(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • सुरेश भास्कर गायतोंडे

    अभियांत्रिकी क्षेत्रात नोकरी करुन गेली ५५ ते ६० वर्षे अविरत तबलावादन करुन रसिकांना मंत्रमुग्ध करणारे तबलावादकांमध्ये ज्येष्ठ म्हणून आदराने ओळखले जाणारे ठाणेकर सुरेश तथा भाई गायतोंडे हे ठाण्यातील एक कलारत्न होय.

  • डॉ. शुभा अशोक चिटणीस

    हिंदी विषयात एम.ए.पी.एच.डी. करणार्‍या मुंबई विद्यापीठात आणि बेडेकर महाविद्यालयात २५ वर्षं अध्यापनाचे कार्य करणार्‍या; तसंच नियतकालिकं, वृत्तपत्र यांतून सातत्याने लेखन करणार्‍या डॉ. शुभा चिटणीस या ठाण्यातील एक यशस्वी व्यक्तिमत्व !

  • कृष्णाजी वासुदेव पुरंदरे

    कृष्णाजी वासुदेव पुरंदरे हे इतिहास संशोधक होते.

  • अशोक रामचंद्र शिंदे

    श्री. अशोक रामचंद्र शिंदे हे गेली २५ वर्षे पत्रकारितेत असून त्यांनी `सांज लोकसत्ता', `नवशक्ती', `सकाळ', `अर्थनीती', `युगधर्म' अशा दैनिकांमधून पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवेगळे विषय हाताळले असून त्याची दखल शासकीय स्तरावरून वेळोवेळी घेण्यात आली आहे. ते भारतीय पत्रकार संघ, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ, मुंबई मराठी पत्रकार संघ आदी संस्थांशी संलग्न आहेत तसेच महाराष्ट्र शासनाचे अधिस्वीकृतीधारक पत्रकारदेखील आहेत. नागपूर येथून प्रकाशित होत असलेल्या ६७ वर्षे जुन्या `दै. युगधर्म' या दैनिकाचे ते मुंबईचे ब्यूरो चीफ म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर याच वृत्तपत्र समूहातील `दै. देश', `दै. उद्याची खबर आज', `दै. विदर्भ पुकार' या दैनिकांसाठीही ते मुंबईचे विशेष प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत.

    पूर्णवेळ पत्रकारिता करत त्यांनी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, व्यापार-उद्योग अशा विविध क्षेत्रातील वार्तांकनं तसेच लेखन केले आहे. व्यसनमुक्ती तसेच अवैध दारूचे धंदे, व्यसनापायी होणारी सामाजिक हानी, राजकारणात सत्शीलपणा येण्यासाठी आग्रही राहिलेले त्यांचे लेखन, विविध सामाजिक बाबी आदी विषयांवर त्यांनी गेल्या २३ वर्षांमध्ये नियमितपणे व सातत्याने लिखाण केले आहे. त्याच्या उपयोग महाराष्ट्राच्या विकासात हातभार लागण्यासाठी झालेला आहे. प्रत्येक बातमीमागे त्याची वस्तुनिष्ठता तसेच त्याचा सापेक्षपणा ठळकपणे अधोरेखित होतो.

