(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • ज्येष्ठ सतारवादक उस्ताद हलिम जाफर खान

    ‘मधुबन मे राधिका नाचे रे’, ‘ये जिंदगी उसी की हैं’ या अजरामर गाण्यातील सतारीचे सुर, ‘मुगल-ए-आझम’, ‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटांसाठीच्या सतार वादनासाठी सतारवादक उस्ताद अब्दुल हलिम जाफर खान यांचे नाव लक्षात राहील.
    उस्ताद अब्दुल हलिम जाफर खान यांचे नाव पं. रवीशंकर, उस्ताद विलायतखान यांच्या जोडीने घेतले जात असे. त्यांनी सतारवादनात स्वत:चा ‘जाफरखानी’ बाज निर्माण केला. इंदौर घराण्याचे असलेल्या जाफर खान यांनी सतार वादनाची स्वतंत्र शैली निर्माण केली होती. संगीत नाटक अकादमी, ‘पद्मभूषण’ आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

    हिंदी चित्रपटसृष्टीतील फिरोज निजामी, अनिल-विश्वास, शंकर जयकिशन, मदनमोहन, सी. रामचंद्र, नौशाद, वसंत देसाई आदी दिग्गज संगीतकारांबरोबर काम केले होते. हलिम अकादमी ऑफ म्युझिक या संस्थेचे ते संस्थापक होते. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना सतारवादन शिकविले. जुनेन खान, राजेंद्र वर्मन, हरीशंकर भट्टाचार्य, रवींद्र चारी, झुबेर शेख आदी शिष्य परिवारातील काही ठळक नावे आहेत.

    ज्येष्ठ सतारवादक हलिम जाफर खान यांचे ४ जानेवारी २०१६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • पं. कृष्ण गुंडोपंत गिंडे उर्फ के. जी. गिंडे

    पं. गिंडे यांचा जन्म कर्नाटक राज्यात बेळगाव जवळ बैलहोंगल येथे झाला. त्यांनी लहान वयातच संगीतात रूची दाखविण्यास सुरुवात केली व पुढे आपले सारे आयुष्य संगीताला वाहून घेतले. ते श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांच्याकडे वयाच्या अकराव्या वर्षी गाणे शिकू लागले. त्यासाठी त्यांनी लखनौ येथे प्रयाण केले व रातंजनकरांच्या घरातील एक सदस्य बनले. तिथे ते मॉरिस कॉलेजातील व्ही. जी. जोग, एस. सी. आर. भट, चिन्मय लाहिरी अशा संगीताभ्यासात बरेच पुढे असलेल्या विद्यार्थ्यांच्या सहाय्याने संगीत अध्ययनात प्रगती करू लागले. वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत गिंडे यांनी संगीताच्या क्षेत्रातही बरीच प्रगती केली होती व माध्यमिक शाळेचा अभ्यासक्रमही पूर्ण केला होता. हळूहळू पं. गिंडे रातंजनकरांच्या मदतनीसाची भूमिका निभावू लागले. त्याच जोडीला त्यांचे संगीत क्षेत्रातील ज्ञान व उमजही वाढत होती.

    त्यांनी आकाशवाणीवर व वेगवेगळ्या संगीत महोत्सवांत आपल्या गायनाचे कार्यक्रम करण्यास सुरूवात केली. तसेच आपले सहाध्यायी व शिक्षक एस. सी. आर. भट यांच्या जोडीने ते ध्रुपद शैलीत जुगलबंदीही करू लागले. १९५१ मध्ये त्यांनी मुंबई येथील भारतीय विद्या भवन येथे शिक्षकाची नोकरी स्वीकारली. १९६२ मध्ये ते वल्लभ संगीत विद्यालयाचे प्राचार्य पदी नियुक्त झाले. एक उत्तम शिक्षक, विद्वान, गायक व संगीत रचनाकार अशा विविध भूमिका त्यांनी निभावल्या. त्यांनी कोलकाता येथील आयटीसी संगीत संशोधन अकादमीतही ज्ञानदानाचे कार्य केले. त्यांची भारतीय शास्त्रीय संगीताविषयीची सप्रात्यक्षिक व्याख्याने प्रचंड लोकप्रिय होती. पं. गिंडे यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार व महाराष्ट्र गौरव पुरस्कार अशा दोन पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

