(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आदित्य ओक

    आदित्य ओक यांचे वडिल डॉ. विद्याधर ओक गोविंदरावांकडे शिकायचे. त्यांना शिकवायला दर शुक्रवारी ते घरी यायचे. वयाच्या दहाव्या वर्षांपासून पुढे आठ वर्षं आदित्य ओक यांना गोविंदरावांकडे प्रत्यक्ष शिकण्याची संधी मिळाली.

      June 21, 2022


  • प्राजक्ता कैलास टिपाले

    वयाच्या ११ व्या वर्षापासून प्राजक्ताने खेळायला सुरुवात केली आणि १२ व्या वर्षी पहिले राज्यस्तरीय अजिंक्यपद पटकावले, १७ व्या वर्षी राष्ट्रस्तरीय स्पर्धा जिंकली.

      May 16, 2014


  • स्वातंत्र्यसैनिक दत्तात्रय शं.पोतनीस

    स्वातंत्र्यसैनिक, समाजसेवक आणि नाशिकच्या ‘गावकरी’,’अमृत’ व ‘रसरंग’ चे संपादक दत्तात्रय.शं.पोतनीस तथा दादासाहेब पोतनीस यांचा जन्म.२२ नोव्हेंबर १९०९ रोजी वाई (जि. सातारा) येथे झाला.

    दत्तात्रय पोतनीस यांचे वडिल शिलाई काम करून चरितार्थ चालवायचे. त्यामुळे त्याचे शालेय शिक्षण वाईतच झाले. नंतर ते पुण्याला आले. मात्र पुण्यात आल्यावर गांधी विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि ते स्वातंत्र्य चळवळीत ओढले गेले. शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी गांधीजींच्या हाकेला ओ देत थेठ नाशिक जिल्हयातील टेंभे गाव गाठले. तेथे अनेक सामाजिक कामं केली. परिसरातील गावात ४५ एक शिक्षकी शाळा सुरू करून ज्ञानयज्ञ आरंभिला. त्यासाठी गावकरी सुरू केले.

    मात्र १९३९ च्या सुमारास त्यांना नाशिकला जाण्यासाठी सांगण्यात आले. ते नाशिकला गेले. गावकरी साप्ताहिक मग नाशिकमधून निघू लागला. तेथे त्यांनी ७००० रूपये गुंतवणूक एक छपाई मशिन घेतले. त्यावर ‘गावकरी’ छापला जायला लागला. मात्र याच वेळेस १९४२ च्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना कारावास झाला. त्यामुळं गावकरीचं प्रकाशन थाबलं. परत आल्यानंतर १९४४ मध्ये पुन्हा गावकरी पहिल्या जोमानं प्रकाशित व्हायला लागला. साप्ताहिकाच्या मर्यादा लक्षात घेऊन १९४७ मध्ये दादासाहेबांनी गावकरीचे दैनिकात रूपातर केलं. मुंबईची वृत्तपत्रं नाशिकात उशिरानं येत. गावकरी मात्र सकाळीच नाशिकात वितरित होऊ लागल्यानं गावकरी नाशिकच्या घराघरात आणि मनामनात घर करून बसला.

    आपल्या वाचकांना उशिरातल्या बातम्या देता याव्यात म्हणून दादासाहेबांनी पीटीआय या वृत्तसंस्थेची सेवा घेतली. ताज्या बातम्या आणि सर्व विचारांना स्थान देणारे गावकरी अल्पावधितच लोकप्रिय दैनिक बनले. गावकरीचा चांगलाच जम बसल्यानंतर दादासाहेबांनी एक नवा प्रयोग कऱण्याचं ठरविलं. इंग्रजीतील रिडर डायजेस्टच्या धर्तीवर ‘अमृत’ हे मासिक सुरू केलं. या मासिकाला महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलं. त्यानंतर आणखी एक नवा प्रयोग दादासाहेबांनी केला. कला,क्रीडा आणि मनोरंजनाला वाहिलेलं ‘रसरंग’ हे साप्ताहिक १० मे १९५८ रोजी सुरू केलं. मराठीतला हा प्रयोगही पहिल्यांदाच होत असल्यानं वाचकानं रसरंगवर देखील उडया टाकल्या.व्यावसायिकदृष्टया देखील रसरंग यशस्वी ठरले.