    अनेक चरित्रपर व मार्गदर्शनपर पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने कांची कामकोठी पीठाचे जगदगुरु शंकराचार्य यांच्या हस्ते पुरस्कारदेखील मिळाला आहे. त्याचबरोबर अन्य संस्थांनीही त्यांच्या पत्रकारितेतील कार्याचा गौरव केला आहे. व्यसनमुक्ती उपक्रमांबरोबरच अन्य कामिगरींमध्ये त्यांचा लौकिक राहिला आहे. महाराष्ट्रातील जलसिंचन प्रकल्प, पंचतारांकित औद्योगिक वसाहती, कृषी प्रकल्प अशा अनेक विषयांवर त्यांनी अभ्यास करून पत्रकारितेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांची पाहणी करून त्याबाबत संबंधित विभागांकडे पाठपुरावा करून त्यांची सोडवणूकदेखील केलेली आहे. त्याची अनेक उदाहरणे आहे. आपल्या लिखाणातून राज्यातील असंख्य वाचकांवर शासनाच्या वतीने राबवण्यात येणा-या उपक्रमांचे तसेच योजनांचे विवेचन विश्लेषणात्मक रुपाने दिले आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांमध्ये या योजनांचे स्वरुप समजून त्याचा उपयोग कल्याणकारी कार्यासाठी करून घेण्यास हातभार लागला आहे. गेली पाच वर्षे सलगपणे ते विधिमंडळाच्या अधिवेशनांचे वार्तांकन करत असल्यामुळे शासकीय कामकाजांना त्यांनी वृत्तपत्राच्या माध्मयातून प्रसिद्धी देऊन जनमानसांपर्यंत शासनाचे विविध कार्य पोहचवले आहे.

    व्यसनमुक्तीच्या उपक्रमांना आपल्या लिखाणातून प्राधान्य देत महाराष्ट्राच्या विविध विकास कामं, योजना यांच्याशी संबंधित माहिती, त्याच्यावरील विश्लेष्ण तसेच त्याच्या प्रचारासाठी सातत्याने त्यांच्याकडून होत असलेल्या लिखाणातून राज्याच्या विकासकार्यात त्यांचेदेखील भरीव योगदान काही प्रमाणात लाभत आहे.

    भारतीय पत्रकार संघाचे सरचिटणीस म्हणून त्यांनी पत्रकारांचे साहित्य संमेलन दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सहकार्याने आयोजित केले. त्यालादेखील राज्यभरातील पत्रकारांनी उत्तम प्रतिसाद दिला होता.
    त्यांनी आतापर्यंत अनेक पुस्तके व लेख लिहले आहेत. पुस्तकांमध्ये अधिकांश आत्मचरित्रपर लिखाण असून त्यात राजकीय नेते शरद पवार, विक्रमराव सावरकर, पी. एस. लाड, उद्योजक भाई सावंत, शिक्षणकर्मी अनंत वामन वर्तक, पुष्पकांत अनंत म्हात्रे आदींचा समावेश आहे. त्याचबरोबर `लघुउद्योजकांच्या दुनियेत' हे त्यांचे पुस्तक तत्कालिक उद्योगमंत्री लिलाधर डाके यांच्या हस्ते प्रकाशित झाले. त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्याशिवाय अनेक प्रासंगिक लेखन ते वृत्तपत्रांमधून करत असतात. त्यांचे अनेक लेख महाराष्ट्रातील नामांकित वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

    केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळ, कुर्ला व श्रमिक पत्रकार संघटना असलेल्या भारतीय पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ६ जानेवारी २०१७ या दिवशी पत्रकारितेतील उल्लेखनीय व समर्पित कार्याबद्दल व श्रमिक पत्रकार म्हणून २५ वर्षे कार्य केल्याबद्दल विशेष पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

    महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने त्यांची परिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. ती जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

    मुंबईतील लघुवाद न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालत अंतर्गत त्यांना न्यायालयीन खटल्याच्या न्यायप्रक्रियेत पत्रकार व समाजसेवक म्हणून सहभागी करून घेतले जाते.

    कोकण मराठी साहित्य परिषदेचे ते अजीवन सदस्य असून त्यांनी कोमसापच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या साहित्य संमेलनात मोलाची भूमिका बजावली. या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. दादर येथील राजा शिवाजी विद्यालयात झालेल्या या भव्य संमेलनाच्या आयोजनापासून ते संपूर्ण संमेलन पूर्ण होईपर्यंत प्रसिद्धी समिती प्रमुखपदाची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली. त्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

    ऋजुता फाऊंडेशनचे ते विश्वस्त असून त्यांनी महिला साहित्यिकांचे राज्यव्यापी संमेलन दादर – माटुंगा सांस्कृतिक केंद्रात आयोजित केले. त्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. विजया वाड होत्या तसेच गिरीजा किर यांना जीवनगौरव पुरस्कार दिला गेला. भाषा संचालनालयाच्या संचालिका डॉ. मंजुषा कुलकर्णी यांच्यासह देश-विदेशातील अनेक सुप्रसिद्ध महिला साहित्यिका यात सहभागी झाल्या होत्या. या संमेलनाचे नेटनेटके आयोजन अशोक शिंदे यांनी केले व संमेलन यशस्वी केले.

