हा संतकवि सातारा जिल्ह्यांतील कर्हाहड जवळील कोपरडें येथील रहाणारा. माध्यंदिनशाखी देशस्थ ब्राह्मण होय. याचें खरें नांव नरहरि असून बापाचें नांव नारायण व आईचें बहिणा होते. याचा जन्म सन १६७४ च्या अक्षय्य तृतीयेस झाला. याचें लग्न लवकर झालें होतें. या वेळीं महाराष्ट्रांत औरंगझेबाच्या स्वारीमुळें सर्वत्र धुमाकूळ माजला होता. त्यामुळें नरहरीला गांव सोडावा लागला. तो जोगाईच्या आंब्यास राहिला असतां तेथें आनंदसंप्रदायीं गोविंदाने त्याला शके १६१८ गोकुळ अष्टमीस उपदेश दिला.
मधुकरी मागत असतां “कृष्णदयार्णव” असें नरहरि सतत म्हणे. त्यावरून तेंच त्यांचें टोपण नांव रूढ झालें. तीर्थयात्रा करून आल्यावर व प्रथम कुटुंब वारल्यावर अग्निहोत्र घेतल्यामुळें यांनीं द्वितीय संबंध केला. परंतु तितक्यांत त्यांना महारोग झाला. त्यावर उपाय म्हणून भागवताच्या दशमस्कंधावर त्यांनीं प्राकृत टीका लिहिली. यावेळीं यांचें वय ५४ होतें. या ग्रंथास आधार श्रीधरी टीकेचा आहे. पूर्वार्धाचे ४९ अध्याय संपले व रोग नाहींसा झाला. उत्तरार्धाचे ३७ अध्याय संपविले व ३८ व्या अध्यायाचे २३ श्लोक झाले आणि स्वामी पैठण येथें समाधिस्त झाले (शके १६६२ मार्गशीर्ष). पुढील साडेतीन अध्याय यांचा शिष्य उत्तमश्लोक यानें लिहिले आहेत. एकंदर ग्रंथास १६ वर्षे लागलीं. हा ग्रंथ चांगला आहे. ओवी एकनाथाप्रमाणें आहे.
ज्ञानेश्वरीचीहि छाया ग्रंथावर पडलेली आहे. विद्वान लोक या “हरिवरदा” ग्रंथास फार मान देतात. यावरून कर्त्याची विद्वत्ता व बहुश्रुतपणा दिसून येतो. काव्याच्या दृष्टीनेंहि ग्रंथ चांगला वठला आहे. विस्ताराच्या मानानें हा ग्रंथ प्रचंड आहे. याची एकंदर ओवीसंख्या ४२ हजार आहे. स्वामींचा “तन्मयानंद” नांवाचा आणखी एक ग्रंथ व बरेचसे अभंग आणि पदें इतकी कृति सध्यां उपलब्ध आहे. संतकवि कृष्णदयार्णव यांचे १३ नोव्हेंबर १७४० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
संतकवि कृष्णदयार्णव हा संतकवि सातारा जिल्ह्यांतील कर्हाहड जवळील कोपरडें येथील रहाणारा. माध्यंदिनशाखी देशस्थ ब्राह्मण होय. याचें खरें नांव नरहरि असून बापाचें नांव नारायण व आईचें बहिणा होते.
पटकथा आणि संवादलेखन सलीमखान यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९३५ रोजी झाला. सलीम खान यांनी जरी फार कमी काळ या सिनेसृष्टीला दिला तरी त्यांच्या योगदानासाठी त्यांचे नाव नेहमीसाठी घेतले जाईल.
कितने आदमी थे” - शोले
“मेरे पास मां है”, - दिवार
“डॉन को पकडना मुश्कील हि नाही नामुमकीन है”... या सारखे संवाद सिनेसृष्टीत अजरामर झालेले आहेत. पण या संवादाचे लेखक शेवटपर्यंत एकत्र राहू शकले नाही ही मात्र सिनेसृष्टीसाठी शोकांकीता ठरली. आज ही अनेकांना वाटते सलीम-जावेद ही एकच व्यक्ती आहे, पण तसे नसून या ‘दोन व्यक्ती’ ‘सलीम खान’ आणि ‘जावेद अख्तर’ आहेत. ‘सलीमखान’ यांचे पूर्वज हे अफगाणिस्तान येथील ‘अल्कोझाई’ या कबिल्यातील आहेत. ते भारतातील इंदोर या शहरात वास्तव्यात आले. ‘सलीम खान’ आणि ‘ताराचंद बडजात्या’ हे शेजारी राहणारे आणि त्यांचे अगदी घरोब्याचे संबंध होते. ‘सलीम खान’ यांचा जन्म इंदोर येथे एका सुखवस्तू घराण्यात झाला होता.