    त्यांच्या साठाव्या वाढदिवसा निमित्त आयोजित समारंभास पं. भीमसेन जोशी, कुमार गंधर्व व पु. ल. देशपांडे अशा संगीत साहित्य क्षेत्रातील प्रभृतींनी आपली उपस्थिती लावली होती. के. जी. गिंडे १३ जुलै १९९४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ

    जिंताओ यांनी १९९८ ते २००३ या काळात चीनचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर २००२ साली चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या महासचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

  • अभिनेत्री मर्लिन मन्रो

    अमेरिकी सौंदर्यवती अभिनेत्री मर्लिन मन्रो हिचा जन्म १ जून १९२६ रोजी लॉसएंजल्स येथे झाला. जन्मजात नोर्मा जीन नाव असलेल्या मर्लिन मन्रोचे बालपण फारसे आनंददायी नव्हते. तिला अनाथाश्रमात राहावे लागले होते. त्यानंतर वेगवेगळ्या अकरा पालकांनी तिचा सांभाळ केला.

    खास वळण असलेले केस ही मर्लिनची सर्वात मोठी ओळख होती. १९५० च्या दशकामध्ये तर जगभरात तिच्या या केसांच्या स्टाइलची एक फॅशनच सुरू झाली होती.

    हॉलिवूड अभिनेत्री म्हणून तिने त्यावेळी सेक्स सिंबॉलच्या रूपात ओळख निर्माण केली होती. १९५३ मध्ये आलेला मेलोड्रामा चित्रपट 'नियाग्रा' मध्येम तिने केलेले अभिनय आजही लोकांच्या आठवणीत आहे. मन्रोचे मादक डोळे आणि सोनेरी केस यामुळे तिच्या सौंदर्यात आणखीच भर पडायची. १९५५ मध्येच आलेला 'द सेव्हन ईयर इच' या चित्रपटामध्येल तिने केलेली मुलीची भूमिका विशेष गाजली. १९९९ मध्ये अमेरिकन फिल्म इन्स्टीचट्यूटने मन्रोला जगातील सर्वात महान अभिनेत्री म्हणून घोषित केले.

    १९५३ मध्ये एका अनोळखी मासिकाचे संपादक ह्युज हेफनर यांना मर्लिनचा एक न्यूड फोटो मिळाला. मर्लिनने १९४९ मध्ये ते फोटोशूट केले होते. त्यांनी ५०० डॉलर मोजून एक फोटो खरेदी केला आणि तो त्यांच्या नव्या प्लेबॉय (Playboy) मासिकात छापला. त्यामुळे मर्लिन प्लेबॉय या मासिकाची पहिली मॉडेल ठरली. या फोटोशूटसाठी तिला फक्त ५० डॉलर इतकाच मोबदला मिळाला होता.

    मर्लिनचा द सेव्हन इअर इच हा चित्रपट व तिचा या चित्रपटातील प्रसिद्ध सीन पाहिलेला मागील पिढीतील व्यक्ती विरळाच. हवेने उडणारा मर्लिनचा ड्रेस आणि तो सावरण्याचा तिचा प्रयत्न आणि त्यातच तिच्या चेहऱ्यावरील दिलखेचक अदा याने गेल्या काही पिढ्यांना अक्षरशः वेड लावले आहे. अनेक चित्रपटांमध्ये मन्रोचे हवेत उडत असलेले स्कर्टचे दृश्यय कैद करण्याःसाठी जगभरातून प्रयत्न झाला. पण तिच्यासारखी अदा दाखवण्या त सर्व सिनेतारिका फिक्या पडल्या. मर्लिनचा हा ड्रेस २०११ साली ५० लाख डॉलरमध्ये लिलावात विकला गेला होता.

