(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • दाते पंचांग कर्ते लक्ष्मणशास्त्री दाते उर्फ नानाशास्त्री दाते

    १०३ वर्षापूर्वी पंचांगकार्याची मुहूर्तमेढ नानाशास्त्री दाते यांनी रोवली. पंचांग बनवताना पंचांगाचे गणित सोडवताना नानाशास्त्री दाते यांची मान आणि कंबर दुखत असे; मग त्यांनी भिंतीवर गणित सोडवायला सुरुवात केली. भिंतीचा कागद केला. नानांचे सुपुत्र धुंडीराजशास्त्री दाते यांनी या कामात लक्ष घालायला सुरुवात केली तेव्हा आधुनिकतेचं पाऊल टाकलं.

      January 25, 2022


  • नोबेल पारितोषिकाचे जनक आल्फ्रेड नोबेल

    जगातील सर्वात प्रतिष्ठेचे मानले गेलेले नोबेल पारितोषिक स्विडीश शास्त्रज्ञ आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिले जाते. आल्फ्रेड नोबेल यांचा जन्म १३ ऑक्टोबर १८३३ रोजी स्टॉकहोम येथे झाला. त्यांचा मृत्यू १० डिसेंबर १८८६ रोजी झाला.

    आल्फ्रेड नोबेल यांनी सैन्याच्या कामासाठी डायनामाईटचा शोध लावला. युद्धाबरोबरच खाणी, रस्ते तयार करण्याच्या कामातही त्याचा वापर होऊ लागला.

    नोबेलचे वडील औषधांचे उद्योजक होते व आल्फ्रेडने स्वत शालेय शिक्षण खाजगी शिक्षकांकडून घेतले.यांत्रिकी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असले तरी आफ्रेडला रासायनिक संशोधनात रस होता. भरीस वडील बंधूचा स्फोटकांच्या अपघातात मृत्यू ओढवल्यावर आल्फ्रेडने स्वतला सुरक्षित स्फोटके शोधण्यासाठीच्या संशोधनाला वाहून घेतले व पुढे डायनामाइटचा शोध लावला.

    डायनामाइटच्या शोधामुळे नागरी तसेच लष्करी बांधकामे करणे सुलभ झाले. यातून नोबेलने गडगंज संपत्ती मिळवली. आपल्या शोधाचा उपयोग युद्धातच जास्त होत असल्याचे व त्यामुळे आपण स्वत: इतरांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचे शल्य नोबेलच्या मनाला सलत होते. त्या कारणाने आल्फ्रेड नोबेलने दहा लाख स्विडीश क्रोनरचा निधी देऊन ट्रस्ट स्थापन केला व जगातील उत्तमोत्तम संशोधकांना व शांतिदूतांना त्यातून पारितोषिक देण्याचे सुरू केले. हे पारितोषिक म्हणजेच नोबेल पारितोषिक होय.

    नोबेल यांना विज्ञानाबरोबरच साहित्य, कला, शांतिकार्य या क्षेत्राचीही आवड होती. विविध क्षेत्रातील व्यक्तींचा योग्य बहुमान व्हावा असे त्यांना वाटे. त्यामुळेच त्यांनी मृत्यूपत्र लिहतांना नोबेल पारीतोषिकाची व्यवस्था केली. त्यांनी आपल्या उत्पादनाच्या ९४ टक्के रक्कम या विविध पुरस्कारांसाठी राखून ठेवली.

    त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ १९०१ पासुन हे पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. शांतिकार्य, साहित्य, पदार्थविज्ञन, रसायनशास्त्र, शरीरशास्त्र व अर्थशास्त्र ह्या विषयात संशोधन करणार्‍यांना नोबेल पुरस्कार दिले जातात.

    -- मराठीसृष्टी टिम

      July 19, 2016


  • मराठी नाट्य, दूरदर्शन व चित्रपट अभिनेते रवींद्र मंकणी

    ‘स्वामी’, ‘त्रिकाल’, ‘शांती’ या मालिकेतील विविध भूमिकांसोबत अनेक चित्रपट आणि नाटकातील भूमिका गाजवणारे अभिनेता रविंद्र मंकणी व्यवसायाने सिव्हिल इंजिनीअर आहेत. त्यांचा जन्म २१ मे १९५६ रोजी झाला.

