(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • माणिक वर्मा

    क्षणभर उघड नयन देवा — तुझा नि माझा एक पणा — निघाले आज तिकडच्या घरी — झुलवू नको हिंदोळा — अश्या अनेक गोड गीतांना गोड आवाज देणाऱ्या जेष्ठ गायिका माणिक वर्मा यांचा स्वर म्हणजे संगीतातला एक माणिक मोतीच.

  • माधव धनंजय गाडगीळ Ph.D

    (जन्म १९४२)

    जागतिक कीर्तीचे पर्यावरण शास्त्रज्ञ. मुंबईच्या विज्ञान संस्थेमधून १९६५ मध्ये एम.एस्सी. आणि हार्वर्ड विद्यापीठाची १९६९ मध्ये पीएच.डी. पश्चिम घाट, राजस्थान, हिमालय, पनामा, पूर्व आफ्रिका, अमेरिका इथल्या पर्यावरणाचा प्रत्यक्ष अभ्यास. भारतांतील बायोस्फिअर रिझर्व्ह यांच्या कक्षा ठरवून त्यांचे नियम करण्यासाठी व निलगिरी बायोस्फिअर रिझर्व्हच्या घाटीत प्रत्यक्ष फिरून धोरण आखण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. सस्तन प्राण्यांची वागणूक पद्धती, आदिवासी जमातींच्या पर्यावरणाला अनुकूल जीवनपद्धती आणि वा. द. वर्तक यांचेबरोबर अभ्यासलेले देवरायांचे महत्त्व, हे त्यांचे संशोधन जगप्रसिद्ध आहे. माधव गाडगीळ यांना भटनागर पुरस्कार, भारतातील वैज्ञानिक संस्थांचे सदस्यत्व, भारत सरकारची पद्मश्री इत्यादी सन्मानप्राप्त झालेले आहेत. बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथून निवृत्त झाल्यावर ते पुण्यात स्थायिक झाले आहेत. १९८३ साली लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे भरलेल्या मराठी विज्ञान संमेलनाचे ते अध्यक्ष हते.

    माहितीस्त्रोत - (म.वि.प.चा.) विज्ञानतंत्रज्ञान कोष

  • कला दिग्दर्शक नितिन चंद्रकांत देसाई

    जागतिक कीर्तीचे चित्रपट-कलादिग्दर्शक, चित्रपटदिग्दर्शक व निर्माता नितिन चंद्रकांत देसाई यांचा जन्म ६ ऑगस्ट १९६५ रोजी झाला.

    नितिन चंद्रकांत देसाई यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटांसाठी कलादिग्दर्शन केले आहे. चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याआधी नितिन देसाई यांनी मुंबईतल्या सर जे.जे. कला विद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले.१९८७ सालापासून त्यांची चित्रपट कारकीर्द सुरू झाली.

    प्रतिभा, प्रयत्न आणि प्रज्ञा या त्रयीच्या जोरावर आपले अढळ स्थान निर्माण करणारे नाव म्हणजे नितीन चंद्रकांत देसाई!

    एका चाळकरी मध्यमवर्गीय मुलानं रुपेरी पडद्यावर हालचाल करणारी चित्रं पाहिली, त्यामागचे भव्य सेटस् पाहिले आणि ते सारं मोहमयी वातावरण पाहताना आपणही असंच माणसाला मोहवून टाकणारं भव्य काही तरी निर्माण केलं पाहिजे असं मनाशी ठरवूनही टाकलं. अडीच खणांच्या खोलीत राहणाऱ्या माणसानं अडीच दशकांनंतर मुंबई-पुणे महामार्गावर चौक-कर्जत रस्त्यावर अडीचशे एकरात ते भव्य स्वप्न साकारलं- एन् डी स्टुडिओ! आज देशातील अग्रगण्य स्टुडिओमध्ये या स्टुडिओची गणना होते.

