(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • जेष्ठ कलाकार अशोक कुमार

    अशोक कुमार यांचा जन्म १३ ऑक्टोबर १९११ रोजी झाला. कुंजालाल गांगुली व गौरी देवी हे त्यांचे आई-वडील. १९३६ मध्ये बॉंम्बे टॉकीज प्रॉडक्शनच्या जीवन नैय्या, या चित्रपटात मा.अशोक कुमार यांनी पहिल्यांदा काम केले. बॉलिवूडमधल्या दर्जेदार अभिनेत्यांपैकी ते एक होते. जीवन नैया या पहिल्याच चित्रपटाने नायक म्हणून लोकप्रिय केल्यानंतर त्याने तब्बल अर्धा डझन सिनेमात देविका राणीचा नायक म्हणून काम केलं. या व्यतिरिक्त ते इतर अभिनेत्रींसमोरही अनेक सिनेमांत हीरो म्हणून चमकले. वय झाल्यावर मोठमोठ्या हीरोंना निष्टूरपणे बाजूला सारणार्यान या चित्रपटसृष्टीत आपल्याला अभिनेता म्हणून टिकून रहायचं आहे, हीरोगिरी नाही करता आली तरी चालेल हे अशोक कुमार यांनी वेळीच ठरवलं होतं. त्यामुळे राज कपूर - देव आनंद - दिलीप कुमार या तीन दिग्गजांसमोर पन्नासच्या दशकात टिच्चून उभं राहिल्यानंतर नायक म्हणून असलेल्या आपल्या मर्यादांची संपूर्णपणे जाणीव असलेल्या अशोक कुमार यांनी अगदी सहज हातातले पिस्तुल आणि सिगारेट टाकून काठी आणि पाईप कधी घेतले ते समजलंच नाही. दादामुनींच्या बाबतीत दूरदर्शनवर केलेल्या कामगिरीचा उल्लेख केलाच पाहिजे. 'हम लोग' मालिकेच्या प्रत्येक भागाची प्रेक्षक जितक्या उत्कंठेने वाट बघत असत, तेवढीच उत्सुकता त्या भागाच्या शेवटी दादामुनींच्या त्या भागावर केलेल्या छोट्याशा भाष्याची आणि त्यांच्या त्या विशिष्ट प्रकारच्या हातवारे करत वेगवेगळ्या भाषेत 'हम लोग' म्हणण्याचीही असे. शम्मी कपूरबरोबर लग्नाच्या वरातीच्या पार्श्वभूमीवर केलेली पान परागची जाहिरातही प्रचंड लोकप्रिय झाली होती. सुमारे सहा दशकं त्यांनी बॉलिवूडवर आपल्या अभिनयाने भुरळ पाडली. या काळात त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित केले गेले. भारतीय चित्रपटांमधील त्यांच्या कामासाठी भारत सरकारने १९८८ मध्ये अशोक कुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने व १९९८ मध्ये पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित केले. अछुत कन्या, किस्मत, परिणीता, चलती का नाम गाडी, आशीर्वाद, छोटी सी बात, मिली, खुबसुरत, खट्टा मीठा, मि. इंडिया हे मा.अशोक कुमार यांचे गाजलेले चित्रपट. रेल गाडी रेल गाडी हे बॉलिवूडमधील पहिले रॅप गाणे त्यांनीच गायले आहे.
    मा.अशोक कुमार यांचे १० डिसेंबर २००१ निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • बिरादरीची माणसं – गोविंद काका

    असे हे आमचे गोविंद काका. बाबांना दिलेल्या शपथेला ध्यानात ठेऊन गोविंदकाकांचे कार्य आजही अविरत सुरु आहे. म्हणूनच लोक बिरादरीच्या सर्वात जुन्या कार्यकर्त्याला म्हणजेच आमच्या गोविंदकाकांना ‘बिरादरी’ चा सलाम!!