    रविंद्र मंकणी यांनी अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच झाशीची राणी या ऐतिहासिक हिंदी मालिकेतही त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. 'रवींद्र मंकणी' यांची 'स्वामी' या मालिकेत 'माधवराव पेशवे' यांची भूमिका खूप गाजली होती. त्यांनी मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित 'रमा माधव' या चित्रपटात 'नानासाहेब पेशवे' यांची भूमिका केली आहे.

    रविंद्र मंकणी यांच्या २२ जून १८९७ व लिमिटेड माणुसकी या चित्रपटातील भूमिकेबद्दल पुरस्कार मिळाला होता. निवडुंग, स्मृतिचित्रे, वारस लक्ष्मीचा,बंद झरोके हे त्यांचे इतर चित्रपट.

    आपला कलाकार या व्यवसायाबरोबरच रविंद्र मंकणी यांची पुण्यात रविराज पब्लीसीटी या नावाने प्रसिध्द अॅड एजन्सी आहे.

    रविंद्र मंकणी हे जेष्ठ लेखक द.मा. मिराजदार यांचे जावई. रविंद्र मंकणी यांचा मुलगा सुश्रुत मंकणीसुद्धा चित्रपट सृष्टीत आहे. सुश्रुत याची संगीत अॅकेडमी पण आहे. गजेंद्र अहिरेंच्या 'नातीगोती' या सिनेमात तो पहिल्यांदा झळकला होता. 'स्वराज्य' या सिनेमात निगेटिव्ह भूमिका साकारुन त्याने अभिनयात वेगळी छाप उमटवली. 'ना ना नकोसे' आणि 'गुलमोहोर' या सिनेमांमध्येही तो झळकला आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      May 21, 2017


  • गायक रवींद्र साठे

    स्पष्ट शब्दोच्चार,खर्जातील घनगंभीर स्वर,आणि भावपूर्ण गायन ही रवींद्र साठे यांची खासीयत. त्यांचा जन्म ७ फेब्रुवारी १९५१ रोजी झाला.

    रविंन्द्र साठे यांचे श्री. मुकुंदराव गोखले यांच्याकडे रीतसर शास्त्रीय गायनाचे शिक्षण झाले.बालकलाकार म्हणून त्यांचे कार्यक्रम होऊ लागले.पण महाविद्यालयात गेल्यावर त्यांच्या या शिक्षणात खंड पडला.त्याच वेळी सुगम संगीत स्पर्धेत त्यांना प्रथम पारितोषिक मिळाले.आणि ते पुन्हा गाण्याकडे वळले.पंडित नागेश खलीकर यांच्याकडे त्यांची गानसाधना सुरु झाली.पदवीनंतर त्यांनी पुण्याच्या एफ.टी.आय मध्ये '' साऊंड रेकॉर्डडिस्ट ''चा कोर्स पूर्ण केला.त्यानंतर दूरदर्शनवर म्हणून नोकरी केली.तेव्हा दूरदर्शनवर आरोही,शब्दांच्या पलीकडले,अमृताची फळे असे दर्जेदार कार्यक्रम सादर होत असत.येथेच स्वरांचे संस्कार त्यांच्यावर घडले.सुधीर फडके आणि गजानन वाटवे यांना ते ''शब्दोच्चरतिल आदर्श'' मानतात.

    रवींद्र साठे हे नाव सुपरिचित झाले ते ''घाशीराम कोतवाल''या नाटकातील त्यांच्या गायक नटाच्या भूमिकेमुळे .त्यांच्या या भूमिकेबद्दल सी.रामचंद्र,कुमार गंधर्व,वसंतराव देशपांडे अश्या मान्यवरांकडून त्यांना दाद मिळाली. मधुकर गोळवलकर,सी.रामचंद्र,राम कदम,आनंद मोडक,हृदयनाथ मंगेशकर, श्रीधर फडके अशा नामवंत संगीतकारांबरोबर त्यांनी काम केले आहे.''ओंजळीत स्वर तुझेच''हा त्याचा आनंद मोडक यांनी स्वरबद्ध केलेला अल्बम रसिकांनी खूप नावाजला आहे.