    रसरंग सुरू करून अजून सहा महिनेही झालेले नव्हते तोच दादासाहेबांनी औरंगाबादेतून अजिंठा सुरू करण्याचा निर्णय़ घेतला.निजामी राजवटीतून मुक्त झालेल्या मराठवाड्यात परिपूर्ण दैनिक नव्हते. मराठवाडा होते पण ते साप्ताहिक स्वरूपात निघत होते.ही पोकळी विचारात घेऊन दादासाहेबांनी ३ डिसेंबर १९५८ पासून अजिंठा नावाचे दैनिक औरंगाबादेतून सुरू केलं. अलिकडच्या काळात मराठवाड्यात भांडवलदारी वृत्तपत्रं आल्यानं ध्येयवादी वृत्तपत्रं बंद पडू लागली. अगोदर मराठवाडा बंद पडले. २००० मध्ये अजिंठाही त्याच मार्गाने गेले. मात्र या काळात अजिंठानं मराठवाड्याला पत्रकारिता शिकविली. त्यांनी अनेक नवे पत्रकार निर्माण केले. मराठवाड्यातील अनेक प्रश्न धसास लावले. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या निमित्तानं दादासाहेबाची कसोटी लागली होती. कॉंग्रेसमधील एक गट संयुक्त महाराष्ट्राचा पुरस्कार करणारा असला तरी दुसरा गट हायकमांडच्या तालावर नाचणारा होता. दादासाहेब स्वतःसंयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशा मताचे होते. गावकरीनं त्याचा पुरस्कार केला पण त्याबद्दल त्याना कॉग्रेसवाल्याकडूनच मोठा त्रास सहन करावा लागला. त्याची त्यांनी पर्वा केली नाही.

    १९६० मध्ये दादासाहेबांनी सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेत आपलं लक्ष नाशिकच्या विकासावर केंद्रीत केलं. नाशिकला त्यांनी औद्योगिक विकास परिषद घेऊन त्यात नाशिकच्या विकासावर सांगोपांग चर्चा घडवून आणली. नाशिक मर्चंटस को ऑपरेटीव्ह बॅंक स्थापन केली.

    नाशिकला एम.आय.डी.सी आणण्यात मोठे योगदान दादासाहेबांचे आहे. नाशिक लोकहितवादी मंडळाचे ते दहा वर्षे अध्यक्ष होते. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नाशिकला व्हावे यासाठी देखील त्यांनी प्रय़त्न केले. नाशिक सहकारी साखर कारखाना देखील त्याच्याच प्रयत्नांचं फळ आहे.

    राजकारण,गावकरीचा व्याप,आणि समाजसेवेत अडकून पडलेल्या दादासाहेबांनी वेगळं लेखन केलं नसलं तरी त्यांनी जी व्याख्यानं दिली ती “स्नेहयात्रा” या स्मृतीग्रंथात छापली आहेत.

    दादासाहेबांना मुंबई मराठी पत्रकार संघानं आचार्य अत्रे पुरस्कारानं गौरविलं होतं, ग.गो.जाधव पुरस्कारही त्यांना मिळाला होता. मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष होण्याचा मानही त्यांना मिळाला. पणजी येथे १९६९ मध्ये झालेल्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. पत्रकारितेवर अपार निष्ठा आणि प्रेम असणाऱ्या दादासाहेबांसाठी पत्रकारिता हा एक धर्म होता. वृत्तपत्रांना ते कान व डोळे मानत.पत्रकारिता हे समाजशिक्षण आणि समाज प्रबोधनाचे एक प्रमुख साधन असून ते नैतिक बळ देणारे एक माध्यमही आहे अशी त्यांची धारणा होती. त्यामुळंच त्यांनी एक व्रत समजूनच आयुष्यभर पत्रकारिता केली. पत्रकारितेत नवनवे प्रयोग करून व्यावसायिक यशही संपादन केले.