  • अभिनेते संजय जोग

    रामायण या मालिकेत आपल्याला भरतच्या भूमिकेत एक मराठी चेहरा पाहायला मिळाला होता. या मालिकेत भरतची भूमिका अभिनेता संजय जोग यांनी साकारली होती.

  • मराठी अर्वाचीन कादंबरीचे जनक हरी नारायण उर्फ ह.ना.आपटे

    ह. ना. आपटेंनी अनेक पुस्तकांना प्रस्तावनाही लिहिल्या. ह. ना. आपटेंनी साहित्याच्या अनेक प्रांतांत मुशाफिरी केली असली, तरी ते गाजले त्यांच्या कादंबरी लेखनामुळेच. बारा सामाजिक व अकरा ऐतिहासिक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्या सर्वच लोकप्रियही झाल्या. पण त्यांचे नाव आजतागायत गाजत राहिले, ते त्यांच्या ‘पण लक्षात कोण घेते?’ या कादंबरीमुळे. ही कादंबरी मराठी साहित्याच्या वाटचालीतील मैलाचा दगड बनून राहिली.

  • टॉम अॅण्ड जेरीचे दिग्दर्शक जीन डेच

    ऑस्कर पुरस्कार विजेते चित्रकार आणि टॉम अॅण्ड जेरीचे दिग्दर्शक जीन डेच यांचा जन्म ८ ऑगस्ट १९२४ रोजी झाला.

    जीन डेच यांचे संपूर्ण नाव युजीन मेरील डेच असं होतं. त्यांनी सुरुवातीला त्यांनी नॉर्थ अमेरिकन एव्हीएशन कंपनीमध्ये ड्राफ्टमन म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांनी त्यांनी लष्करासाठी काम केलं आणि नंतर त्यांनी वैमानिक होण्याचे प्रशिक्षण घेतलं. १९४४ साली आरोग्याशी संबंधित अडचणींमुळे त्यांनी हे क्षेत्र सोडलं आणि ते पुन्हा कमर्शियल आर्टकडे वळले. तिथून त्यांच्या अॅचनिमेशन क्षेत्रातील प्रवासाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

    १९५८ साली जीन डेच यांना त्यांच्या सिडनीज फॅमेली ट्री या चित्रपटासाठी अकॅडमी पुरस्कारांचे (ऑस्कर्स) नामांकन मिळालं. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच १९६० साली त्यांना मुनरो या त्यांच्या अॅ निमेशन चित्रपटासाठी सर्वोत्तम अॅननिमेशनपट म्हणून नामांकन मिळालं. त्यानंतर १९६४ साली हियर्स नूडनीक आणि हाऊ टू अवॉइड फ्रेण्डशीप या दोन चित्रपटांसाठी जीन यांना सर्वोत्तम अॅयनिमेशनपट कॅटेगरीमध्ये नामांकन मिळालं होतं. जीन डेच यांनी ट्विटीयथ सेंच्यूरी फॉक्स या कंपनीसाठी टेरीटून्सचे दिग्दर्शक म्हणून काम केलं. त्यांनी तेथे सिडनी द एलिफंट, गॅस्टॉन ली क्रेऑन, क्लिट कॉब्लर आणि टेरीबल थॉम्पसन सारखी कार्टून कॅरेक्टर स्वत: निर्माण केली.

    १९६० च्या दशकात जीन यांनी रेम्ब्रँट फिल्म्सबरोबर काम करताना पोपॉय कॉर्टून सिरीजची निर्मिती केली. त्यानंतर त्यांनी मेट्रो-गोल्डवॅन-मायरसोबत काम करताना टॉम अॅकण्ड जेरीचे अनेक लहान लहान कार्यक्रमांची निर्मिती केली होती. जीन डेच हे किग्स फिचर्सच्या ‘क्रेझी कॅट’ या टीव्हीवरील कार्यक्रमाचे सहनिर्माते होते. तर त्यांनी लहान मुलांसाठी ‘द ब्लफर्स’ या अगदी नव्या सिरीजची निर्मिती केली होती. जीन डेच यांचे निधन १६ एप्रिल २०२० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