लहानपणापासूनच ऐशोआरामाच्या सर्व गोष्टी त्यांच्या जवळ होत्या. अगदी कॉलेज मध्ये असताना त्यांना क्रिकेटचा पण खूप शौक होता. त्यांचे व्यक्तिमत्व पण एखाद्या नायकापेक्षा काही कमी नव्हते. तसे बघितले तर त्यांचा अभिनयाशी काही एक संभंध नव्हता पण तरीही ते अभिनयाकडे ओढले गेले. अशाच एकावेळी ताराचंद बडजात्या यांच्या कडील एका विवाहाप्रसंगी इंदोर येथे मुंबईतून आलेल्या सिनेसृष्टीतील काही निर्मात्यांसोबत परिचय झाला, त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाला भाळून प्रसिद्ध दिग्दर्शक ‘के अमरनाथ’ यांनी सलीम खान यांना मुंबईत चित्रपटात काम करण्यासाठी आमंत्रित केले. त्याकाळात त्यांनी चारशे रु महिना मानधन पण देऊ केले तेव्हा काहीसे अचंबित झालेले ‘सलीम खान’ त्यासाठी तयार झाले. जेव्हा स्टेशन वर आले तर तेव्हा त्यांच्या भावाने म्हंटले कि मुंबईत तर तू चालला आहेस पण कधीही घरी निरोप देऊ नको कि मला पैसे पाठवा आणि मी परत येतो. तेव्हाच त्यांचा निर्णय पक्का झाला कि आता तर काही नक्कीच करून दाखवावे लागेल.
कसेबसे मुंबईत राहून त्यांनी अभिनयाचा निवडलेला मार्ग काही जम बसू देत नव्हता. तब्बल सात वर्ष अभिनय करून सुद्धा हवे तसे यश येत नव्हते. या दरम्यान त्यांनी ‘तिसरी मंझील’, ‘सरहद्दी लुटेरा’ आणि ‘दिवाना’ मध्ये काम केले होते. साठ चे दशक संपत चालले होते पण यश पदरात येत नव्हते आणि अपयशाचे शिखर समोर दिसत होते त्यावेळेस त्यांनी संवाद लेखक म्हणून काम करायचे ठरविले, तेव्हा त्यांनी स्वप्नातही असा विचार केला नव्हता कि आपली जोडी ही ‘जावेद अख्तर’ नावाच्या इसमासोबत होईल आणि हे नाव इतिहासात अजरामर होईल. सलीम-जावेद यांनी जवळपास बारा वर्ष एकत्र काम केले या दरम्यान त्यांनी २८ चित्रपटांसाठी पटकथा आणि संवादलेखन केले त्यापैकी वीस चित्रपट सुपरहिट झाले होते. ‘यादो कि बारात’, ‘जंजीर’, ‘क्रांती’, ‘हाथ कि सफाई’, ‘दिवार’, ‘शोले’ आणि ‘मि. इंडिया’ सारखे हिट चित्रपट दिलेत.
या दरम्यान त्यांनी केवळ आपले करियर विकसित केले नाही तर त्यांनी पटकथा लेखक यांनी सुद्धा मानाचे स्थान दिले. त्याआधी पटकथा लेखक यांचे नाव पोस्टर वर कधीच झळकत नव्हते. पण सलीम जावेद यांच्यामुळेच संवाद आणि पटकथा लेखक यांना मानाचे स्थान मिळाले. १९८२ साली ही जोडी वेगळी झाली तेव्हा हे स्पष्ट झाले कि ‘सलीम खान’ हे तयार नव्हते पण ‘जावेद अख्तर’ यांच्या मनात काही वेगळेच होते. जोडी तुटल्यानंतर सलीम खान यांचे मन या करियर मधून पूर्ण उतरून गेले आणि त्यांनी जवळपास याला रामराम ठोकला होता. पण त्यानन्तर त्यांना अनेक प्रश्न विचारल्या गेलेत, त्या प्रश्नांना उत्तर देणे तर भागच होते. मग त्यांनी एक जबरदस्त स्क्रीप्ट तयार केली आणि तो चित्रपट आला, केवळ एकट्या सलीम खान ने पटकथा लिहिलेला “नाम”. ‘संजय दत्त’ आणि ‘कुमार गौरव’ यांनी अभिनित केलेला हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.