    दादासाहेब पोतनीस यांचे २७ ऑगस्ट १९९८ रोजी निधन झाले.

    अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

    #DattatrayPotnis

      May 4, 2022


  • बाळकृष्ण भगवंत बोरकर (बा. भ. बोरकर)

    बा. भ. बोरकर म्हणजेच बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचा जन्म इ.स. १९१० मध्ये गोव्यातील कुडचडे गावी झाला. बा. भ. बोरकर यांनी एक प्रसिध्द प्रतिभावंत कवी म्हणून ख्याती मिळवली.

      December 3, 2012


  • भारती आचरेकर

    धन्य ते गायनी कळा’नंतर लगेच त्याच संस्थेचं ‘तुझा तू वाढवी राजा’ केलं. त्याच वेळी त्यांचे लग्न आचरेकरांशी ठरलं होतं. त्या भारती वर्माची भारती आचरेकर झाल्या. १९७२ ला दूरदर्शन केंद सुरू झालं आणि त्या अगदी पहिल्या दिवसापासून त्या तिथे रुजू झाल्या.

      July 12, 2022


  • दिलीप प्रभावळकर

    दिलीप प्रभावळकर हे नाव माहित नसलेला रसिक मराठी माणुस विरळाच. ज्याला खरी अभिनयाची जाण व गोडी आहे , त्याला प्रभावळकरांमधला सच्चा व प्रतीभाशील कलावंत हा भावतोच.

      July 23, 2011


  • विजय मुनीश्वर

    शारीरिक अपंगत्व सहन करणे महाकठीण असले तरी त्याने हरायचे नसते... जिद्द आणि उमेदीच्या जोरावर देशविदेशातील क्रीडास्पर्धांमध्ये सुवर्णपदकांची बाजी मारणारे नागपूरचे विजय मुनीश्वर यांनी हे दाखवून दिले. पॅरालिम्पिकमध्ये पॉवर लिफ्टिंग प्रकारात त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उंचावले. अॅथलेटिक्स, बॉक्सिंग, टेबल टेनिस यांत त्यांनी अनेक खेळाडू घडविले. त्यांच्या कर्तृत्त्वाची दखल घेत सरकारने त्यांना “अर्जुन पुरस्कारा” ने व राज्य सरकारने “उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक” पुरस्काराने सन्मानित केले आहे. सध्या ते पॅरालिम्पिक कमिटीच्या उपाध्यक्षपदावर असून पॉवरलिफ्टिंगचे मुख्य कोच आहेत.

    ''पॉवर'' फुल प्रशिक्षक

      July 24, 2015


  • प्रा.जगन्नाथ वाणी

    कॅनडातील मॅकगील विद्यापीठातून गणितात पीएचडी आणि त्यानंतर कॅनडातल्याच कॅलगरी विद्यापीठात गणिताचे अध्यापन करताना प्रा. जगन्नाथ वाणी यांनी आपले समाजसेवेचे सूत्र कधी सोडले नाही. कॅनडातून भारतातील उपक्रमांना भरघोस अर्थसाह्य मिळवून दिले व स्वत: ही संगीत, चित्रपटनिर्मिती अशा अनेक प्रांतात वेगळा ठसाही उमटविला. विविध क्षेत्रांतील त्यांच्या कार्याचा गौरव कॅनडा सरकारने सर्वोच्च सन्मान देऊन केला.