    चॅनेल पाच या फ्रेंच परफ्युमची मर्लिनने मोफत प्रसिद्धी केली होती. एका मुलाखतीत तिला, तुम्ही झोपताना काय परिधान करते असे विचारले होते. त्यावेळी तिने अत्यंत खळबळजनक उत्तर दिले होते. केवळ चॅनेल नंबर पाच चे पाच थेंब असे उत्तर तिने दिले होते. म्हणजेच तिने न्यू़ड (विवस्त्र) झोपत असल्याचेही मान्य केले होते. तिची मुलाखत चांगलीच गाजली होती. वर्षभरानंतर मर्लिनने एका परफ्युमसाठी न्यूड फोटोशूटही केले होते.

    मर्लिनच्या चेहऱ्यावर असलेल्या ब्युटी मार्कबाबतही तो खरा होता की कृत्रिम अशा अनेक चर्चा आहेत. पण तसे असले तरी पोलका ड्रेसमधील मर्लिनचे रूप हे पुढील अनेक दशकांपर्यंत सौदर्याचे मूर्तिमंद उदाहरण ठरले. तिच्या ब्युटीमार्कची एवढी क्रेझ होती की अनेक दशकांपर्यंत मुली अशा प्रकारे ब्युटीमार्क चेहऱ्यावर गोंदून घेऊ लागल्या. त्याला तेव्हा मर्लिन्स मोल म्हटले जायचे.

    १९६२ साली मर्लिनने मेडिसन स्क्वेअर गार्डन येथे अमेरिकेचे प्रेसिडेंट जॉन एफ केनडी यांच्या वाढदिवसानिमित्त हॅपी बर्थडे गाणे गायले. त्यावेळी ती “Happy Birthday, Mr. President” असे म्हणाली होती. तेव्हापासून केनडी यांच्या नावाआधी मिस्टर प्रेसिडेंट लावले जाऊ लागले. आजही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना मिस्टर प्रेसिडेंट म्हटले जाते. यानंतर केनडी यांनी स्वतः मर्लिनचे आभार मानले होते.
    मर्लिनने प्लास्टीक सर्जरी केली होतो. यासंदर्भातील वैद्यकीय कागदपत्रे २५६०० डॉलरमध्ये विकली गेली होती. त्यात तिने हनुवटी आणि नाकावर शस्त्रक्रिया केल्याचा उल्लेख होता.

    आरसपाणी सौदर्यासाठी अत्यंत कमी कालावधीत जगप्रसिद्ध अजालेल्या मर्लिन मनरो हिचे खासगी आयुष्य तेवढेच वादग्रस्त होते. तिने तीन विवाह केले होते. तिचे दोन पती तिच्याप्रमाणेच प्रसिद्ध होते. प्रसिद्ध बेसबॉलपटू जो डीमॅगिओ आणि आर्थर मिलर. तिचा डीमॅगिओबरोबर १९५४ मध्ये घटस्फोट झाला. त्याचवर्षी तीने मिलरशी विवाह केला. पाच वर्षे त्यांचे नाते टिकले. त्यानंतर पुन्ही तिचे आणि डीमॅगिओ यांच्यात नाते जुळल्याचे म्हटले जात होते.

    तिचे गाजलेले चित्रपट म्हणजे नायगारा, जेंटलमन प्रेफर्स ब्लाँडेज, रिव्हर ऑफ नो रिटर्न, द सेव्हन इयर एच, सम लाइक इट हॉट. मर्लिन मन्रो यांचे निधन ५ ऑगस्ट १९६२ साली झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • गायक रवींद्र साठे

    स्पष्ट शब्दोच्चार,खर्जातील घनगंभीर स्वर,आणि भावपूर्ण गायन ही रवींद्र साठे यांची खासीयत. त्यांचा जन्म ७ फेब्रुवारी १९५१ रोजी झाला.