  • रत्नाकर मतकरी

    रत्नाकर मतकरी यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९३८ रोजी झाला. रत्नाकर मतकरी गेली अनेक वर्षे अविरत लेखन करणारे नाटककार, दिग्दर्शक, निर्माते, बालनाटय़ चळवळीचे अध्वर्यु, साहित्यिक, स्तंभलेखक, चित्रकार, चित्रपट व मालिका लेखक, एकपात्री कथाकथनकार अशा विविधांगी भूमिका लीलया निभावणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. प्राथमिक शिक्षण रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये तर माध्यमिक शिक्षण राममोहन इंग्लिश स्कूल मध्ये झालं. १९५४ साली एस. एस. सी. तर एल्फिन्स्टन कॉलेजमधून १९५८ साली बी. ए. पदवी मिळविली. १९७८ पर्यंत त्यांनी बँक ऑफ इंडियात नोकरी केली आणि त्यानंतर मात्र त्यांनी स्वतःला नाट्यक्षेत्राला वाहून घेतलं.

    मतकरी यांनी १९५५ साली वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी रेडिओसाठी ‘वेडी माणसे’ ही श्रृतिका लिहून त्यांनी लेखनास प्रारंभ केला. विजय तेंडुलकर आणि मतकरी हे तसे समकालीन. साधारणत: एकाच वेळी त्यांनी नाटय़लेखनास सुरुवात केली. मतकरींनी नाटय़लेखनात अनेक ‘प्रयोग’ केले. बालनाटय़ापासून प्रायोगिक, व्यावसायिक अशी सर्व प्रकारची नाटके त्यांनी लिहिली. ‘माझं काय चुकलं?’ ‘लोककथा ७८’, ‘आरण्यक’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘घर तिघांचे हवे’, ‘बकासुर’ आदी नाटकांतून त्यांच्या चतुरस्र शैलीचा वानवळा मिळतो. त्यांनी ‘बालनाटय़’ आणि ‘सूत्रधार’ या संस्था स्थापन करून त्याद्वारे निर्मिती व दिग्दर्शनही केले. आजवर ३५ हून अधिक नाटके त्यांच्या नावावर आहेत. इंदिरा गांधी यांच्या अखेरच्या दिवसांवर त्यांनी लिहिलेले नाटक करण्याचे धाडस मात्र अद्याप कुणा निर्मात्याने दाखविलेले नाही.

    चाय-खोका बालनाटय़ चळवळीद्वारे त्यांनी बालनाटय़े सर्वदूर पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले. मराठी गूढकथा आणि रत्नाकर मतकरी असे समीकरण जुळले त्याला आता कैक वर्षे उलटून गेली आहेत. ‘गूढकथा लिहणे ही त्यांची आणखी एक ओळख. मा.मतकरी यांचा एक वाचकवर्ग आहेच. शिवाय त्यांच्या गूढकथांचा असा एक वाचक वर्ग तयार झाला आहे. आपल्या गूढकथांवर ‘गहिरे पाणी’ या मालिकेचीही त्यांनी निर्मिती केली. भयकथेमध्ये भयाला, तर गूढकथे मध्ये कथेला महत्त्व आहे. मानसशास्त्रीय दृष्टिकोन, मानवी संबंध, सामाजिक प्रश्न अशा वेगवेगळ्या पातळीवर गूढकथेच्या माध्यमातून आशय अभिव्यक्त करता येतो.