    सूत्र जनसेवेचे

      July 14, 2017


  • एन. के. पी. साळवे

    स्वातंत्र्य सैनिक, विद्वान राजकारणी, कणखर प्रशासक आणि समाजजीवनाचे सांस्कृतिक भान असलेले बहुभाषी एन.के.पी. साळवे यांच्या निधनामुळे स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीतील एक खंदा पुरस्कर्ता नेता काळाच्या पडद्याआड गेल्याची जाणीव या चळवळीला यापुढेही होत राहील. मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथे जन्मलेले एन.के.पी. साळवे तारुण्यातच स्वातंत्र्य चळवळीत ओढले गेले.

    एक निष्णात चार्टर्ड अकाऊन्टंट म्हणून जशी त्यांची ओळख होती तशीच उत्कृष्ट वक्ता म्हणूनही. धर्माने ख्रिश्चन असलेल्या साळवे यांचे हिंदी, मराठी, उर्दू, संस्कृत आणि इंग्रजी भाषेवरही कमालीचे प्रभुत्व होते. त्यामुळेच कोणत्याही सभेतील त्यांचे भाषण हा वक्तृत्वाचा उत्तम वस्तुपाठच असे. उर्दू शेरोशायरीच्या पखरणीशिवाय त्यांचे भाषण संपत नसे.

    सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि चार्टर्ड अकांऊन्टट असल्यामुळे बऱ्याच औद्योगिक संघटनांशीही त्यांचा संबंध होता. व्यक्तिगत मतभेदापलीकडे दृष्टी लाभलेले ते व्यक्तिमत्त्व होते. केंद्रीय मंत्रिमंडळात माहिती व नभोवाणी व पुढे खाण व पोलाद खात्याचे राज्यमंत्री आणि सांसदीय कामकाज मंत्री होते. महाराष्ट्रात येणाऱ्या एन्रॉनचा वीज प्रकल्पामुळे त्यांची केंद्रीय ऊर्जा मंत्री म्हणून कारकिर्द अधिक गाजली. त्यांच्याच काळात या क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला प्रवेशव्दार मुक्त झाले. संसदेत करप्रणाली, घटना, सार्वजनिक लेखा या विषयावरील त्यांची भाषणे विशेष गाजली.

    नवव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केंद्र आणि राज्याचा महसूल विभागणीबाबत महत्त्वाची भूमिका बजावली. क्रीडा क्षेत्रातही एन.के.पी. साळवे या नावाला एक वेगळे वलय होते. १९४३ ला अखिल भारतीय पंच समितीवर त्यांची निवड झाली. विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे १० वर्ष अध्यक्ष असताना त्यांनी विदर्भात क्रिकेटला चांगले दिवस आणले. भारतीय नियामक मंडळाचे ते ४ वर्ष, तर आशियाई क्रिकेट कौन्सिलचेही ते अध्यक्ष होते. १९८७ मध्ये भारतात प्रथमच झालेल्या रिलायन्स विश्वकप सामन्याच्या वेळी भारत-पाक व्यवस्थापन समितीचेही ते अध्यक्ष होते. नागपुरातील सी.पी. क्लब, गोंडवाना क्लबसह मुंबई, दिल्लीतील क्रिकेट विश्वाशीही त्यांचा जवळून संबंध होता.

      August 5, 2017


  • डॉ. सचिन पाटील

    कोल्हापूरजवळ वाढलेला एक तरुण केमिकल टेक्नॉलॉजीचे शिक्षण घेतो, नंतर मिशिगन विद्यापीठात पीएचडी करतो आणि आता अमेरिकेच्या वाइडनर विद्यापीठात स्मृतिभ्रंशावरील संशोधनाने जगाचे लक्ष वेधून घेतो. “अल्झायमर असोसिएशन” ची शिष्यवृत्ती मिळालेल्या मोजक्या विद्यार्थ्यांपैकी एक डॉ. सचिन पाटील यांची अमेरिकेत स्वत:ची प्रयोगशाळाही आहे.

    स्मृतीचे तल्लख रसायन

      July 24, 2015