(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • डॉ. संजय रामचंद्र कंदलगावकर

    प्राचार्य, चिंतामणराव व्यापार महाविद्यालय, सांगली

      May 25, 2010


  • डॉ. चिंतामण श्रीधर कर्वे

    विज्ञानलेखक डॉ. चिंतामण श्रीधर कर्वे यांचा जन्म २५ डिसेंबर १९१४ रोजी झाला.

    निळे आकाश, अणुशक्ती शाप की वरदान, चला चंद्राकडे, अणूतून अनंताकडे, अग्निबाण ही त्यांनी ५० वर्षांपूर्वी लिहिलेली पुस्तके प्रसिद्ध आहेत.

    ## Dr. Chintaman Shridhar Karve

      July 27, 2017


  • अविनाश नारायण भिसे

    निवृत्त संचालक-कॅन्सर रिसर्च सेंटर, मुंबई.

      December 15, 2010


  • सदाशिव आत्माराम जोगळेकर

    संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात त्यांनी लिहिलेला ‘संयुक्त महाराष्ट्र — महागुजरात’ हा ग्रंथ त्या दोन राज्यांच्या जडण-घडणीचा अद्ययावत ज्ञानकोश समजावयास हरकत नाही. ‘अहल्या आणि इतर कथा’ हा त्यांचा लघुकथा संग्रह आहे.

      August 2, 2017


  • योसेफ दाविद पेणकर

    पेणकर, योसेफ दाविद - 0459

    ३१ ऑक्टोबर १८७२
    १८७२> बेने इस्रायली मराठी नाटककार योसेफ दाविद पेणकर यांचा जन्म. “मक्काबी वीरांचे शौर्य”, “राजपुत्र आबशालोम”, “एस्तर राणी”, “रोमन राजा टेटस” ही अख्यानवजा मराठी नाटके त्यांच्या नावावर आहेत.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

    पेणकर, योसेफ दाविद - 0475

    ६ सप्टेंबर १९४९
    १९४९> “रशियातील बहुदी कन्या” हे नाटक लिहुन त्यांनी बेने इस्रायली धर्मकथांचा परिचय महाराष्ट्राला करुन दिला. “दाविदाख्यान”, आणि “महाराणी एस्तरचे बुद्धिचातुर्य” आदी मराठी कीर्तनाच्या पद्यावली त्यांनी रचल्या होत्या.

    mss

      August 2, 2017


  • (डॉ.) भूषण पटवर्धन

    पटवर्धन, (डॉ.) भूषण

    तीन-चार महिन्यांपासून डॉ. भूषण पटवर्धन हे नाव राज्यातील उच्चशिक्षणविश्वामध्ये चर्चेत होते. ते म्हणजे पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या ‘शर्यती’मधील एक प्रमुख उमेदवार म्हणून! काही कारणांमुळे कुलगुरू निवडीचे फासे डॉ. पटवर्धन यांच्यासाठी अनुकूल पडले नाहीत. अर्थात, डॉ. पटवर्धन याला अपयश मानत नाहीत. यामुळे स्थितप्रज्ञ होणे तर त्यांना मुळीच मान्य नाही. बंगळूरू येथील ‘इन्स्टिटय़ूट ऑफ आयुर्वेद अ‍ॅण्ड इंटिग्रेटिव्ह मेडिसिन’ या संस्थेच्या संचालकपदी डॉ. पटवर्धन यांची झालेली निवड हे त्याचेच द्योतक आहे.

    राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. सॅम पित्रोदा यांनी ही निवड जाहीर केली. आयुर्वेदासारख्या प्राचीन भारतीय ज्ञानशाखेचे महत्त्व वेळोवेळी सिद्ध होत असले तरी त्याचा व्यावहारिक वापर करण्यासाठी आरोग्य-उपचार ज्ञानपरंपरांचा समन्वय साधण्यात आपण कमी पडतो. त्याचप्रमाणे आयुर्वेदासारख्या ऐतिहासिक परंपरेच्या कसोटीवर उतरलेल्या ज्ञानसाधनेचे शास्त्र, अत्याधुनिक विज्ञानाच्या निकषांवर सिद्ध करण्याचे क्षमताविकसन आपण केलेले नाही. या पाश्र्वभूमीवर डॉ. पटवर्धन यांची आयुर्वेद इन्स्टिटय़ूटच्या संचालकपदी नियुक्ती सयुक्तिक ठरत आहे. पुण्यातील फग्र्युसन महाविद्यालयातून रसायनशास्त्र विषयातून पदवी प्राप्त केल्यानंतर अहमदनगरला प्रो. जॉन बार्नबास यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जैवरसायनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मुंबईच्या हाफकिन संस्थेतून पीएच.डी. संपादन केल्यानंतर औषधनिर्माणशास्त्र उद्योगामध्ये संशोधक व व्यवस्थापक या नात्याने भरीव कामगिरी केली. १९९४च्या सुमारास डॉ. पां. वा. सुखात्मे यांच्या प्रेरणेने पुणे विद्यापीठात ‘स्कूल ऑफ हेल्थ सायन्स’ असा स्वायत्त विभाग सुरू करण्यात आला आणि डॉ. पटवर्धन यांचा विद्यापीठीय अध्यापन-प्रशासनामध्ये प्रवेश झाला. आरोग्यशास्त्र व सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात कार्यरत आधुनिक-प्राचीन अशा सर्व ज्ञानपरंपरा, कौशल्ये, प्रणालींचा समन्वय साधून विभागामार्फत समाजाभिमुख संशोधन प्रकल्प हाती घेण्यात आले. अगदी जागतिक बँकेपर्यंतच्या प्रकल्पांना पुणे विद्यापीठाने संशोधनाचे पाठबळ दिले ते डॉ. पटवर्धन यांच्या या विभागामुळेच! जनतेचा महाविज्ञानसोहळा म्हणून गौरविण्यात आलेल्या २००० सालच्या अखिल भारतीय विज्ञान काँग्रेसच्या पुण्यातील अधिवेशनाच्या मुख्य संयोजन सचिवपदाची जबाबदारी डॉ. पटवर्धन यांनी यशस्वी केली. युरोप-अमेरिकेतील आघाडीच्या उद्योगांसमवेत सहकार्य करार करतानाच पुणे महापालिका, जिल्हा परिषदांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांशी सहकार्य प्रस्थापित करून तळागाळातील जनतेच्या आरोग्याचे प्रश्न त्यांनी चार भिंतींमध्ये बंदिस्त राहिलेल्या विद्यापीठीय संशोधनाच्या कक्षेत आणले. आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनाप्रमाणे आंतरआरोग्यशाखीय प्रकल्प उभारण्याचे कार्य डॉ. पटवर्धन यांनी केले आहे. बंगळूरू येथील या संस्थेमार्फत त्याला आंतरराष्ट्रीय व्याप्ती लाभणार आहे. भारतीय उच्चशिक्षणाची निर्यात करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने नेमलेल्या समितीचे सदस्य म्हणून व त्यानंतर मणिपाल विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण प्रकल्पाचे प्रमुख या नात्याने त्यांना देशोदेशीच्या उच्चशिक्षण व संशोधन व्यवस्थेचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. डॉ. पित्रोदा, डॉ. रघुनाथ माशेलकर आदींच्या प्रेरणेने केंद्रीय स्तरावर ‘न्यू मिलेनियम टेक्नॉलॉजी इनिशिएटिव्ह’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत वनौषधी विकासाकरिता कार्यरत असलेल्या राष्ट्रीय प्रकल्पाची जबाबदारी सांभाळणाऱ्या तीन आघाडीच्या संशोधकांमध्ये डॉ. पटवर्धन यांचा समावेश आहे. ‘प्राचीन शास्त्र-परंपरेचा त्याग केला तरच आयुर्वेदाचे आधुनिकीकरण करणे शक्य आहे, असा गैरसमज आपल्याकडे आहे. त्याऐवजी प्रगत तंत्रज्ञानाच्या वापरामुळे या प्राचीन ज्ञानशाखेला अधिक बळकटी प्राप्त होत आहे. जनुकीय समस्या, जैवतंत्रज्ञान, जैवमाहितीशास्त्र, कर्करोगाबरोबरच एचआयव्ही-एड्ससारख्या व्याधी आदींवर प्राचीन परंपरांमधील शास्त्र आधुनिकीकरणाच्या माध्यमातून प्रयोगशाळांमधून ताडून पाहणे शक्य आहे. त्यासाठी आयुर्वेदावर आधारित आंतरराष्ट्रीय प्रकल्प व्यासपीठ उभारण्याची नितांत गरज आहे. त्या दृष्टीने बंगळुरू येथील ही नवीन जबाबदारी आश्वासक ठरते आहे,’ असे डॉ. पटवर्धन सांगतात.

