(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • अभिनेते टॉम अल्टर

    शक्तिमान’, ‘कॅप्टन व्योम’सारख्या मालिकांमध्येही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

  • विनोदी लेखक पांडुरंग लक्ष्मण ऊर्फ बाळ गाडगीळ

    बाळ गाडगीळ यांनी ६० हून अधिक पुस्तके लिहिली. त्यांच्या ’लोटांगण’ या पहिल्याच विनोदी कथासंग्रहाला पु.ल. देशपांडे यांच्या ‘अपूर्वाई’ या पुस्तकाबरोबर राज्य सरकारचा पुरस्कार विभागून मिळाला होता. ’एकच प्याला, पण कोण?’, ’अखेर पडदा पडला’, ’फिरकी’, ’वशिल्याचा तट्टू’ अशा अनेक पुस्तकांनाही लोकप्रियता मिळाली होती. सिगरेट व वसंतऋतू’ या त्यांच्या प्रवासवर्णनाला राज्य सरकारचे पहिले पारितोषिक मिळाले.

  • आधुनिक युगातील शिक्षणाचे महामेरू व कॉग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम

    गावात शाळा नसल्या कारणाने पतंगरावांना चार ते पाच किमी चालत जाऊन प्राथमिक शिक्षण घ्यावं लागत असे. पुढे पलूस तालुक्यातील कुंडल गावातून ते दहावी उत्तीर्ण झाले. त्यांचा जन्म ८ जानेवारी १९४५ रोजी सांगली जिल्ह्यातील सोंसल या गावी झाला. दहावीनंतर त्यांनी साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या शिवाजी कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतले. शिक्षण क्षेत्रातील सेवेची बिजं याच संस्थेत त्यांच्यामध्ये रुजली. १९६१ साली ते पुण्यात आले आणि एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स करुन, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून रूजू झाले. त्यावेळी पुणे विद्यापीठातून त्यांनी कायद्यात बॅचलर डिग्री मिळवली आणि पुढे पुणे विद्यापीठातून मास्टरचेही शिक्षण पूर्ण केले. १९६४ मध्ये अवघ्या २० वर्षाच्या वयात त्यांनी ‘भारती विद्यापीठ’ ही शैक्षणिक संस्था स्थापन केली.

    सुरूवातीच्या जडणघडणीच्या काळात भारती विद्यापीठाच्या कार्याचे क्षेत्र, केवळ शालेय विद्यार्थ्यांसाठी गणित आणि इंग्लिश विषयांच्या प्रमाणपत्र परीक्षा घेण्यापुरतेच मर्यादित होते. मुख्यतः, या विषयांबाबत विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी, हा दृष्टिकोन ठेवूनच हा कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्यांच्या समर्थ, चैतन्यशील आणि अतिशय कल्पक अशा नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली, भारती विद्यापीठाने आपल्या उपक्रमांचा विविध दिशांनी विस्तार करायला सुरूवात केली आणि आज ते, बालकमंदिर ते विद्यापीठ शिक्षण असे संपूर्ण शैक्षणिक क्षेत्र व्यापणार्‍या, १८० शैक्षणिक संस्थांचा समावेश असलेल्या विशाल संस्थात्मक जाळ्यामध्ये विकसित झाले आहे.

    भारती विद्यापीठाला एक परिपूर्ण विश्वविद्यालय म्हणून विकसित करणे’, हे विद्यापीठाच्या मेमोरन्डम ऑफ असोसिएशन मधील ध्येयांपैकी एक होते. त्यावेळच्या २० वर्षे वयाच्या या तरुणाने आपले स्वप्न त्यानंतर ३२ वर्षांनी, १९९६ मध्ये, जेव्हा भारत सरकारने भारती विद्यापीठाच्या संस्थांच्या समूहाला विश्वविद्यालयाचा दर्जा प्रदान केला त्यावेळी, सत्यात उतरलेले पाहिले. डॉ. कदम यांची विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नेमणूक होणे, हे या महत्त्वाच्या टप्प्याचे वैशिष्ट्य होते – अक्षरशः राखेतून उभारी घेऊन सर्वोच्च स्थानी पोहोचणाऱ्या एका शेतकर्‍याच्या मुलाचे हे यश थक्क करणारे होते.