सलीम खान यांनी एका ‘मराठी राजपूत’ महिलेसोबत विवाह केला त्यांचे नाव होते ‘सुशीला चरक’. लग्नानंतर त्यांनी हे बदलवून ‘सलमा खान’ असे ठेवले. सलमान खान या दोघांचा मुलगा. सलीम खान स्वतः मुस्लीम असताना सुद्धा त्यांनी घरातील वातावरण अगदी मोकळे ठेवले म्हणूनच त्याच्या घरात आजही गुढी पाडवा, गणेशउत्सव आणि दिवाळीचा सण धुमधडाक्यात होतो. ८० च्या दरम्यान प्रसिद्धी तर मिळाली होती पण त्याच दरम्यान त्यांचे त्याकाळची प्रसिद्ध नर्तिका ‘हेलेन’ वर प्रेम बसले. त्यावेळच खूप गाजावाजा झाला पण असे ठरले होते कि जर सलमा खान यांची अनुमती असेल तरच हे लग्न होणार त्यामुळे काहीशा तणावानंतर या लग्नाला ‘सुशीला चरक’ यांनी अनुमती दिली. आजही या दोघी एकाच घरात सुखाने राहतात.
हेलेन यांना कोणतीही संतती नसल्यामुळे त्यांनी एक कन्या दत्तक घेतली, आणि ती त्या परिवारातील लाडकी कन्या ठरली. तिचे नाव ‘अर्पिता खान’ ठेवल्या गेले. तिचे अर्पिता हे नाव कुणी आणि कसे ठेवले, याविषयी फार कमी जणांना ठाऊक आहे. सलमानच्या या लाडक्या बहिणीचे 'अर्पिता' हे नाव प्रसिद्ध व्यंगचित्रकार शरद जोशी यांनी ठेवले आहे. अर्पिताला सलमानचे वडील सलीम खान यांनी १९८१ मध्ये दत्तक घेतले होते. त्यावेळी सलीम खान यांच्यासोबत इंदूर येथील होळकर कॉलेजमधील त्यांचे मित्र शरद जोशी हजर होते. तेव्हा सलीम यांनी शरद जोशींकडे आपल्या मुलीचे नाव ठेवण्याची विनंती केली. शरद जोशी यांनी सलीम खान यांना म्हटले की, ही मुलगी तुम्हाला अर्पित झाली आहे, त्यामुळे हिचे नाव 'अर्पिता' ठेवायला पाहिजे. अशाप्रकारे ही अनाथ मुलगी सलीम खान यांची मुलगी 'अर्पिता खान' झाली.
एक पिता म्हुणुन त्यांनी जसे आपले कुटुंब जोपासले तसे ते एक चांगले व्यक्तित्व म्हणून पण समोर आले. जास्त प्रसिद्धीचा हव्यास न करता आपले कार्य प्रामाणिकपणे करीत असताना त्यांनी खऱ्या अर्थाने या देशाचे जेष्ठ आणि सेकुलर व्यक्तीची प्रतीमा कायम राखली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ शशांक गिरडकर
स्टीफन हॉकिंग यांचे वडील डॉ.फ्रँक हॉकिंग जीवशास्त्राचे संशोधक होते. त्यांचा जन्म ८ जानेवारी १९४२ रोजी ऑक्सफर्ड इंग्लंड येथे झाला. स्टीफन यांच्या जन्माच्या वेळी, डॉ.फ्रँक आणि इसाबेल या दांपत्त्याने उत्तर लंडनहून ऑक्सफर्डला स्थलांतर केले, कारण त्यावेळी दुसरे महायुद्ध चालु होते. स्टीफन यांच्या जन्मानंतर हॉकिंग कुटुंबाने परत लंडनला स्थलांतर केले, कारण त्यांचे वडील नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ मेडिसीनमध्ये पार्सिटॉलॉजी विभागाचे प्रमुख झाले होते. १९५० मध्ये हॉकिंग कुटुंबाने सेंट अल्बान्स येथे स्थलांतर केले. येथेच १९५० ते १९५३ अशी तीन वर्षे त्यांचे शिक्षण "सेंन्ट अल्बान्स स्कूल फोर गर्ल्स" या शाळेत झाले. त्याकाळी गर्ल्स स्कूलमध्ये मुलांनाही प्रवेश मिळे. स्टीफन लहानपणापासून एकपाठी होते. त्यांना संगीत, गणित आणि भौतिकशास्त्राची आवड विद्यार्थीदशेपासूनच होती.
