(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • दिनानाथ दलाल

    चित्रकलेवर ‘दिनानाथ शैली’चा ठसा उमटविणारे दिनानाथ दामोदर दलाल. राजकीय, सामाजिक व्यंगचित्रे अतिशय मार्मिकपणे रेखाटता रेखाटता बोजडपणा आणि रसहीनता यापासून आपला कुंचला दूर ठेवून त्यांनी मराठी पुस्तकांच्या मुखपृष्ठात अमूलाग्र बदल घडवून आणला.

  • प्रा. द. के. बर्वे

    १९५० साली ‘आंबटषौक’ हा त्यांचा प्रौढ वाचकांसाठी पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला, पण त्यानंतर ते प्रामुख्याने वळले बालकुमार साहित्याकडे. बालवाङ्मयाची जवळजवळ सत्तर उत्तमोत्तम पुस्तके लिहून त्यांनी बालसाहित्यकार म्हणून चांगले नाव मिळवले आणि बालसाहित्यात मोलाची भर घातली.

  • राजा बढे

    राजा बढे हे नावाप्रमाणंच राजा-माणूस होते. राजा बढे हे नामवंत गीतकाव्य आणि भावकाव्य लिहिणारे कवी… रुबाबदार,प्रसन्न व्यक्तिमत्त्व, राजस छबी, कुसुमकोमल भावनांना शब्दबद्ध करणारा, कोमलवृत्तीचा हा प्रतिभासंपन्न कवी, पण मनात देशभक्तीचा स्फुलिग सांभाळणारा राष्ट्रप्रेमी म्हणजे राजा बढे.

  • यदुनाथ दत्तात्रय थत्ते

    ‘साधना’ला मराठी वृत्तपत्रसृष्टीत वैचारिक प्रतिष्ठा मिळवून देणारे संपादक यदुनाथ दत्तात्रय थत्ते यांचा जन्म ५ ऑक्टोबर १९२२ रोजी झाला.

  • सतिश मोडखळकर

    प्रत्येक कलावंत हा तोंडाने नाही तर त्याच्या कलेतून बोलत असतो. त्याच्या तत्वांना, भावनांना, व आयुष्यभर जोपासलेल्या स्वप्नांना तो कलेच्या सौंदर्यामध्ये घोळवत असतो, मुर्तरूप देत असतो, त्यांना एका अर्थाने जीवंतच करत असतो. खळबळलेला समुद्र जसं आपल्या मनातलं वादळ व्यक्त करण्यासाठी लाटांचा आधार घेतो, त्याप्रमाणे कलावंत आपल्या कलेतून ही तळमळ रसिकांसमोर मांडत असतो. पायामधील पैंजण ज्याप्रमाणे हळुवार वाजुन पावलं कुठे चालली आहेत याची जाणीव करून देतात, त्याप्रमाणे कलाकाराच्या मनाचा थांगपत्ता हा त्याच्या कलेच्या अविष्कारामधून केवळ दर्दी रसिकांनाच लागु शकतो.

  • डॉ. दीप्ती देवबागकर

    जीवतंत्रज्ञानासारख्या आधुनिक विषयातील संशोधनात स्वत:चे आगळे स्थान निर्माण करणार्‍या पुणे विद्यापीठाच्या प्राणीसास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. दीप्ती देवबागकर विज्ञान प्रसारकही आहेत. विज्ञान लोकाभिमुख करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. जनुकाचे कामकाज बदलल्यामुळे कॅन्सरच्या पेशंटांवर होणारे परिणाम कसे कमी करता येतील, यावर त्या महत्वपूर्ण संशोधन सध्या करीत आहेत.

    डॉ. दीप्ती देवबागकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला विज्ञानप्रसाराचा डीएनए हा लेख पुढील पानावर वाचा.

    डॉ. दीप्ती देवबागकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला विज्ञानप्रसाराचा डीएनए हा लेख वाचा.

    devbagkar-dipti-modified

  • राजा ठाकूर

    १९५३ सालच्या ‘बोलविता धनी’ या चित्रपटापासून राजा ठाकूर यांची दिग्दर्शक म्हणून कारकीर्द सुरु झाली. १९५३ ते १९७५ या २३ वर्षांत त्यांनी २० मराठी, २ हिंदी व ‘बिरबल ब्रदर’ या इंग्रजी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं.

  • गोपाळ मेखले

    चार वर्षात केवळ एक एकर जमिनीवरील फुलशेतीतून ३०-४० लाखांचा टर्नओव्हर करणार्‍या आयटी स्पेशालिस्ट गोपाळ मेखले यांनी आपल्या गावात बचतगट, डेअरी, यासारखे यशस्वी प्रोजेक्टही राबवले आणि त्याची दखल हॉवर्ड युनिव्हसिर्टीने घेतली.