    स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या निवडक ग्रंथ संपदांचा 12 भारतीय भाषांमध्ये अनुवाद तसेच ब्रेल लिपीत त्याचे रुपांतरण करण्याचा प्रकल्प त्यांनी एकट्यानी यशस्वीपणे राबविला आहे. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे साहित्य मराठी, हिंदी, इंग्रजीसह गुजराती, बंगाली, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळ्म, आसामी, पंजाबी, उडिया या भाषांमध्ये उपलब्ध झाले आहे.

    माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांनी लिहलेल्या `शिवसेना – काल, आज आणि उद्या' या अभ्यासपूर्ण ग्रंथाच्या निर्मितीसाठी संपादकीय स्तरावर सहकार्य केले असून तसा उल्लेख प्रकाशकांनी प्रस्ताविकेत केला आहे.

    राजहंस प्रकाशनच्या वतीने गाजत असलेल्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक संदीप वासलेकर लिखित `एका दिशेचा शोध' या पुस्तकाच्या संपादकीय प्रक्रिया त्यांचा सहभाग असून तसा उल्लेख लेखकाने आपल्या मनोगतात केला आहे.

    अनेक स्वयंसेवी संस्थांशी ते संबंधित आहेत. रामचंद्र प्रतिष्ठान या विश्वस्त संस्थेच्या तसेच अर्थनीती मासिकाच्या वतीने त्यांनी लेख, निबंध स्पर्धा अशा साहित्यिक उपक्रमांचे आयोजन केले आहे.

    श्रमजीवी वर्गात त्यांचे व्यावसायिक कार्य येत असून त्यातून त्यांनी महाराष्ट्राच्या समाजाच्या विकासात अप्रत्यक्षपणे भरीव योगदान दिले आहे.

  • रा. श्री. जोग

    साहित्य मीमांसक, कवी आणि एक विचारवंत म्हणून रा. श्री. जोगांची ओळख आहे. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज या गावी १५ मे १९०३ रोजी झाला. त्यांचे वडील श्रीपाद बाजी जोग हे संस्कृतचे गाढे अभ्यासक होते. रा. श्री. जोग यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून झाले.

  • केसरबाई केरकर

    केसरबाईंनी नेहमी राजा-महाराजांसमोर आपली कला सादर केली. कधीही रेकॉर्डिंगच्या मागे लागल्या नाहीत; उलटं ह्या सागळया चोचल्यांपासून लांबच राहिल्या. केवळ आपले गाणे परिपूर्ण कसे होईल ह्यावर भर देत त्यांनी आपले जीवन ह्या कलेला समर्पित केले. त्यांनी आपल्या गाण्याची काही ध्वनिमुद्रणेही केली.

  • (डॉ.) मनोहर जाधव

    मराठी साहित्यात सामाजिक वास्तवाचे भान असावे, या मताचा हिरीरीने पुरस्कार करणारे साहित्यिक डॉ. मनोहर जाधव हे पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख. विचारमंथनातून निमिर्तीक्षम साहित्यसेवा आणि अध्यापनातून कृतिशील संवेदना जपणारे जाधव समतावादी परंपरा पुढे नेणारे असे कवी.

    साहित्यिकांनी सामाजिक दृष्टिकोनातून बदलत्या समाजजीवनाचा आढावा घेण्याची आवश्यकता आहे, या त्यांच्या भूमिकेचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनात उमटते. वास्तवाची जाणीव, आसपासच्या घटनांचे भान आणि लेखन परंपरेचे अधिष्ठान त्यांच्या लेखनातून ठळक होते. या जाणीवेतूनच दलित साहित्याकडे ते पाहतात.