हॉकिंग यांना पहिल्यापासून विज्ञान विषयात रस होता. गणिताच्या शिक्षकाच्या प्रेरणेमुळे त्यांना विद्यापीठात गणिताचे शिक्षण घ्यावयाचे होते पण त्यांच्या वडीलाना असे वाटत होते कि त्यांनी "युनिव्हर्सिटी कॉलेज, ऑक्सफर्ड" येथे प्रवेश घ्यावा. पण युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये त्यावेळी गणितासाठी फेलोशिपची सोय नसल्याने हॉकिंग यांनी निसर्गविज्ञान या विषयासाठी प्रवेश घेतला आणि त्यासाठी त्यांना स्कॉलरशिपसुद्धा मिळाली. त्यांनी १९६२ यावर्षी ऑक्सफर्ड विद्यापीठ येथून पदवी संपादन केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी स्टीफन यांनी केंब्रिज विद्यापीठ येथे आपले नाव नोंदविले. एकदा लंडनमध्ये गणितज्ञ रॉजर पेनरोज यांचे भाषण ऐकायला स्टीफन हॉकिंग गेले.
तार्यायतील इंधन संपल्यावर तो बिंदूवत होऊ शकतो असे निष्कर्ष पेनरोज यांनी त्या भाषणात मांडले होते. यावरूनच स्टीफन हॉकिंग यांनी स्वतंत्र अभ्यास करून संपूर्ण विश्वाचाही तार्यांप्रमाणेच अंत होऊ शकतो असा निष्कर्ष काढला, या प्रबंधावर स्टीफन हॉकिंग यांना डॉक्टरेट मिळाली. याच प्रबंधाचा पुढचा भाग सिंग्युलॅरिटीज अँड दी जीओमेट्री ऑफ स्पेसटाईम हा प्रबंध स्टीफन यांनी लिहिला. या प्रबंधासाठी १९६६ सालचे ऍडम्स प्राईझ त्यांना मिळाले. स्टीफन हॉकिंग यांनी नंतर कृष्णविवर या विषयाकडे आपले लक्ष वळविले. यावर आइनस्टाइनच्या सापेक्षतावादाचा सिद्धांताची जोड देऊन गृहिते मांडणे सुरू केले. १९६२ मध्ये हिवाळी सुट्यांसाठी स्टीफन आपल्या घरी गेले असता त्यांना अचानक त्रास होऊ लागला.
उपचारासाठी अनेक डॉक्टरांकडे दाखवून झाले पण रोगाविषयी काहीच माहिती मिळेना. त्यातच रोगाचा जोर वाढला आणि ८ जानेवारी १९६३ रोजी, २१ व्या वाढदिवस साजरा करीपर्यंतच दिवशीच स्टीफन यांना एक असाध्य रोग झाल्याचे स्पष्ट झाले. या रोगाला इंग्लंडमध्ये मोटर न्यूरॉन डिसीज (MND) तर अमेरिकेत अमायो ट्रॉपिक लॅटरल स्क्लोरोसिस (A. L. S.) असे म्हणतात. स्टीफन हॉकिंग जेमतेम दोन वर्षे जगतील असे त्यांना सांगण्यात आले. आधी ते खूप निराश झाले पण त्याच इस्पितळातील एका रोग्याला असाध्य रोगाशी झगडतांना पाहून स्टीफन यांनाही आशेचे किरण दिसू लागले.
स्टीफन यांना चालण्या-फिरण्यासाठी व्हील चेअरचा आधार घ्यावा लागला. मग या व्हील चेअरलाच एक संगणक जोडण्यात आला. फक्त एक बोट वापरून स्टीफन या संगणकावर हवे ते काम करू शकत. १९८५ साली हॉकिंग यांना न्यूमोनिया रोग झाला. केवळ श्वास नलिकेला छिद्र करूनच शस्त्रक्रिया होऊ शकणार असल्याने तशी शस्त्रक्रिया हॉकिंग यांच्यावर करण्यात आली पण त्यामुळे हॉकिंग यांचा आवाज कायमचा गेला. यावर संगणतज्ज्ञ डेव्हिड मेसन यांनी स्टीफन हॉकिंग यांच्या संगणकासाठी एक नवी आज्ञावली लिहून ती त्या संगणकात कार्यरत करून दिली. यामुळे संगणकाच्या आवाजाच्या माध्यमातून बोलणे हॉकिंग यांना शक्य झाले.