    सुरूवातीच्या काळात, भारती विद्यापीठाचे कार्यक्षेत्र हे शालेय विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश आणि गणित विषयांच्या परीक्षांचे आयोजन करण्यापुरतेच मर्यादित होते. डॉ. कदम यांच्या चैतन्यशील आणि द्रष्ट्या नेतृत्वाखाली, ४३ वर्षांच्या कालावधीत, आपल्या छत्राखाली १८० शैक्षणिक संस्था असलेले भारती विद्यापीठ, भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वदूर मान्यता पावलेल्या शैक्षणिक संस्थांपैकी एक, म्हणून बहरास आले. वैद्यकशास्त्र, दंतवैद्यक, आयुर्वेद, होमिओपॅथी, नर्सिंग, व्यवस्थापन, औषधीनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकी, कृषी, आर्किटेक्चर, विधी, जैवतंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान इ. चा समावेश असलेल्या जवळपास सर्व मुख्य परंपरागत आणि उदयोन्मुख विद्याशाखांचे शिक्षण देणारी ६५ महाविद्यालये आणि संस्था, या विश्वविद्यालयाद्वारे चालविल्या जातात.

    भारताच्या राजधानीचे शहर, नवी दिल्ली, येथे शैक्षणिक संस्थान सुरू करणाऱ्या महाराष्ट्रातील अत्यंत मोजक्याच राजकारण्यांपैकी, डॉ. कदम हे एक आहेत. डॉ. कदम यांनी अनेक सहकारी संस्थांची स्थापना केली आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कायापालट करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. या सहकारी संस्थांमध्ये साखर कारखाना, सहकारी ग्राहक भांडार, बहुराज्यीय शेडयुल्ड बँक इ. चा समावेश होतो. या सर्व संस्था यशस्वीपणे कार्यरत असून ग्रामीण शेतकर्‍यांच्या कल्याणात साहाय्यभूत झाल्या आहेत. त्यांनी नोकरी करणाऱ्या महिलांकरिता वसतीगृहे देखील स्थापन केली आहेत.

    त्यांनी ग्रामीण लोकांच्या गरजांच्या पूर्तीसाठी, प्रामुख्याने ग्रामीण भागांमध्ये शाळा, महाविद्यालये आणि सहकारी केंद्रांची स्थापना केली आहे. भारती विद्यापीठाने समाजातील वंचित घटकांमधील अनेक मुलींना दत्तक घेऊन त्यांना जवळ जवळ मोफत शिक्षण देण्याची जबाबदारी घेतली आहे. शिक्षण मंत्री असताना, त्यांनी प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात स्तुत्य कार्य केले आहे.

    भारती विद्यापीठाने समाजातील वंचित घटकांमधील अनेक मुलींना दत्तक घेऊन त्यांना जवळ जवळ मोफत शिक्षण देण्याची जबाबदारी घेतली आहे. भारती विद्यापीठ हे केवळ पश्‍चिम महाराष्ट्रातीलच नव्हे तर पूर्ण देशभरातील आघाडीच्या शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे. शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे, असे डॉ. पतंगराव कदमांना वाटते आणि म्हणूनच ‘चैतन्यशील शिक्षणाद्वारे सामाजिक परिवर्तन’ हे ध्येयवाक्य भारती विद्यापीठाने आपल्या प्रारंभापासूनच अंगिकारले आहे.

    डॉ. पतंगराव कदम यांनी प्रथम, महाराष्ट्र मंत्रीमंडळात राज्य मंत्री म्हणून जून १९९१ ते फेब्रुवारी १९९३ पर्यंत काम केले. त्यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी शिक्षण, तंत्रशिक्षण, जलसिंचन, जलप्रदाय क्षेत्र (कमांड एरिआ) विकास, माजी सैनिक कल्याण यांसहित विविध खाती वाखणण्याजोग्या रितीने हाताळली. त्यांनी शालेय शिक्षण विभागाचा स्वतंत्र प्रभारही सांभाळला.

