(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • प्रदीप कबरे

    कथा, पटकथा, संवाद लेखक व कलाकार प्रदीप कबरे हे मुळातच अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. अभिनेता म्हणून त्यांनी नाव कमावलं आहेच, पण लेखक म्हणूनही कामगिरी केली आहे. त्यांनी आत्तापर्यंत दोन नाटकं लिहिली आहेत. तसंच अंदाजे अडीच हजार रेडिओ कार्यक्रम लिहिले आहेत. पाच हजारांहून अधिक रेडिओ कार्यक्रमांचं सादरीकरण केलं आहे. सहा-सात माहितीपटांचं लेखन केलं आहे. शंभरेक जिंगल्स लिहिल्यात. दोन चित्रपटांची कथा-पटकथा-संवाद लिहिले आहेत. एका चित्रपटासाठी गीतलेखनही केलं आहे.

  • सीताराम कुंटे

    कुंटे, सीताराम

    सुबोधकुमारांनंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून नियोजन विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे यांची नियुक्ती झाली. सुबोधकुमार यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली. सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीबरोबरच कामगार संघटना व इतरांशीही सुबोधकुमार कायम फटकून वागले. कुंटे हेही कडक शिस्तीचे असले तरी सौम्य प्रकृतीचे मनमिळाऊ अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

    राजकीय मंडळी आणि कामगार नेत्यांशी खेळीमेळीचे संबंध ठेवून गोड बोलून ते पालिकेत सौहार्दाचे वातावरण ठेवू शकतील. कुंटे हे १९८५ च्या आयएएस तुकडीतील अधिकारी. राज्य शासनाच्या सेवेत ते तब्बल २६ वर्षे असून त्यांनी सांभाळलेल्या विविध पदांपैकी ‘म्हाडा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी, गृहनिर्माण सचिव पदावरील त्यांची कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली. ग्रामीण आणि शहरी भागातील गरिबांसाठी गृहनिर्माणाच्या विविध योजना त्यांनी राबविल्या. झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या अंमलबजावणीत गती आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ‘महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अ‍ॅक्ट’ मधील सुधारणांसह गृहनिर्माणविषयक कायदे व नियमांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणांसाठी त्यांनी भरीव काम केले. बिल्डरांनी वाऱ्यावर सोडून दिलेल्या गृहरचना संस्थांना जमिनीचीही मालकी मिळावी, यासाठी ‘डीम्ड कन्व्हेयन्स’ ची तरतूद करण्यामध्ये कुंटे यांचे योगदान आहे. सनदी अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडत असताना कुंटे यांनी लाला लजपतराय विधी महाविद्यालयातून २००६ ते २००९ या काळात कायद्याची पदवी मिळविली. ‘सिरक्यूस विद्यापीठा’अंतर्गत असलेल्या मॅक्सवेल स्कूलमधून त्यांनी ‘सिटिझनशिप अ‍ॅण्ड पब्लिक अफेअर्स’ विषयात प्रमाणपत्र मिळविले, ब्रिटनच्या बर्मिगहॅम विद्यापीठामधील स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसीमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. अर्थशास्त्राबरोबरच प्रशासन, शासकीय धोरणे, विधी आदी बाबींचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. महापालिकेत आर्थिक शिस्त आणण्यासाठी त्याचा बराच उपयोग होईल. मुंबई महापालिकेत त्यांनी याआधी अतिरिक्त आयुक्त म्हणून काम केले आहे. त्यामुळे पालिकेतील कामकाजाचा त्यांना चांगला अनुभव आहे. अर्थसंकल्पात पाणीपट्टीसह अन्य सेवांसाठी करवाढीचा बोजा टाकलेल्या मुंबईकर जनतेला ते कोणता दिलासा देतात, हे लवकरच दिसून येईल.