१९७४ साली हॉकिंग यांनी पहिल्यांदा पुंज यामिक आणि सापेक्षतावादाचा सिद्धांतची सांगड घालून दोन सिद्धांतांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. स्टीफन हॉकिंग यांच्या या प्रबंधाला आधी जोरदार विरोध झाला पण नंतर स्टीफन हॉकिंग यांचे मत पटल्यावर त्या नव्या निष्कर्षाप्रमाणे होणार्याो किरणोत्सर्जनाला हॉकिंग उत्सर्जन असे नाव देण्यात आले. त्याच वर्षी स्टीफन हॉकिंग यांचा कृष्णविवर या विषयावरील प्रबंध इंग्लंडच्या नेचर या नियतकालिकेत प्रसिद्ध झाला आणि त्यांची रॉयल सोसायटीचा फेलो म्हणून निवड झाली. १९८० च्या दशकात हॉकिंग यांना ऑक्सफर्ड विद्यापीठ, प्रिन्स्टन विद्यापीठ, न्यूयॉर्क विद्यापीठ, लँकेस्टर विद्यापीठ या विद्यापीठांनी डॉक्टरेट देऊन त्यांचा सन्मान केला.
विज्ञान विषयात काम करीत असतांनाच हॉकिंग यांनी अपंग लोकांसाठी, त्यांच्या सोयींसाठी आणि त्यांच्यावरील अन्यायासाठी लढा दिला. यासाठी हॉकिंग यांना १९७९ Royal Association for Disability and Rehabilitation या संस्थेकडून मॅन ऑफ दि इयर हा किताब देण्यात आला. मा. हॉकिंग 'ब्रीफ हिस्टरी ऑफ टाईम'सारखे पुस्तक लिहून सामान्यांपर्यंत विज्ञानाची कास आणि गंमत पोहोचविली आहे.
स्टीफन हॉकिंग यांना महिलांचे गुढ वाटत असते. ते म्हणतात, स्त्री हे एक गुढच आहे. 'न्यू सायंटिस्ट' या नियतकालिकाने हॉकिंग यांना प्रश्न विचारला होता, की तुम्ही सर्वांत जास्त वेळ कशाचा विचार करता? यावर त्यांनी उत्तर दिले ते असे, 'स्त्रिया. त्या पूर्णपणे गुढ आहेत. स्टीफन हॉकिंग यांचे १४ मार्च २०१८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत यांचा महत्त्वाचा वाटा होता. भारतीय जनसंघातून पुढे भारतीय जनता पक्षाचा उगम झाला.
हरिहरन मुंबईत लहानाचे मोठे झाले. विज्ञान व कायदा या शिक्षण शाखांच्या पदव्या घेतल्या आहेत. त्यांचा जन्म ३ एप्रिल १९५५ रोजी झाला.हरिहरन यांनी हिंदी, मल्याळम, कन्नड, मराठी अशा अनेकविध भाषांत गाणी म्हणली आहेत. ते एक उत्तम गझल-गायकही आहेत. ते उत्तम मराठी बोलतात. अलमेलू हे त्यांचे संगीतातले पहिले गुरू होते. संगीतकार रेहमान यांनी हाय रामा(रंगीला), सून री सखी (हमसे है मुकाबला), भारत हमको जानसे प्यारा है (रोजा) या गाण्यांतून शास्त्रीय-उपाशास्त्रीय धाटणीचा गायक अशी मा.हरिहरन यांची प्रतिमा निर्माण केली आणि ‘टेलिफोन धून मे हसने वाली’ (हिंदुस्थानी), यू ही चलाचल (स्वदेस) सारख्या उडत्या चालीच्या गाण्यांनी ती धुऊन काढली. रेहमान-हरिहरन जोडीने दिलेली सर्वात सुंदर गाणी विरहगीत या प्रकारात मोडतात. रोजा जानेमन (रोजा), तू ही रे.. (बॉम्बे), चंदा रे चंदा रे (सपने) हरिहरन यांनी गायलेल्या चित्रपट-गीतांमधील यादें(यादें), झौका हवा का (हम दिल दे चुके सनम), कितनी बातें(लक्ष्य), ही विरहगीते नेहमीच मनात घर करून बसतात. हरिहरन यांनी भारतीय फ्युजन संगीतात मूलभूत काम केले. त्यांचा अल्बम "कलोनियल कझिन्स‘ याची साक्ष देतो. कलोनियल कझिन्स! हा एक गाजलेला अल्बम यातील ‘कृष्णा नीबे..’ ‘ओ हो काय झालं..’ ‘सा नि धा पा..’ अशा गाण्यांनी लेस्ली लुईस आणि हरिहरन या जोडीने भारतीय संगीतात एका वेगळ्याच संगीतप्रकाराची भर घातली. पण, गझल हा त्यांचा खास जिव्हाळ्याचा विषय. "गझल तुम्हाला नेहमीच मध्यममार्गी अनुभव देते. खयाल, ठुमरी, कव्वाली असे केवढे तरी वैविध्य यात आहे. संगीतात तीन दशकांहून आपल्या अधिकच्या कारकिर्दीत त्यांनी नौशादजींपासून जयदेव, लक्ष्मीकांत प्यारेलाल, इलयाराजा, रहेमान, अजय-अतुल आणि त्यांचा मुलगा अक्षय अशा अनेक संगीतकारांसोबत काम केले. अक्षयने गेल्या वर्षी आलेल्या "कोकणस्थ‘ला संगीत दिले होते. २००४ साली हरिहरन यांनी भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
हरिहरन यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=qlUvCY2rp08
https://www.youtube.com/watch?v=1kEjXAzir3Q
https://www.youtube.com/watch?v=RR1bIAPM3Ro
https://www.youtube.com/watch?v=j6fNKK2GBBk
https://www.youtube.com/watch?v=CJvK0dox0_M
https://www.youtube.com/watch?v=cuMYU4bqZ_A
दिनकर गंगाधर केळकर म्हणजेच कवी अज्ञातवासी हे कवी, काव्यसंग्रह संपादक, तत्वज्ञानाचे अभ्यासक, म्हणून ओळखले जात असत. केळकर यांनी १९२० पासून विविध वस्तूंचे जतन करण्यास सुरुवात केली मात्र मधल्या काळात म्हणजे १९२२ पासून त्यांनी एका खोलीत त्यांनी वस्तू संग्रहालय सुरु केले.
सिमी गरेवाल म्हटलं की आपल्याला ‘रांदेवू’ वुईथ सिमी गरेवाल’ हा त्यांचा शो आठवतोच. सिमी गरेवाल यांचे वडील जे. एस. ग्रेवाल आर्मीत ब्रिगेडियर होते. त्यांचे बालपण इंग्लंडमध्ये गेले आणि शिक्षण न्यूलँड हाऊस स्कूलमध्ये झाले होते. इंग्लंडमध्ये बालपण घालवल्यानंतर किशोरावस्थेत सिमी भारतात परतल्या. त्यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९४७ रोजी दिल्ली येथे झाला. वयाच्या पंधराव्या वर्षी तिला 'टार्जन गोज टू इंडिया' या सिनेमाची ऑफर मिळाली होती. हा सिनेमा सिमीने स्वीकारला होता. आपल्या पहिल्या सिनेमात तिला फिरोज खानबरोबर काम करण्याची संधी मिळाली होती. त्यांनी मेहबूब खान, राज कपूर, मृणाल सेन, राज खोसला अशा मात्तबर दिगदर्शकांबरोबर काम केले.
सिमी गरेवाल या बोल्ड सीन साठी त्या काळी फेमस होत्या. सिमी गरेवाल या 'दो बंधन', 'साथी', 'मेरा नाम जोकर' आणि 'सिद्धार्थ' या वादग्रस्त सिनेमासाठी ओळखले जातात. १९७२ मध्ये रिलीज झालेल्या 'सिद्धार्थ' या सिनेमात सिमी गरेवालने बॉलिवूडमधला पहिला न्यूड सीन देऊन खळबळ उडवली होती. हा सिनेमा सर्वाधिक वादग्रस्त सिनेमा ठरला होता. कोनरॉट रुक्सच्या 'सिद्धार्थ' या सिनेमात अनेक हॉट आणि वादग्रस्त सीन्स होते. एका सीनमध्ये तर शशी कपूर न्यूड सिमी ग्रेवालच्या समोर उभे दिसतात. हे छायाचित्र दोन इंग्रजी मासिकांनी आपल्या कव्हरपेजवर प्रकाशित केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. प्रकरण थेट न्यायालयात पोहोचले होते. शशी कपूर आणि सिमीच्या न्यूड सीनमुळे 'सिद्धार्थ' हा सिनेमा भारतात प्रदर्शित झाला नव्हता.