    गूढकथा आकृतीबंधाच्या या शक्यताच समीक्षकांच्या ध्यानात आल्या नाहीत. त्यामुळे गूढकथेचे महत्त्व मराठी साहित्याला समजलेच नाही, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक-नाटककार रत्नाकर मतकरी यांना आहे. इन्व्हेस्टमेंट’ या आपल्या कथेवरील चित्रपटाचे लेखन, निर्मिती व दिग्दर्शनही त्यांनी केले. सामाजिक जाणिवेच्या चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार त्याला मिळाला. रेडिओ, दूरदर्शन, चित्रपट, रंगभूमी, एकपात्री कार्यक्रम, चित्रकारिता, सामाजिक चळवळी असा चौफेर संचार त्यांनी आयुष्यभर केला. या प्रत्येक क्षेत्रात काहीतरी वेगळे करण्याचा नेहमीच त्यांचा प्रयत्न राहिला. १९९५ साली निर्भय बनो आंदोलनात त्यांनी सक्रीय सहभाग घेतला. काही वर्षांमागे ‘अॅलडम’ ही लैंगिकतेवरील कादंबरी लिहून त्यांनी खळबळ उडवून दिली होती. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • गायिका गौरी पाठारे

    २०१९ मध्ये स्वरानंद प्रतिष्ठानचा माणिक वर्मा पुरस्कार गौरी पाठारे यांना मिळाला आहे. या बरोबरच गौरी पाठारे यांना अनेक पुरस्कार, मान-सन्मान, कौतुक मिळाले आहे. त्यांच्या गाण्याला लोकांनी भरभरून प्रेम व संधी दिली. गौरी पाठारे यांनी देश विदेशात अनेक मैफिली केल्या आहेत.

  • कॉमन मॅन’चं मूर्तिमंत उदाहरण असलेले मनोहर पर्रीकर

    साधी राहणी, स्वच्छ प्रतिमा आणि हसरा चेहरा…’कॉमन मॅन’चं मूर्तिमंत उदाहरण असलेले गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सर्वांना नेहमी आपल्यातलेच एक वाटले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, भाजपचा सामान्य कार्यकर्ता, गोव्याचे मुख्यमंत्री ते देशाचे संरक्षण मंत्री असा पर्रीकर यांचा थक्क करणारा प्रवास होता मात्र यशाची अनेक शिखरं गाठूनही त्यांनी त्यांच्यातला ‘कॉमन मॅन’ अखेरच्या श्वासापर्यंत जपला…

  • मोहक मोहिनी – गिरिजा जोशी

    अभिनेत्री गिरिजा जोशी तिचा उठावदार बोलका चेहरा, पारंपरिक आणि पाश्चिमात्य या दोन्ही पेहरावांसाठी अनुरूप आहे.

    ‘गोविंदा’, ‘प्रियतमा’, ‘धमक’, ‘देऊळ बंद’, ‘वाजलंच पाहिजे’ यासारख्या रूपेरी पडद्यावरच्या कलाकृतींमधून वेगळ्या धाटणीच्या भूमिकांतून नेहमीच अभिनेत्री म्हणून समोर आलेल्या गिरिजा जोशीने अल्पावधीतच आपला चाहता वर्ग तयार केला. पदार्पणापासूनच तगडय़ा कलाकारांसोबत अभिनय साकारलेल्या गिरिजाने आपला कसदार अभिनय सादर करत अभिनय क्षेत्रावर आपली वेगळी छाप पाडली. अभिनयासोबतच शास्त्रीय संगीत आणि कथ्थक नृत्याची जाण असलेल्या गिरिजाचा मोहक चेहरा अल्पावधीतच घराघरात पोहचला.

    गिरिजाने २०१३ साली ‘गोविंदा’ या सिनेमातून सिनेइंडस्ट्रीत प्रवेश केला. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलंच नाही. गिरिजाने आज अभिनय क्षेत्रात आपला वेगळा ठसा जरी उमटवला असला तरीही लहानपणी तिला अभिनय क्षेत्रात यावं असं अजिबात वाटत नव्हतं. गिरिजाला खरंतर एअर होस्टेस म्हणून करीअर करायचं होत. मात्र गिरिजाच्या वडिलांनी तिच्यातला कलाकार बालपणीच हेरला आणि तिला अभिनयाची गोडी लावली. ‘ऐश इज बार्ंनग’ या तिने अभिनय साकारलेल्या एकांकिकेला राज्यस्तरीय पारितोषिकं लाभली आणि हाच दिवस गिरिजासाठी टार्ंनग पॉइंट ठरला.