    गोपाळ मेखले शिक्षणाने इन्फमेर्शन टेक्नॉलॉजिस्ट, पण सध्या करतोय शेती. वाचून कुणालाही आश्चर्य वाटेल. चार वर्षांपूर्वी 'डेल' या आयटी क्षेत्रातील मोठ्या कंपनीतील लठ्ठ पगाराची नोकरी सोडूऩ त्याने़ शेतात राबायचा निर्णय घेतला, तेव्हा असंच सगळ्यांना आश्चर्य वाटलं होतं. पण थोड्याच अवधीत त्याने एक मोठी हॉर्टीकल्चर इंडस्ट्री उभी केली आणि सगळ्यांनी त्याच्या यशाचं व त्याने घेतलेल्या निर्णयाचं कौतुक करायला सुरुवात केली.

    सध्याच्या पिढीचा आपला 'सीव्ही फ्लरीश' करुन सतत कंपन्या बदलण्याकडे कल असताना, काहीतरी वेगळं करायचं, घरची जबाबदारी सांभाळायची अशा विचारानं चाळीशीच्या आतील गोपाळ मार्च २००८ मध्ये लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातल्या आपल्या सुगाव गावी आला. स्वत:च्या ३० एकर शेतीत हायटेक फ्लोरिकल्चर डेव्हलप केलं आणि दरसाल चक्क २०-३० लाखांचा टर्नओव्हर घेऊ लागला, हा त्याचा प्रवास नक्कीच वेधक आहे. पण त्यामागे त्याची बुध्दी आणि कठोर मेहनतही आहे. खरंतर गोपाळ २००२ ते २००८ या कालावधीत पूण्याला नोकरी करत होता. नोकरीत चांगलं चाललं होतं. नोकरीत स्थिरस्थावर झाल्यावर आईवडिलांनी पुण्यात कायमचं आपल्याकडे यावं, असं त्याला वाटलं. पण मुलाकडे राहायची इच्छा असतानाही गोपाळच्या आईवडिलांना पुण्यात नकोसं वाटलं. सुगाव सारख्या लहान गावात आयुष्य काढलेल्यामुळे त्यांना शहराचं आकर्षण होतं, मुलगा सोबत असणार म्हणून आनंदही झाला होता. परंतु पूर्णपणे पुण्यात स्थायिक होणं त्यांना पचलं-आवडलं नाही. शिवाय गावाकडे असलेल्या ३० एकर शेतीचं काय, असा प्रश्न गोपाळच्या आईवडिलांना भेडसावत होता. शेवटी मातीची माया वरचढ ठरली आणि त्यांनी सुगावातच राहण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे म्हाताऱ्या आईबाबांकडे कोण लक्ष देणार, ते ३० एकराची शेती कशी पाहणार, असे विचार गोपाळला छळायला लागले. त्याचं कामावरुन लक्ष उडालं. अन् एके क्षणी त्याच्या डोक्यात विचार आला- आपणच सुगावला गेलं तर! पण पुण्यासारख्या शहरात आठ वर्षं नोकरी केलेल्या गोपाळसाठी गावी परतण्याचा निर्णय घेणं सोपं नव्हतं. किंबहुना भविष्य खेड्यात काढायचं या कल्पनेने त्याला जणू काही फ्रस्ट्रेशनच आलं. पण शहर की गाव, आपलं भविष्य की कर्तव्य या संघर्षात अखेर वरचढ ठरलं ते मुलगा म्हणून करायचं कर्तव्य! आणि तडक सात वर्षांची नोकरी सोडून, पुण्यातील गाशा गुंडाळून गोपाळ सुगावला परतला.

    सुगावला येताच गोपाळचं पुन्हा नव्यानं स्ट्रगल करणं सुरु झालं. यावेळी स्ट्रगल जरा वेगळं होतं. एकीकडे शेती करण्याचं प्लॅनिंग सुरु असतानाच, पुण्यात नोकरीला असताना सुरू झालेली लग्नाची बोलणी एकदम बंद झाली. स्थळं येणं बंद झालं. घरी येणारा लठ्ठ पगारही बंद झाला. पण एव्हाना काय करायचं त्याचं चित्र त्याच्या डोळ्यासमोर होतं. त्याने सुगावातच बचतगट स्थापनं करणं, डेअरी प्रोजेक्ट आखणं, हॉटीर्कल्चर फार्मसाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारणं ही कामं करायला सुरुवात केली. दरम्यान एक स्थळ येऊन त्याचं लग्नही झालं. त्याच्या आईवडिलांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पण गोपाळला अजून खरा टप्पा गाठायचा होता. त्याचं लक्ष होतं, फ्लोरिकल्चर युनिटकडे. इथे तळेगाव दाभाडे येथे हॉटीर्कल्चरचं घेतलेलं शिक्षण उपयोगी आलं.