सिमी गरेवाल यांनी ६० पेक्षा जास्त चित्रपटात कामे केली आहेत. सिमी गरेवालने "रुखसत " या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. मिथुन चक्रवर्ती व अनुराधा पटेल यांच्या भूमिका होत्या. अभिनय सोबत सिमी गरेवाल एक अँकर म्हणूनपण आपल्या लक्षात आहे. ‘इंडियाज मोस्ट डिझायरेबल’ हा शो पण सिमी गरेवाल यांचा होता. दूरदर्शनवर Woman's World या नावाने त्यांनी डॉक्यूमेट्री केली होती. राजीव गांधी यांच्या जीवनावर राजीव या नावाने डॉक्यूमेट्री केली आहे. सिमी गरेवाल यांची खासियत म्हणजे त्या नेहमी पांढ-या रंगाचे कपडेच परिधान करतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
हिंदुस्तानी शास्त्रीय गायनातील ग्वाल्हेर घराण्याच्या ख्याल शैलीतील बंदिशींच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवणा-या एक प्रयोगशील गायिका नीला भागवत यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९४२ रोजी पुणे येथे झाला.
कृष्णराव पंडीत व शरच्चंद्र आरोलकर हे त्यांचे गुरु. त्यांची मीराबाई व कबीराच्या भजन गाण्याबद्धल विशेष प्रसिद्ध आहेत. जयपूर आणि ग्वाल्हेर अशा दोन्ही घराण्यांमधली गायकी त्या शिकल्या, ती आत्मसात केली आणि अवलंबलीही, मात्र ग्वाल्हेर घराण्याच्या ख्याल (खयाल-कल्पना) गायकीमध्ये त्या मनापासून रमल्या. ग्वाल्हेर घराण्यात बोलाला सर्वाधिक महत्त्व आहे. बोलात सगळंच अंतर्भूत असतं, या कल्पनेनं झपाटलेल्या नीला यांनी ख्यालाचा मूळ पिंड कधीच सोडला नाही. त्या व्यवसायाने प्राध्यापक व भाषांतर कार आहेत. आजही पारंपरिक गायिकीसोबतच जीवनातील अनुभव बंदिशींमधून मांडत नवता, प्रयोगशीलताही त्या जपत आहेत. शास्त्रीय रागांसह ‘पियानो’सारख्या पाश्चिमात्य वाद्याबरोबरही त्या जितक्या एकरूप होतात, तितक्याच परदेशी मूकबधिर मुलांना गायन शिकवतानाही होतात.
संत कबीर, मीराबाई, चोखामेळा, संत तुकाराम, महात्मा फुले ते अगदी महात्मा गांधी यांसारख्या संत आणि महापुरुषांच्या विचारांवर, काव्यांवर बंदिशी बांधून त्यांचं सांगीतिक चित्र समाजापुढे मांडत आहेत. आज वयाच्या पंच्याहर्या वर्षीही नीला भागवत यांचा नवनिर्मितीचा, सृजनशीलतेचा उत्साह कायम आहे. त्यांना एसएनडीटी विद्यापीठ आणि वायएमसीए संस्था यांच्यातर्फे ‘कॉन्ट्रिब्युशन टू विमेन्स कल्चर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच
केंद्र सरकारतर्फे संगीतातील संशोधनासाठी मानद शिष्यवृत्ती त्यांना देण्यात आली आहे.
नीला भागवत यांचे साहित्य.
मोनोग्राफ ऑन कृष्णराव शंकर पंडित (१९९२)
तिहाई (कवितासंग्रह) (१९९२-९३)
कबीर गाता गाता (२००४)
शरच्चंद्र आरोलकर – लेणे प्रतिभेचे (२०१२)
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट https://www.youtube.com/watch?v=0WLgyPkL5dI https://www.youtube.com/watch?v=Ukghy6LIqlA
ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर म्हणजे गायनातलं मूर्तिमंत चैतन्यतत्त्व. कारण त्या गात असलेलं गाणं कोणत्याही प्रकारांतलं असो, शास्त्रीय संगीत किंवा नाट्यसंगीत, भक्तिसंगीत किंवा अगदी भावगीत... त्यांचा जन्म ११ जानेवारी १९५५ मध्ये सांगली येथे झाला. त्यांचे प्रत्येक गाणं प्रचंड ऊर्जेनं भारलेलं असतं. ही ऊर्जा मूळच्या गाण्यापेक्षा आशाताईंच्या अंतरातून आलेली असते. त्यामुळेच आशाताई जेव्हा एखादं गाणं गातात,तेव्हा ते तत्पूर्वी कुणीही गायलेलं असलं तरीही विलक्षण चैतन्यमय भासतं.
विशेष म्हणजे वयाच्या तेराव्या वर्षीत्यांनी पहिली मैफल गाजवली तेव्हाची आणि आताची त्यांचीगायनातली ऊर्जा, यात बिलकूल फरक पडलेला नाही. अगदी लहान वयातच आशाताईंच्या घरच्यांनी त्यांना पं. बाळकृष्णबुवा मोहिते यांच्याकडे गाणं शिकायला पाठवलं आणि आशाताई गाण्यातच अक्षरशः रुजल्या.