    सामना,जैत रे जैत,एक होता विदुषक अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले.''पिक करपल'' हे पुरस्कार विजेते गीत तसेच कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे,वाट चालतो सारे यासारखी त्यांची अनेक गीते लोकप्रिय आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट/ मानसी पटवर्धन

      February 9, 2017


  • सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर-टिकेकर

    काळी गोल टिकली. त्यावर भांगापर्यंत रेखाटलेली काळ्या कुंकवाची उभी रेघ. नाकात लकाकणारी चमकी. डार्क ब्ल्यू किंवा मरून रंगाची सिल्क साडी. काठ ठळकपणे उठून दिसणारे, हाती तंबोरा – मैफलीपूर्वीची डोळे मिटलेली ध्यानस्थ स्तब्धता. `आकाशवाणी धारवाड’ केंद्रावरचा फोटो वाटावा अशी आरती अंकलीकर – टिकेकरची प्रतिमा.

    आरती अंकलीकर-टिकेकर यांनी आग्रा-ग्वाल्हेर घराण्याच्या पं. वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे आणि नंतर गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्याकडे संगीताचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांचा जन्म २७ जानेवारी १९६३ रोजी झाला.त्यांच्या गायनशैलीवर त्यांच्या दोन्ही गुरुंचा प्रभाव जाणवतो. चांगलं गाता येण्यासाठी नैसर्गिक देणगी, संस्कार, कष्ट (रियाज) आणि संधी या चार गोष्टींची गरज असते. आरती अंकलीकर - टिकेकर यांना आवाजाची देणगी तर मिळालीच होती, जोडीला आईवडिलांचे संस्कार, गुरूंची आणि परमेश्वकराची कृपा यांमुळे मिळालेल्या प्रत्येक संधीचं त्यांनी सोनंच केलं. आरती अंकलीकर-टिकेकर यांनी प्रथम वसंतराव कुलकर्णींकडे बारा वर्षं रीतसर आग्रा-ग्वाल्हेर घराण्याच्या गाण्याचे शिक्षण घेतले. वसंतराव कुलकर्णी यांची आठवण सांगताना त्या म्हणतात. वसंतरावांकडचा सकाळचा नऊचा क्लाुस आठवतोय. मला पोचायला २-३ मिनिटं उशीर झाला असावा. सर त्यांच्या गादीवर तक्त्यााला टेकून बसलेले. पांढरे शुभ्र धोतर, पांढरा झब्बा, कुरळे केस व्यवस्थित विंचरलेले. समोरच्या तबकात तंबाखू, सुपारी, विड्याची पानं, सरांच्या अंगठ्याच्या नखात चुना, डाव्या हातात तळहातावर तंबाखू. मला पाहताच चेहऱ्यावर नाराजी. मला म्हणाले, ""घड्याळात पाहतेस ना किती वाजले?'' मी- ""पण सर..'' ""बस.. उशिरा आली.'' सर - ""ख्यालाच्या आवर्तनामध्ये दुसऱ्या मात्रेवर समेवर येऊन चालेल का? वेळेचं भान नको का ठेवायला?'' ताल म्हणजे काय, आवर्तन म्हणजे काय, याचा मिळालेला पहिला धडा होता तो. असे शिस्तप्रिय, वक्तशीर, मितभाषी, आतून खूप प्रेम करणारे, वरवर कोरडे वाटणारे सर.