    त्यानंतर, त्यांची कॅबिनेट मंत्री म्हणून पदोन्नती होऊन त्यांना उच्च आणि तंत्रशिक्षण आणि रोजगार ही खाती देण्यात आली. त्यांचा उच्च आणि तंत्रशिक्षण आणि रोजगार मंत्री म्हणून कार्यकाळ, त्या काळात पारित झालेल्या धोरणात्मक निर्णयांमुळे विशेष लक्षणीय ठरला व त्या निर्णयांचा दूरगामी विधायक प्रभाव या क्षेत्रात पडला आणि त्यांच्यातून, त्यांनी हाताळलेल्या विषयांबाबतची त्यांची दूरदृष्टी आणि सखोल ज्ञान प्रतिबिंबित झाले.
    डॉ. कदम महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेवर चार वेळा निवडून आले आहेत (१९८५-९०, १९९०-९५, १९९९-२००४, २००४-२००९, २००९-२०१० आणि २०१० पासून पुढे). ऑक्टोबर २००४ मध्ये ते महाराष्ट्रातील भिलवडी-वांगी मतदारसंघातून १,०१,९०० च्या फरकाने पुन्हा निवडून आले. निवडणुकीत देण्यात आलेल्या मतांच्या टक्केवारीचा विचार करता, त्या निवडणुकीमधील सर्व यशस्वी उमेदवारांच्या यादीत ते अग्रस्थानी होते.

    प्रचंड मतसंख्येच्या बाबतीत, महाराष्ट्र विधानसभेचा सदस्य म्हणून त्यांनी अतिशय हेवा करण्याजोगा विक्रम नोंदविला आहे. एक कार्यक्षम, अभ्यासू आणि स्पष्टवक्ते व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी विधानसभेमध्ये आपली छाप बसवली आहे. कृषी विकास, उच्च शिक्षण, ग्रामीण आणि शहरी समस्या, सहकारी उपक्रम, जलसिंचन, वित्तव्यवस्था आणि तत्सम इतर क्षेत्रांतील आपल्या सखोल ज्ञानाने त्यांनी विविध राज्यस्तरीय समित्यांवरील आपल्या सहकार्‍यांनाही प्रभावित केले होते. पतंगराव कदम यांचे ९ मार्च २०१८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • संगीतकार सरदार मलिक

    संगीत विश्वात सरदार मलिक यांना ‘सुरांचा सरदार’ म्हणून ओळखलं जात असे. हिंदी सिनेसृष्टी मध्ये भरीव काम करुन सुध्दा पहिल्या पाच मध्ये नाव न मिळवु शकलेला एक संगीतकार म्हणजे सरदार मलिक.

    सरदार मलिक उत्तर प्रदेशमधील अल्मोडा गावचे. आयुष्यभर सर्वधर्मसमभावाचा त्यांनी पुरस्कार केला. त्यासाठी ‘सरदार’ नाव धारण केलं. ते स्वत: सरदार, पत्नी बिल्किस तर मुलं अन्नू, अबू आणि डेबू. हिंदुस्थानी संगीताचे प्राथमिक धडे त्यांनी अल्लाउद्दीन खाँ साहेबांकडे गिरवले. उस्ताद अली अकबर खाँ, पंडित रविशंकर हे त्यांचे गुरुबंधू होते. गायनाचं शास्त्रोक्त शिक्षण त्यांनी पंडित विष्णुपंत शिराळी यांच्याकडून घेतलं. उदय शंकर यांच्याकडे नृत्यकला शिकले. पुढे सरदार मलिक संगीत दिग्दर्शनाकडे वळले. १९४७ मधील जयंत देसाईंचा ‘रेणुका’ हा त्यांनी संगीतबद्ध केलेला पहिला चित्रपट. ‘नायक मुबारक’साठी त्यांनी पार्श्वगायनही केलं; पण चित्रपट अपयशी ठरला. पुढे काही काळ ते एच.एम.व्ही.त काम करत होते. सरदार मलिक यांची संगीतकार म्हणून ओळख झाली ती ‘ठोकर’(१९५३)पासून.