    एकूण ३० एकर पैकी १ एकरात गोपाळचे प्रयोग सुरु झाले. एक एकर शेतात जरबेराचं उत्पादन घेण्याचं ठरलं. काही लाखांची स्वत:ची गुंतवणूक व कॅनरा बॅंकेकडून घेतलेलं कर्ज या बळावर त्याने, 'इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट'करावी तशी शेतीत इन्व्हेस्टमेंट सुरु केली. शेती कोरडवाहू, त्यात अनेक अडचणी. ग्रीनहाऊस, फ्लोरिकल्चर हाऊस कसं उभारावं हा प्रश्न. पण हा प्रश्नही सोडवला गेला तो गावातीलच १२ जणांना घेऊन. गोपाळने़ १२ जणांना रोजगार दिला. मेहनत सुरु झाली. कोरडवाहूत एक पॉलीहाऊस उभारलं गेलं. ऊस, सोयाबीन, तूर यासारखी पीकंही फ्लोरिकल्चरच्या जागे व्यतिरिक्त पारंपरिकपणे घेणं गोपाळने सुरु ठेवलं. लागवडीनंतर रोज किमान ४ हजार जरबेराची फुलं येऊ लागली. त्यामुळे आता त्याच्या माकेर्टिंगची जबाबदारी आली. लातूर, औरंगाबाद, हैदराबाद, दिल्ली, पुणे आदी ठिकाणी माल जाऊ लागला पहिल्या वर्षी जेवढी इनव्हेस्टमेंट केली तेवढी काढणंही कठीण झालं. पण कधीही न संपणारा अनुभव पाठीशी आला. पहिल्या वर्षी झालेल्या चुका टाळण्यात करण्यात दुसर्‍या वर्षी यश आलं. पहिल्या वर्षीचा अनुभव गाठीशी आल्यानं २००९-२०१० साली १० लाख, त्याच्या पुढील वर्षी २० लाख तर, तर यंदा तब्बल ४० लाखावर उलाढाल गेली. अर्थात फुलांच्या धंद्यात चढउतार नसतात, असं नाही.कधी जरबेराच्या एका फुलाला अडीच, तर कधी ८ रुपये दरही आला. ह्यातून अॅग्रिकल्चर ही एक 'इंडस्ट्री' म्हणून गोपाळने याला 'ट्रीट' केलं. माकेर्टिंग, पॅकेजिंग, अशा टेक्निकल बाबी शिकून घेतल्या. दिल्लीपर्यंत फुलांची बाजार नेल्यानंतर, आता गोपाळ दुबई, अमेरिकेची स्वप्न पाहू लागला आहे. तब्बल बारा जणांच्या बळावर आता ही फुलशेती हायटेक होऊ लागली आहे.

    आधुनिक काळात ज्या ज्या म्हणून तांत्रिक बाबी गावात यायला हव्यात, त्या-त्या सर्व बाबींची पूर्तता करण्यात गोपाळला यश आलं आहे. गावात डेअरी फार्म, ज्वारी-गव्हाच्या पीठाचा कारखाना, बचत गट, भाजीपाला उत्पादन, अत्याधुनिक शेतीकडे युवकांना अॅग्रिकल्चर ही एक इंडस्ट्री म्हणून पाहायला भाग पाडणे, त्या दृष्टीने प्रबोधन करणं, लातूरमध्ये डेअरी फार्म मधून म्हशीचं प्युअर दूध मिळवून देणं, आदी प्रोजेक्टही हळूहळू सुरू करण्यात गोपाळला यश आलं आहे.

    नुकतंच हॉवर्ड युनिर्व्हसिटीचं एक डेलिगेशन खास त्याचे हे प्रयोग पाहायला त्याच्या शेतात येऊन गेलं. बॅंकेचं पाठबळ, दुर्दम्य इच्छा शक्ती आणि 'आऊट ऑफ बॉक्स थिकिंग'ने केलेल्या हायटेक फुलशेतीच्या जोरावर, गोपाळ मराठवाड्याच्याच काय राज्यातील मुलांसाठी एक युथ आयकॉन ठरला आहे.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


  • ज्ञानेश्वर गणपत नाडकर्णी

    वयाच्या नवव्या वर्षापासून अखंड वाचन आणि वयाच्या अठराव्या वर्षापासून अखंड लेखन अशी साधना करणारे लेखक आणि कलासमीक्षक ज्ञानेश्वर गणपत नाडकर्णी. कलासमीक्षा, साहित्यसमीक्षा आणि स्वत:चे लेखन यासाठी अठराव्या वर्षी हाती घेतलेली लेखणी नाडकर्णींनी ६४ वर्षे खाली ठेवली नाही.

  • केशव बाबूराव लेले

    शिल्पकार र.कृ. फडके यांनी सुरू केलेल्या व केशव लेले यांच्या अशा प्रदर्शनांनी महाराष्ट्रातील जनसामान्यांची यथार्थदर्शी वास्तववादी कलेप्रती असलेली अभिरुची वाढवली. त्यातूनच कलेच्या विविध शैलींतील प्रगल्भतेऐवजी आजही महाराष्ट्रात याच प्रकारच्या यथार्थदर्शी कलेचा प्रभाव आढळून येतो.