    वसंतराव कुलकर्णींकडे गाण्याचे शिक्षणानंतर त्यां गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या कडे गाणं शिकल्या. किशोरी आमोणकर यांच्या बद्दलचे त्यांचे भाव व्यक्त करताना त्या म्हणतात, किशोरीताईंकडे चाललेला यमन मनात रुंजी घालतोय, समोर दिसतोय, दरवळतोय, जिभेवरदेखील यमनचीच चव रेंगाळतेय. केवळ त्या आठवणींनी मन जणू यमनच झालंय. ताईंकडे यमनची तालीम चाललेली असतानादेखील असंच वाटायचं, मीच यमन झाल्यासारखं. सगळं जग यमन झाल्यासारखं वाटे. त्यांच्या घरातून बाहेर पडल्यानंतरदेखील यमनमध्ये तरंगल्याचा आभास होई. अंतर्मनामध्ये यमनच चालू असे. ताई म्हणत, "रागाला शरण जा, तोच तुम्हाला वाट दाखवेल.'' ताईंचा श्वा स म्हणजेच संगीत. संगीत हेच जीवन. त्यांची गुरूवर अपार भक्ती. गुरू म्हणजे त्यांचीच आई- गानतपस्विनी - "मोगूबाई.' ताईंनी शिस्तबद्ध गायकी पचवून आपली स्वयंभू, स्वतंत्र गायनशैली निर्माण केली. रागाचं विशाल रूप त्यांना दिसलं आणि आम्हालाही त्याची अनुभूती दिली. मी स्वत: यमन होते तेव्हा काय घडत असतं, याचा साक्षात्कार करवला.
    आरती अंकलीकर-टिकेकर यांनी नंतर आग्रा घराण्याचे अध्वर्यू मा.पं. दिनकर कैकिणी यांच्याकडे शिक्षण घेतले. पं. दिनकर कैकिणी यांच्याबद्दल बोलताना त्या म्हणतात. यश म्हणजे काय? पैसा, नाव, कीर्ती मिळवणं म्हणजे यश; मनातली स्वप्न पूर्ण होणं म्हणजे यश; की श्रोत्यांना भावविभोर करणं म्हणजे यश? चांगला माणूस बनणं म्हणजे यश की यशस्वी कलाकार होणं म्हणजे यश? निरंतर साधनेत रमणारं मन घडवणं म्हणजे यश, की सातासमुद्रापलीकडे कार्यक्रम करणं म्हणजे यश? या विचारांच्या भोवऱ्यात मन भरकटत असताना आठवतो तो माझ्या गुरूंबरोबर गायलेला राग भैरव. पं. दिनकर कैकिणी- आग्रा घराण्याचे अध्वर्यू- त्यांनी भैरव शिकवला. खरं तर उभाच केला डोळ्यांसमोर. राग ही केवळ एक स्वराकृती नसून, तरल भावाचं एक वलय आहे. अलगद तरंगणारं, गायकाच्या आणि श्रोत्याच्या तरल मनाला तरंगवणारं. पं. कैकिणी गुरुजींची काही वाक्यंर इथं आठवतात

    "शास्त्रीय संगीत हे मनोरंजनासाठी नसून आत्मरंजनासाठी आहे.'
    "भारतीय संगीत हे दोन स्वरांना जोडणाऱ्या दुव्यात दडलेलं आहे.'

    त्यांनी आत्तापर्यत भारतभर तसेच भारताबाहेर अनेक प्रतिष्ठित संगीत महोत्सवांमध्ये आपली कला सादर केली आहे. आरती अंकलीकर-टिकेकर यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचा आणि संस्कृतीचा जगभरामध्ये आपल्या गायनाद्वारे प्रसार केला. प्रसिद्ध दिग्दर्शक शाम बेनेगल यांच्या `सरदारी बेगम’ या चित्रपटासाठी त्यांनी पार्श्वगायनही केले आहे. आरती अंकलीकर-टिकेकर यांना आत्तापर्यंत पं. कुमार गंधर्व पुरस्कार, पं. जसराज पुरस्कार, व्ही. शांताराम पुरस्कार अशा अनेक नामांकित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. 'संहिता' या मराठी चित्रपटातील 'पलके ना मूंदो' या गाण्यासाठी आरती अंकलीकर-टिकेकर यांना उत्कृष्ट पार्श्वगायिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळालेला आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

    मी राधिका मी प्रेमिका
    https://www.youtube.com/watch?v=AqH-TkK9NSk
    ग्रेट भेटमधील सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर यांची मुलाखत
    http://www.ibnlokmat.tv/archives/65281
    http://www.ibnlokmat.tv/archives/65279
    सरदारी बेगम चित्रपटातील गाणी
    https://www.youtube.com/watch?v=twjdlrUYcYs
    https://www.youtube.com/watch?v=QAWHl2BKOJY

      January 27, 2017


  • अमेरिकन सिनेमाचा आद्य महापुरुष सेसिल डमिल

    मेल अँड फीमेल, डायनामाइट, दी बकॅनिअर, नॉर्थवेस्ट माउंटेड पुलिस, दी किंग ऑफ किंग्ज, दी ग्रेटेस्ट शो ऑन अर्थ – असे त्याचे सिनेमे प्रसिद्ध आहेत.