    रविंन्द्र साठे यांचे श्री. मुकुंदराव गोखले यांच्याकडे रीतसर शास्त्रीय गायनाचे शिक्षण झाले.बालकलाकार म्हणून त्यांचे कार्यक्रम होऊ लागले.पण महाविद्यालयात गेल्यावर त्यांच्या या शिक्षणात खंड पडला.त्याच वेळी सुगम संगीत स्पर्धेत त्यांना प्रथम पारितोषिक मिळाले.आणि ते पुन्हा गाण्याकडे वळले.पंडित नागेश खलीकर यांच्याकडे त्यांची गानसाधना सुरु झाली.पदवीनंतर त्यांनी पुण्याच्या एफ.टी.आय मध्ये '' साऊंड रेकॉर्डडिस्ट ''चा कोर्स पूर्ण केला.त्यानंतर दूरदर्शनवर म्हणून नोकरी केली.तेव्हा दूरदर्शनवर आरोही,शब्दांच्या पलीकडले,अमृताची फळे असे दर्जेदार कार्यक्रम सादर होत असत.येथेच स्वरांचे संस्कार त्यांच्यावर घडले.सुधीर फडके आणि गजानन वाटवे यांना ते ''शब्दोच्चरतिल आदर्श'' मानतात.

    रवींद्र साठे हे नाव सुपरिचित झाले ते ''घाशीराम कोतवाल''या नाटकातील त्यांच्या गायक नटाच्या भूमिकेमुळे .त्यांच्या या भूमिकेबद्दल सी.रामचंद्र,कुमार गंधर्व,वसंतराव देशपांडे अश्या मान्यवरांकडून त्यांना दाद मिळाली. मधुकर गोळवलकर,सी.रामचंद्र,राम कदम,आनंद मोडक,हृदयनाथ मंगेशकर, श्रीधर फडके अशा नामवंत संगीतकारांबरोबर त्यांनी काम केले आहे.''ओंजळीत स्वर तुझेच''हा त्याचा आनंद मोडक यांनी स्वरबद्ध केलेला अल्बम रसिकांनी खूप नावाजला आहे.

    सामना,जैत रे जैत,एक होता विदुषक अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले.''पिक करपल'' हे पुरस्कार विजेते गीत तसेच कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे,वाट चालतो सारे यासारखी त्यांची अनेक गीते लोकप्रिय आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट/ मानसी पटवर्धन

  • २२ जून १८९७…. गोंद्या आला रे…

    २२ जून १८९७. पुण्यात प्लेगची साथ सुरु असताना घराघरात घुसून आमच्या आया बहिणींच्या इभ्रतीवर हात टाकणाऱ्या रँड नावाच्या नराधमाचा चाफेकर बंधूनी वध करुन त्याला यमसदनी धाडले होते.

  • सशक्त नायिकाप्रधान भुमिका करणाऱ्या माला सिन्हा

    ६० आणि ७० च्या दशकांत आपल्या सौंदर्य आणि अभिनय कौशल्याच्या बळावर आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारी अभिनेत्री माला सिन्हा यांचा आव्हानात्मक, वैविध्यपुर्ण व चाकोरीबाह्य भुमिका स्वीकारण्याकडे नेहमी कल होता. अभिनेता, दिग्दर्शक गुरुदत्त यांच्या प्यासा या चित्रपटात अभिनय करण्याची त्यांना संधी मिळाली. प्रियकाराला नाकारुन एका श्रीमंत व्यक्तीशी लग्न करणार्‍या तरुणीच्या या भुमिकेसाठी आधी मधुबालाचे नांव गृहित धरण्यात येत होते. माला सिन्हाने या भुमिकेला योग्य तो न्याय दिला व हा चित्रपटच तिच्या कारकिर्दीत एक मैलाचा दगड ठरला.

  • हिंदी सिनेमाचे ‘शोमॅन’ म्हणून ओळखले जाणारे राज कपूर

    राज कपूर यांचा जन्म १४ डिसेंबर १९२४ रोजी झाला. पेशावरहून मुंबईत वडिल पृथ्वीराज कपूरसोबत आलेल्या राजकपूर यांना पृथ्वीराजनी सल्ला दिला होता, की त्याने करिअरची सुरुवात खालच्या स्तरावरुन करावी, तरच तो वरिष्ट पातळी गाठू शकेल. वडिलांचा हा सल्ला मानत १७ वर्षीय राज कपूर यांनी 'रंजीत मुव्हीकॉम' आणि 'बॉम्बे टॉकीज' फिल्म प्रॉडक्शनमध्ये 'स्पॉट बॉय' म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्याकाळातील नामांकित दिग्दर्शक केदार शर्मा यांच्याकडे ते 'क्लॅप बॉय' म्हणून कामाला सुरुवात लागले. एका शॉटच्यावेळी राज कपूरने क्लॅप इतक्या जोरात मारली की नायक अभिनेत्याच्या दाढीचे केस त्यात अडकले आणि त्याची नकली दाढीच निघाली. यामुळे चिडलेल्या केदार शर्मा यांनी राज कपूरच्या श्रीमुखात लगावली. त्याच दिग्दर्शक केदार शर्मा यांनी पुढे जाऊन निलकमल या सिनेमाचा नायक म्हणून राज कपूरला घेतले.