    ‘ठोकर’मधलं तलतच्या आवाजातील शम्मी कपूरवर चित्रित झालेलं ‘ऐ गमे दिल क्या करू’ हे गीत माधुर्य, अर्थपूर्ण शब्द सौंदर्यामुळे मन वेडावून टाकत होतं. इंटरव्हलनंतर हाच मुखडा घेऊन पुढचा भाग आशाच्या आवाजात आहे. एक गाणं, तोच विचार दोन वेळा चित्रपटात द्यायची कल्पना सरदार मलिक यांचीच! हा चित्रपट पाहायला निर्माते-दिग्दर्शक पी. एन. अरोरा आले होते. ही दोन्ही गाणी ऐकून ते इतके प्रभावित झाले, की त्यांनी ‘चोर बाजार’ या पुढच्या चित्रपटासाठी मलिकना करारबद्ध केलं. ‘हुई थी हम से नादानी, तेरी महफिल में आ बैठे, जमीं की खाक होकर, आसमां से दिल लगा बैठे.’ केवळ आपल्या आवाजाच्या जादूने भावनांमधील विविध छटांचा आविष्कार करण्याच्या बाबतीत त्या काळात लता मंगेशकरांना तोड नव्हती. ज्याला नाव देता येणार नाही, अशी एक अप्रतिम छटा त्यांनी सरदार मलिक यांच्या या गाण्यातून व्यक्त केली आहे. ‘झुक झुक जाए नजर शरमाए, किसी को कहां न जाए’ हसरत जयपुरीची ही हळुवार भावना गीता दत्तच्या आवाजात त्यांनी तितक्याच समर्थपणे पेश केली आहे.

    विष्णुपंत शिराळींच्या गायकीचा जबरदस्त प्रभाव सरदार मलिक यांच्यावर होता. झोपाळयासारखा स्वरांचा चढ-उतार करत ते गाण्याची लज्जत वाढवत असत. त्यांच्या गायकीची झलक सरदार मलिक यांनी ‘आब-ए-हयात’मधील हेमंतकुमारच्या गाण्यातून दाखवली आहे. ‘मैं गरीबों का दिल हूं वतन की जुबां.’ वेळात वेळ काढून हेमंतकुमार यांनी सरदार मलिक यांच्यासाठी पार्श्वगायन केलं. हेमंतकुमार यांचं हे एक विशेष उल्लेखनीय गीत आहे. चोखंदळ रसिकांनी सरदार मलिक, आशा भोसले यांच्याकडून गाऊन घेतलेली काही गाणी ऐकल्यास त्यांना हा ‘सुरों का सरदार’ काय होता, याची थोडीफार कल्पना येईल. धीरूभाई देसाईंचा ‘सारंगा’ म्हणजे त्यांच्या प्रतिभाशक्तीचा उत्कृष्ट नमुना. रसिक श्रोत्यांसाठी जणू मेजवानीच. ‘पिया कैसे मिलू तुमसे, मेरे पाव पडी जंजीर’ (लता-रफी) या गाण्यातील अगतिक विरहिणी, ‘लागी तुमसे लगन साथी छुटे ना’ (मुकेश-लता) यातील लाडीक नखरा, लताच्या ‘कोई घर आएगा प्यार जगाएगा’मधील ढोलकीची रसपूर्ण साथ, सुमन कल्याणपूरच्या गाण्यातील मधुर दर्द आणि शेवटी लक्षात राहतो, तो मुकेश. ‘हाँ दिवाना हूँ मैं, गम का मारा हुआ इक बेगाना हूँ मैं..’ सरदार मलिक यांनी मुकेशच्या आवाजाचा अतिशय कुशलतापूर्वक उपयोग केला आहे. त्याच्या आवाजातील वजन कमी करून दिलेलं ‘सारंगा तेरी याद में, नैन हुए बेचैन’ हे गाणं म्हणजे, मुकेशच्या कारकिर्दीतला मानबिंदू आहे.