      August 5, 2017


  • डॉ. विजय जोशी

    लोखंडापासून निघणाऱ्या मळीचे रिसायकलिंग करून टिकाऊ रस्ते बांधणीचे तंत्रज्ञान विकसीत करणाऱ्या डॉ. विजय जोशी यांना ऑस्ट्रेलियन सरकारने ' ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया ' हा मानाचा पुरस्कार प्रदान करून गौरविले आहे. भारतातील पद्मश्री पुरस्काराच्या दर्जाचा हा सन्मान आहे.

    डॉ. विजय जोशी हे मूळचे ठाणेकर. मो. ह. विद्यालयाचे माजी विद्यार्थी. त्यांनी व्हीजेटीआयमधून सिव्हिल इंजिनीअरींगची पदवी घेतली. त्यानंतर मास्टर्सही पदवी मिळवली.

    पुढे टाटा, हमफ्रीज् अॅण्ड ग्लेक्सो (आताची जेकब इंजिनीअरिंग) या उद्योग समूहांमध्ये त्यांनी काम केले. तळोजा येथील दीपक फर्टिलायझर्स येथे कार्यरत असताना २५० फूट उंच प्रिलिंग टॉवरच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. मस्कत येथे काही काळ अनुभव घेतल्यानंतर न्यूझीलंड येथील वास्तव्यात त्यांनी रस्तेबांधणीच्या कामात विशेष प्राविण्य मिळविले. गेल्या २० वर्षांपासून जोशी सिडनी येथे स्थायिक आहेत. तेथे स्टील उत्पादनात वाया जाणारे घटक रस्त्यांसाठी कसे वापरता येतील या विषयावरचा प्रबंध पूर्ण करून त्यांनी डॉक्टरेट मिळवली.

    लोखंडापासून निघणाऱ्या मळीचा (स्लॅग) उपयोग करून रस्ते बांधणीचे नवे तंत्र त्यांनी विकसीत केले. ऑस्ट्रेलियातील प्रमुख रस्त्यांसह सिडनी एअरपोर्टच्या तिसऱ्या रनवेसाठी हेच तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. उत्तम दर्जाचे आणि टिकाऊ रस्ते त्यातून बांधले गेले. या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे ऑस्ट्रेलियात रस्ते बांधणीतील रेती , खडी आणि अन्य सामग्री अशी मिळून २ कोटी टन (मुंब्रा पारसीक डोंगराएवढे पाच डोंगर भरतील एवठी खडी व माती) एवढ्या प्रचंड नैसर्गिक साधन संपत्तीची बचत झाली. याच कार्यासाठी ऑस्ट्रेलियन सरकारने डॉ. विजय जोशी यांना ' ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया ' हा पुरस्कार प्रदान केला आहे.

    इंजिनीअरींग बरोबरच संगीत, साहित्य, कला यातही जोशी यांना विशेष रुची आहे. सिडनीत येणा-या तमाम भारतीय कलाकारांचे आदरातिथ्य आपुलकीने करतात. सिडनीतले आकाशवाणी केंद्र सुरू करण्यातही आणि त्यावर विविध कार्यक्रमांच्या आयोजनातही जोशी यांचा पुढाकार असतो. नैसर्गिक साधन संपत्ती वाचविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे डॉ. विजय जोशी नेहमी सांगत असतात. शहराची निर्मिती आणि विकासाच्या प्रत्येक कामात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर होत असतो. अलिकडच्या काळात या वापरावर कुठलेही निर्बंध राहिलेले नाहीत. बेसुमार जंगलतोड , खाडी व नद्यामतील वाळू तसेच छोट्या टेकड्या व मोठे डोंगर पोखरून दगड आणि मातीचा उपसा केला जातोय. त्यामुळे भविष्यात मानवी समाजासमोर अनेक संकटे उभी ठाकणार आहेत. याची जाणिव राज्यकर्ते आणि समाजानेही ठेवायला हवी असेही जोशी आवर्जुन सांगतात.