    राज कपूरचे वडिल पृथ्वीरीज हे त्याकाळातील नामवंत रंगकर्मी आणि अभिनेता होते. राज कपूर यांना अभिनयाचा वारसा त्यांच्याकडूनच मिळाला. राज कपूर त्यांच्यासोबत नाटकात काम करीत असत. त्यांच्या अभिनयाची सुरुवात तेथूनच झाली होती. राज कपूर यांचे पूर्ण नाव 'रणबीर राज कपूर' असे होते. 'रणबीर' हे आता त्यांचा नातवाचे म्हणजेच ऋषि - नितू कपूर यांच्या मुलाचे नाव आहे.

    राज कपूर लहानपणी पांढरी साडी नेसलेल्या एका स्त्रीवर मोहित झाले होते. त्यानंतर त्यांचे पांढऱ्यासाडीचे आकर्षण कधीच कमी झाले नाही. त्यांनी आपल्या अनेक अभिनेत्रींना (नर्गिस, पद्मिनी, वैजयंतीमाला, झीनत अमान, पद्मिनी कोल्हापुरे, मंदाकिनी) पांढऱ्या साड्या नेसायला भाग पाडले. इतकेच नाही तर त्याच्या घरी पत्नी कृष्णा नेहमी पांढरी साडी नेसायच्या. राज कपूर यांच्या गाजलेल्या सिनेमामध्ये मेरा नाम जोकर', 'श्री ४२०','आवारा', 'बेवफा', 'आशियाना', 'अंर', 'अनहोनी', 'पापी', 'आह', 'धुन', 'बूट पॉलिश' इत्यादीचा समावेश होतो. भारत सरकारने त्यांना १९७१ साली हिंदी सिनेमातील त्यांच्या योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. १९८७ साली त्यांना हिंदी सिनेमातील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला होता. याशिवाय त्यांना १९६० मध्ये 'अनाडी' आणि १९६२ मध्ये 'जिस देश में गंगा बहती है' या सिनेमांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा 'फिल्म फेय़र' पुरस्कार मिळाला होता. १९६५ मध्ये 'संगम,' १९७० मध्ये 'मेरा नाम जोकर' आणि १९८३ मध्ये 'प्रेम रोग' या सिनेमांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठीचा फिल्म 'फेय़र पुरस्कार' मिळाला होता. भारतीय सिनेमातील राज कपूर यांचे योगदान केवळ त्यांच्यापुरते मर्यादित नाही. त्यांच्या चार पिढ्यांनी हा वारसा कायम राखला आहे. कपूर परिवारात दादासाहेब फाळके पुरस्कार दोनदा आला. राज कपूर यांच्यासह हा पुरस्कार पृथ्वीरीज कपूर यांना १९७२ मध्ये मिळाला होता. त्यांनी ‘बरसात’, ‘आवारा’, ‘श्री ४२०’, ‘संगम’, ‘मेरा नाम जोकर’, ‘बॉबी’, ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘प्रेमरोग’, ‘राम तेरी गंगा मैली’ यांचे दिग्दर्शन केले होते. त्यांना पद्मभूषण पुरस्कार, चित्रपटसृष्टीत मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार , फिल्म फेअर या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. मा. राज कपूर यांचे २ जून १९८८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • शाहीर पिराजी रामजी सरनाईक

    पोलीस कचेरीतील कारकुनाची नोकरी १९५० मध्ये सोडून देऊन पिराजीरावांनी पूर्ण वेळ शाहिरीला वाहून घेतले. छ. शहाजी महाराजांनी त्यांना ‘शाहीर विशारद’ हा किताब व तहहयात मानधन दिले.