  • संगीतकार अशोक पत्की जिंगल्सचा राजा

    पूर्वी एक जिंगल तयार व्हायला चार ते पाच तास लागत. माझ्या बाबतीत सांगायचं तर दोन तासांत दोन जिंगल्स तयार करून मी पुन्हा तिसऱ्या कामासाठी दुसऱ्या स्टुडिओत जायचो. एक काळ असा होता की, सकाळी रेडिओवाणीला (वरळी) ८ ते १० मध्ये दोन जिंगल्स, मग १० ते ६ वेस्टर्न आऊटडोअर (फाऊंटन), पुन्हा संध्याकाळी ६ ते १० दोन जिंगल्स (रेडिओवाणी किंवा रेडिओ जेम्स- वरळी) आणि रात्री १० ते २ बॉम्बे लॅब किंवा फिल्म सेंटरला फिल्मची जिंगल्स मी करत असे आणि पहाटे तीन वाजता घरी जात असे. आणि पुन्हा सकाळी साडेसहाला उठून आठ वाजता रेडिओवाणीला हजर!

    अशोक पत्की यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
    http://www.marathisrushti.com/articles/ashok-patki-jingles-king/

    # Patki, Ashok

  • अधिक शिरोडकर

    ज्येष्ठ विधिज्ज्ञ, शिवसेनेचे माजी खासदार आणि छायाचित्रकार असे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून अधिक शिरोडकर प्रसिद्ध आहेत. अ‍ॅड. शिरोडकर यांनी फौजदारी वकील म्हणून अनेक महत्त्वाचे खटले लढवले. पण सामान्य जनतेला ते ठाऊक झाले ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वकील म्हणून. १९९२-९३ साली मुंबईत उसळलेल्या दंगलीनंतर न्या. श्रीकृष्ण चौकशी आयोग स्थापन करण्यात आला. त्यासमोर शिवसेनेची बाजू मांडण्याची जबाबदारी अ‍ॅड. शिरोडकर यांच्याकडे आली.