      August 9, 2017


  • केशव रामराव जोशी

    जोशी, के. रा.

    संस्कृत विद्वानांच्या विरळ साखळीतून डॉ. के. रा. जोशी नावाचा दुवा निखळला. अतिशय सामान्य परिस्थितीतून पारंपरिक पद्धतीने संस्कृतचे जिद्दीने शिक्षण घेणाऱ्या डॉ. के. रा. जोशी यांची संस्कृतप्रसाराची भूमिका इतकी आग्रही होती की, इंग्रजीस विरोध करून अनेकांची नाराजी त्यांनी ओढवून घेतली. मराठी आणि संस्कृत या दोन्ही भाषांना त्यांनी ‘रोजगाराची जोड’ देण्याचा आग्रह राज्य सरकारकडे धरला होता. यासाठी त्यांनी अनेक पत्रव्यवहार केले. संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे, यावर ते शेवटपर्यंत कायम राहिले.

    कोणत्याही विषयावर सकारात्मक चर्चा करताना स्वत:ची मते ठामपणे मांडली आणि तेवढय़ाच तन्मयतेने विरोधकांचेही म्हणणे ऐकून घेतले. नागपूर विद्यापीठात अध्यापन करताना पारंपरिकता आणि आधुनिकता असा मार्ग स्वीकारून तब्बल पाच तपे संस्कृत प्रचारासाठी खर्ची घातली. काशीला राहून शास्त्री-पंडितांसोबत परंपरागत अध्ययन केल्यावर तत्त्वज्ञान, व्याकरण आणि वेदाभ्यास यांतच न अडकता शास्त्राभ्यास व ललित साहित्यावरील प्रभुत्वही त्यांनी दाखवून दिले. संस्कृत निबंध, कथा, काव्यनिर्मिती अशी अंगे जोपासताना संस्कृतप्रचुर विद्वत्तापूर्ण वक्तृत्वाने राज्यभरात स्वतंत्र ओळख त्यांनी निर्माण केली. ‘काव्यत्रिदलम’ आणि ‘शास्त्रत्रिदलम’ ग्रंथांमध्ये हुंडय़ासारख्या सामाजिक समस्येचा ऊहापोह त्यांनी संस्कृत साहित्यातून केला. ‘नीलकंठ दीक्षित आणि त्यांची काव्यसंपदा’हे सटीक संपादन त्यांनी केले आणि नद्या, निसर्ग आणि पर्यावरणावर अफाट प्रेम करणाऱ्या के. रा. जोशी यांची संस्कृतातील प्रवासवर्णने वेड लावणारी आहेत. संस्कृत ही राष्ट्रभाषा व्हावी, हा आग्रह धरताना त्यांनी आदर्शवादाची पाठराखण केली. या ध्येयसिद्धीच्या मार्गावर चालताना लढवय्या बाणा दाखवून दिला. राष्ट्रपती पुरस्कार देऊन भारत सरकारने या विद्वानाने संस्कृत भाषेसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेतली. देश-विदेशातील अनेक सन्मान त्यांना लाभले, पण त्याचा गवगवा त्यांनी केला नाही. विदर्भाने देशाला प्रज्ञाभारती डॉ. श्री. भा. वर्णेकर, डॉ. मधुकर आष्टीकर अशी विद्वत्रत्ने दिली; यातील एक महत्त्वाची कडी म्हणजे डॉ. के. रा. जोशी होते. आज तिन्ही रत्ने निखळली आहेत. त्यांनी जोपासलेल्या शैलीची छाप भविष्यातही कायम राहणार आहे.
    ------------------------------------------------------------------------------------

