(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • किरण जाधव

    रॉबर्ट बॉश ही जगातील आघाडीवरची तंत्रज्ञान, सेवा, पुरविणारी तसेच आय. टी. तंत्रज्ञानाचा प्रसार, विकास, संशोधन, निर्मिती व विक्री अशा जवळ जवळ सर्वच क्षेत्रामध्ये अग्रेसर मानली जाणारी कंपनी आहे. आय. टी., विज्ञान, तंत्रज्ञान, व व्यवसाय क्षेत्रात तज्ञ मानल्या जाणार्‍या असंख्य हिर्‍यांचा इथे खच पडलेला असतो. या खाणीतला असाच एक तेजाने तळपणारा हिरा म्हणजे किरण जाधव हा मराठमोळा तरूण.

  • अंशुमन विचारे

    ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘फू बाई फू’ अशा कार्यक्रमांतून छोटा पडदा गाजविणारा, तसेच अनेक चित्रपट, मालिका व नाटकांतून विविध प्रकारच्या भूमिका साकारणारा अभिनेता अंशुमन विचारे दूरदर्शन वरील “चालता बोलता” आणि जी मराठी वरील “फु बाई फु” या कार्यक्रमातून तो घरा घरात पोहचला. “फु बाई फु” च्या एका पर्वाचे तो विजेते ठरला होता.

  • ज्योती गवते

    मुंबईची स्टँडर्ड चार्टर्ड आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आपली विद्यार्थिनी ज्योती गवते ही पहिल्या क्रमांकाने विजेती ठरेल हे तिचे प्रशिक्षक रवि रासकटला यांनी सांगितले होते. काही वृत्तपत्रांनी त्यास तशी प्रसिद्धीही दिली होती. तथापि जेव्हा तिचा तिसरा क्रमांक आल्याचे जाहीर करण्यात आले, तेव्हा त्यांना, ज्योतीला धक्काच बसला. ज्या दोघी पहिल्या, दुसऱ्या क्रमांकावर आल्याचे जाहीर करण्यात आले, त्यांनी जवळच्या मार्गाने अंतर पार केले होते.

