तबस्सुम या जरी अभिनेत्री म्हणून आपण ओळखत असलो तरी त्या दूरदर्शन वरून १९७२ ते १९९३ सादर झालेल्या फूल खिले हैं गुलशन गुलशन या कार्यक्रमामुळे घराघरात पोहचल्या.
श्रीकांत ठाकरे, एक असं नाव ज्यामुळे मराठी संगीत सृष्टीला नव्या ढंगाची ताज्या दमाची आणि उ़डत्या चालीचा आविष्कार प्राप्त झाला; मा.श्रीकांत ठाकरे यांची ओळख महाराष्ट्राला संगीतकार म्हणून तर होतेच; पण ते स्वत: उत्तम व्यंगचित्रकार, लेखक, समीक्षक, पत्रकार आणि आयुर्वेदाचे अभ्यासक देखील होते,ठाकरे कुटुंबीय म्हणजे कलेच्या प्रांगणात रममाण असणारे, सामाजिक बांधिलकीचा ध्यास घेतलेले आणि सृजनशील; अर्थात हे संस्कार प्रबोधनकार मा.ठाकरे यांनी आपल्या प्रत्येक आपत्यांवर केले.
संगीतकार म्हणून श्रीकांत ठाकरे व्हॉयोलीन वादनात निपुण होते, सतत वेगवेगळ्या संगीताच्या चाली त्यांच्या मनात रुंजी घालत आणि यामुळे सुरेल गाण्यांची निर्मिती त्यांच्या हातून झाली.
ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी यांना मराठी गाण्यांची संधी श्रीकांत ठाकरे यांच्यामुळेच मिळाली. मा.श्रीकांत ठाकरे संगीतबद्ध केलेली अनेक गाणी लोकप्रिय आहेत यामध्ये “अगं पोरी सवाल दर्याला तुफान”, “नको आरती की नको पुष्पमाला”, “तुझे रुप सखे गुलजार”, “प्रभू तू दयाळू”, “शोधीसी मानवा राऊळी मंदिरी” सारखी अवीट भक्ती, भाव आणि कोळी गीतांचा समावेश, मराठी संगीत विश्वात मा.श्रीकांत ठाकरे आणि मा.मोहम्मद रफी ही संगीत-गायक जोडगोळी म्हणजे “कानसेनांसाठी” पर्वणीच आहेत; तसंच “गझल” हा गाण्यांचा प्रकार मा.श्रीकांत ठाकरे यांच्या मुळे मराठीत रुजला. उत्तरा केळकर, सुरेश वाडकर, शोभा गुर्टू, पुष्पा पागधरे सारख्या गायकांनी मा.श्रीकांत ठाकरे यांच्या संगीताची सुरेलता वाढवली; “शूरा मी वंदिले”, “सवाई हवालदार”, “महानदीच्या तीरावर” सारख्या चित्रपटांची निर्मिती देखील श्रीकांत ठाकरे यांनी केली.
संगीत क्षेत्राच्या व्यतिरिक्त पत्रकारिता आणि चित्रपट संबंधी लेखन श्रीकांतजींनी केलं, यामध्ये नवीन चित्रपटांची समीक्षा असेल किंवा वैविध्यपूर्ण लेखन, त्यामध्येखास “ठाकरे टच” असायचा “परखड”, “सत्यता” आणि “वैचारिक” पैलू त्यांच्या लिखाणाच्या माध्यमातून मांडलेले दिसत;“मार्मिक” या मासिकात ६० व ७० च्या दशकात “शुद्ध निषाद” या नावाने “सिनेमाची समीक्षा” करणारे सदर लोकप्रिय ठरले.
श्रीकांत ठाकरे यांच्या व्यक्तीत्वाचे पैलू आणि चरित्र पट “जसे घडले तसे” या आत्मचरित्राच्या माध्यमातून वाचक आणि रसिकांना वाचायला मिळाला. श्रीकांत ठाकरे यांचे १० डिसेंबर २००३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट / सागर मालाडकर
इ.स. १९०८ साली त्यांनी ‘कुंजविहारी’ हे पहिले नाटक लिहिले. परंतु त्यांचे गाजलेले पहिले नाटक रंगभूमीवर ७ सप्टेंबर १९१८ रोजी आलेले ‘ हाच मुलाचा बाप ‘ हे नाटक होय. नाट्यलेखनात वरेरकर रमत गेल्यावर त्यांनी टपाल खात्यातील नोकरी सोडून दिली आणि लेखनावरच लक्ष एकवटले.
अगाथा ख्रिस्तीच्या कथा-कादंबऱ्यांतील रहस्याची उकल जशी शेवटपर्यंत होत नसे, तसेच त्यांच्यातील खुनाचे तपशील विलक्षण जिवंत, वास्तवाधिष्ठित असत. हाणामारी वा पिस्तुलबाजी टाळून, तिच्या कादंबऱ्यांतील अनेक मृत्यू विषप्रयोगाने होत. १९६१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या तिच्या ‘पेल हॉर्स’मध्ये खून ‘थेलियम’ या विषाद्वारे झाल्याचे दाखविण्यात आले होते.