      January 21, 2022


  • ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा

    ध्येयाने झपाटलेल्या रतन टाटा यांनी अमेरिकेतील आपल्या दहा वर्षांच्या मुक्कामामध्ये हॉटेलमध्ये भांडी घासण्यापासून ते कारकुनाच्या नोकरीपर्यंत सर्व काही केले.

      December 28, 2021


  • ज्येष्ठ संगीत संयोजक मास्टर केरसी लॉर्ड

    आपल्या वाद्यांच्या परीसस्पर्शाने गाण्याचं सोनं करणारे दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते ज्येष्ठ संगीत संयोजक मास्टर केरसी लॉर्ड यांच्या कलाकर्तृत्वाला दिलेला उजळा.

      February 22, 2018


  • मराठीतल्या पहिल्या स्त्रीवादी लेखिका मालती बेडेकर

    मालतीबाई बेडेकरांचे माहेरचे नाव बाळुताई खरे होते. त्यांचा जन्म १८ मार्च १९०५ आवास, रायगड येथे झाला. विश्राम बेडेकरांशी १९३८ साली त्यांचा विवाह झाला. त्या आपले लिखाण विभावरी शिरुरकर ह्या नावाने प्रसिद्ध करायच्या. 'महिला सेवाग्राम'शी संबंधित असताना अनेक अनाथ, विधवा, परित्यक्तांच्या समस्या त्यांनी अनुभवल्या -अभ्यासल्या. सह्रदयतेनं त्यावर मार्ग काढण्याचाही प्रयत्न केला. यातून दु:खी स्त्रीजीवनाशी त्यांचा जवळून परिचय झाला. या दु:खालाच त्यांनी कादंबरीचं रुप दिलं. मात्र हे लेखन त्यांनी मालतीबाई बेडेकर नावानं न करता 'विभावती शिरुरकर' या नावानं केलं. कारण त्या काळात स्त्रीजीवनाचं असं खरखुरं चित्रण खळबळजनक ठरलं. अलंकारमंजूषा, हिंदू व्यवहार धर्मशास्त्र हे त्यांचे आरंभीचे ग्रंथ होते. पुढे स्त्रियांच्या जाणिवा मांडणारा 'कळयांचे नि:श्वास' हा त्यांचा पहिला कथासंग्रह आला. 'हिंदोळयावर', 'विरलेले स्वप्न', 'बळी', 'जाई', 'शबरी', या कादंबर्या या दृष्टीने महत्वाच्या आहेत. 'पारध', 'हिरा जो भंगला नाही', ही नाटकं, 'घराला मुकलेल्या स्त्रिया' हा समाजशास्त्रीय संशोधनात्मक लेख आणि 'स्त्रीजीवनावरील मनस्विनीचे चिंतन' हा निबंधसंग्रह एवढं त्यांचं लिखाण आहे. त्यांच्या 'बळी' 'शबरी ' आणि 'घराला मुकलेल्या स्त्रिया' या पुस्तकांना राज्य शासनाची पारितोषिकं मिळाली आहेत. त्यांच्या बहुतेक कादंबर्यां ची गुजराथीत भाषांतरे झाली आहेत. मा.मालती बेडेकर यांचे ७ मे २००१ साली निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      March 21, 2017


  • हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेते शशी कपूर

    हिंदी चित्रपटसृष्टीत हॅपी गो लकी म्हणून ओळख असलेल्या शशी कपूर यांनी कपूर घराण्याचा कोणताही स्तोम माजवला नाही. हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेते शशी कपूर यांचा जन्म १८ मार्च १९३८ रोजी कोलकता येथे झाला. बलवीरराज अर्थातच शशी कपूर हे नाव घेतल्यावर आपल्या डोळ्यापुढे येतो तो देखणा चेहरा.