    नितीन देसाई हे भारतीय चित्रपटसृष्टीमधील एक महत्वाचे नाव. गेल्या शतकातील ऐंशीच्या दशकापासून हे नाव छोट्या पडद्याला व मोठ्या पडद्याला आपलं रुपडं देत आलं आहे. भारतातील प्रत्येक मोठा चित्रपट किंवा दूरदर्शनवरील प्रकल्प हा नितीन देसाई यांच्या कलादिग्दर्शनाने सजत असतो. भारत की खोज सारखी ऐतिहासिक महत्वाची मालिका असो किंवा लगान सारखा अफाट चित्रपट असो. त्या प्रकल्पावर नितीन देसाई हे असणारच! त्यांनी पंधरा वर्षांपूर्वी खालापूर तालुक्यातील चौकजवळ हा स्टुडीओ उभारायला घेतला. एक भव्य स्वप्न सृष्टी येथे आकाराला येऊ लागली. हा स्टुडिओ मुंबई आणि पुण्यासारख्या महानगरांपासून समान अंतरावर आणि हमरस्त्याला लागून आहे.

    शेजारीच मोरबे धरणाचा सुंदर परिसर, सह्याद्रीच्या डोंगररांगा, वळणदार रस्ते, सहकार्याला कायम उत्सुक असणारे गावकरी आणि नयनरम्य पार्श्वभूमी ही या स्टुडिओची खासियत आहे. आज खालापूर कर्जतचे नाव एक कलापूर या नात्याने सर्वदूर पसरण्यात एन् डी स्टुडिओचा फार मोठा सहभाग आहे. स्टुडिओमुळे खरंतर या संपूर्ण परिसरातील अर्थकारण आणि समाजकारण बर्‍ यापैकी बदललं आहे. या परिसरात भारतातील छोटे मोठे सर्व कलाकार येतात, हजारो जणांना रोजगार मिळतो, याबरोबरच एका व्यवसायाला जोडून अनेक नवनवे जोडधंदे सुरू होत जातात.

    एकूणच सारा भाग हा जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे अनेक कंपन्या बंद पडत असताना, एन् डी स्टुडिओमुळे काही प्रमाणात सावरला गेला आहे. आमीर खानचा द रायझिंग हा येथे चित्रित केला गेलेला पहिला भव्य चित्रपट. त्यानंतर या स्टुडिओने मागे पाहिले नाही. मधुर भांडारकर यांचा गाजलेला ट्रॅफिक सिग्नल हा त्यानंतरचा महत्वाचा चित्रपट. १८५७ चा भारला गेलेला कालखंड असेल किंवा मुंबईची अफाट गर्दी वाहून नेणारा गजबजलेला हमरस्ता असेल, तो तेथे साकारला गेला. जोधा अकबर सारखा पिरियड ड्रामा असणारा चित्रपटही येथेच चित्रित झाला. आग्र्याचा भव्य किल्ला येथे दिमाखाने त्यातील सर्व बारकाव्यांसह स्टुडिओमध्ये उभा केला गेला.

    ग्रेट कॉमेडी सर्कस, बिग बॉससारख्या अनेक लोकप्रिय आणि भव्य मालिकांचे निर्माण येथे झाले आहे. राजा शिवछत्रपति सारखी भारतीय दूरचित्रवाणीमधील आजवरची सर्वात भव्य मालिका जवळपास संपूर्णपणे येथेच चित्रित झाली. छत्रपतींची राजधानी, त्यांचा दरबार, राजगड, पन्हाळा, रायगड, शिवनेरीसारखे किल्ले उभे केले गेले, आणि ते आजही मालिका संपून गेल्यानंतर त्याच दिमाखात जतन केले गेले आहेत. यासंदर्भात बोलताना श्री नितीन देसाई म्हणाले की, हे सर्व सेट आम्ही निर्माण केले पण ते आम्ही मोडणार नाही, ते तसेच जतन करून ठेवणार, या प्रत्येक सेटला एक ऐतिहासिक महत्व आहे याची जाणीव आम्हाला आहे.