    सरदार मलिक यांनी मात्र मनाचा मोठेपणा दाखवून गाण्याच्या यशाचं श्रेय तारशहनाईवादक डी. एम. टागोर यांना दिलं आहे. टागोर यांना सर्व वादक कलाकार दुखींदा म्हणून ओळखत असतं. ते तारशहनाई वाजवताना इतकी व्याकूळता निर्माण करत, की ऐकणा-याच्या डोळय़ांतून अश्रू पाझरत असत. ‘सारंगा’ चित्रपटाने जितका बिझनेस केला, त्यापेक्षा अधिक बिझनेस त्याच्या ध्वनिमुद्रिकांनी केला. मा.सरदार मलीक यांनी सहाशेच्यावर गाण्यांना संगीत दिले आहे. संगीतकार अन्नु मलिक हे मा.सरदार मलीक यांचे चिरंजीव. सरदार मलीक यांचे निधन २७ जानेवारी २००६ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट / अरुण पुराणिक

  • द ब्रँड लॉरीअट लिजेंडरी अॅवार्ड – गानसम्राज्ञी लता मंगेशकर

    गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना मलेशियाचा प्रतिष्ठेचा ‘द ब्रँड लॉरीअट लिजेंडरी अॅवार्ड’ प्रदान करण्यात आला.
    ब्रँड लॉरीअटकडून दिले जाणारे पुरस्कार हे जगभारातील नावाजलेल्या व्यक्तिंना दिले जातात. ८७ वर्षीय लतादीदींनी सोशल मीडियावर ट्विट करत पुरस्काराचा एक फोटो शेअर केला आहे.

    ट्विटरवर फोटो शेअर करताना त्यांनी म्हटले आहे की, मला लिजेंडरी अॅवार्ड २०१७ देऊन सन्मानित केल्याबद्दल लॉरीअटचे खूप आभार. भारतीय सिनेमातील योगदानाबद्दल शाहरुख खानलाही २०१२ मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता. याआधी दक्षिण आफ्रिकेचे माजी दिवंगत राष्ट्रपती नेल्सन मंडेला, नोबल पुरस्कार विजेते मोहम्मद यूनुस, रतन टाटा, स्टीव्ह जॉब्स, मार्क झुकरबर्ग आणि मायकल शूमाकरला ‘द ब्रँड लॉरीअट लिजेंडरी अॅवार्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे.

    आतापर्यंत ३०,००० हूनही अधिक गाणी गायलेल्या दीदींनी त्यांच्या नंतरच्या ट्विटमध्ये त्यांच्या चाहत्यांचे आभार मानले. माझ्या कामावर मी समाधानी आहे. यासाठी मी माझ्या चाहत्यांची आणि हितचिंतकांची आभारी आहे.

  • मराठीतील ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक

    आनंद मोडक यांनी रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रांत आपल्या संगीताने ठसा उमटविला होता. त्यांचा जन्म १३ मे १९५१ रोजी झाला. ‘महानिर्वाण’, ‘तीन पैशाचा तमाशा’, ‘बेगम बर्वे’, ‘महापूर’, ‘पडघम’, ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकांच्या आशयाला त्यांच्या संगीताने वेगळ्याच उंचीवर नेले होते. ‘२२ जून १८९७’, ‘कळत नकळत’, ‘सूर्योदय’, ‘चाकोरी’, ‘चौकट राजा’, ‘एक होता विदूषक’, ‘मुक्ता’, ‘दोघी’, ‘सरकारनामा’, ‘पाश’, ‘फकिरा’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘आरंभ’, ‘धूसर’, ‘यशवंतराव चव्हाण’, ‘खैरलांजीच्या माथ्यावर’ या चित्रपटातील संगीतही रसिकांकडून तसेच समीक्षकांकडून अतिशय वाखाणले गेले.

