2017)

    ज्येष्ठ पटकथाकार रघुनाथ दामोदर सबनीस, ऊर्फ वसंत सबनीस (6-Dec-2018)

    ज्येष्ठ पटकथाकार वसंत सबनीस (15-Oct-2016)

    ज्येष्ठ पटकथाकार वसंत सबनीस (6-Nov-2017)