    समाजव्यवस्थेचे बळी ठरलेल्या दलितांच्या आत्मभानाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी सहसंवेदनेची आहे. दलित कविता ही मराठी कवितेचे एक वैशिष्ट्यपूर्ण वळण आहे. या कवितेच्या मुळाशी असलेला जीवनानुभव त्यांना स्पर्श करतो. दलित कवींच्या तिसर्‍या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे कवी शेषराव धांडे यांच्या कवितासंग्रहाच्या प्रस्तावनेत दलित कवितेवर होणारा आक्रस्ताळेपणाचा आरोप ते खोडून काढतात. आक्रस्ताळेपणा आणि आक्रमकपणा, स्थितिशीलता आणि परिवर्तन, आक्रोश आणि विदोह यातील फरकावर ते नेमके भाष्य करतात.

    'दलित स्त्रियांची आत्मकथने', 'प्रत्ययपर्व', 'साहित्य : शोध आणि बोध' यांसारखी त्यांची पुस्तके समीक्षकांनी गौरविली आहेत. समतावादी साहित्य संमेलन असो वा भटक्या-विमुक्तांवरील राष्ट्रीय चर्चासत्र, जाधव आपल्या सामाजिक दृष्टिकोनातून आलेली सुधारणावादी भूमिका आग्रहाने मांडतात.

    त्यांनी हिंदी भाषेतही मुशाफिरी केली आहे. कवी अरुण काळे यांच्या कवितासंग्रहाच्या 'सायरन के शहर' या अनुवादाला डॉ. जाधव यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे. हिंदीतील सहा समकालीन मान्यवर कवींच्या कवितांच्या अनुवादाचे कामही त्यांनी केले आहे.

    फैजपूर येथे अध्यापन करून १९९५ मध्ये ते पुण्यात आले. पुणे विद्यापीठात मराठी विभागप्रमुखपद सांभाळताना त्यांची कृतिशीलता अधिक स्पष्ट होते. मराठी विषयात व्यवसायाभिमुख कौशल्यावर आधारित चार नवे अभ्यासक्रम सुरू करण्याचे धोरण काळाबरोबर जाण्याच्या त्यांच्या आग्रहाला पुष्टी देते.

    अमराठी भाषकांना मराठी शिकविण्यासाठी सहा महिन्यांचा मराठीचा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला आहे. बालवाङ्मयाचा विद्यापीठ पातळीवर अभ्यास व्हावा, अशी निराळी भूमिकाही त्यांनी मांडली आहे.

    डॉ. जाधव यांना बुलढाणा जिल्हा साहित्य संघातर्फे उत्कृष्ट साहित्य निमिर्तीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


  • हेमचंद्र रामचंद्र अधिकारी (कर्नल हेमू अधिकारी)

    हेमू अधिकारी हे नावाजलेले क्रिकेट खेळाडू होते. ते ऊजव्या हाताने फलंदाजी करत असत तसेच आवश्यकता असल्यास लेग-स्पिन गोलंदाजीही करत.

  • आचार्य आनंदऋषीजी महाराज

    आनंदऋषी महाराज यांनी समाजातील विविध संप्रदायींना संघटीत करण्याचे कार्य केले. त्यांच्या अलौकिक कार्याने ते श्रमण संघाचे प्रमुख मानले जाऊ लागले.

  • अशोक पाटोळे

    पाटोळे यांनी लिहिलेली २० नाटके व्यावसायिक रंगभूमीवर गाजली. ‘झोपा आता गुपचूप’ हे त्यांचे पहिले नाटक. ‘मुंबई पोर्ट ट्र्स्ट’च्या ‘एकटा जीव सदाशिव’ या नाटकात त्यांनी विनोदी नायकाची भूमिका केली होती. चित्रकला, वक्तृत्व, गीतगायन व अभिनय यांचीही पाटोळ्यांना आवड होती.