    ‘एक झोका, चुके काळजाचा ठोका’, ‘जाई जुईचा गंध मातीला’, ‘युगा युगांचे नाते आपुले’, ‘श्रावणाच ऊन मला झेपेना’, ‘हे जीवन सुंदर आहे’, ‘तू तलम अग्नीची पात’, ‘वळणवाटातल्या मातीत हिरवे गंध’, ‘मना तुझे मनोगत मला कधी कळेल का’, ‘नाकावरच्या रागाला औषध काय’ ही त्यांची गाणी आजही रसिकांच्या मनात दरवळत आहेत. आनंद मोडक यांचे २३ मे २०१४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • मराठी व हिन्दी चित्रपट दिग्दर्शक राजा बारगीर

    ’सुखाचे सोबती’, ’बोलकी बाहुली’, ’देवा तुझी सोन्याची जेजुरी’, ’मानाचा मुजरा’, ’करावं तसं भरावं’, ’दीड शहाणे’, ’ठकास महाठक’, ’गडबड घोटाळा’, ’तुझी माझी जमली जोडी’ अशा अनेक मराठी व हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. राजा बारगीर यांचे १८ डिसेंबर १९९३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • बॉलिवूडच्या जेष्ठ गायिका मीना कपूर

    मीना कपूर यांचे वडील विक्रम कपूर हे कलकत्त्याच्या न्यू थिएटर्स स्टुडिओचे अभिनेते होते. चित्रपट निर्माते पी.सी. बरुआ हेही त्यांचे नातेवाईक होते. यांमुळे कपूर यांचा चित्रपटात प्रवेश सुकर झाला. मीना कपूर यांनी आपल्या लहानश्या करीयरची सुरवात १९४६ साली नीनु मुजुमदार यांच्या आठ दिन या चित्रपटापासून केली. याला संगीत एस.डी.बर्मन यांचे हो. गायिका मीना कपूर या संगीतकार अनिल विश्वास यांच्या पत्नी. मीना कपूर यांचा संगीतकार अनिल विश्वास यांच्याशी १९५९ मध्ये विवाह झाला.

    मीना कपूर यांचे नाव घेताच चटदिशी आठवते ते गाणे म्हणजे "कुछ और जमाना केहता है" हे 'छोटी छोटी बाते' या स्वर्गीय मोतीलाल निर्मित चित्रपटातील अनिल विश्वास यानीच संगीतबद्ध केलेले सुरेख गीत, जे नादिरा यांच्यावर चित्रीत झाले होते. 'परदेसी' मधील 'रसिया रे मन बसिया रे' हे एक आणि "आँखे" मधील 'मोरे अटरिय पे कागा' हे आणखीन एक प्रकर्षाने आठवणारे गीत. अनिलदांच्या निधनानंतर 'अमर उत्पल' या त्यांच्या मुलांजवळ राहात असत अमर उत्पल या जोडीने बिग बी च्या 'शहेनशहा' चे संगीत दिग्दर्शन केले होते. मीना कपूर यांनी १२५ हून अधिक गाणी गायली होती. यातील सी रामचंद्र यांच्या बरोबरचे मेरी जान संडे के संडे', व'रसिया रे मन बसिया रे' ही त्यांची गाजलेली गाणी. मीना कपूर यांचे २३ नोव्हेंबर २०१७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    मीना कपूर यांची गाणी
    https://www.youtube.com/playlist…
    मेरी जान संडे के संडे'
    https://www.youtube.com/watch?v=eQT_HmOUdRc
    https://www.youtube.com/watch?v=Va739fEuuZg