अजय देवगणचे खरे नाव विशाल देवगण. अजय देवगणचे शिक्षण मुंबईत मिठीबाई कॉलेज मध्ये झाले. त्याचा जन्म २ एप्रिल १९६९ रोजी झाला.
अजय देवगण हा एक असा कलाकार आहे, ज्याने कोणाचीही मदत न घेता बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. अजयचे वडील विरु देवगण यांचे नाव बॉलिवूडमध्ये यशस्वी स्टंट डायरेक्टर म्हणून घेतले जाते. या व्यतिरिक्त अजयची आई वीना देवगण यांनी एक चित्रपट प्रोड्यूस केला आहे. भाऊ अनिल देवगण यांनी एक चित्रपट दिग्दर्शित केला आहे.
अजयने जेव्हा चित्रपटात काम करण्याची इच्छा वडिलांजवळ व्यक्त केली, तेव्हा ते अजयला महेश भट्टकडे घेऊन गेले. अजयच्या डोळ्यांकडे पाहून महेश भट्ट म्हणाले, याचे डोळे बोलतात आणि यामध्ये बरेच काही लपलेले आहे. फूल और काटे' या चित्रपटातून त्याने आपले करियर सुरू केले आणि बर्याचच चित्रपटात उल्लेखनीय अभिनय केला.
अजय देवगणने काजोलसोबत विवाह केला आहे. चित्रपट इंडस्ट्रीत येउन अजयला २२ पेक्षा जास्त वर्ष झाली असून, दिवसेंदिवस त्याची लोकप्रियता वाढत आहे. अजयचे आवडते कलाकार दिलीप कुमार असून त्यांच्यासोबत एकदा काम करण्याची अजयची इच्छा आहे. दिलजले ते अगदी गोलमालपर्यंत हटके सिनेमांमधून त्याने काम केलं आहे. "सिंघम' मुळे अजय देवगणचे मार्केट वाढले. आता माझी सटकली ही अजयचा मराठी डायलॉग खूप हिट झाला. सोलर एनर्जीच्या कंपनीचे काम, हॉटेल व्यवसाय, चित्रपटांचे वितरण असे अनेक अजय देवगणचे व्यवसाय आहेत. ओंकारा, द लीजेंड ऑफ भगतसिंग, हम दिल दे चुके सनम, जखम, दृष्यम, बोल बच्चन हे अजय देवगणचे काही चित्रपट.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मराठीत ‘उत्तरायण’, ‘एवढंसं आभाळ’, ‘नटरंग’, ‘बालक पालक’, ‘बाल गंधर्व’, ‘मुळशी पॅटर्न’ आदी चित्रपट महेश लिमये यांनी केले. सलमान खानच्या ‘दबंग’साठी ‘सिनेमॅटोग्राफर’ म्हणून महेश लिमये यांना खास बोलावून घेण्यात आले. हिंदीतील ‘बिग बजेट’ आणि ‘१५० कोटी’ क्लबमध्ये गेलेला एक मोठा चित्रपट त्यांच्या नावावर जमा झाला. पुढे त्यांनी ‘दबंग २’साठी ही काम केले. ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘कॉर्पोरेट’, ‘हीरोईन’, ‘दबंग’, ‘दबंग २’ हे त्यांचे हिंदीतील गाजलेले चित्रपट होत.
१९६३ मध्ये ओटन्स यांचा कॅसेट टेपचा शोध हे जगभरात एक मोठे यश होते. १९६३ मध्ये शोध लावल्या पासून १०० अब्जाहूनही अधिक कॅसेट विकल्या गेल्या आहेत. परंतु सीडीच्या उदयानंतर या कॅसेटचा वापर कमी झाला.
तो आणि त्याच्या मित्रांनी २००१ साली त्यांनी लॅरी सँगर आणि इतर ह्यांच्या सोबतीने विकिपीडियाची स्थापना केली. विकिपीडिया म्हणजे ओपन कन्टेन्ट एनसायक्लोपेडिया.
सात सक्कं त्रेचाळीस’, ‘रावण अँड एडी’, ‘ककल्ड’, ‘द एक्स्ट्राज’ आदी क्लासिक कादंबऱ्यांनी साहित्यप्रेमींच्या मनावर अधिराज्य निर्माण करणारे प्रसिद्ध साहित्यिक, कादंबरीकार, पटकथा लेखक, नाटककार किरण नगरकर यांचे संपूर्ण शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून झाले.
वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी गांधी हत्याकांडात त्यांचे घर जळाले अन् त्या ज्वाळा पाहून घरासमोरील झाडाखाली बसून त्यांना आयुष्यातली पहिली कविता ‘मानवते तु विधवा झालीस’ सुचली. त्यांचा जन्म १० मे १९३२ रोजी झाला.
Copyright © 2025 | Marathisrushti