    डॉ. के. रा. जोशी

    एखादे ध्येय घेऊन जगणे , त्यासाठी अवघे आयुष्य समर्पित करणे ही सोपी बाब नाही . त्यासाठी साधना लागते . प्रख्यात संस्कृत पंडित डॉ . केशव रामराव जोशी हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण होते . अमेरिकेच्या बायोग्राफिकल इन्स्टिट्यूटने २००५ साली ' मॅन ऑफ द इयर ' पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान त्यांच्या निवासस्थानी जाऊन केला होता , यावरून त्यांच्या कार्याची केवढी मोठी दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली ते लक्षात यावे . नागपूरच्या संस्कृत भाषा प्रचारिणी सभेचे अनेक वर्ष उपाध्यक्ष राहिलेले जोशी यांच्या कार्याचा अनेकांनी गौरव केला . त्यांना अनेक मानसन्मान मिळाले . जोशी संस्कृतचे विद्वान होते . त्यांचा प्राचीन , अर्वाचीन परंपराचा अभ्यास होता . विपरीत परिस्थितीतून वर आलेल्या जोशी यांनी स्वतःचे व्यक्तिमत्त्व स्वतःच घडवले . त्यंानी नागपूर विद्यापीठातून एम . ए . केले व त्यानंतर पीएच . डी . केले . बिंझाणी कॉलेजात काही काळ प्राध्यापकी केल्यानंतर त्यांनी नागपूर विद्यापीठाच्या संस्कृत विभागाचे प्रमुख म्हणून काम केले . विद्यापीठाच्या संस्कृत अभ्यासमंडळाचे ते काही काळ अध्यक्ष होते . कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांवरही ते सदस्य होते . अतिशय विनोदी स्वभावाचे डॉ . जोशी शाब्दिक कोट्या करायचे . हातात घेतलेले काम तडीस नेणे हा त्यांचा स्वभाव होता . जोशी यांचे व्यक्तिमत्त्व मेहनती , जिद्दी व लढाऊ होते . त्यांनी शारीरिक भाष्यावरील विश्लेषण , अभिनवम् शास्त्रत्रिदलम् या पुस्तकांसह नीलकंठविजयम् व रहस्यमयी या नाटिकाही लिहिल्या . कम्प्युटर ज्या लॉजिकवर चालतो त्या ' लॉजिक ' वर आधारित त्यांचे पुस्तक ' न्यायसिद्धांत मुक्तावली ' खूपच गाजले . त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना पीएच . डी . साठी मार्गदर्शन केले . कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ . पंकज चांदे , प्रभाकर आग्रे , डॉ . सुनीती आफळे , हर्षिदा दवे , डॉ . अनुपमा डोंगरे असे अनेक विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनात घडले , मोठे झाले . डॉ . जोशी यांच्या कार्याची दखल घेत १९८९मध्ये त्यांना महाराष्ट्र सरकारने संस्कृत पंडित पुरस्कार प्रदान केला . ज्ञान प्रबोधिनी पुणे , कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ , देवदेवेश्वर संस्थान , जयपूरची संस्कृत सेवा परिषद , श्रुंगेरी पीठ आदींचेही पुरस्कार त्यांना मिळाले . २००९ साली त्यंाना राष्ट्रपती मिळाला . साहित्याचार्य , काव्यतीर्थ , साहित्योत्तम आणि संपूर्णदर्शनमध्यमा अशा अनेक पदव्या त्यांना मिळाल्या . संस्कृत भाषेचा अभ्यास करणारे तरुण मध्यभारतात भरपूर आहेत पण ज्येष्ठ व विद्वान मंडळीची संख्या फार कमी आहे . त्यामुळे संस्कृत पंडित , साहित्याचार्य डॉ . जोशी यांचे महत्त्व संस्कृतभाषिकांना अधिक होते . त्यांच्या अचानक निधनाने संस्कृत साहित्याची फार मोठी हानी झाली आहे .

    मूळ स्त्रोत - (महाराष्ट्र टाईम्स)

      August 5, 2017


  • गिरिजा ओक

    गोष्ट छोटी डोंगराएवढी’, ‘गुलमोहर’, ‘मानिनी’, आणि ‘अडगुळे मडगुळे’ या चित्रपटांत तिने काम केले आहे.

      June 25, 2022


  • बाळासाहेब भारदे

    स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले “सहकार” मंत्री म्हणून बाळासाहेब भारदे यांनी केलेले कार्य संपूर्ण देशाने गौरविले. ते त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष झाले. ते मुरब्बी राजकारणी तर होतेच त्याचबरोबर ते गांधीवादी विचारवंत, संत साहित्याचे अभ्यासक, सहकार क्षेत्रातील अग्रणी, पत्रकारही आणि कीर्तनकार होते.

      July 11, 2022