  • जेष्ठ कलाकार बलराज साहनी

    त्यांचे खरे नाव युधिष्ठिर साहनी. त्यांचा जन्म १ मे १९१३ रोजी पंजाबच्या सरगोधा जिल्ह्यातील भेरा येथे एका पंजाबी खत्री कुटूंबात झाला होता. बलराज साहनी यांनी लाहोरच्या लाहोर विद्यापीठामध्ये प्रोफेसर सोढी आणि प्रोफेसर बुखारी यांच्या मार्गदर्शनात शेक्सपिअर लिखित नाटकात अभिनय केला. लाहोर विद्यापीठातून इंग्लिश साहित्य व हिंदी विषयांत पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी काही काळ रावळपिंडी येथे कौटुंबीक व्यवसायात व्यतित केला. पुढे १९३० साली ते पत्नी दमयंती सह रविंद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनात अध्यापनासाठी गेले. मा.बलराज साहनी हे काही काळ ‘शांतिनिकेतन’मध्ये प्राध्यापक होते. शांती निकेतनमध्ये बर्नाड शॉ यांच्या ‘आर्म्स अँड मॅन’ मध्ये काम केले. 'इंडियन पिपल्स थिएटर असोसिएशन' (आय.पी.टी.ए.) व 'पंजाबी कला केंद्राचे' ते संस्थापक सदस्य होते. १९३८ साली महात्मा गांधींसोबत कार्य केल्यानंतर ते लंडन येथील बी.बी.सी. च्या हिंदी विभागात निवेदक म्हणून रुजू झाले. तेथे ते १९४३ पर्यंत होते. नंतर मात्र, लंडनमध्ये बी.बी.सी मध्ये नोकरी करून भारतात आल्यानंतर त्यांनी भारतीय नाटकातच काम केले. बलराज साहनी यांनी चित्रपट उद्योगात वयाच्या ३४ व्या वर्षी प्रवेश केला. बलराज साहनी हे चित्रपटसृष्टीतील मातब्बर कलावंत होते. हिंदी चित्रपटांत त्यांनी तब्बल २५ वर्षे काम केले. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीचा ठसा उमटवला. रंगभूमी आणि एकूणच सांस्कृतिक विकासात त्यांनी मोलाची भर घातली. बलराज सहानी हे एक श्रेष्ठ चित्रपट अभिनेते म्हणून लोकांना माहित आहेत. पण ते एक थोर तत्त्वचिंतक, समाजसेवक होते ही गोष्ट पहात थोड्यांना ज्ञात आहे.

    देव आनंद अभिनीत ‘बाजी’ चित्रपटाची पटकथा बलराज साहनी यांनी लिहिली. काही वर्षांनंतर चेतन आनंदच्या ‘हकीकत’ मध्ये त्यांनी अभिनयाबरोबरच लेखन आणि निर्मितीतसुद्धा सहकार्य केले. सारांश एवढाच की, हे सगळे शिक्षित लोक होते आणि कोणताही वाद ताणत नव्हते. बलराज साहनी यांचा चेहरा पारंपरिक नायकाचा नव्हता. ते मध्य अवस्थेत अभिनयाशी जोडले गेले होते. जिया सरहदी यांच्या ‘हम लोग’ च्या शूटिंग वेळी त्यांना रोज तुरुंगातून आणावे लागत होते. कारण एका आंदोलनामुळे त्यांना राजकीय बंदी बनवण्यात आले होते. ख्वाजा अहमद अब्बास यांच्या ‘धरती के लाल’ मध्ये त्यांनी अभिनय केला होता. मात्र, १९४६ मध्ये जागोजागी दंगे झाल्यामुळे चित्रपटाचे सामान्य प्रदर्शन होऊ शकले नाही. बिमल रॉय यांनी ‘दो बीघा जमीन’ मध्ये त्यांना मुख्य भूमिकेत घेतले. चित्रपटाच्या यशासोबत बलराज यांनासुद्धा खूप प्रशंसा मिळाली. अमिय चक्रवर्ती यांच्या ‘सीमा’ मध्ये त्यांनी गांधीवादी संस्थेच्या प्रमुखाची भूमिका केली होती. या भूमिकेची खूप प्रशंसा झाली होती. हा चित्रपट शंकर-जयकिशन-शैलेंद्र यांच्या यांच्या गीत व संगीत्नाने आठवणीत राहीला. ‘काबुलीवाला’ मध्येही बलराज यांच्या अभिनयाची प्रशंसा झाली. हा चित्रपट रवींद्रनाथ टागोर यांच्या कहाणीवर आधारित होता. शांती निकेतनशी जोडलेले असल्यामुळे रवींद्रनाथ टागोर यांनी कधी काळी हा चित्रपट पंजाबीमध्ये लिहिण्याची प्रेरणा बलराज यांना दिली होती. बलराज साहनी यांचे अजूनही ‘वक्त’ मधील गाणे ‘ओ मेरी जोहरा जबी, तुझे मालूम नहीं, तू अब तक हैं हंसी और मैं जवां.’ लक्षात आहे.. ते पठाण कुटुंबाच्या उत्सवात गाणे म्हणत आहेत.