    यामध्ये त्यांनी केलेली ती फसवणूक नसेलही कदाचित, पण जर त्यांच्या या ‘यशा’वर शिक्कामोर्तब होते, तर जी योग्य मार्गाने यशस्वी झाली तिच्यावर अन्याय झाला असता. गेल्या वर्षी जी मुलगी अनवाणी पळली होती आणि तिला तेव्हा दुसरा क्रमांक मिळाला होता, ती ज्योती गवते या खेपेच्या मॅरॅथॉन स्पर्धेची विजेती ठरली आहे. यंदा तिला तीन तास पाच मिनिटे आणि तीस सेकंद एवढा वेळ लागला. रासकटला यांनी ती हे अंतर तीन तासातच पार करील, असे गृहित धरले होते. गवते ही परभणीची आहे. तिच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. ज्योती खेळामध्ये करिअर करू इच्छित असली, तरी तिला लागणाऱ्या सुविधा पुरवू शकण्याची ऐपत त्या कुटुंबाकडे नाही. अशा स्थितीत तिची जिद्द तिला स्वस्थ बसू देईना. रासकटला यांनी तिला धीर दिला आणि एक पैसाही न घेता तिला प्रशिक्षण दिले. आपल्याला या यशापर्यंत जायचे आहे असे तिने मनाने ठरवले होते आणि ते तिला मिळाले. तिचा आत्मविश्वासच तिला यशाच्या या पायरीपर्यंत घेऊन गेला आहे. गेल्या वर्षी तिला यशाने हुलकावणी दिली होती, पण यंदा तिने मुंबई जिंकली. आघाडी घेतल्यावर आपल्या मागे कोण आहे ते आपण कधीही पाहात नाही, असे सांगणारी ज्योती हिची वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी रवि रासकटला यांची भेट झाली आणि त्यांना तिच्यात असलेल्या ध्येयापर्यंत जाण्यायोग्य तडफ पाहायला मिळाली. चेहऱ्यावर दरिद्री परिस्थितीचे भान बाळगणारी ज्योतीने रासकटला यांच्या मार्गदर्शनाखाली सरावाला प्रारंभ केला. ती रासकटला यांना २००३ मध्ये भेटली होती. त्यांनी तिच्या आई-वडिलांना तिच्यामध्ये असलेल्या गुणांची माहिती देऊन म्हटले, की तिला खेळात प्रावीण्य कमवू द्या. ज्योती पुढल्या वर्षी पदवीधर होईलसुद्धा. दोन दिवसांपूर्वी तिने मिळवलेल्या यशाची तयारी तिने गेल्या वर्षभरामध्ये केली होती. नाशिक जिल्ह्य़ातल्या कविता राऊतचा दरम्यान विक्रम तिने अनुभवला. एका आदिवासी समाजातून आलेली एक मुलगी जर राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत आणि आशियाई क्रीडास्पर्धेत पदक मिळवू शकते, तर मग मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेऊन आपल्याला त्या यशापर्यंत का जाता येणार नाही असा विचार तिने केला. परभणीच्या मराठवाडा कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर ती रोज सराव करते. तिचे वडील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बँकेत शिपाई आहेत. घरच्या गरिबीची ज्योतीला चांगलीच जाणीव आहे, पण त्यावर मात करायची तर हे दिव्यही करायला हवे, असे तिने ठरवले आणि त्यानुसार तिने ते मिळवून दाखवले. गेल्या वर्षी तिने जिंकलेले दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक २ लाख ३८ हजारांचे होते. त्या वेळचे ते पारितोषिक तिने घरच्यांसाठी ठेवले. ज्योतीचे दोन्ही भाऊ शिकत आहेत. परभणीत ती ज्या घरात राहते ते घर अगदी छोटेसे आहे. सहजासहजी कुणाच्याही नजरेस न भरणारे आहे. अशा या स्थितीत तिने मिळवलेले यश हे देदीप्यमान आहे आणि आता ती २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकच्या दृष्टीने तयारी करत आहे. त्या दृष्टीने तिला अर्थातच अधिक मार्गदर्शनाचीही गरज भासणार आहे.

    -----------------------------------

    Aniket

    ज्योती गवते

    ज्योती गवतेचा जन्म परभणीमध्ये अत्यंत गरीब व हालाखीच्या कौटुंबिक परिस्थितींमध्ये झाला. लहानपणापासून काटक व चपळ असल्यामूळे पळण्याची व विविध मैदानी खेळ लीलया खेळण्याची सवय तिला होती. धावण्याचे वेड, कसब व जिद्द या तिन्ही गोष्टी तिच्याजवळ मुबलक असल्या तरी आर्थिक चणचणींमूळे या क्रीडाप्रकाराचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेणे तिला शक्य नव्हते. तिचे बाबा महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बँकेत शिपाई म्हणून कार्यरत आहेत. परंतु उत्तम शाडूच्या मातीला कलात्मकतेने आकार देवून तिला रेखीव गणरायाचे रूप देणारा शिल्पकार मिळावा, त्याप्रमाणे तिला कुठल्याही धनाची अपेक्षा न बाळगता, अस्सल व्यावसायिक प्रशिक्षण देणारे रवि रासकटला यांच्यासारखे गुरू मिळाले व तिच्या स्वप्नांची गाडी भरधाव सुटली. परभणीच्या मराठवाडा कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर तिने धावण्याचा कसून सराव केला. यावर्षीच्या मुंबईच्या स्टँडर्ड चार्टर्ड आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवून तिने दैदिप्यमान यशाची नोंद केली. यंदा तिला हे अंतर पार करण्यासाठी केवळ तीन तास पाच मिनीटे एवढा वेळ लागला. गेल्या वर्षीच्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये तिने रणरणत्या उन्हामध्ये अनवाणी धावण्याची किमया केली होती व तरीदेखील द्वितीय क्रमांक पटकाविला होता. गेल्या वर्षी तिला यशाने थोडक्यात हुलकावणी दिली, पण यंदा तिने मुंबई जिंकून दाखवली. आघाडी घेतल्यावर आपल्या मागे कोण आहे हे ती कधीही पाहात नाही, असे जेव्हा ती पत्रकारांना सांगते, तेव्हा तिच्या चेहर्‍यावरून ओसंडून वाहणारा आत्मविश्वास तिच्या आजवरच्या कठोर साधनेची व धावण्यावरील एकनिष्ठतेची प्रचिती देत असतो. धावण्याप्रमाणेच आभ्यासातही तिला गती असून पुढील वर्षी पदवीधर बनण्यासाठी तिची धावण्याच्या सरावाची कसरत सांभाळता सांभाळता, आभ्यासाची तयारीही जोरदार सुरू आहे. तिच्या या उज्ज्वल कामगिरीमूळे तिच्या कुटुंबियांना भरपूर आर्थिक आधार मिळाला आहे. गेल्या वर्षी तिने जिंकलेले पारितोषिक २ लाख ३८ हजार रूपयांचे होते. त्या वेळचे पारितोषिक तिने घरच्यांसाठी ठेवले. आता ती २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकच्या दृष्टीने तयारी करीत आहे.