    भारतीय कलाइतिहासाची ही सोनेरी पाने आहेत. हा स्टुडिओ म्हणजे लवकरच एक पर्यटन स्थळ म्हणून आम्ही विकसित करणार आहोत. आज अनेकदा ही मयसृष्टी आणि सर्वसामान्य माणसं यांच्यात अंतर पडलेले आपणांस जाणवते. हे अंतर या निमित्ताने कमी होईल आणी कलावंताबद्दलच्या आकर्षणाबरोबरच या कलावंताला आपली कला जोपासायला, पडद्यावरील आपली व्यक्तिरेखा साकारताना किती प्रकारचे कष्ट उपसावे लागतात याची नम्र जाणीव आम्ही करून देऊ शकू. एका दृष्टीने ते लोकशिक्षणच असेल.

    आमच्या स्टुडिओमध्ये एकाच वेळी शेकडो कलावंतांची, सहयोगी तंत्रज्ञांच्या राहण्याची, जेवण्याची, अखंड विद्युत पुरवठ्याची आम्ही सोय करू शकतो. आज आमच्या कंपनीचं प्रचंड मोठं असं कार्यालय पवई येथे आहे. एका सामान्य कुटुंबात मी जन्माला आलेलो असल्यामुळे मला माझ्यासारखी परिस्थिती असणाऱ्या लोकांसमोर विनम्र असं उदाहरण ठेवता येतं आहे यासाठी मी परमेश्वराचा आभारी आहे. एन् डी स्टुडिओने आता स्वत:ची कंपनी स्थापन करून नव्या दूरचित्रवाणी मालिका, नवे चित्रपटही घडवायला सुरुवात केली आहे.

    राजा शिवछत्रपति या मालिकेच्या निर्मितीबरोबरच तुफान गाजलेल्या महाराणी पद्मिनी, झाशीची राणी या मालिकांची निर्मिती एन् डी स्टुडिओने केली आहे. जगातील सात आश्चर्ये येथे उभी करून ज्यांना ज्यांना ही आश्चर्ये पहाणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी त्या सात आश्चर्यांच्या प्रतिकृती येथे उभारल्या जातील, येथे एक जागतिक दर्जाचं म्युझियम बनविण्याचा श्री देसाई यांचा मानस आहे.

    एन् डी स्टुडिओ हे एका सामान्य परिस्थितीमध्ये जन्माला आलेल्या व्यक्तीनं आपल्या जिद्द, चिकाट आणि कला यांच्या सहाय्याने साकारलेलं सत्य-स्वप्न आहे! नितिन देसाई यांच्यावर ‘आधुनिक युगाचा विश्वकर्मा: नितीन चंद्रकांत देसाई’

    लेखक मंदार जोशी. हे पुस्तक सकाळ प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे.

    नितीन देसाई हे व्यक्तिमत्व एकूणात ‘नाही रे’ वर्गाला भुरळ घालणारं व्यक्तिमत्व आहे. खिशात काहीही नसताना, वरळीच्या चाळीत राहणार्याव एका सर्वसामान्य परिस्थितीतील बँक कर्मचाऱ्याचा हा मुलगा पुढे अवघ्या अडीच दशकात जागतिक कीर्तीचा कर्तबगार कलादिग्दर्शक, प्रॉडक्शन डिझायनर बनतो, १०० एकरांच्या एन्. डी. स्टुडिओचा मालक कसा बनतो याचा शोध हा मराठी मनाच्या कुतुहलाचा विषय आहे आणि हे कुतुहल शमविणारं हे पुस्तक आहे.

    अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

    चित्रपटदिग्दर्शक व निर्माता नितिन चंद्रकांत देसाई (6-Aug-2021)

    दिग्दर्शक नितीन देसाई (6-Aug-2017)

    #NitinChandrakantDesai

  • बाबूराव रेळे

    कंपनी कायद्याच्या क्षेत्रात चंद्रशेखर ऊर्फ बाबूराव रेळे यांचे नाव मोठे असले तरीही संगीताच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान तेवढेच मोलाचे असल्याची माहिती कायद्याच्या क्षेत्रातील फार थोडय़ा लोकांना असेल. आज मुंबईत राहणाऱ्या सव्वा कोटी लोकांपैकी कितीजण अस्सल मुंबईकर असतील, हे शोधावेच लागेल.