    बलराज साहनी यांचे ‘गरम कोट’, ‘सट्टा बाजार’, ‘सीमा’, ‘लाजवंती’, आणि ‘गर्म हवा’ अविस्मरणीय चित्रपट होते. एमएस सथ्यु यांचा ‘गर्म हवा’ फाळणीवर बनलेला महान चित्रपट होता. मा.बलराज साहनी अतिशय संवेदनशील व्यक्ती होते. त्यांची कलात्मक आवड त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक कार्यात दिसून आली. ते स्टार असूनही खूपच सामान्य जीवन जगत होते. राज खोसला यांच्या ‘दो रास्ते’ मध्ये त्यांनी सावत्र भावाची भूमिका केली होती. तो त्या कुटुंबाचा प्रमुख असतो. राज खोसला एक स्वछंदी व्यक्ती होते. त्यांना लवकर आणि कमी खर्चात काम करणे आवडत नव्हते. त्यांच्यासारखे विविध चित्रपट इतर दिग्दर्शकांनी केले नाहीत. पंचवीस वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत बलराज साहनी यांनी १२५ चित्रपटांत अभिनय केला. बिमल रॉय यांचा "दो बिघा जमीन‘, अमिया चक्रवर्ती यांचा "सीमा‘, राजेंद्रसिंह बेदी यांच्या "गरम कोट‘ या कथेवरील चित्रपट, हेमंत गुप्ता याचा "काबुलीवाला‘, यश चोप्रा यांचा "वक्त‘ यांतील त्यांचा अभिनय अविस्मरणीय आहे. एम. एस. सथ्यू यांचा "गरम हवा‘ या त्यांनी अभिनय केलेल्या शेवटच्या चित्रपटात फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार देणाऱ्या मुस्लिमाचे त्यांचे पात्र अनेक पिढ्यांच्या स्मरणात राहील. जीवनाचे शेवटचे क्षण त्यांनी अमृतसरच्या पंजाबी कला केंद्रात घालवले. या संस्थेसाठी त्यांनी एक नाटक ‘क्या यह सच है बापू’ लिहिले. मात्र हे ‘अर्श-फर्श’ च्या नावाने सादर करण्यात आले. बलराज साहनी यांचे १३ एप्रिल १९७३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • आर. के. नारायण आणि मालगुडी डेज

    १९३५ साली नारायण यांनी मालगुडी नावाच्या एका काल्पनिक गावाला केंद्रस्थानी कल्पून स्वामी ॲन्ड फ्रेन्ड्स या नावाची आपली पहिली कथामालिका लिहिली. त्यावेळी त्यांचे लिखाण भारतात कोणाच्याही पसंतीस उतरले नाही. या गोष्टी वाचून लेखक ग्रॅहॅम ग्रीन यांना मात्र या कथांमध्ये त्यांचे नवीन मित्र भेटल्यासारखे वाटले. त्यांनी पुढाकार घेऊन नारायण यांची ही कथामालिका छापण्यात रस घेतला आणि हे पुस्तक अतिशय गाजले.