    हायकोर्ट किंवा मग इतर कोणत्याही न्यायालयातला खटला असो अ‍ॅड. शिरोडकर युक्तिवादासाठी असणार, असे कळल्यानंतर अनेक वकील त्या न्यायालयात गर्दी करतात. कारण युक्तिवादाचा उत्तम वस्तुपाठ त्यावेळी अनुभवता येतो. शिरोडकर यांच्या युक्तिवादात अगदी सॉक्रेटिस, शेक्सपिअरपासून ते मराठी साहित्यातील केशवसुत, आचार्य अत्रे, कधी शांताबाई शेळके यांच्यापर्यंत अनेकांचे उल्लेख येतात. ही काही ठरवून केलेली पखरण नसते तर बोलण्याच्या ओघातच सारे येत असते. त्यात नाटकीपणा किंवा आविर्भाव कधीही नसतो, हे त्यांचे विशेष आहे. त्यात नर्म विनोदही असतो. केवळ मराठी साहित्याचाच नव्हे तर इंग्रजी साहित्याचाही त्यांची उत्तम अभ्यास आहे आणि काय, कुठे व केव्हा वापरावे, याची नेमकी जाणही त्यांना आहे. त्याचमुळे त्यांची कोणतीही टिप्पणी ही विषयाला धरूनच असते. त्यांच्या या हजरजबाबीपणाला ते उत्तम अभिनेते असल्याची पाश्र्वभूमीही आहे. विल्सन महाविद्यालयातून मराठी वाङ्मय (ऑनर्स) या विषयात पदवी घेतल्यानंतर वकील सुशील कवळेकर यांच्यामुळे ते वकिली व्यवसायाकडे वळले. कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर लगेचच त्यांचे लग्न झाले होते. नोकरी करावी की, कायद्याचा अभ्यास हा त्यांच्यासमोरील यक्षप्रश्न पत्नीने आग्रहाने सोडवलाआणि कायद्याच्या अभ्यासाकडे वळलो, असे शिरोडकर नेहमी सांगतात. फक्त वकिलीच नव्हे तर दुसरीकडे नाटय़क्षेत्रातही ते कार्यरत होते. गणेशोत्सवातील नाटकांमधून मग ते व्यावसायिक रंगभूमीपर्यंत पोहोचले. गोमंतक मराठा समाज, धी गोवा हिंदूू असोसिएशन आणि आयएनटीच्या गाजलेल्या नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या. ‘साक्षीदार’मध्ये त्यांनी केलेली सरकारी वकिलाची भूमिका गाजली होती. ‘झोपी गेलेला जागा झाला’चे ९८ प्रयोग झाल्यानंतर मात्र त्यांनी नाटय़क्षेत्राला रामराम केला आणि पूर्णपणे वकिलीला सुरुवात केली. अभ्यासू पिंड, हजरजबाबीपणा, उत्तम निरिक्षणशक्ती आणि दांडगे वाचन इथे कामी आले. त्यानंतर अ‍ॅड. शिरोडकर आणि यश असे समीकरण रूढ झाले. त्यांच्यातील बहुआयामी व्यक्तिमत्वामुळे आणि नर्म विनोदाने प्रतिवादी असलेल्या वकिलांनाही त्यांनी आपलेसे केले. त्यांच्या अभ्यासू युक्तिवादामुळे त्यांच्याबद्दल भीतीयुक्त आदरही निर्माण झाला. हे करत असतानाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे खासदारकीही त्यांच्याकडे चालत आली. त्यावेळेस दिल्लीमध्ये शिवसेनेची भूमिका चांगल्या पद्धतीत मांडू शकणाऱ्या चांगल्या वक्त्याची गरज होती. अ‍ॅड. शिरोडकर यांच्या निमित्ताने इंग्रजीत अधिकारवाणीने बोलू शकणारा चेहरा शिवसेनेला मिळाला. हे सारे सुरू असताना त्यांच्यातील छायाचित्रकार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. वन्यजीवचित्रण हा त्यांच्या आवडीचा विषय. भारतीयांनी निसर्गाचे रक्षण केले नाही तर पुढच्या पिढीसाठी काही उरणार नाही, हे लक्षात घेऊन वन्यजीवचित्रणाच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरण रक्षणाचे महत्त्व स्पष्ट करण्यास सुरूवात केली. त्याच काळात संसदेच्या पर्यावरण आणि संरक्षण समित्यांवर त्यांची नेमणूक झाली. मग त्यांनी नौदलाला भरतपूर स्वच्छ करण्याच्या कामी जोडले आणि पर्यावरणविषयक कायदे अधिक कडक करण्यास सुचवले. वयाच्या ८० व्या वर्षांत पदार्पण केलेले शिरोडकर मनाने तरूणच आहेत. याही वयात त्यांनी केवळ भारतातीलच नव्हे तर आफ्रिकेतील जंगलेही पालथी घातली आणि छायाचित्रण केले. आता पुढच्या पिढीसाठी हे सारे जपावे, एवढा एकच ध्यास त्यांना लागून राहिला आहे!

  • दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर

    दत्तात्रेय बाळकृष्ण कालेलकर, उर्फ आचार्य कालेलकर उर्फ काकासाहेब कालेलकर; हे थोर स्वातंत्र्यसैनिक, समाज सुधारक, इतिहासकर, शिक्षण तज्ञ, पत्रकार, साहित्यिक तसंच भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक तथा गांधीवादी म्हणून परिचित आहे.

  • मोहन गोखले

    घारे भेदक डोळे आणि खोलवर रूतणारा आवाज या वैशिष्ट्यांचा परिणामकारक वापर करत रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन या तिन्ही माध्यमांत लीलया मोहन गोखले वावरले.

  • भाऊसाहेब चितळे

    दूध-खवा-चक्का या गोष्टींना पुणेकरांनी दिलेला प्रतिसाद पाहता मोठी मागणी पूर्ण करायची असेल तर स्वतंत्र दुकान हवे हे ओळखून भाऊसाहेबांनी १९५० मध्ये शनिपार येथे आणि चारच वर्षांनी डेक्कन जिमखान्यावर ‘चितळे बंधू मिठाईवाले’ची स्थापना केली.