    पण बाबूराव रेळे यांच्या पूर्वजांचा जो काही ज्ञात इतिहास उपलब्ध आहे, तो पाहता, मूळचे मुंबईचे असे जे काही थोडे लोक आज असतील, त्यात त्यांच्या कुटुंबाचा समावेश करावा लागेल. मुंबईतील खंबाला हिल भागातील जायफळाची बाग बाबूरावांच्या पणजोबांच्या मालकीची होती. त्यामुळे घरून काही मिळवण्यासाठी काही करण्याचा आग्रह असण्याची शक्यता नव्हती. पण रेळेंनी आपले सारे आयुष्य संपन्नपणे जगण्यासाठी अगदी लहान वयातच प्रयत्नांना सुरुवात केली होती. जे मनापासून आवडते, ते करण्यासाठी कष्ट पडत नाहीत, हे त्यांना लवकर उमगले असावे. त्यामुळेच त्यांनी कायद्याचा अभ्यास सुरू करण्याच्या कितीतरी अगोदर, तेव्हा मुंबईत नव्याने सुरू झालेल्या प्रो. बी. आर. देवधर स्कूल ऑफ म्युझिकमध्ये १९३५ मध्ये, म्हणजे वयाच्या आठव्या वर्षीच आपले नाव दाखल करून टाकले होते. आपल्याला संगीताची विशेष आवड आहे आणि ती जोपासण्यासाठी शास्त्रशुद्ध शिक्षण घेणे आवश्यक आहे, याची जाण त्यांच्या दोन्हीकडच्या आजोबांना होती. १९३६ मध्ये याच संगीत शाळेत दाखल होण्यापूर्वी कुमार गंधर्व नावाच्या मुलाने साऱ्या देशात आपल्या अपूर्व गायनाने ख्याती मिळवली होती. बाबूराव आणि कुमारजी यांच्यातील मैत्रीचे धागे इतके घट्ट झाले की, हे दोघेही एकमेकांशिवाय राहणे अशक्य झाले. संगीतातील आनंद निर्माण करण्याच्या प्रज्ञेचा कुमारांनी केलेला अपूर्व प्रयोग घडत असताना त्यांच्या अगदी जवळ असे जे काही थोडेचजण होते, त्यात बाबूरावही होते. संगीताकडे पाहण्याची त्यांची दृष्टी वैज्ञानिकाची होती. ही दृष्टी प्रो. बी. आर. देवधर यांच्याकडूनच मिळाली असणार हे नक्की! कारण देवधर मास्तर हे केवळ संगीत शिक्षक नव्हते, ते संगीताबद्दल मूलगामी चिंतन करणारे होते. त्यामुळे ग्वाल्हेर गायकीचे ज्येष्ठ कलावंत विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्याकडे संगीत शिकल्यानंतरही त्यांनी आपली दृष्टी सतत विस्फारित ठेवली. इतर घराण्यांचे गाणे ऐकायलाही दुरापास्त असताना देवधर मास्तर आपल्या विद्यार्थ्यांसाठी अनेक नामवंत कलावंतांचे कार्यक्रम आयोजित करत असत. कुमारजी आणि बाबूराव यांच्याकडे संगीताकडे पाहण्याची जी वेगळी नजर होती, त्याचे मूळ इथे आहे. बाबूरावांनी आयुष्यभर कायद्याच्या क्षेत्रात काम केले, पण त्यांचे सुखनिधान संगीत हेच राहिले. मैफली गवई व्हायचे नाही, असे काही त्यांनी ठरवले नव्हते. पण त्यांनी मैफली करण्यापेक्षा संगीतावर चिंतन करणे अधिक पसंत केले आणि संगीतावर ग्रंथ लिहिले. ‘स्वरप्रवाह’ हे संगीतातील थाट पद्धतीचे विश्लेषण करणारे त्यांचे पुस्तक महत्त्वाचे ठरले आहे. कायद्याच्या क्षेत्रात काम करीत असतानाही त्यांनी संशोधन करून पीएच.डी. संपादन केली. ‘स्वरप्रवाह’ हा या संशोधनाचाच ग्रंथ. बाबूरावांनी स्वत: काही बंदिशींच्या रचनाही केल्या होत्या. अशा सुमारे सव्वाशे बंदिशींचा ‘गुंजन’ हा संग्रहही त्यांनी प्रकाशित केला होता. कुमार गंधर्व यांच्या अपूर्व मैत्रीचा ठेवा उलगडून दाखवणारे ‘कुमार माझा सखा!’ हे पुस्तकही नुकतेच प्रकाशित झाले आहे. आयुष्याच्या संध्याकाळी गाता गाता मृत्यू यावा असे संगीताच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कलावंताचे एक स्वप्न असते. बाबूरावांच्या बाबतीत ते सत्यात उतरले. संगीतावर व्याख्यान देत असतानाच त्यांना मृत्यूने निमंत्रण दिले. त्यांच्या निधनाने विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील संगीताच्या इतिहासाचा साक्षीदार आपल्यातून निघून गेला आहे.