  • नारायण श्रीपाद राजहंस, ऊर्फ बालगंधर्व

    बालगंधर्व या नावाने अधिक लोकप्रिय असलेले विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील अभिनेते, गायक आणि नाट्यनिर्माते. त्यांचा जन्म २६ जून १८८८ रोजी झाला.रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करीत नसतानाच्या काळात आपल्या हुबेहुब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली. नाट्यगीतांसह ख्याल, ठुमरी, गझल, दादरा, भक्तिगीते यांसारख्या गायन प्रकारांवरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. बालगंधर्व भास्करबुवा बखले यांचे शिष्य आणि मास्तर कृष्णरावांचे गुरुबंधू होत. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांचे गाणे ऐकून बाळ गंगाधर टिळकांनी त्यांना बालगंधर्व ही पदवी बहाल केली. पुढे ते त्याच नावाने लोकप्रिय झाले. बालगंधर्वानी आपल्या भूमिका साकारनाच संगीत नाटक आणि नाट्यसंगीत हे कलाप्रकार मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबांमध्ये लोकप्रिय केले. नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर, गोविंद बल्लाळ देवल, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, काकासाहेब खाडिलकर, राम गणेश गडकरी आणि वसंत शांताराम देसाई प्रभृतींनी लिहीलेली अनेक संगीत नाटके बालगंधर्वांनी केली. बालगंधर्वांनी कंपनीतील सर्वांना चांदीच्या थाळीतून वरण-भात तूप आणि पक्वान्नं खाऊ घातली, त्यांनाच आंधळ्या प्रेमापोटी जर्मनच्या थाळीतून जेमतेम अर्धी भाकरी अन्‌ मूठभर भात खाण्याची वेळ यावी, यापरता दैवदुर्विलास कोणता? मोत्यांचा चारा खाऊन जगणाऱ्या "राजहंसा‘वर अशी वेळ आली, ती निव्वळ अव्यवहारीपणा, आंधळं प्रेम अन्‌ व्यक्तिगत अवगुणांमुळं, असं आचार्य प्र. के. अत्रे, गंधर्व कंपनीतील हीरो-कृष्णराव चोणकर आणि विनायकराव पटवर्धन-यांनी लिहून ठेवलंय...अन्‌ तरीही अनुपम सौंदर्य अन्‌ स्वर्गीय गाणं यामुळं "असा बालगंधर्व आता न होणे‘ हे शब्द सार्थच ठरतात!
    बालगंधर्व हे महाराष्ट्राला पडलेलं देखणं, सुरेल स्वप्न होतं. महाराष्ट्राचे महाकवी ग. दि. माडगूळकर यांनी त्यांचं यथार्थ वर्णन केलंय...
    जशा जन्मती तेज घेऊन तारा । जसा मोर घेऊन येतो पिसारा ।
    तसा येइ कंठात घेऊन गाणे ।
    असा बालगंधर्व आता न होणे ।।
    रतीचे जया रूपलावण्य लाभे ।
    कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे ।
    सुधेसारखा साद; स्वर्गीय गाणे।
    असा बालगंधर्व आता न होणे ।।
    अनुपम सौंदर्य अन्‌ स्वर्गीय गाणं यामुळं "असा बालगंधर्व आता न होणे‘ हे शब्द सार्थच ठरतात!
    ‘गंधर्व’ या शब्दात काहीतरी विलक्षण जादू असलीच पाहिजे. कारण या शब्दावर आधारून जितक्या पदव्या दिल्या गेल्या किंवा घेतल्या गेल्या तितक्या दुसर्याल कोणत्याही शब्दाच्या वाट्याला आल्या नाहीत. बालगंधर्व, भूगंधर्व, सवाई गंधर्व, महाराष्ट्र गंधर्व, कुमार गंधर्व, छोटा गंधर्व, नूतन गंधर्व, हिंद गंधर्व, आनंद गंधर्व, भावगंधर्वपासून अक्षरशः डिट्टो गंधर्वपर्यंत गंधर्वांची एक मांदियाळीच महाराष्ट्रात तयार झाली. यांपैकी बर्याधच जणांनी आपल्या कर्तृत्वाने ती पदवी सार्थ करून दाखवली आणि काहीजणांनी आपल्या अतिहुशारीमुळे त्या पदवीलाच लाजविले. नारायण श्रीपादराव राजहंस या माणसाने मात्र ‘बालगंधर्व’ ही आपणाला मिळालेली पदवी अजरामर केली. बरं, ही पदवी बहाल करणारा माणूस तरी लेचापेचा होता? अजिबात नाही. १८९८ साली नारायण राजहंस या छोट्या मुलाचं गाणं ऐकून ‘अरे, हा तर साक्षात बालगंधर्व आहे!’ असे उद्गार काढणारी ती व्यक्ती कोण असेल? भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे अध्वर्यू, असंतोषाचे जनक, प्रख्यात प्रकांड पंडित, भगवद्गीतेचे भाष्यकार, ज्योतिर्विद्येचे जाणकार आणि वैदिक गणितज्ज्ञ- साक्षात लोकमान्य टिळक!
    या घटनेचं वर्णन करताना गदिमांनी लिहिलंय-
    त्याच संधिला कुणा अनामिक रसिकाची हौस
    टिळकांपुढती ठेवि बोलका कुणी राजहंस
    राजहंस तो नेत्यासन्मुख गीत मनोहर म्हणे