  • डॉ. आशुतोष कोतवाल

    सध्या अमेरिकेत असलेल्या डॉ. आशुतोष कोतवाल यांनी 'हिग्ज बोसॅन' या मूलकणांच्या आकारमानाबाबत संशोधन केले आहे. त्याची दखल जगभरातील भौतिकशास्त्रज्ञांनी घेतली आहे...

    विश्वाची रचना आणि त्याच्या जडणघडणीचे रहस्य उकलण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ‘डब्ल्यू बोसॉन’ या मूलकणांचा शोध जगभरातील अनेक शास्त्रज्ञ घेत आहेत. या कणांना ‘दैवी कण’ (गॉड्ज पार्टिकल) असेही संबोधले जाते. त्यासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च करून युरोपात जमिनीखाली तयार केलेल्या सर्न प्रयोगशाळेत अचाट आकाराचा ‘लार्ज ह्रेडॉन कोलायडर’ (एलएचसी) नावाचा प्रयोग हाती घेण्यात आला आहे. या कणांच्या वस्तुमानाबाबत मूळचा पुणेकर असलेल्या डॉ. आशुतोष कोतवाल या शास्त्रज्ञाने अनोखे संशोधन केले असून, त्याची जगभरातील भौतिकींमध्ये चर्चा आहे. डॉ. कोतवाल हे याबाबत अमेरिकेत संशोधन करतात.