  • डॉ. वीणा देव

    डॉ. वीणा देव ठाणे जिल्हा आणि विटा येथील ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा राहिल्या आहेत. साहित्य आणि कला क्षेत्रात विविध विषयांवर अनेक ठिकाणी त्यांनी व्याख्याने दिली आहेत. मुलाखती घेणे, सूत्रसंचालन याद्वारे त्यांचा आकाशवाणी, दूरदर्शनवर सहभाग राहिला आहे.

  • उपेन्द्र भट

    पं.उपेंद्र भट यांनी संगीत विषयात एम.ए. केले असून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय (मुंबई) तर्फे त्यांना `संगीत विशारद’ आणि `संगीत अलंकार’ पदवी देऊन गौरविण्यात आले आहे.शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, चित्रपट संगीत, भावगीत, राग निर्मिती, संतवाणी, हिंदी द्वंद्वंगीते असे अनेकविध पैलू त्यांच्या गाण्यात आहे.

  • वसंत पुरुषोत्तम काळे (व.पु. काळे)

    लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार अशी ख्याती असलेल्या व.पु. काळे अर्थात वसंत पुरुषोत्तम काळे,हे पेशाने वास्तुविशारद होते.
    “आपण सारे अर्जुन”, “गुलमोहर”, “गोष्ट हातातली होती!“, “घर हलवलेली माणसे”, “दोस्त”, “माझं माझ्यापाशी?”, “मी माणूस शोधतोय”, “वन फॉर द रोड”, “रंग मनाचे”, “माणसं”,“प्लेझर बाँक्स भाग १ आणि २”, “वपुर्वाई”, “वपुर्झा़”, “ हुंकार” असे पत्रसंग्रह, व्यक्तीचित्रे, ललितप्रकार खुपच प्रसिध्द आहेत.

  • योगेश्वरी मिस्तरी

    धुळ्यात योगासनाची फारशी क्रेझ नाही. हौसेन योगाभ्यास करावा. असेहि काही नाही. मात्र इथलीच योगेश्वरी मिस्तरी नावाची एक चुणचुणीत मुलगी फ्रान्समधील जागतिक योगस्पर्धेत तीन सुवर्णपदकांसह तब्बल ७ पदके जिंकून आली. खर्‍या अर्थाने योगाची योगेश्वरी झालेल्या या मुलीचा थक्क करणारा हा प्रवास...

    योगेश्वरी मिस्तरी यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला योगेश्वरी ... योगाची हा लेख पुढील पानावर वाचा.

    योगेश्वरी मिस्तरी यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला योगेश्वरी ... योगाची हा लेख वाचा.

    mistery-yogeshwari-modified

  • डॉ.केशव बळिराम हेडगेवार (राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक)

    डॉ. हेडगेवार यांनी तरुणपणात सशस्त्र क्रांतीत सहभाग घेतलेला. शाळेत असताना त्यांनी – व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाला ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वाटण्यात आलेली मिठाई रागाने फेकून दिली होती. तसेच पुढे ‘वंदे मातरम्‌’ चा घोष केल्याबद्दल त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते.

  • प्राजक्त देशमुख

    ते एक चांगले व्यवसायिक आहेतचं.. पण त्या पेक्षा ते नाशकात किंवा महाराष्ट्रात लोकप्रिय कवी आणि नाटकातल्या दिग्दर्शन-अभिनयाकरिता ओळखतात.