  • डॉ. विद्याधर गंगाधर पुंडलिक

    ख्यातनाम साहित्यिक डॉ. विद्याधर गंगाधर पुंडलिक यांचा जन्म १३ डिसेंबर १९२४ रोजी झाला.

    टेकडीवरचे पीस, देवचाफा, माळ, फॅन्टॅसिया हे कथासंग्रह, चार्वाक, माता द्रौपदी, कुणीकडून कुणीकडे ही नाटके तसेच आवडलेली माणसे (व्यक्तिचित्रे) आणि शाश्वताचे रंग (समिक्षात्मक) ही त्यांची साहित्यसंपदा.

    १९८९ मध्ये त्यांचे निधन झाले.

    ## Dr Vidyadhar Gangadhar Pundlik

  • उदय टिकेकर

    उदय टिकेकर यांनी ‘शमिताभ’, ‘बर्फी’, ‘रईस’, ‘लाल सलाम’ या हिंदी चित्रपटांमधूनही त्यांनी काम केलं आहे. ‘तुझा माझा ब्रेक अप’, ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘कोई अपना सा’, ‘कसौटी जिंदगी की’ या मराठी-हिंदी मालिकेत उदय टिकेकर यांनी काम केले आहे.

  • विष्णु माधव घाटगे

    विष्णु माधव घाटगे हे भारताला हवाई क्षेत्रामधील स्वयंसिध्दतेकडे घेवून जाणारे एक महान वैज्ञानिक, उद्योगपती, व कारखानदार अशा तिहेरी भुमिकेतील तारणहार होते. या तारणहार म्हणण्याला कारणही तसेच आहे, जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा विमान निर्मीतीसारख्या मोठ्या, किचकट, व आधुनिकतेबरोबरच भक्कम आर्थिक पाठबळ लागणार्‍या उद्योगधंद्यात उतरायला कोणीच धजत नव्हते. तेव्हा या प्रचंड उर्जेच्या, व व्यावसायिक कौशल्यांनी ओतप्रोत भरलेल्या उद्योजकाने कुणाच्याही मदतीशिवाय या पठडीबाहेरच्या, व आव्हानात्मक क्षेत्रात उडी मारली होती. घाटगे यांनी त्यांच्या स्वप्नवत कारकीर्दीमध्ये अनेक प्रकारची विमाने बनविली व विकलीसुध्दा. आपल्या डोक्यातही येणार नाही अशा कितीतरी दैनंदिन गोष्टी विमानाच्या साहाय्याने सुसह्य व गतिमान कशा करता येवू शकतात हे त्यांनी प्रत्यक्ष दाखवून दिले होते. जसे पिकांवर औषधे व किटकनाशके फवारण्यासाठी कृषक हे चालवण्यास अतिशय सहज सोपे, व खिशाला परवडणारे विमान त्यांनी सामान्य शेतकर्‍यांसाठी बनविले होते. घाटगे यांनी ज्याप्रमाणे बाहेरच्या देशांना भारत कशा प्रकारे राखेतून सुरूवात करून आपल्या कर्तुत्वाची सुंदर व कल्पक रांगोळी निर्माण करू शकतो हे दाखवून दिले होते, त्याचप्रमाणे त्यांनी असंख्य उद्योजक होऊ पाहणार्‍या नव-तरूणांना प्रेरणा व आत्मविश्वासाचे तेज दिले होते. गुलाम गिरीची पुटं कधीच झाडली गेली होती व एक नव तंत्रज्ञानाचं, व विज्ञानाचं लख्ख आभाळ भारताला साद घालत होतं, या सादेला सर्वप्रथम प्रतिसाद दिला तो या स्वप्नाळू, परंतु बेहद निश्चयी मराठमोळ्या तरूणाने.