    त्यांनी व त्यांच्या चमूने दैवी कणांचे (डब्ल्यू बोसॉन) मोजमाप करण्याचे तंत्र विकसित केले आहे. त्यांच्या तंत्रानुसार या दैवी कणांचे आतापर्यंतचे सर्वात अचूक वस्तुमान शोधण्यात यश आले आहे. त्याची अचूकता ०.०२ टक्के इतकी जवळ जाणारी आहे, असे अमेरिकेतील शिकागोजवळ असलेल्या ‘फर्मी नॅशनल अ‍ॅक्सीलरेटर लॅबोरेटरी’ या ख्यातनाम प्रयोगशाळेने जाहीर केले आहे. डॉ. कोतवाल यांच्या या यशामुळे गेली ४० वर्षे विविध शास्त्रज्ञांनी या कणांबाबत घेतलेला ध्यास एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. विशेष म्हणजे बोसॉन या मूलकणांचे अस्तित्व असल्याचा सिद्धांत प्रसिद्ध दिवंगत पदार्थशास्त्रज्ञ डॉ. सत्येंद्रनाथ बोस यांनी सर्वप्रथम मांडला होता. त्यावरून या कणांना ‘बोसॉन’ असे नाव देण्यात आले. आता याच कणांचे अचूक वस्तुमान शोधून त्यात भर टाकण्याचे कार्य कोतवाल यांच्या रूपाने एका भारतीयानेच केले आहे. डॉ. कोतवाल हे अमेरिकेतील नॉर्थ क्ररोलिना राज्यातील डय़ुक विद्यापीठात प्राध्यापक आहेत. त्यांनी अमेरिकेत अभियांत्रिकी व अर्थशास्त्र याविषयांची पदवी घेतली. त्यानंतर कोलंबिया विद्यापीठात पीएच.डी. करून त्यांनी शिकागोजवळील ‘फर्मी’ प्रयोगशाळेत संशोधनकार्य सुरू केले. ‘डब्ल्यू बोसॉन’ कणांच्या संशोधनाबरोबरच ‘टॉर क्वार्क’ या मूलकणांचे अचूक वस्तुमान शोधण्यातही त्यांनी यश मिळविले आहे. त्यांना अमेरिकेतील राष्ट्रीय स्तरावरील ‘आऊटस्टँडिंग इनव्हेस्टिगेटर अ‍ॅवॉर्ड’ व ‘स्कोन फेलोशिप’ हे प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले आहेत. पदार्थविज्ञानातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन अमेरिकन फिजिक्स सोसायटीने त्यांना विशेष फेलोशिप प्रदान केली आहे.

    डॉ. आशुतोष कोतवाल यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला ध्यास हा कणाकणाचा ! हा लेख पुढील पानावर वाचा.

    डॉ. आशुतोष कोतवाल यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला हा लेख वाचा.
    ध्यास हा कणाकणाचा !
    kotval-dr-ashutosh-modified


    MM-050; VV-0056

    <!--डॉ. आशुतोष कोतवाल यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला हा लेख वाचा. ध्यास हा कणाकणाचा ! -->

  • जे. एल. रानडे

    १६ ऑक्टोबर १९५१ या दिवशीच्या ‘लोकसत्ता’ दैनिकातील ‘संगीतसुधा’मध्ये नवीन रेकॉर्डस्च्या जाहिरातीत गायक जे. एल. रानडे यांच्या ‘घायाळ मी शिकारी’ व ‘डोळे तुझे शराबी’ या गीतांचा उल्लेख आहे.

  • शांता शेळके

    शांताबाई शेळके या सुप्रसिद्ध मराठी कवियत्री , गीतकार आणि लघुनिबंधकार होत्या. त्यांच्या कवितांनी आणि त्यावर बनलेल्या गाण्यांनी उभ्या महाराष्ट्राला वेड लावले आहे.

  • अरूण साधू

    अरूण साधू हे मराठी भाषेतील प्रख्यात लेखक, पत्रकार तसेच आंतरराष्ट्रीय सामाजिक निरिक्षक व समीक्षक आहेत.

  • राम नाईक

    राम नाईक हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत.

    त्यांचा जन्म १६ एप्रिल १९३४ रोजी झाला. राम नाईक यांनी वयाच्या ३५ व्या वर्षी नोकरी सोडली आणि त्यानंतर ते सक्रिय राजकारणात गेले; खासदार, केंद्रीय मंत्री झाले.

    ते १९८९, १९९१, १९९६, १९९८ आणि १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ते पेट्रोलियम मंत्री होते.

    जुलै २०१४ पासून राम नाईक उत्तर प्रदेश राज्याचे राज्यपाल आहेत.

    राम नाईक यांनी 'चरैवेति! चरैवेति!!' हे आत्मचरित्र लिहिले आहे.

  • अजिंक्य देव

    Ajinkya Dev is the noted actor in Marathi films and is the son of veteran Marathi actor Ramesh Dev & Seema Dev . “Vasudev Balawant Phadke” was the latest Marathi films in which he was the lead.

  • भालचंद्र श्रोत्री

    भालचंद्र श्रोत्री हे अलिबाग-उरण परिसरातील सामाजिक कार्यकर्ते होते.