तेराव्या वर्षी त्यांनी पहिली मैफल मारली; तर वयाच्या सतराव्या वर्षीच पं. भीमसेन जोशी, गानहिरा हिराबाई बडोदेकर, डॉ. वसंतराव देशपांडे यांच्यासारख्या गायनातील मान्यवरांनी आशाताईंच्या गाण्याला नावाजलं आणि त्यांना पुण्यात मानाचा 'बालगंधर्व पुरस्कार' बहाल केला.
१९७५ मध्ये लग्नानंतर मुंबईस स्थलांतर केल्यावर आशाताईंनी ख्यातनाम गायिका माणिक वर्मा यांच्याकडे गायनाचे शिक्षण चालू ठेवले. पुढच्या काळात त्या ग्वाल्हेर घराण्याचे समर्थ गायक पं. यशवंतबुवा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली गायनकलेची आराधना करत होत्या.
आशाताईंनी वेगवेगळ्या संगीत घराण्यांना आपल्या गायनात समाविष्ट करून त्यातून आपले गाणे अधिक कसदार बनविले आहे. किराणा घराणे, ग्वाल्हेर घराणे व आग्रा घराणे यांच्या गायन शैलीची अनेक वैशिष्ट्ये आशाताईंच्या गायनात दिसून येतात. 'घेता किती घेशील दो करांनी' या न्यायाने माणिक वर्मा, पं. यशवंतबुवा जोशी, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. शंकरराव अभ्यंकर अशा विविध संगीत घराण्यातील गुरुंकडून गाण्याची तालीम घेतली. केवळ तालीम घेतली नाही, त्यात्या घराण्याची खासीयत आपल्या गळ्यात उतरवली आणि आपली अशी एक स्वतंत्र, काहीशी आक्रमक गायनशैली विकसित केली.
आशाताईंचं गाणं ऐकताना किराणा, ग्वाल्हेर व आग्रा घराण्याची गान वैशिष्ट्यं आढळून येतात, ती त्यामुळेच. त्यांनी गायलेल्या भावगीतांत याची उत्तम झलक पाहायला मिळते. विशेषतः 'घाई नको बाई अशी, आले रे बकुलफुला' हे गाणं ऐकताना याचं प्रत्यंतर येतं.
आशाताई पारंपरिक मराठी भावगीते, भजने व नाट्यगीतेही तितक्याच प्रभावीपणे सादर करतात. देशोदेशी त्यांचे कार्यक्रम होत असतात. आशाताईंनी संगीत दिग्दर्शन व संगीत रचनाही केल्या आहेत, तसेच अनेक बंदिशी रचल्या आहेत. 'संगीत आराधना' व 'संगीत कविराज जयदेव' यांसारख्या नव्या काळातील मराठी संगीतिकांचे त्यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. जाहीर कार्यक्रमांच्या जोडीला आशाताईंनी वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित कार्यक्रम, जसे, 'होली रंग रंगीले', 'सावन - रंग', 'ऋतु-रंग', 'रचनाकार को प्रणाम', सादर केले आहेत.
१९९४ पासून आपले पती श्री. माधव खाडिलकर यांच्या सहयोगाने आशाताईंनी ठाणे, मुंबई येथे 'उत्तुंग सांस्कृतिक परिवार' नामक सांस्कृतिक संस्था सुरू केली असून तिचा उद्देश संगीत, नृत्य, नाट्य व साहित्य विश्वातील नव्या दमाच्या प्रतिभेला आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. ह्या क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी करणाऱ्यांसाठी ही संस्था 'उत्तुंग पुरस्कार' जाहीर करते.
आजवर आशाताईंना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांत माणिक वर्मा पुरस्कार, पं. कुमार गंधर्व पुरस्कार, संगीत शिरोमणी पुरस्कार अशा अनेक मानाच्या पुरस्कारांचा समावेश आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ म.टा
काही गाणी आशा खाडिलकर यांची
घाई नको बाई अशी, आले रे बकुलफुला
वद जाऊ कुणाला शरण
जोहर मायबाप जोहर मायबाप
मजवरी तयाचे प्रेम खरे
अनंता तुला कोण पाहू शके
बलसागर तुम्ही
किती किती सांगू तुला
मर्म बंधातली ठेव ही
Copyright © 2025 | Marathisrushti