    घरंदाज, अदबशीर आणि अगदी सज्जन व्यक्तिमत्त्व. बहुतेक लोकप्रिय चित्रपटांमधून शशी कपूर असेच दिसले. प्रामाणिक, लाघवी, शांत, संयमी आणि बघता क्षणी नायिकेला प्रेमात पडायला लावणाऱ्या भूमिका त्यांच्या वाटय़ाला जास्त आल्या आणि त्याच लक्षात राहिल्या. मा. शशी कपूर यांचे शिक्षण मुंबईत झाले. वयाच्या दहाव्या- बाराव्या वर्षापासूनच त्यांनी अभिनय करायला सुरुवात केली. १९४८ साली आलेल्या ‘आग’ व १९५१ साली आलेल्या ‘आवारा’ या चित्रपटांमध्ये त्यांनी राजकपूरच्या बालपणाच्या भूमिका केल्या. हा गोड दिसणारा, गोड हसणारा छोकरा पुढे त्यांच्या त्याच हास्यासाठी व अवखळपणासाठी प्रसिद्ध झाला.

    घरातूनच मिळालेला अभिनयाचा वारसा त्यांनीही जपला. मात्र, तरीही वडिल पृथ्वीराज कपूर यांच्यासह थिएटरमध्ये ते बरीच वर्ष रमले. तरुणपणी इतर कपूरांप्रमाणे त्यांनीही सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या कामाला सुरुवात केली. १९६१ साली आलेल्या ‘धर्मपुत्र’ या चित्रपटात शशीकपूर पहिल्यांदा नायक म्हणून चमकले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी नायक म्हणून ११६ चित्रपटांमध्ये भूमिका केल्या.

    जब जब फूल खिले या सिनेमातली नंदा आणि शशी कपूर यांची जोडी विशेष गाजली. कपूर यांच्या नावावर अनेक यशस्वी चित्रपट आहेत. जब जब फुल खिले, शर्मिली,कभी कभी, बसेरा, पिघलता आसमान, रोटी कपडा और मकान अशा एका हून एक विलक्षण चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत. त्यांचा ‘दिवार’ हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतला एक मैलाचा दगड ठरला. अमिताभ बच्चन आणि शशी कपूर या जोडीने तर बॉक्सऑफिसवर एकच धमाल उडवून दिली.. दीवार, रोटी कपडा और मकान, त्रिशूल, दो और दो पाच, नमक हलाल, सिलसिला, शान, कभी कभी या हीट फिल्म्स या जोडीने दिल्या आणि प्रेक्षकांच मनोरंजन केलं.

    शशी कपूर यांच्या सत्यम् शिवम् सुंदरम्, जब जब फूल खिले या चित्रपटातील अभिनय खूपच गाजले. शशी कपूर हे देव आनंद व राजेश खन्नाप्रमाणे ‘रोमॅन्टिक हीरो’ म्हणून स्त्री-चाहत्यांत आपले स्थान निर्माण करू शकले. ती त्याची मोठीच मिळकत. हिंदी चित्रपटांबरोबरच मा.शशी कपूर यांनी दोन इंग्रजी चित्रपटांमध्येही भूमिका केल्या. आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये भूमिका करणारे शशी कपूर हे पहिले भारतीय अभिनेते ठरले. अनेक अमेरिकन व ब्रिटीश चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका केल्या. ‘फिल्मवालाज’ या त्यांच्या निर्मितीसंस्थेच्या वतीने त्यांनी जुनून व कलियुग ३६ चौरंगी लेन अशा विविध चित्रपटांची निर्मिती केली.

    हिंदी रंगभूमीसाठी शशी कपूर यांनी दिलेले योगदानही महत्त्वाचे आहे. आपल्या वडिलांच्या पृथ्वी थिएटरचीची त्यांनी पुर्नउभारणी केली. शशी कपूर यांना २०११ मध्ये ‘पद्मभूषण’ या सर्वोच्च नागरी पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. सिनेक्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी शशी कपूर यांना २०१४ साठी दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला होता.

    वडील पृथ्वीराज कपूर आणि बंधू राज कपूर यांच्यानंतर दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणारे कपूर कुटुंबातील ते तिसरे सदस्य होते. १६० चित्रपटांत त्यांनी काम केले होते. तीन वेळा त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार जिंकले होते. शशी कपूर यांचे ४ डिसेंबर २०१७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    शशी कपूर यांची गाणी
    https://www.youtube.com/watch?v=VO3EHeCKbEE
    https://www.youtube.com/watch?v=jZ-CQMDwiSc

      November 5, 2019