    देवदत्त तो साद मनोहर ऐकूनिया कानी
    बाल गायका अमोल पदवी दिली टिळकांनी
    शिरोधार्य ते दान मानिले इवल्या नारायणें
    तो तोच बालगंधर्व
    जाणिती सर्व
    वाढला पुढती
    यशसिद्धी राहिली त्याची सदोदित चढती
    वाढला बालगंधर्व युगंधर झाला
    वर्षाव प्रीतीचा रसिकजनांनी केला
    सन्मान असा ना मिळतो सम्राटाला
    मंत्रमुग्ध जन होत राहिले त्यांच्या मधुगायनें…
    साक्षात सम्राटालाही मिळत नाही असा मान बालगंधर्वांना मिळाला. जवळपास पन्नास वर्षे रसिकमनावर त्यांनी अधिराज्य केले. आवाजाच्या जोरावर ते संगीतातील विलक्षण जादूगार झाले. ज्याप्रमाणे त्यांचे रूप मोहक होते त्याचप्रमाणे त्यांचा आवाजही मोहिनी घालणारा होता. अत्यंत मधुर, झार असलेला स्वयंप्रकाशी असा तो आवाज होता. त्यांच्या आवाजाच्या झारेला इंद्रधनुष्यातील विविध रंगांच्या छटांची उपमा एका मर्मज्ञ रसिकाने दिली होती व ती सार्थही होती. इतर कलावंत गायकांप्रमाणे जरी त्यांच्या गायनात पुष्कळ तर्हाआ नसल्या तरी त्यांचे साधेसुधे गोड गाणे आल्हाददायक बनू शकले ते या कंठमाधुर्याच्या देणगीवरच! हा आवाज प्रत्यक्ष ऐकण्यासाठी लोक शेकडो मैलांवरून धावत येत; तारेने थिएटरमध्ये जागा रिझर्व्ह केल्या जात; स्पेशल मोटारी सोडल्या जात. एवढेच नव्हे तर नाटकाच्या तिसर्याम अंकापर्यंत तिकिटं मिळवण्याची लोक खटपट व धडपड करीत. असं काय बालगंधर्वांमध्ये होतं की त्यांना पाहायला, ऐकायला लोक एवढे वेडावले होते? ही सर्व किमया बालगंधर्वांच्या जादुई आवाजाची होती! ऑर्गन व सारंगीवर त्यांनी आपला आवाज मिळवला की त्या तीन सुंदर स्वरांच्या मिलाफाने श्रोत्यांच्या कानांचे समाधान होऊन अंगावर रोमांच उभे राहत. रंगमंदिरात विलक्षण शांतता प्रस्थापित होई. १९८८ साली भारत सरकारने बालगंधर्व यांचे पोस्टाचे तिकीट त्यांच्या स्मृती निमीत्त छापले होते. बालगंधर्व यांचे १५ जुलै १९६७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट/ विष्णू सूर्या वाघ