    गुढीपाढवा निमित्ताच्या विशेष फोटोशूटसाठी मला गिरिजाचं फोटोशूट करण्याची संधी मिळाली होती. या पाडव्याच्या शूटसाठी तिची वेशभूषा आणि तिचा एकूणच लूक कसा असेल हे तिच्याशी बोलून शूटचा दिवस आम्ही निश्चित केला. मॉर्डन टच असलेला पारंपरिक साज आम्ही निश्चित केला होता. हा मॉर्डन टच असलेला पारंपरिक साज लक्षात घेऊन तशीच वेशभूषा आणि रंगभूषा तिची करण्यात आली होती. पिवळ्या उठावदार रंगाची साडी, त्यावर साजेसा दिसेल असा हातात पांढऱया-लाल रंगांचा चुडा, नाकात मोत्यांची नथ, कलाकुसर केलेले दागिने, केसात मळलेला गजरा, कपाळावर टिकली असा तिचा शृंगार होता. तिचा हाच मोहक चेहरा कॅमेराबद्ध करण्यासाठी मी प्रयत्न करत होतो. गुढीची पूजा करतानाचे तिचे काही फोटो मी टिपले. वृत्तपत्राची गरज असलेले फोटो टिपल्यानांतर याच वेषभूषेतले तिचे काही पोर्टेट मी टिपले. तिच्या चेहऱयावरचं स्मितहास्य आणि सोनेरी झाक असलेली लायटिंग यामुळे मला एका पाठोपाठ एक असे अनेक चांगले फोटो टिपता आले.

    पारंपरिक वेषभूषेतल्या लूकनंतर गिरिजाचं ग्लॅमरस फोटोशूट करायचं ठरलं होतं. यासाठी तिचा मेकओव्हर करावा लागणार होता. मेकओव्हरला साधारणपणे एक-दीड तास जाईल हे हेरून माझी टीम पुढच्या लायटिंगच्या तयारीला लागली. शूटच्या मध्ये बराच वेळ होता. याच वेळी गिरिजा तिच्या अभिनयाच्या प्रवासाबद्दल सांगत होती. तिला खरंतर एअर होस्टेस म्हणून करीअर करायचं होतं. पुढे त्या दिशेने तिने अभ्यासदेखील सुरू ठेवला होता. रुईया महाविद्यालयातून पॉलिटिक्स आणि सायकोलॉजी (मानसशास्त्र) या विषयांचं पदवी शिक्षण पूर्ण केलं. तर यानंतर सायकॉलॉजीचं पदव्युत्तर शिक्षणदेखील तिने पूर्ण केलं होत. गिरिजाचे वडील त्याकाळचे उत्तम दिग्दर्शक होते. त्यांच्याकडूनच गिरिजाला अभिनयाचं बाळकडू मिळालं. अभ्यासाच्या जोडीनं गिरिजाला लहानपणापासूनच नृत्य आणि संगीत याची वेगळी गोडी होती. पाचवीत असल्यापासून तिने गुरुवर्या गांगल यांच्याकडून शास्त्रीय संगीताचा नियमित अभ्यास करण्यास सुरुवात केली होती. तर यांच्या जोडीने पं.गोपीकृष्ण यांचे शिष्य राजकुमार केतकर यांच्याकडून तिने कथ्थकचे धडे गिरवले. हाच नृत्यकलेचा उपयोग तिला पुढे झाला. महाविद्यालयात तिने दीपाली विचारे हिच्या मार्गदर्शनाखाली अनेक नृत्य कार्यक्रमांतही सहभाग नोंदवत आपल्या नृत्याची चुणूक दाखवल्याचे ती सांगत होती.

    पारंपरिक लूकनंतर आता गिरिजाचा मॉर्डन आणि ग्लॅमर्स लूक होता. गोविंदा आणि प्रियतमा या सिनेमांतून तिची मध्यमवर्गीय स्त्राrची तसेच गावरान महिलेची भूमिका समोर आली होती. मात्र यापलीकडे गिरिजा किती बोल्ड आणि ब्युटीफुल आहे हे दाखवण्यासाठी तिचा ग्लॅमरस मेकओव्हर करण्याचं आम्ही ठरवलं होत.

    पारंपरिक साडीनंतर गिरिजाने गडद काळ्या रंगाचा वनपीस परिधान केला होता. वेशभूषा लक्षात घेऊन ‘लो की’ (low key) लायटिंग करून तिचे काही मिड शॉटस् आणि हेडशॉटस मी कॅमेराबद्ध केले. तर यानंतर पुन्हा लूक बदलून तिने गुलाबी रंगाचा टॉप आणि हॉट पॅन्ट परिधान केली. यात गिरिजा अधिकच बोल्ड दिसत होती. तिच्या या लूकमधल्या दिलखेच अदा मी कॅमेराबद्ध केल्या. अर्थात तब्बल सहा तास चालेल्या या एकूण शूटनंतर आणि नऊ जणांच्या अथक मेहनती अंती गिरिजाचे विविध लूक मला कॅमेराबद्ध करण्यात यश आले होते.

    गोविंदा आणि प्रियतमा या सिनेमांतून गिरिजाची समोर आलेली प्रतिमा पुसून तिने पुढे काही सिनेमात अभिनय साकारण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या ‘चूक भूल द्यावी घ्यावी’ या आगामी सिनेमातून तिचा हा बोल्ड लूक समोर येईल. तर आगामी ‘रघु रोमिओ’ या सिनेमातही तिने साच्याबाहेरील अभिनय साकारल्याचं पाहायला मिळणार आहे. आपल्या कसदार अभिनयानं वेळोवेळी रसिकमन जिंकलेल्या गिरिजानं अथक मेहनतीने आणि परिश्रमाने तिचा पुढचा अभिनयाचा प्रवास सुरू ठेवला आहे. आगामी सिनेमांतून गिरिजा आपल्या अभिनयानं यापुढेही यशाचा आलेख उंचच उंच ठेवेल.

    धनेश पाटील
    dhanuimages@gmail.com

  • जुन्या हिंदी चित्रपट सृष्टीतील नायक व चरित्र अभिनेता मोतीलाल

    मोतीलाल राजवंश उर्फ मोतीलाल हे आपल्या ऐटबाज व्यक्तिमत्त्वाने व सहजसुंदर अभिनयाने रसिकांवर मोहिनी घालणारे अभिनेते अशी त्यांची ओळख होती. त्यांचा जन्म ४ डिसेंबर १९१० रोजी सिमला येथे झाला. मोतीलाल यांचे शिक्षण सिमला येथे झाले. कॉलेज संपल्यावर मोतीलाल मुंबईला नौसेनेत जाण्यासाठी आले होते. पण काही कारणाने ते झाले नाही व हिंदी चित्रपट सृष्टीला एक भारदस्त नट मिळाला. १९३४ मध्ये सागर फिल्म कंपनीच्या शहर का जादू या चित्रपटात नायक म्हणून पहिले काम केले. मोतीलाल यांचे गाजलेले चित्रपट 'शादी', आई-'परदेसी', ,'अरमान', 'ससुराल', 'मूर्ति', 'देवदास', जागते रहो व अछूत कन्या. मोतीलाल यांचे जागते रहो मधील गाणे 'ज़िंदगी ख्वाब है' हे गाणे त्या काळी खूपच गाजले होते. मोतीलाल यांचे १७ जून १९६५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    'ज़िंदगी ख्वाब है' हे गाणे
    https://www.youtube.com/watch?v=GQZaG5SZRYk
    https://www.youtube.com/watch?v=y5JcBpFMkKw